Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
शेतीमध्ये अणुऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे - डॉ. एस. टी. म्हेत्रे

व्हीएस न्यूज - अणुऊर्जेचा वापर हा वीज निर्मिती, कॅन्सर रोगांवर इलाज, औद्योगिक क्षेत्र, शेती आणि अन्न धान्यांची साठवणूक, मूलभूत संशोधनांमध्ये केला जातो. शेती क्षेत्रामध्ये अणुऊर्जेचा वापर करून अनेक महत्वपूर्ण शोध लावले असून शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि शेती उत्पादन वाढवावे. असे आवाहन बीएआरसीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. एस.टी.म्हेत्रे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे मुंबईतील भाभा ॲटोमीक रिसर्च सेंटरच्या (बीएआरसी) वतीने ‘शांतता, शक्ती आणि प्रगती साठी अणु ऊर्जा’(ATOMIC ENERGY FOR PEACE, POWER AND PROSPERITY)या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत मार्गदर्शन करताना डॉ. एस.टी. म्हेत्रे बोलत होते. यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रिजचे मुख्य व्यवस्थापक जी. के. पिल्लई, इंडियन न्युक्लिअर सोसायटीचे सचिव आर. के. सिंग,पीसीओेईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, बीएआरसीचे समुह संचालक आर. एस. यादव, ज्येष्ठ संशोधक हेमंत शिंपी, संगणक विभाग प्रमुख प्रा. महेंद्र साळुंके आदींसह अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. म्हेत्रे मार्गदर्शन करताना म्हणाले की, उत्परिवर्तन ही निसर्गनिर्मित प्रक्रिया असून जनुकांमध्ये बदल होत असतात. परंतु हे बदल होण्यासाठी जास्त काळ लागतो. विकिरणांच्यामुळे ही बदल होण्याची क्रिया आपण अधिक वेगाने घडवून आणू शकतो. कारण विकिरणांमुळे जनुकांमध्ये बदल केले जातात आणि त्यापासून नवीन प्रजाती विकसित केली जाते. अशा प्रकियेच्या मदतीमुळे भाभा अणु संशोधन केंद्राने पिकांच्या 42 जाती विकसित केल्या आहेत. तसेच कडुनिंब एक प्रभावी कीड नाशक आहे. लिंबोळ्याच्या बि मध्ये तेल असते ज्यामध्ये अझाडिरॅक्टिन नावाचा घटक असतो. त्यामुळे लिंबोळीमध्ये कीडनाशक गुणधर्म आढळतात. याचे तंत्रज्ञान बीएआरसी आणि विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT) नागपूर यांनी मिळून विकसित केले आहे. यामध्ये लिंबोळीपासून पावडर बनवली जाते आणि त्याच्या कणांची जाडी जसजशी कमी होईल तसे त्याचा प्रभाव वाढल्याचे आढळून आले आहे. हे तंत्रज्ञान खाजगी कंपनीला हस्तांतरित केलं असून थोड्याच काळात यावर आधारित उत्पादन बाजारांत दाखल होईल. रासायनिक औषधे आणि खतांच्या अतीवापरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून नापीक जमिनीची आकडेवारी फुगत चालली आहे. या रासायनिक शेतीने माती, हवा, पाणी जेव्हा मृतवत होईल. तेंव्हा मानवाचे डोळे उघडतील आणि मगच नैसर्गिक शेतीचे महत्व लोकांना समजेल व लोक नैसर्गिक शेतीकडे वळतील. परंतु आता जमिनी खराब होण्याची वाट न बघता सर्व शेतक-यांनी लवकर या पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. असे घडले तर भविष्यकाळ उज्वल होईल यात शंका नाही. भाभा अणु संशोधन केंद्राने अशा प्रकारे शेतीच्या विविध क्षेत्रामध्ये भरीव योगदान केले आहे. शांततेसाठी अणु ऊर्जेचा वापर कसा करता येऊ शकतो हे येथील शास्त्रज्ञांनी आपल्या अथक प्रयत्नाने आपल्याला दाखवून दिले आहे. आता या तंत्रज्ञानाचा सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असेही आवाहन डॉ. एस.टी. म्हेत्रे यांनी केले.

ही परिषद यशस्वी करण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी मार्गदर्शन केले. स्वागत प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, सूत्रसंचालन प्रा. मानसी कुरकुरे आणि आभार प्रा. जमीर कोतवाल यांनी मानले.

...Read More

V. S. News
‘यशार्थ’सारखे अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

व्हीएस न्यूज - बदलत्या माध्यमांच्या स्वरूपामुळे शासकीय जनसंपर्कात समाजमाध्यमांचा प्रभावी व सकारात्मक वापर ही काळाची गरज आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या धुळे जिल्हा माहिती कार्यालयाचे डिजिटल साप्ताहिक ‘यशार्थ’चा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

धुळे येथे नियोजन सभागृहात धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा माहिती कार्यालयाच्या‘यशार्थ’ या डिजिटल साप्ताहिकाच्या ‘दुष्काळासंगे लढाया... तुफान आलंया’ ! या वॉटर कप स्पर्धेवरील विशेषांकाचे प्रकाशन मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, दक्षता व गुणवत्ता विभागाचे अभियंता एस. एस. पाटील, अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री.पाटील म्हणाले, अभिनव व नावीण्यपूर्ण जनहिताच्या उपक्रमांचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाची आहे. ‘यशार्थ’ या डिजिटल साप्ताहिकाच्या माध्यमातून अत्यंत कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांत निर्माण केलेल्या नेटवर्कची किमया, त्यातील सातत्य व वाचकांची वाढती संख्या निश्चितच प्रशंसनीय आहे. त्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी, कर्मचारी यांचे व ‘टीम यशार्थ’चे अभिनंदन करायला हवे. लोकाभिमुख शासनाची प्रतिमा निर्माण करणारे असे अभिनव प्रयोग प्रत्येक जिल्ह्यातून सुरू व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतरत्न आदरणीय अटलबिहारीजी वाजपेयी यांचा जन्मदिन तथा सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘यशार्थ’ च्या अंकाचे प्रकाशन केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांचे कौतुक करून मंत्री श्री.पाटील यांनी ‘यशार्थ’ च्या सर्व अंकांचे अवलोकन केले. तसेच निर्मितीची प्रक्रिया, विषयाची निवड, डिझायनिंग, व्हायरल करण्याचे तंत्र, त्यास मिळत असलेल्या प्रतिसाद यांची माहिती करून घेतली.

‘यशार्थ’ विकास प्रशासनाचा आरसा - पर्यटनमंत्री जयकुमार रावल

‘यशार्थ’ची संकल्पना राज्यात सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर धुळे जिल्ह्यात राबविण्यात आली. त्याला अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद, उपयुक्तता व त्याची गरज बघून त्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. ‘यशार्थ’ विकास प्रशासनाचा आरसा असून जिल्ह्यातीलच नाही, तर राज्यातील महत्वाच्या घडामोडी व त्याचे जिल्ह्यावर होणारे सकारात्मक परिणामांचे प्रतिबिंब त्यात नियमितपणे उमटताना दिसते. डिझायनिंग, विषय निवडीचे टायमिंग यामुळे डिजिटल युगातल्या रिडर्सला त्याने भुरळ घातली आहे.‘यशार्थ’ ला मिळणारा प्रतिसाद हा जिल्हा प्रशासन व जिल्ह्याची नवी ओळख आणि प्रतिमा निर्माण करणारा आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आम्ही एक परिणामकारक, व्यापक तसेच थेट जनतेत भिडणारा उपक्रम राबवू शकलो याचे समाधान आपणांस असल्याचे मनोगत यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केले. ‘यशार्थ’च्या उपक्रमाची संकल्पना, उद्देश व चालू अंकाच्या विषयाची पार्श्वभूमी तसेच वाचकांचा प्रतिसाद याबतची माहिती यावेळी प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपाळ साळुंखे यांनी केले, तर सादरीकरण मनोहर पाटील व संदीप गावित यांनी केले.

...Read More

V. S. News
भारत-अफगाणिस्तानचे उद्योग व्यापार संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत - राज्यपाल

काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु

व्हीएस न्यूज - काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु झाल्याने अफगाणिस्तान आणि भारताचे उद्योग-व्यापारविषयक संबंध अधिक वृध्दिंगत होतील असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी व्यक्त केला. राजभवन येथे अफगाणिस्तानच्या वाणिज्‍य शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध प्राचीन आहेत. शेकडो वर्षापूर्वी दोन्ही देशांदरम्यान व्यापार चालायचा. आज पुन्हा त्या जुन्या संबंधाना उजाळा मिळाला आहे. दोन्ही देशात पर्यटनाला चांगला वाव आहे. अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी भारत ठामपणे उभा राहिलेला आहे. राजनैतिक संबंध उत्तम प्रकारे प्रस्थापित झाले आहेत. दोन्ही देशादरम्यान व्यापार विषयक देवाण-घेवाण वाढली पाहिजे. त्यासाठी विविध शहरे विमान सेवेने जोडली पाहिजेत, म्हणजे उद्योग-व्यवसायाला चालना मिळून पर्यटन क्षेत्राचा विकास होईल.

अफगाणिस्तान मधील सुकामेवा (ड्रायफ्रुटस) भारतात प्रसिद्ध आहे, तर भारतातील मोती आणि मोत्यांचे दागिने अफगाणिस्तानात प्रसिद्ध आहेत. असे सांगून ते म्हणाले, भारताने जवळपास 16 हजार अफगाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली आहे. पुणे,मुंबई आणि अन्य शहरात ते उच्च शिक्षण घेत आहेत. भारताने अफगाणिस्तानात अनेक शाळा सुरु केल्या आहेत. दहशतवाद संपविणे हे दोन्ही देशाचे उद्दिष्ट आहे. व्यापार आणि उद्योग व्यवसायात दोन्ही देशांनी चांगली भरारी घेतली तर अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. भारतातील अनेक भाषातील चित्रपटाचे चित्रीकरण हे अफगाणिस्तानात केले जाते. तेथील सुंदर प्रेक्षणीय स्थळांची मोहिनी भारतीयांवर आहे. त्याच बरोबर भारतीय चित्रपटाचा खास शौकीन वर्ग अफगाणिस्तानात आहे. असेही शेवटी राज्यपाल म्हणाले. प्रारंभी अफगाणिस्तानचे राजदूत मोहमंद झीया सालेही यांनी राज्यपाल विद्यासागरराव यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कार्गो सेवेद्वारे दाखल फळांची पहिली पेटी राज्यपाल विद्यासागर राव यांना सन्मानपूर्वक भेट दिली. या भेटी दरम्यान अफगाणिस्तान दूतावासातील अधिकारी, व्यापारी शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काबूलचे सफरचंद मुंबईत

काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु झाल्याने फळे आणि भाजीपाला आयात-निर्यातीला चालना मिळणार आहे. कालच जवळपास 40 टन सफरचंद घेऊन अफगाणिस्तानचे विमान मुंबईत दाखल झाले. आता नियमित विविध फळे, सुकामेवा येथील बाजार पेठेत उपलब्ध होणार आहेत. भारतातील केळी आणि द्राक्षाला चांगली मागणी असल्याचे अफगाण शिष्टमंडळाने चर्चा करताना सांगितले.

अफगाणिस्तानचे व्यापारी शिष्टमंडळ आणि मुंबईतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांची एकत्रित बैठक घेऊन फळे, भाजीपाला व अन्य जिवनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण वाढविण्याबाबत चर्चा घडवून आणण्याच्या सूचना यावेळी राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी दिल्या. यावेळी सर्वश्री हाजी मोहमंद (आशिक अफगाण लि.) हाजी फरहार (फरहाद लि.) हाजी सादुद्दीन (खंदा फूड लि.), हाजी अहमद शाह (अल मन्सूर झम झम लि.), मोहमंद अली खान (क्रिस्टाल इन्टरप्राईजेस) आदी उद्योग-व्यापारविषयक शिष्टमंडळातील व्यापाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी राज्यपाल यांचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, पणन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
जपानशी सामंजस्य करार

व्हीएस न्यूज - नवी मुंबईसह कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या टप्पा एक व टप्पा दोनच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जपानचे परिवहन जमीन पायाभूत सुविधा आणि पर्यटन मंत्री किशी इशी यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि कंत्राटदार यांच्यातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली.

याप्रसंगी भारतातील जपानच्या दूतावासाचे वित्तीय आणि विकासमंत्री केनको सोने, मुंबईतील जपानचे वाणिज्य दूत रोजी नोदा, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीचे (जायका) भारतातील वरिष्ठ प्रतिनिधी ताकायोशी तांगे आदी उपस्थित होते. एमटीएचएल या प्रकल्पासाठी जायका कर्ज स्वरूपात निधी पुरविणार आहे. हा एकूण दोन 2.8 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 17 हजार 843 कोटी रुपये) प्रकल्प आहे. त्यापैकी 85 टक्के म्हणजेच सुमारे 15 हजार शंभर कोटी रुपये जायका एमएमआरडीएला देणार आहे. टप्पा एक हा 10.38 कि.मी. चा असून त्याचे बांधकाम एल अँड टी आणि आयएचआय, जपान यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी 7 हजार 767 कोटी रुपये खर्च येणार आहे. टप्पा 3 हा 3.60 कि.मी. चा असून बांधकाम एल अँड टी करणार आहे त्यासाठी 1 हजार 13 कोटी 79 लाख रुपये खर्च होणार आहे. याप्रसंगी एमएमआरडीए आणि एल अँड टी आणि आयएचआय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी एल अँड टी च्या अवजड नागरी पायाभूत सुविधा व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख एस. व्ही. देसाई, आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कं.लि.चे अध्यक्ष ताकेशी कावाकामी, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे तसेच संजय खंदारे आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
अधिकारी - मालकावर फौजदारी गुन्हे दाखल होणार - मुख्यमंत्री

कमला मिल आग प्रकरण : पाच अधिकारी निलंबित

व्हीएस न्यूज - कमला मिल आवारातील आग दुर्घटनेप्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या आणि प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या मुंबई महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी बेकायदेशीररित्या परवानग्या दिल्याचे स्पष्ट झाल्यास अधिकाऱ्यांवर तसेच संबंधित मालक-चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजो आणि वन अबव्ह या उपाहारगृहांना (पब-रेस्टो) गुरुवारी मध्यरात्री आग लागून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करून 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या पाच अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. मात्र, घटनेतील मृत्यूप्रकरणी अधिकारी किंवा संबंधित मालक जबाबदार असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी व इतर गुन्हे दाखल करण्यात येतील. दोषींवर निश्चित कारवाई केली जाणार असून कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अशा पद्धतीने परवानग्या देण्यात आलेल्या इमारतींचे तत्काळ सुरक्षा ऑडिट करण्यासह विनापरवानगी करण्यात आलेली व सुरू असलेली बांधकामे युद्धपातळीवर तोडण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

...Read More

V. S. News
महाराष्ट्रातील 116 शाळांमध्ये अटल "टिंकरिंग" लॅब

व्हीएस न्यूज - नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या `अटल टिंकरिंग लॅब` या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 1504 शाळांचा समावेश करण्यात आला आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 116 शाळांचा समावेश आहे. नीती आयोगाने नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनाना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात गेल्यावर्षी देशातील928 शाळांचा या अभिनव योजनेत समावेश करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 75 शाळांचा समावेश होता. आता महाराष्ट्रातील 191 शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील 388 जिल्हे व 79 स्मार्ट शहरातील 2 हजार 432 शाळांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील 116 शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा -

शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे व कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहे, यासाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळांना 20 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

निती आयोगाने जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 116 शाळांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 11 शाळांचा समावेश आहे तर मुबई शहरामधील 10 शाळा तर त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील 10 शाळांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील निवड झालेल्या शाळांची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, अहमदनगर- 04, अकोला -01, अमरावती- 06, बीड- 01, बुलडाणा- 04, चंद्रपूर- 01, धुळे- 02,गडचिरोली- 02, गोंदिया- 07, हिंगोली- 01, जळगाव- 03, जालना- 01, कोल्हापूर- 10, लातूर- 04, मुंबई शहर- 10, मुंबई उपनगर- 04, नागपूर- 07, नांदेड- 01, नंदुरबार- 01, नाशिक-05, उस्मानाबाद- 02, पुणे- 11, रायगड- 02, रत्नागिरी-02, सांगली- 02, सातारा- 08, सोलापूर- 02, ठाणे- 03, वर्धा- 02, वाशीम- 04 आणि यवतमाळ- 03.

...Read More

V. S. News
कोल्हापूर पासपोर्ट वितरणात देशात प्रथम

व्हीएस न्यूज - देशातील नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने सुरु झालेल्या नवीन पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाचमध्ये राज्यातील तीन शहरे असून पिंपरी चिंचवड दुसऱ्या तर औरंगाबाद पाचव्या स्थानावर असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली. देशात 251 केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून यातील पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात आलेल्या देशातील 59केंद्रापैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहरे पहिल्या पाचमध्ये आहेत.

कोल्हापुरातून 21 हजार 95 पासपोर्टचे वितरण -

कोल्हापूर पासपोर्ट सेवा केंद्रातून 21 हजार 95 पासपोर्टचे वितरण करण्यात आले. देशात सर्वाधिक पासपोर्ट वितरणाचा हा उच्चांक आहे. पिंपरी चिंचवड पासपोर्ट वितरण केंद्रातून 20हजार 83 तर औरंगाबाद केंद्रातून 14 हजार 973 पासपोर्ट वितरित करण्यात आले. कर्नाटकातील म्हैसूर तिसऱ्या क्रमांकावर असून या केंद्रातून 16 हजार 446 आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या भूज (गुजरात) केंद्रातून 15 हजार 281 पासपोर्ट वितरित करण्यात आल्याची माहिती श्री. मुळे यांनी परिचय केंद्रास दिली आहे.

...Read More

V. S. News
भोंदू बाबांची दुसरी यादी आखाडा परिषदेने केली जाहीर

व्हीएस न्यूज : आखाडा परिषदेने दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनाम्यानंतर, साधू-संतांची प्रतिमा मलिन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितसह, उत्तर प्रदेशमधील बस्तीच्या सचिदानंद सरस्वती आणि अलाबादच्या त्रिकाल भवंता यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे.

१३ आखाड्याचे प्रमुख आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सहभागी होते. महंत नरेंद्र गिरी यांनी या बैठकीनंतर भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले. आखाडा परिषदेतून राजस्थानच्या अलवरचे फलाहारी बाबांनाही निलंबित केल्याची घोषणा गिरी यांनी यावेळी केली. २०१९मध्ये प्रयागमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याच्या तयारीसंदर्भात आढावा आखाडा परिषदेच्या या बैठकीत घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नव्या यादीत असलेला राजधानी दिल्लीत ‘आध्यात्मिक यूनिव्हर्सिटी’ नावाने एक आश्रम बाबा वीरेंद्र दीक्षित चालवत होता. तरुण मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण या आश्रमातून होत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी यात बाबाच्या एकूण पाच आश्रमतून १५० तरुणी आणि महिलांची सुटका केली आहे. बाबा वीरेंद्र दीक्षित सध्या फरार असून, दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचबरोबर आपल्या संत कुटिल आश्रमात बाबा सचिदानंद सरस्वती धर्म प्रसाराच्या नावावर २० वर्षांपासून तरुणींना शिष्य बनवत होता. त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे.

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्याची मूळ रहिवासी असलेली त्रिकाल भवंता ऊर्फ अनीता शर्माने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अलाहबादमधील एका खासगी रुग्णालयात काहीकाळ नर्स म्हणून काम केल्यानंतर अलाहाबादमधील दारागंजमध्ये स्वत: चे क्लीनिक सुरु केले. तिचे जवळपास २०वर्षांपूर्वी अलाहबादमधील राम शर्मा नावाच्या एका शिक्षकासोबत लग्न झाले. तिला एक मुलगा रवी शर्मा आणि एम मुलगी अपराजिता शर्मा अशी दोन मुले आहेत. हे दोघेही अलाहबादजवळच्या शहरात शिक्षण घेत आहेत. तिने नाशिकमधील कुंभ मेळ्यात महिलांचा स्वतंत्र आखाडा बनवून धर्माचार्यांनाच आव्हान दिल्यानंतर ती सर्वाधिक चर्चेत राहिली होती. दरम्यान, आखाडा परिषदेने यापूर्वी १० सप्टेंबर रोजी १४ भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. आसाराम बापू, गुरमीत राम रहीम, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, सच्चिदानंद गिरी, ओमबाब ऊर्फ विवेकानंद झा, नर्मल बाबा, स्वामी असीमानंद, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमूर्ती द्विवेदी, ओम नम: शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, कुश मुनी, मलखान गिरी, आणि बृहस्पती गिरी आदींचा या यादीत समावेश होता.

...Read More

V. S. News
दरमहा गॅस सिलिंडर दरवाढीचा आदेश मागे

व्हिएस न्यूज - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दरमहा चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अखेर मागे घेतला आहे. गरिबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन देण्याच्या ‘उज्ज्वला योजने’च्या उलट हा निर्णय असल्याने केंद्र सरकारने तो मागे घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी, केंद्र सरकारने जून 2016 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना गॅस सिलिंडरच्या दरात दरमहा चार रुपयांनी वाढ करण्याचे आदेश दिले होते. गॅस सिलिंडरवर दिले जाणारे अनुदान हळूहळू रद्द करण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र, कंपन्यांना देण्यात आलेल्या हा दरवाढीचा आदेश सरकारने ऑक्टोबरमध्ये मागे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी यावर्षी ऑक्टोबरपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलीही वाढ केली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात 14.2 किलो वजनाचे 12 सिलिंडर अनुदानित दराने मिळू शकतात. त्यानंतरचा प्रत्येक सिलिंडर बाजारभावाने विकत घ्यावा लागतो. या अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात दरमहा वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, एकीकडे ‘उज्ज्वला योजने’त गरिबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येत असताना दुसरीकडे दर महिन्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत होते. त्यामुळे या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीका होत होती. हा विरोधाभास लक्षात घेऊन दरमहा दरवाढीचा निर्णय सरकारने मागे घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे; परंतु त्याला सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना गॅस सिलिंडरच्या दरात दरमहा दोन रुपयांनी वाढ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर 1 जुलै 2016 पासून तेल कंपन्यांनी दहा वेळा गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या होत्या. सरकारच्या आदेशानुसार तेल कंपन्यांनी 30 मे 2017 रोजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये दुप्पट वाढ करण्यास सुरुवात केली होती.
त्यामुळे 1 जून 2017 पासून कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमती दरमहा चार रुपयांनी वाढविल्या होत्या. मार्च 2018 पर्यंत गॅसवरील संपूर्ण अनुदान रद्द करण्याचे सरकारचे उद्दिष्ट होते. या दरवाढीत ‘व्हॅट’चा समावेश नव्हता. अखेर हा आदेश केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये मागे घेतला आहे. मात्र, ऑक्टोबरनंतरही गॅस सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. त्याचे कारण कराचा मुद्दा असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर आता गॅस सिलिंडरवर बाजारभावानुसार जीएसटीची आकारणी होत आहे. गेल्या वर्षी जुलैपासून तब्बल 19 वेळा गॅस सिलिंडरच्या दरात एकूण 76 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 1 नोव्हेंबर रोजी शेवटची वाढ 4.50 रुपयांनी झाली होती. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर रोजी अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 495.69 रुपये झाली होती. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरातही 1 डिसेंबर रोजी 5 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 747 रुपये झाली आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
...Read More

V. S. News
मनातील खंत अजित पवारांना सांगितली - खडसे

व्हिएस न्यूज - राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या सत्कार सोहळ्याला मी उपस्थीत असलो तरी, तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही. माझ्या मनात जे आहे ते मी अजित दादांच्या कानात सांगितले आहे, असे विधान माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज सायंकाळी जळगाव येथे केले. हाच धागा पकडून अजित पवार म्हणाले की, खडसे यांनी जे माझ्या कानात सांगितले आहे ते मी येथे जाहीर रित्या सांगणार नाही, अशी गुगली टाकत राज्यात निर्माण झालेला संभ्रम कायम ठेवला. मोपालवर सारख्या अधिकाऱ्याची चौकशी होऊन परत नियुक्तीही केली जाते मात्र चाळीस वष्रे पक्षाला देणारया जेष्ठ नेत्याला असे ताटकळत ठेवले जाते, हे योग्य नाही,असेही पवार म्हणाले. मुख्यमंत्री अजित दादा पवार होतील अशी अपेक्षा कार्यक्रमात व्यक्त झाली, पण यामुळे अजून चौकशी लागून जाईल, असा टोलाही खडसे यांनी लगावला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आज जळगाव येथे पार पडला. यावेळी खडसे व पवार एकाच व्यासपीठावर असल्याने सर्वाचे लक्ष या सोहळ्याकडे होते. दोन्ही नेत्याच्या सूचक गुगल्यामुळे राजकीय संभ्रम कायम राहिला.

यावेळी आ. सतीश पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील आठवणींना उजाळा दिला. मोदींचा करिष्मा कसा होता याची उदाहरणे दिली. पाटील बोलत असतानाच, व्यासपीठावरून पंधरा लाखांच्या आश्वासनांचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवारांनी मांडला व एकच हस्यकल्लोळ उडाला.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मी पूर्वी एरंडोलचा आमदार होतो, त्यामुळे एरंडोल नावातच जादू आहे. एरंडोली करून सर्वपक्षीय सत्कार समारंभ हा होतोय. योगायोगाने नाथाभाऊ, अजितदादा सर्वपक्ष,एकत्र आले, समारंभात पक्ष नसतात, पक्ष वेगळे असले तरी आम्ही एकच, राष्ट्रवादीचे ते एकमेव आमदार असले तरी एकटे आहे, असे वाटत नाही, आम्ही एकच आहोत. लढाई ही विचारांची असते, माणुसकीची नसते, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यांनी राजकीय घडामोडींवर बोलणे टाळले. विधानसभेचे माजी सभापती अरूण गुजराथी म्हणाले की,राजकरणात हेही करावे लागते तेही करावे लागते, मात्र आता काळ बदलला असून एकनाथराव खडसे, तुमच्या शेजारी बसले आहे. आजचा गौरव हा आपल्या कार्याचा,विकासाचा गौरव आहे. आज दोन तोफांची उपस्थिती आहे. एक विरोधी पक्षाची व एक सत्ताधारी पक्षाची, मात्र आज काल विधानसभेत सत्ताधारी तोफाही जोरात आहे,नक्की मनात काय आहे, काय माहीत, शेवटी हे राजकारण आहे. अशी फटकेबाजी मनोगतात माजी विधानसभा गुजराथी यांनी केली.

...Read More

V. S. News
३१ डिसेंबर निमित्त मुंबई पोलिसांच्या सुट्टया रद्द

व्हिएस न्यूज - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या संख्येने रस्ते, समुद्र किनारे यावर होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त चोख ठेवला असून पोलिसांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. इतकेच नव्हे तर ३० हजार अतिरिक्त पोलिस रस्त्यांवर तैनात केले गेले आहेत. या दिवशी इसिस दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता मरीन ड्राईव्ह, वरळी सीफेस, बँड स्ट्रँड या सारख्या अति गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंग झोन तयार केले गेले असल्याचे समजते. या परिसरात फटाके वाजविण्यावरही बंदी घातली गेली आहे.

या दिवशी दरवर्षी चौपाट्या तसेच रस्त्यांमध्ये अतोनात गर्दी होते. लोक नव वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात. लोकांनी स्वतःची वाहने रस्त्यावर आणून गर्दी करू नये म्हणून बेस्ट व रेल्वेने मध्यरात्री पासून विशेष सेवा देणार असल्याची घोषणा केली आहे. बेस्ट जादा बसेस सोडणार आहे तर पश्चिम मध्य रेल्वे मध्यरात्रीपासून विशेष लोकल्स चालविणार आहे.

...Read More

V. S. News
कमला मिल कंपाऊंड अग्नितांडव, १५ जणांचा मृत्यू

व्हिएस न्यूज – लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील एका इमारतीला गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. १५ जणांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तर, १४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

रात्री साडेबाराच्या सुमारास कमला मिल कंपाऊंड परिसरातील हॉटेल मोजेसला आग लागली. या आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान,ही आग शर्तीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. केईम रुग्णालयात या आगीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आगीत मृत्यू झालेल्यांची नावे – जीत (४९), प्रिती (३६),तेजल, प्रमिला, विश्वा (२३), विणा (२८), कविता (३६),परोली (३०), धैर्या (२६), मनिषा (३०), यश (२६)

आगीत जखमी झालेल्यांची नावे – शेफाली, खुशबू,रोहन (२२), अभिषेक (२२), दीप (३१), उत्सव (२७),अंकिता (३०), सिद्धार्थ (२४), नेहा (२८), शंक्रा, जीत (२१), यश (२२)

यातील शेफाली व खुशबू या दोघींची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये १२ मुलींचा, ३ मुलांचा समावेश असून त्यांचे मृतदेह केईएम रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. भीषण आगीमुळे येथे असलेल्या ईटी नाऊ, मिरर नाऊ,झूम या वाहिन्यांची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. कमला मिल परिसरात असलेल्या टीव्ही ९ मराठी,झूम टिव्ही, ईटी नाऊ, मिरर नाऊ या वृत्त वाहिन्यांच्या कार्यालयांना झळा पोहोचल्या आहेत. पब ‘वन अबव्ह’च्या मालकावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!