व्हीएस न्युज - 'ग' प्रभाग थेरगाव मध्ये आसलेल्या प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर परिसरामध्ये गेल्या आनेक दिवसांनपासुन काही ठराविक परीसरात स्थानिक नगरसेवकांच्या सांगण्या वरून पाणीपुरवठा विस्कळीत केला जात आसल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे.
नागरिकांच्या या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेत आणि या घानेरड्या वृत्तीला आळा घालण्यासाठी युवराज दाखले यांनी शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाच्या वतीने निषेध व्यक्त करत 'ग' प्रभाग थेरगाव मध्ये आसलेल्या प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर परिसरामध्यील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना आज निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की "संबंधित पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर परिसरामध्यील पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक करण्याचे त्वरित आदेश देण्यात यावे. पाच दिवसांच्या कालावधीत जर पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक न केल्यास शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाच्या वतीने सदरील ठिकाणच्या महिला भगिनिंनच्या सोबत आयुक्त कार्यालयातून "हंडाभर पाणी भरो" आंदोलन केले जाईल.
व्हीएस न्युज - झिरो बॉईज चौक ते अजमेरा कॉलनी रोड शेजारील फुटपाथ सहा महिन्यापासुन पुर्णपणे उखडलेल्या अवस्थेत आहे. सदर ठिकाणी सतत कचऱ्याचा ढीग साचलेला असतो त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे, या संर्दभात 'क' प्रभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख श्री.गणेश जाधव,श्री.विद्यासागर गायकवाड,श्री.गोरकनाथ कवडे, श्री.कैलास कुदळे यांनी आज रोजी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की " पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश करण्यात आला आहे परंतू फुटपाथ, रस्ते, स्वच्छता या बाबत नागरिकांन मध्ये नाराजी आहे. झिरो बॉईज चौक ते अजमेरा कॉलनी रोड शेजारील फुटपाथचे काम त्वरित करण्यात यावे आणि या परिसरात पालिके तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. निवेदनावर पालिके द्वारा केलेल्या कारवाईचा अहवाल लेखी स्वरुपात सात दिवसात सादर करण्याची मागणी हि केली आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. वाहतूक कोंडीतून थोडी उसंत मिळाल्यानंतर शहरातील छोटे-मोठे गुन्हेगार आता त्यांच्या रडारवर आले आहेत. गणेशोत्सवानंतर शहरातील गुन्हेगारांचा योग्य बंदोबस्त करू अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. ऑटोक्लस्टर येथे सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर आयुक्तांनी पदभार स्वीकारताच काही दिवसात हिंजवडी येथील ५४ कंपन्या वाहतूक कोंडीला कंटाळून हिंजवडी सोडून जाणार असल्याची ‘फेक न्यूज व्हायरल’ झाली. याची गंभीर दखल घेत आयुक्त पद्मनाभन यांनी स्वतः हिंजवडीच्या रस्त्यावर उतरून वाहतूकीचा आढावा घेतला. आयुक्तांनी निरीक्षण करून हिंजवडीमध्ये चक्राकार वाहतूकीचा बदल सूचवला. आयुक्तांच्या आदेशानंतर तात्काळ त्यावर अंमलबजावणी करण्यात आली. वाहतूकीतील या बदलांना स्थानिकांनी विरोध केला. मात्र, या बदलांमुळे स्थानिकांना कसा फायदा होणार हे आयुक्तांनी त्यांना विश्वासात घेत समजावून सांगितले. काहीच दिवसात स्थानिकांना देखील या बदलाचे फायदे दिसू लागल्याने स्थानिकांचा विरोध मावळला. तसेच आयटीयन्सने देखील आयुक्तांच्या निर्णयाचे भरभरून कौतुक केले.
शहराच्या इतर भागाची देखील पाहणी करून आयुक्तांनी बदल सुचवले. वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणार्या वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करा असे आदेश दिल्याने वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने दामटणार्यांचे धाबे दणाणले आहेत. वाहतूक कोंडीतून थोडा दिलासा मिळाल्यानंतर आता आयुक्तांनी गुन्ह्यांच्या फायलींची चाचपणी सुरु केली आहे.
वाहतूक कोंडी पाठोपाठ शहरातील गुन्हेगारीमुळे देखील नागरिक हैराण असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता शहरातील गुन्हेगारांची माहीती घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गणेशोत्सवसानंतर शहरातील गुन्हेगारांवर कारवायांचा धडाका सुरु करणार असल्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले. आयुक्तालयापूर्वी परिसरात दहशत माजवण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. तलवारीचा नंगा नाच शहरवासीयांनी पहिला आहे. या सर्व प्रकरणातील आरोपींची पार्श्वभूमी तसेच त्या गुन्ह्याची माहिती त्यांनी मागवली आहे. यापूर्वी घटनेनंतर केवळ गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, असे गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
व्हीएस न्युज - पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज (सोमवारी)भारत बंद पुकारला आहे. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पाठिंबा दिला असून राज्यभरात मनसेने आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
पिंपरीत देखील मनसे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी महापालिका भवनासमोर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग रोखून धरला. ग्रेडसेपरेटरमध्ये कार्यकत्यांनी ठिय्या मांडला आहे
. पुण्यावरुन निगडीकडे जाणारी वाहने मनसेने रोखून धरली आहेत.
व्हीएस न्युज – बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्यांच्या समर्थकांनी एका शिक्षकाला फेसबुक लाईव्ह करुन बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास निगडी येथील निवेदिता बँकेसमोर घडली. संजय कुऱ्हाडे असे मारहाण करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गणेश कराडसह पाच ते सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कुऱ्हाडे हे कॅम्प एज्युकेशनमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदमांच्या वक्तव्यावरून संजय कुऱ्हाडे यांनी ‘प्रीतम मुंडे’ देखील अविवाहित असल्याची टिप्पणी सोशल मीडियावर केली होती. याच कारणावरुन आज दुपारी गणेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुऱ्हाडेंना निगडी येथील निवेदिता बँकेसमोर बोलावून घेतले. तसेच फेसबुक लाईव्ह सुरू करुन आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत मारहाणही केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
व्हीएस न्युज - गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून तीन जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडवण्यास गेलेल्या एका वडापाव विक्रेत्यालाही जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास रामनगर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन गायकवाड, किरण विटकर, मयूर संजय विटेकर (वय १९, रा. शेलार चाळ, रामनगर, चिंचवड) अशी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अाहे. वैभव माने (वय २२), रमजान शेख (वय १९, दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर याची रामनगर येथे राम मंदिरासमोर वडापावची हातगाडी आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी वैभव, रमजान आणि त्यांचा आणखी एक साथीदार वडापावच्या गाडीजवळ गणेश उत्सवाची वर्गणी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी मयूर याचा मित्र किसन गायकवाड आणि किरण विटकर हे दोघे गाडीजवळ थांबले होते. आरोपींनी किसन याच्याकडे गणपती उत्सवाची वर्गणी मागितली. त्यावरून आरोपी आणि किसन यांच्यामध्ये वाद सुरु झाले. वैभव याने गाडीवरील झारा उचलून किसनला मारहाण केली. रमजान आणि अन्य एका आरोपीने किरण याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी मयूर गेला असता वैभव याने बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू मयूरच्या डोक्यात मारला. या मध्ये मयूर गंभीर जखमी झाला. आरोपी अद्याप फरार आहेत. पिंपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - सर्वसामान्यपणे एका गटातील प्राण्याला एकाच प्रकारचे अवयव असतात. पण नुकतीच एक अनोखी घटना समोर आली आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात नुकतीच एक कोंबडी सापडली आहे. आता कोंबडी म्हटल्यावर तिला दोन पाय, एक चोच, डोक्यावर तुरा, दोन डोळे असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. पण निगडी परिसरात असणाऱ्या एका चिकन सेंटरमध्ये चक्क चार पायाची कोंबडी आढळली आहे. या कोंबडीला चार पाय असल्याने तन्वीर नाव असलेल्या या चिकन सेंटरला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चार पायांची ही कोंबडी कशी दिसते हे पाहायला बघ्यांची एकच गर्दी झाली होत आहे.
कुतबुद्दीन होबळे याचे मागील ३० वर्षांपासून चिकनचे दुकान आहे. त्यांचा मुलगा तन्वीरही आता त्यांच्यासोबत हाच व्यवसाय करतो. एकदिवस सकाळी नेहमीप्रमाणे तन्वीरने कोंबड्या कापायला घेतल्या. त्यात एका कोंबडीला कापत असताना तिला चार पाय असल्याचे त्याच्या लक्षात आले. ही गोष्ट त्याने आपल्या वडिलांना सांगितली. त्यावेळी कुतबुद्दीन यांचा या गोष्टीवर विश्वासच बसेना. मात्र त्यांनी प्रत्यक्ष या कोंबडीला पाहिल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मग अतिशय कमी कालावधीत ही गोष्ट संपूर्ण शहरात पसरली.
मग कापायला आणलेली ही कोंबडी काहीशी वेगळी असल्याने तिला न कापण्याचे होबळे पिता-पुत्रांनी ठरवले. आता ते तिची काळजी घेत असून या कोंबडीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे त्यांनी सांगितले. ४ पाय असल्याने या कोंबडीबाबत विशेष उत्सुकता असल्याने काहींनी या कोंबडीला काहीशा जास्त किंमतीत विकत घेण्याची तयारीही दर्शवली. मात्र आपण या कोंबडीला विकणार नसून जोपर्यंत ती जगेल तोपर्यंत तिचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करणार असल्याचे चिकन सेंटर मालक कुतबुद्दीन यांनी सांगितले.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड : पेट्रोलचे दर मागील काही दिवसांपासून गगनाला भिडले असल्याने सामान्यांना त्याची झळ बसत आहे. विरोधकांनी अनेक आंदोलने करुनही काहीही फरक पडला नसून दरवाढीवर नियंत्रण आलेले नाही. असे असतानाच एक आश्चर्याची बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडकरांना पेट्रोलच्या बाबतीत अच्छे दिन आले आहेत. याचे कारण म्हणजे शहरातील डुडळगाव येथे चक्क बोअरवेल पाण्याऐवी पेट्रोल येत आहे. आता हे असे कसे काय याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर तांत्रिक बिघाडामुळे हे झाले आहे. या अनोख्या गोष्टीमुळे गावकऱ्यांमध्ये सध्या एकच चर्चा सुरु आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील डुडळगाव येथे एका शेतकऱ्याच्या बोअरवेलमधून चक्क पेट्रोल निघत आहे. या प्रकरणाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने याची पाहणी केली. ही बोअरवेल शिवाजी तळेकर यांची असून त्यांची भातशेती आहे. भाताला पाणी देत असताना तळेकर यांच्या पाण्याच्या पाईपमधून पेट्रोल येत असल्याची गोष्ट लक्षात आली. मग थोडा शोध घेतल्यानंतर शेजारी भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप असून पेट्रोलची साठवणूक करणाऱ्या टाकीला गळती लागल्याने हे झाल्याचे लक्षात आले. पंपात जमिनीमध्ये असणाऱ्या टाकीतून पेट्रोल जमिनीमध्ये झिरपले. आणि मातीतून ते अवघ्या ९० ते १०० मीटर अंतरावर असलेल्या तळेकर यांच्या शेतातील बोअरवेलमधून पाण्यासोबत येऊ लागले.
व्हीएस न्युज - मुस्लिम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण कायम करावे. तसेच गोरक्षा, लव जिहाद, मुस्लिम व्यक्तींची समूहाकडून (मॉब लिंचिंग) होणाऱ्या हत्या रोखाव्यात यासह अनेक मागण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या वतीने मुस्लिम मूक महामोर्चा काढण्यात आला. गोळीबार मैदान ते विधानभवनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
पुण्यातील गोळीबार मैदानावरून निघालेला मूकमोर्चा सेव्हन लव्ह चौकापासून रामोशी गेट, केईएम हॉस्पिटल, नरपतगिरी चौक, जिल्हा परिषदेची जुनी इमारत तेथून पुढे विधानभवनासमोर मोर्चाचा समारोप झाला.
धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात, मुस्लिम समाजाला अॅट्रासिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, यासह विविध मागण्याचे फलक घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. या मागण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष द्यावे आणि यावर योग्य त्या उपाय योजना कराव्यात, अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी केली. तसेच या मोर्चात पुणे शहर आणि जिल्ह्यातून अनेक नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
व्हीएस न्युज - दिनांक ९/९/२०१८, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महिला प्रथम स्थानावर होत्या. त्यांच्या प्रेरणेनेच महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने आतापर्यंत मराठा समाज आरक्षण व इतर न्याय हक्क मागण्यांसाठी राज्यभरातून अठ्ठावन्न मूकमोर्चे काढले. या मूकमोर्चानंतर ठोक मोर्चेदेखील काढले.
नऊ ऑगस्ट क्रांतीदिनाच्या दिवशी झालेल्या महामोर्चातून समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. मागील तेरा महिन्यात मराठा समाजाच्या पदरात मात्र काहीही पडलेले नाही. सरकार फक्त वेळ काढूपणाची भूमिका घेत आहे. या सर्व आंदोलनांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. परंतू समाजाचे प्रतिनिधी म्हणून जे समन्वयक काम पाहत आहेत त्यामध्ये महिलांचा समावेश करून घेण्यात आला नाही. आता राज्यभरातून सकल मराठा महिला क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य या महिलांच्या क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून महिलांचे राज्यव्यापी संघटन उभारण्यात येणार आहे. याची पहिली राज्यस्तरीय बैठक नुकतीच पुण्यात संपन्न झाली. आज रविवारी, पिंपरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. तसेच दिनांक अकरा सप्टेंबरला नांदेड येथे जिल्हा बैठक होणार आहे. याप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत व शहरांत या महिन्यात बैठका घेऊन समाजात जनजागृती करण्यात येणार आहे.
आगामी सर्व आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग, महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या पुणे प्रतिनिधी उषा पाटील यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी स्वाती पवार, अर्चना काकडे, ज्योती सपाटे, मीरा ढोके, संगिता कोरे, सलोनी भोसले, मीना पावडे, शकुंतला भोसले, स्वाती पवार आदी उपस्थित होते.
पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठराव पास करण्यात आले. यामध्ये मराठा& समाजाच्या न्याय हक्कासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाकडे सरकारने पाठ फिरवली आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासाठी& सरकारने निश्चित तारीख जाहिर करावी. या आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरविणे. मराठा आरक्षणावर शैक्षणिक क्षेत्रात चालू& वर्षापासूनच मराठा आरक्षण लागू करण्याबाबत शासनाने आदेश काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणे. राज्य शासनाने मराठा& समाजासाठी देऊ केलेल्या सात शासन निर्णयाबाबत जनजागृती करणे. तरूण तरूणी व शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी& मार्गदर्शन करणे. मराठा विद्यार्थ्यांना सर्व शासकीय सवलती लागू कराव्यात. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा& समाजाच्या मुला-मुलींच्या सर्वप्रकारचा शैक्षणिक खर्च, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी व इतर& व्यावसायिक शिक्षणासाठी असणारी फि शंभर टक्के माफ करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील नियोजित& स्मारकाची उंची कमी करू नये. कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ फक्त मराठा समाजासाठी सिमित करून& ताबडतोब विनातारण कर्ज पुरवठा व सबसिडी पुरवठा सुरु करावा. या महामंडळाचे फक्त अध्यक्षाचे नाव सरकारने जाहिर केले& आहे. मात्र अद्यापपर्यंत निधिची तरतूद केली नाही. मराठा समाजाला प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधून डॉ. पंजाबराव देशमुख& वार्षिक वसतिगृह भत्ता शहरी दहा हजार रुपये, ग्रामीण आठ हजार रुपये हा अपुरा पडत असून यामध्ये शहरी पन्नास हजार& रुपये, ग्रामीण चाळीस हजार रुपये वार्षिक भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा.
२०१४ साली& ईएसबीसी& प्रवर्गातून भरती झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ कायम नोकरीत सामावून घेण्यात यावे. शेतक-यांच्या शेतमालास हमी भाव देण्याबाबत निर्णय घ्यावा. राजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही स्वायत्त संस्था सक्षमपणे& कार्यान्वित करून मराठा समाजासाठीच सिमित असावी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी शिक्षण, प्रशिक्षण व& अभ्यासिकासाठी रोख स्वरुपात अनुदान द्यावे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांना भरीव अनुदान व सवलती& द्याव्यात. गरज असेल तिथे विनातारण शैक्षणिक कर्ज द्यावे त्याचे व्याज सरकारने भरावे. उद्योग व्यवसायासाठी जाहिर& करण्यात आलेले 605 अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाचा समावेश करावा.& &
व्हीएस न्युज - भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या दहीहंडी उत्सवात केलेल्या वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात टीका सुरु असताना त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा असा अर्ज पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा अर्ज दिला आहे.
घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या कदम यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून टीका केली जात आहे. मुलींना पळवून आणण्यास मदत करेल या वक्तव्याचा सर्व स्तरातील महिलांनी समाचार घेतला आहे. याच संदर्भात चाकणकर यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यात कदम यांनी समस्त महिलांचा अपमान केल्याचे म्हटले असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या विषयावर चाकणकर म्हणाल्या की, कदम यांचे वक्तव्य अत्यंत लांच्छनास्पद आहे. परिचारक, दानवे, छिंदम अशा भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत कदम अव्वल ठरले आहेत. त्यांच्या या वाक्यामुळे समस्त महाराष्ट्राच्या माता- भगिनींचा अपमान झाला असल्याने या संबंधीचा अर्ज दिला आहे. अविचारीपणे महिलांबद्दल जीभ सैल सोडून बोलणाऱ्या कदम यांनी फक्त माफीनामा नाही तर राजीनामा द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली.
व्हीएस न्युज - घरकाम करणाऱ्या महिलेने ज्या घरांमध्ये ती काम करायची त्या घरांमध्ये थाेडेथाेडे करत तब्बल 30 ताेळे साेने लंपास केले. या दागिण्यांची किंमत 5 रुपये इतकी अाहे. चाेरी करणाऱ्या महिलेला सिंहगड राेड पाेलिसांनी अटक केली असून तिच्याकडून चाेरीचे दागिने हस्तगत करण्यात येत अाहेत. मंगळवारी ही घटना समाेर अाली.
याप्रकरणी प्रिती गिरीधर करंदीकर (38 ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अाराेपी महिला ही करंदीकर यांच्याकडे 2018 पासून स्वयंपाकी म्हणून काम करते. करंदीकर यांनी त्यांचे वडिलाेपार्जित दागिने ज्या कपाटात ठेवले हाेते, त्या कपाटाला त्या कुलूप लावायला विसरल्या हाेत्या. ही गाेष्ट माेलकरणीच्या लक्षात अाली हाेती. तिने मागील दाेन ते तीन महिन्यांपासून थाेडे थाेडे दागिने चाेरण्यास सुरुवात केली. मंगळवारी करंदीकर या घर अावरत असताना त्यांना कपाटातील दागिने चाेरीला गेल्याचे लक्षात अाले. त्यांच्या घरातील माेलकरीण ही इतर ठिकाणी सुद्धा काम करत असल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनीही त्यांच्या घरातील 7 ते 8 ताेळे दागिने चाेरीला गेल्याचे सांगितले. त्यामुळे माेलकरणीवर संशय वाढल्याने करंदीकर यांनी सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी माेलकरणीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने दागिने चाेरल्याची कबुली दिली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002