व्हिएस न्युज - नेहरुनगर संतोषी माता चौकाजवळील टेल्को रोडवर सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका इंडिका कारला अचानक आग लागली. या आगीत इंडिका कार जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच संत तुकारामनगर येथील अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला आणि १५ ते २० मिनिटातच आग विझवण्यात यश आले. मात्री आगीमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. कोणत्याही प्रकारची जिवीत हाणी झालेली नाही.
व्हीएस न्युज - तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचवून त्यांच्यात सकारात्माक सक्षमता निर्माण करण्यानची गरज आहे, असे प्रतिपादन करीत येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्न होईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पखाले आदी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती यावेळी दिली. सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून प्रतिबंधात्मक कार्यवाही चालू आहे. देशविघातक, समाजविघातक शक्ती कार्यरत असतात, जाती-जातींमध्येच भांडणे लागावीत हाच त्यांचा हेतू असतो, अशा शक्तींपासून आपण सावध रहायला हवे. प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहे.
प्रत्येेक नागरिक हा ‘पोलीस’ असतो असे नमूद करुन नागरिकांनी त्यांना काही नकारात्मक बाबी आढळून आल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले. प्रारंभी विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी विविध संघटना, पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवास उत्साहात सुरुवात
व्हीएस न्युज - आत्ताची तरुण पिढी काहीशी भरकटत चालली आहे. त्या तरुणाईला योग्य मार्ग दाखवायला हवा. तसेच त्यांना अध्यात्मिक ज्ञानाची गोडी लागायला हवी. त्यामुळे संस्कृतीचा विकास होईल, असे मत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केले. महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४५७ वा संजीवन समाधी महोत्सवास सोमवारी (दि. १७) सुरुवात झाली. महोत्सवाचे उदघाटन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते झाले. महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी आयुक्त ते बोलत होते.
यावेळी मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, आळंदी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, विश्वस्त विनोद पवार, अॅड. राजेंद्र उमाप, आनंद तांबे, विठ्ठल भोईर, विघ्नहरी देव महाराज, विश्राम देव, नगरसेविका करुणा चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “माझी आजवर सर्वात जास्त पोलीस सेवा तीर्थक्षेत्र असलेल्या शहरात झाली. तीर्थक्षेत्र असलेल्या शहरात काम करताना संस्कृती आणि अध्यात्माचे वातावरण असलेले जाणवते. त्यातून मलाही काही प्रमाणात अध्यात्माची गोडी लागली आहे. आताही पिंपरी चिंचवड शहराचा पहिला पोलीस आयुक्त म्हणून मोरया गोसावी नगरीची सेवा करताना आनंद होत आहे.
आपण प्रत्येकजण आपल्या समाजाला अध्यात्मिक देणे लागतो. तो वसा मोरया गोसावी देवस्थान समर्थपणे पार पाडत आहेत, असे हेमलता काळोखे म्हणाल्या. उपस्थितांच्या हस्ते २०१९ च्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक विश्राम देव यांनी केले. आभार आनंद तांबे यांनी मानले.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका हरवलेल्या चिमुकलीला अवघ्या दोन तासात शोधून काढले आहे. गेल्या आठ दिवसात पोलिसांनी हरवलेली मुले शोधण्याची ही तिसरी वेळ आहे. ही घटना ताजी असताना रविवारी दिघी परिसरातून सहा वर्षीय ईश्वरी राम भागवत शाळेच्या परिसरातून हरवली होती. तिचा अवघ्या दोन तासात दिघी पोलिसांनी शोध घेतला.
याच आठवड्यात १० वर्षीय मुलगा घरातून निघून गेला होता, त्यानंतर आई वडिलांनी मुलगा हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. मात्र मुलगा हा आपल्याच परिसरात मित्रांसोबत फिरत होता. तर शुक्रवारी भोसरी परिसरातून साडेचार वर्षीय मुलगी खेळता-खेळता घरातून निघून गेली होती. तिला शोधण्यासाठी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली होती.
दरम्यान, दिघी परिसरातल्या मोजे शाळेत ईश्वरीची आज सकाळी चित्रकलेची परीक्षा होती. साडेदहा वाजता परीक्षा संपल्यानंतर ती नेहमीप्रमाणे शाळेच्या बाहेर येऊन थांबली. परंतु, आज रविवार असल्याने तिला घ्यायला बस येणार नव्हती. ईश्वरी अर्धा किलोमीटर पुढे निघून गेली. तिला रस्ता समजला नाही.
अवघ्या दहा मिनिटांच्या फरकाने तिचे वडील राम भागवत हे शाळा परिसरात ईश्वरीला घेण्यासाठी आले. परंतु ईश्वरी कुठेच दिसत नव्हती. सर्व मुले शाळेतून निघून गेली होती. वडिलांनी तिचा शोध घेतला. मात्र ईश्वरी सापडली नाही. तब्बल एक तास तिचा शोध सुरू ठेवला. अखेर दिघी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी वडील राम हे गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लावंड, पोलीस अधिकारी अशोक तरंगे, महिला पोलीस अधिकारी कदम यांच्या पथकाने ईश्वरीचा शोध घेण्यासाठी ३ अधिकारी आणि १२ कर्मचारी कामाला लावत स्वतः शोध घ्यायला सुरुवात केली. संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली. दुपारी एकच्या सुमारास दिघी पोलिसांना ईश्वरीला शोधण्यात यश आले. ईश्वरी साई पार्क परिसरात सापडली. ईश्वरीला पाहताच आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते.
पालकांनी सतर्क राहावे
पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. मुलांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. गेल्या आठ दिवसात मुले शोधण्याची ही तिसरी वेळ आहे. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले, तर अशा घटना टाळता येतील.
स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त
व्हीएस न्युज - गुन्हेगारी विश्वावर आधारीत ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा सुरु असताना पोलिसांनी पुण्याच्या मंगला थिएटरमधून कोल्हापूरातील एका कुख्यात गुंडाला अटक केली. थिएटरच्या स्क्रीन नंबर ३ मध्ये मुळशी पॅटर्न सिनेमाचा खेळ सुरु असताना रात्री ११.३०च्या सुमारास पोलीस थिएटरमध्ये शिरले. चित्रपटाचा खेळ थांबवून लाईट सुरु केल्या व मॅनेजरच्या मदतीने त्या गुंडाला ताब्यात घेतले.
उमेश भाऊसाहेब अरबाळे (२६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो कोल्हापूर इंचलकरंजीचा राहणारा आहे. हत्या, दरोडा, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना तो हवा होता. शनिवारी रात्री कोल्हापूर पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांना संशयित गुन्हेगार शहरामध्ये असल्याची माहिती दिली.
हर्षवर्धन ठाकूरदेसाई यांच्या हत्या प्रकरणात उमेश भाऊसाहेब अरबाळे तिसरा गुन्हेगार आहे. ११ डिसेंबरला सहा जणांनी मिळून ठाकूरदेसाई यांची हत्या केली. उमेशही त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होता. हत्या केल्यानंतर पुण्यामध्ये लपून बसला होता. चित्रपटगृहावर धाड टाकून अशा प्रकारे अटकेच्या केलेल्या कारवाईमुळे चित्रपट पाहणाऱ्या अन्य प्रेक्षकांना त्रास झाला नाही. काही मिनिटांमध्ये आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस बाहेर निघाले असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.
व्हीएस न्युज - पुणे दहशतवादी विरोधी पथकाने एका संशयित दहशतवाद्याला चाकण परिसरातून देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसांसह अटक केली. अटक करण्यात आलेला संशयित हा स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असल्याचे समजते.
हरपालसिंग प्रतापसिंग नाईक (वय ४२, मुळ रा. रोपर, पंजाब, सध्या रा. चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पुणे दहशतवादी विरोधी पथकाने अतिशय गुप्तपने हरपालसिंग याला रविवारी (दि.२ डिसेंबरला) चाकण येथून अटक केली. यावेळी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुस ही जप्त करण्यात आले.
सोमवारी (दि.३ डिसेंबरला) त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी (दि.१०) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरपालसिंग त्याच्या साथीदारांच्या मदतीने दहशतवाद्यांची टोळी बनवून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याच्या तयारीत होता. तो इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करुन देशातील तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यास भडकवत होता. तसेच दहशतवादी कारवायांसाठी तो सोशल मीडियाचा वापर करुन शस्त्र जमवण्याचे काम ही करत असल्याचे समोर आले आहे.
पुणे दहशतवादी विरोधी पथकाला हरपालसिंग हा पाकिस्तान आणि विदेशातील दहशतवादी विचारसरणी असलेल्यांच्या संपर्कात असल्याचा दाट संशय आहे. तसेच पंजाबच्या सरहद पोलीसांनी मोईन नावाच्या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. लवकरच पुढील कारवाईसाठी पुणे दहशतवादी विरोधी पथक त्याला ताब्यात घेणार आहेत.
व्हीएस न्युज - विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लीटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने आयोजित केलेल्या ‘एक दिवस उद्यानात’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी धमाल केली. तसेच निसर्गाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची संधीही दवडली नाही.
शाळेच्यावतीने दरवर्षी एकदिवसीय सहलीचे आयोजन केले जाते. यंदा जुनी सांगवीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांची सहल नेत मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. एवढेच नाही तर शिक्षकांकडून गोष्टी ऐकूण घेण्याची संधीही विद्यार्थ्यांनी सोडली नाही. विद्यार्थ्यांनीही मुखोद्गत असलेल्या गोष्टी सर्वांना ऐकविल्या. विद्यार्थ्यांनी योगा केला, गाणी गायली. मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी विद्यार्थ्यांसाठी कृतियुक्त शब्दांचा खेळ घेतला. विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देत धमाल केली.
शिक्षिका राजश्री..... आणि अंजुम पिरजादे यांनी विविध गाणी गात विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. विद्यार्थी शुभम घोरपडे आणि कुणाल साळवी यांनी कार्टूनची वेषभूषा करून विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वागत आणि मनोरंजन केले. निसर्गाच्या अगदी जवळ जात निसर्गाची विविध रूपे विद्यार्थ्यांनी अनुभवली. आपण राहत असलेल्या जवळच्या परिसराची मिळालेली माहिती आपल्या स्मरणात ठेवून विद्यार्थ्यांनी निसर्गाशी एकप्रकारे मैत्री केली असल्याचेच यावेळी जाणवत होते.
शाळेच्या शिक्षिका, तसेच कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेत सहकार्य केले. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, राजश्री येन्गुन्दूल, अंजुम पिरजादे आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
व्हीएस न्युज - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा निषेध नोंदविण्यात आला. पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्ता रोको करण्यात आला. मुख्य चौकातील वाहतूक अडवल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, रामदास आठवले यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय असून त्याचा पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो. रामदास आठवले हे सामान्य जनतेच्या अडचणी सोडवणारे नेते आहेत. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील हल्लेखोरांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणीही धेंडे यांनी यावेळी केली. तर ‘मी लोकप्रिय नेता असल्याने कदाचित कोणीतरी एखाद्या मुद्द्यावरुन नाराज असेल त्यामुळे माझ्यावर हल्ला केला असावा, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. तर याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या वतीने संविधान गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. रात्री १० वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर ते व्यासपीठावरून खाली येत असताना प्रवीण गोसावी या तरुणाने त्यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. या प्रकारानंतर ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी गोसावीला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.
व्हीएस न्युज - पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. ८) पिंपरी न्यायालयात व आकुर्डी मनपा न्यायालय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेकडो खटले निकाली काढण्यात आले. आकुर्डी न्यायालयामध्ये न्यायाधिश मे. माधुरी खनवे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार होते. तसेच आकुर्डी न्यायालय लोकन्यायालयाचे उदघाटन ज्येष्ठ विधीतज्ञ सोपान माने यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पिंपरी चिंचवड विभागाच्या अध्यक्षा अॅड. मनीषा महाजन होत्या. यावेळी पिंपरी न्यायालयातील प्रभारी मुख्य न्यायाधीश एस. जी. अग्रवाल, सहन्यायाधीश ए.यु. सुपेकर व सह न्यायाधीश एन. टी. भोसले, पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष अॅड. योगेश थंबा, सचिव अॅड.गोरख कुंभार,महिला सचिव अॅड. स्मिता लांडे पाटील,सहसचिव अॅड. अंकुश एम. गोयल, ऑडीटर अॅड.महेश टेमगिरे, सदस्य अॅड.निलेश ठोकळ,अॅड. सुनील रानवडे, अॅड. पुनम राऊत, अॅड.केशव घोगरे, अॅड.विलास कुटे,अॅड.सुनील कड, अॅड.सुदाम साने , अॅड. सुरज खाडे, अॅड.पद्मावती पाटील, अॅड. निखील बोडके,अॅड. किशोर आरडकर, अॅड. गणेश राऊत, अॅड.संभाजी वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, न्यायालयाबाबतीतील सर्व प्रश्न सोडविण्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वपरीने मदत करेल अशी हमी दिली. पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.सुनील कडुसकर यांनी पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभागी होऊन जास्तीत जास्त खटले निकाली काढावेत असे आवाहन केले.
पॅनल परिक्षक म्हणून अॅड. सागर आडागळे,अॅड. जयश्री कुटे, अॅड. प्रतीक्षा खिल्लारी,अॅड. संगीता कुशालकर, अॅड.मनाली सावंत,अॅड. दिलीप शिंगोटे, अॅड. मोनिका गाढवे,अॅड. शिवाजी महानवर, यांनी काम पाहिले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅड. गोरख कुंभार यांनी केले तर आभार अॅड. महिला सचिव अॅड. स्मिता लांडे यांनी मानले.
व्हीएस न्युज - वडमुखवाडीत एका हॉटेल कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ :३० च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर गवळी (वय २० रा. नानाश्री हाॅटेल, वडमुखवाडी) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी शेखर बाळासाहेब दींडे (वय ३२ नानाश्री हाॅटेल, वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस स्टेशन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजू सखाराम पावडे (वय १९) अनिकेत मानसिंग राजपूत (वय २३) आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर गवळी हा आचारी म्हणून वडमुखवाडीतील नानाश्री हाॅटेलमध्ये कामगार होता. गुरुवारी रात्री ११:३० सुुमारास जेवताना किरकोळ वादातून ज्ञानेश्वर चे आरोपी राजू पावडे अनिकेत राजपूत यांच्या बरोबर भांडण झाले. यामुळे रागाच्या भरात एकाने लोखंडी सळई (राॅड) ज्ञानेश्वर च्या डोक्यात घातली. डोक्यात गंभीर झाल्याने ज्ञानेश्ववर हा जागेवरच मयत झाल्यामुळे आरोपींनी प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने धडापासून शीर वेगळे केले. माञ शरीराचे तुकडे करण्यासाठी वेळ नसल्यामुळे घाबरून त्यांनी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
दिघी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अधिक तपास दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड करीत आहेत.
व्हीएस न्युज - प्रियकराने प्रेयसिला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्या तरुणीसोबत विवाह जमवल्याने प्रेयसिने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
ईश्वरी बाबूराव पोकळे (वय २२, रा. नयन गोविंद गार्डन, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पुष्पा बाबूराव पोकळे (वय ५०, रा. पैठण, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, योगेश गोकूळ सोनावणे (रा. प्रिय अपार्टमेंट, सिडको, रामनगर, औरंगाबाद) या तरुणाविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकर योगेश याने जुलै २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ईश्वरी हिला लग्नाचे आमिष दाखविले. एवढेच नव्हे तर ते दोघेजण पिंपळे गुरव येथे एकाच रुममध्ये राहत होते. मात्र योगेश याने दुसऱ्या मुलीसोबत विवाह ठरवला. याबाबत त्याने ईश्वराला सांगितले. यावर ईश्वरी निराश झाली तिने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.
याप्रकरणी योगेश सोनावणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक अलका सरग अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - भांडणाचा जाब विचारला म्हणून तिघा टोळक्यांनी पती-पत्नीस जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण करुन त्यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. इतकेच नाही तर टोळक्यांनी त्या दाम्पत्याच्या दुचाकीची देखील तोडफोड केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.४) रात्री साडेअकरा ते अडिचच्या दरम्यान पवनानगर गल्ली नंबर ३ आणि २ मजिदसमोर काळेवाडी येथे घडली.
शांताराम एकनाथ काळुळदे (वय ४५) आणि त्यांची पत्नी कल्पना (दोघे.रा. पवनानगर गल्ली नं.२, मजिद समोर) असे जखमी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिपक नाना शेवरे, महेंद्र कोळी आणि राकेश या तिघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक शेवरे, महेंद्र कोळी आणि राकेश यांच्यासोबत फिर्यादी शांताराम काळुळदे यांचा किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणाचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काळुळदे हे आरोपींकडे गेले होते. यावर आरोपी महेंद्र कोळी याने फिर्यादीस, “मी गुन्हेगार आहे तुम्हाला खल्लासच करुन टाकतो” असे बोलून शांताराम यांच्या डोक्यात फायटरने मारुन जखमी केले. यावेळी शांताराम यांच्या पत्नी कल्पना भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता आरोपी राकेश आणि महेंद्र यांनी मिळून कल्पना यांना हाताने जबर मारहाण केली. तसेच रात्री अडीचच्या सुमारास काळुळदे यांच्या घरात घुसून घरातील साहित्य आणि दुचाकीची तोडफोड करुन फरार झाले.
याप्रकरणी शांताराम यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार, तातडीने दिपक नाना शेवरे, महेंद्र कोळी आणि राकेश या तिघा आरोपींना अटक केली. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002