व्हीएस न्युज - पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्ना बाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी केंद्रीय केमिकल फर्टीलायझर मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स ही भारत सरकारची कंपनी अनेक समस्यांनी ग्रासली आहे. कंपनीच्या कामगारांचा १९ महिन्याचा पगार प्रलंबित असून कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्याने कंपनी चालू ठेवणे व्यवस्थापनाला कठीण जात आहे. कंपनीच्या जमीन विक्रीची परवानगी मिळूनही जमिनीची विक्री होऊ शकली नाही. यासाठी दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करूनही कोणी खरेदीदार पुढे आला नाही. या सर्व कारणाने कंपनी चालू ठेवणे अधिकच कठीण झाले आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठ्पुराव्याणे कंपनीला केंद्र सरकार कडून १०० कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळाले होते. त्यात कंपनीच्या कामगारांचा थकीत पगार देऊन कंपनीचे उत्पादन चालू करण्यात आले आहे. कंपनी सुस्थित चालू ठेवण्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे. कंपनी पूर्वस्थितीत आणण्यासाठी तसेच सेवा निवृतीची रक्कम व कामगारांचे थकीत पगार देण्यासाठी केंद्रीय केमिकल फार्टीलायझर मंत्रालयाने केंद्रीय आर्थिक संबधि कॅबिनेट कमिटी पुढे ४५० करोड रुपये कंपनीस देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यास आज पर्यंत मंजुरी मिळाली नसल्याने एच. ए कंपनीच्या अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी आज संबधित खात्याचे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली .
सरकार या प्रश्ना बाबत सकारात्मक असून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाच्या आधिकाऱ्या समवेत बैठक बोलावली असुन एच.ए कंपनीला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा म्हणाले असल्याचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्युज - रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिस व आरटीओकडून नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंड आकारला जातो. मात्र दंड आकारूनही वाहचालकांवर फारसा परक पडत नाही. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधित वाहनचालकाचा परवानाच निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवावा आणि आरटीओने परवाना निलंबित करावा, असे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले आहेत.
त्यानुसार पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडणाऱ्यांचा वाहन चालवण्याचा परवाना निलंबित होणार आहे. अपघात रोखण्यासाठी सरकारने विविध विभागांमार्फत अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच विविध समित्यांचीही स्थापना केली आहे. एवढे करूनही रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होताना किंवा रोखण्यात यश येत नाही. त्यामुळे सरकारने आता अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी गंभीर कारवाईचा निर्णय घेतला आहे. अपघात रोखण्यासाठी केवळ वाहतूक पोलिस आणि आरटीओंनाच जबाबदारी न देता या दोन विभागांसोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलिस, आरोग्य विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रसिद्धी कार्यालयांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यातील मुख्य जबाबदारी ही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची राहणार आहे.
दारू पिऊन वाहन चालवणारे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहून चालवणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे आणि क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे या पाच प्रकारांपैकी कोणताही वाहतूक नियम मोडला तर संबंधित वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता पोलिसांनी परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओ विभागाकडे पाठवतील. आरटीओ विभागाने वाहतूक पोलिसांच्या शिफारशीनुसार संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचप्रमाणे हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशात नमूद आहे.
व्हीएस न्युज - जुण्या भांडणाच्या रागातून दोघा जणांनी मिळून एका तरुणाच्या घरात घुसत त्याच्या डोक्यात चाकूने वार केले. ही घटना पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या सेनेटरी चाळीमध्ये घडली. विकी सतीश ठोकळ (वय २२, रा. सेनेटरी चाळ, पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ, पिंपरी) असे चाकूने वार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अविनाश काशिनाथ काळे (वय २५) आणि कृष्णा काशिनाथ काळे (वय २०, दोघे रा. काळेवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विकी ठोकळ हे त्यांच्या पत्नीसोबत पिंपरीतील सेनेटरी चाळीतील भाड्याच्या खोलीत राहतात. जुण्या भांडणाच्या रागातून आरोपी अविनाश आणि कृष्णा हे दोघे त्यांच्या घरात घुसले. तसेच त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्या चाकूने वार करुन पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत वाहन चोराला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड पोलीसांनी केली.
राजू बाबुराव जावळकर (वय ५०, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली.) असे शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यासह त्याचा साथीदार सोमनाथ सुभाष चौधरी (वय ३२, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाणे हद्दीतून फेब्रुवारी २०१८ मध्ये टाटा कंपनीचा छोटा हत्ती (एमएच/१२/एफडी/६४२३) हा टेम्पो चोरीला गेला होता. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना वाकड पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली या प्रकरणातील चोरीचा टेम्पो हा खेड शिवापूर येथे आहे. यावर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन शोध घेतला असता एका शेड मध्ये आरोपी राजू आणि सोमनाथ हे दोघेही गॅस कटरच्या साहाय्याने तो टेम्पो कट करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्या दोघांना ताब्यात घेऊन टेम्पो जप्त केला. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी हा टेम्पो रहाटणी येथील बीआरटी रोडवरून चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून दोघा आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपी राजू जावळकर याच्यावर पुणे शहर, सातारा, नगर येथे तब्बल १०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तर सोमनाथ चौधरी याच्यावर २० ते २५ वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील दोन, वाकड, इंदापूर, चाकण, तळेगाव दाभाडे, कराड शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सात वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन डी सस्ते, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी देविदास शेळके, डी. डी. सणस, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, सुरेश भोसले, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, विक्रम जगदाळे, दीपक भोसले, भैरोबा यादव, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, शाम बाबा, मधुकर चव्हाण, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.
चोरीच्या पैशांमधून मुलांचे शिक्षण
चोरीच्या कामातून मिळणाऱ्या पैशांमधून दोघेही संसार आणि मुलांच्या शिक्षणासाठी येणारा खर्च भागवायचे. राजू जावळकरला दोन मुले असून ते नेवासा येथील बोर्डिंगमध्ये शिक्षण घेत आहेत.त्यासाठी राजू हा दरवर्षी दोघांची ८० हजार रुपये फी भरतो. तर पत्नी ही गृहिणी आहे. आई-वडील हे पुण्याजवळील एका खेड्यात राहतात. राजू हा गेली २० वर्ष वाहनचोरीचे गुन्हे करत आहे. चार चाकी चोरुन ती भंगारात विकायचा. कवडीमोल किंमतीमध्ये भंगारात विकायचा. या पैशांमधून तो संसार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवतो. राजू इयत्ता ७ वी पर्यंत शिकलेला असून कमी कष्टात जास्त पैसे कमावण्यासाठी तो चोरी करु लागला. दरम्यान, चोरी केलेल्या गाडीमध्ये जीपीएस सिस्टम तर नाही ना हे पाहण्यासाठी चोरी केलेली गाडी निर्जनस्थळी ठेवली जायची. तिथे दोन दिवस पोलीस किंवा गाडी मालक तर येत नाही ना याची खात्री करून ते गाडी भंगारात काढायचे.
व्हीएस न्युज - मोबाईल दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ६७ हजार २१० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री अकरा ते रविवारी (दि.१६) पहाटे चारच्या दरम्यान भोसरी आळंदी रस्ता येथील शरयु एंटरप्रायजेस या मोबाईल विक्रीच्या दुकानात घडली.
याप्रकरणी दुकानाचे मालक विशाल प्रकाश पाटील (वय २३, रा. पसायदान सोसायटी, फ्लॅट नं.१०५, ए विंग परांदेनगर, दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांचे भोसरी आळंदी रस्ता येथे शरयु एंटरप्रायजेस नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. शनिवारी (दि.१५) रात्री अकराच्या सुमारास दुकानाला कुलुप लावून घरी गेले असता. रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानातील विविध कंपन्यांचे ४५ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ६७ हजार २१० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - बेपत्ता विवाहितेच्या चौकशीसाठी तिच्या वयोवृद्ध वडिलांना भोसरी पोलीस ठाण्यात बोलावून सर्व नातेवाईकांसमोर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
वयोवृध्द इसमाला मारहाण करणाऱ्या भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षकाचे नाव विकास देशमुख असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुरुवारी (दि. १३) एक विवाहित महिला एक वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाली होती. सगळीकडे शोधाशोध करूनही महिला सापडत नसल्याने सासरच्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेच्या वडिलांना गावी देखील याबाबत कल्पना देण्यात आली. वडिलांनी देखील सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती मिळून आली नाही.
या प्रकरणाच्या तपासासाठी भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक विकास देशमुख यांनी महिलेच्या वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. यावेळी महिलेचे वडील नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात आल्यानंतर देशमुख यांनी त्यांना कोणावर संशय आहे का, असे विचारले. त्यावर त्यांनी महिलेचे लग्नापूर्वी एका तरुणासोबत मैत्रीचे संबंध असून त्याच्यासोबत गेल्याचा संशय वाटत असल्याचे सांगितले. ही माहिती देताच ही माहिती एवढ्या उशीरा का सांगितली म्हणत देशमुख यांनी बेपत्ता महिलेच्या वडिलांना मारहाण केली. तसेच बारा तासांच्या आत मला महिला आणि तिचा मुलगा इथे पाहिजे असे सांगून त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून काढले. या घटनेमुळे सर्वच स्थरातून संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना विचारले असता त्यांनी, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. मात्र याप्रकरणी वडिलांनी सुरुवातीला ही माहिती देणे अपेक्षीत होते. ती दिली नाही म्हणून त्यांच्यावर थोडा दबाव आणल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र संबंधीत अधिकाऱ्याने मारहाण केली आहे का याची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती दिली.
व्हीएस न्युज - दुचाकी घेऊन देतो असे सांगून एका महिलेकडून कागदपत्रे आणि २८ हजार ६०० रुपये घेऊन तिला दुचाकी घेऊन न देता तिघाजणांनी मिळून फसवणूक केली. ही घटना मंगळवार (दि.१३ नोव्हेंबर) ते मंगळवार (दि.४ डिसेंबर) दरम्यान नेहरुनगर येथील राजीव गांधी शाळे शेजारील इमारतीमध्ये घडली.
याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेचे बंधू अभिशेक सुभाष पाटील (वय २१, रा. वारंगवाडी रोड, डी.वाय.पाटील कॉलेज आंबीगाव तळेगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेंद्र सुरेश जैसवाल (रा. राजीव गांधी शाळेशेजारील पांढऱ्या रंगाची इमारत, रुम नं.३, नेहरुनगर, पिंपरी) आणि त्याचे इतर दोघा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१३ नोव्हेंबर) ते मंगळवार (दि.४ डिसेंबर) या दरम्यान फिर्यादी अभिषेक यांच्या बहिणीला आरोपी महेंद्र आणि इतर दोघा आरोपींनी नवी दुचाकी घेऊन देतो असे सांगून त्यांच्याकडून त्यांचे घरभाडे अॅग्रीमेंट, आधार कार्ड आणि पॅनकार्ड घेतले. त्यानंतर एकूण २८ हजार ६०० रुपये त्यांच्याकडून घेऊन त्यांना दुचाकी घेऊन न देता त्यांची फसवणूक. आरोपींनी महिलेचे पैसेही परत केले नाही तसेच देलेल्या कागदपत्रांचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग केला.
याप्रकरणी महेंद्र आणि त्यांच्या दोघा साथीदारांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून अटक करण्यात आलेले नाहीत. पोलिस उपनिरीक्षक बोचरे तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - नेहरुनगर संतोषी माता चौकाजवळील टेल्को रोडवर सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका इंडिका कारला अचानक आग लागली. या आगीत इंडिका कार जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच संत तुकारामनगर येथील अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला आणि १५ ते २० मिनिटातच आग विझवण्यात यश आले. मात्री आगीमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. कोणत्याही प्रकारची जिवीत हाणी झालेली नाही.
व्हीएस न्युज - तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचवून त्यांच्यात सकारात्माक सक्षमता निर्माण करण्यानची गरज आहे, असे प्रतिपादन करीत येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्न होईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पखाले आदी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती यावेळी दिली. सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून प्रतिबंधात्मक कार्यवाही चालू आहे. देशविघातक, समाजविघातक शक्ती कार्यरत असतात, जाती-जातींमध्येच भांडणे लागावीत हाच त्यांचा हेतू असतो, अशा शक्तींपासून आपण सावध रहायला हवे. प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहे.
प्रत्येेक नागरिक हा ‘पोलीस’ असतो असे नमूद करुन नागरिकांनी त्यांना काही नकारात्मक बाबी आढळून आल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले. प्रारंभी विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी विविध संघटना, पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवास उत्साहात सुरुवात
व्हीएस न्युज - आत्ताची तरुण पिढी काहीशी भरकटत चालली आहे. त्या तरुणाईला योग्य मार्ग दाखवायला हवा. तसेच त्यांना अध्यात्मिक ज्ञानाची गोडी लागायला हवी. त्यामुळे संस्कृतीचा विकास होईल, असे मत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केले. महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४५७ वा संजीवन समाधी महोत्सवास सोमवारी (दि. १७) सुरुवात झाली. महोत्सवाचे उदघाटन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते झाले. महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी आयुक्त ते बोलत होते.
यावेळी मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, आळंदी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, विश्वस्त विनोद पवार, अॅड. राजेंद्र उमाप, आनंद तांबे, विठ्ठल भोईर, विघ्नहरी देव महाराज, विश्राम देव, नगरसेविका करुणा चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “माझी आजवर सर्वात जास्त पोलीस सेवा तीर्थक्षेत्र असलेल्या शहरात झाली. तीर्थक्षेत्र असलेल्या शहरात काम करताना संस्कृती आणि अध्यात्माचे वातावरण असलेले जाणवते. त्यातून मलाही काही प्रमाणात अध्यात्माची गोडी लागली आहे. आताही पिंपरी चिंचवड शहराचा पहिला पोलीस आयुक्त म्हणून मोरया गोसावी नगरीची सेवा करताना आनंद होत आहे.
आपण प्रत्येकजण आपल्या समाजाला अध्यात्मिक देणे लागतो. तो वसा मोरया गोसावी देवस्थान समर्थपणे पार पाडत आहेत, असे हेमलता काळोखे म्हणाल्या. उपस्थितांच्या हस्ते २०१९ च्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक विश्राम देव यांनी केले. आभार आनंद तांबे यांनी मानले.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका हरवलेल्या चिमुकलीला अवघ्या दोन तासात शोधून काढले आहे. गेल्या आठ दिवसात पोलिसांनी हरवलेली मुले शोधण्याची ही तिसरी वेळ आहे. ही घटना ताजी असताना रविवारी दिघी परिसरातून सहा वर्षीय ईश्वरी राम भागवत शाळेच्या परिसरातून हरवली होती. तिचा अवघ्या दोन तासात दिघी पोलिसांनी शोध घेतला.
याच आठवड्यात १० वर्षीय मुलगा घरातून निघून गेला होता, त्यानंतर आई वडिलांनी मुलगा हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. मात्र मुलगा हा आपल्याच परिसरात मित्रांसोबत फिरत होता. तर शुक्रवारी भोसरी परिसरातून साडेचार वर्षीय मुलगी खेळता-खेळता घरातून निघून गेली होती. तिला शोधण्यासाठी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली होती.
दरम्यान, दिघी परिसरातल्या मोजे शाळेत ईश्वरीची आज सकाळी चित्रकलेची परीक्षा होती. साडेदहा वाजता परीक्षा संपल्यानंतर ती नेहमीप्रमाणे शाळेच्या बाहेर येऊन थांबली. परंतु, आज रविवार असल्याने तिला घ्यायला बस येणार नव्हती. ईश्वरी अर्धा किलोमीटर पुढे निघून गेली. तिला रस्ता समजला नाही.
अवघ्या दहा मिनिटांच्या फरकाने तिचे वडील राम भागवत हे शाळा परिसरात ईश्वरीला घेण्यासाठी आले. परंतु ईश्वरी कुठेच दिसत नव्हती. सर्व मुले शाळेतून निघून गेली होती. वडिलांनी तिचा शोध घेतला. मात्र ईश्वरी सापडली नाही. तब्बल एक तास तिचा शोध सुरू ठेवला. अखेर दिघी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी वडील राम हे गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लावंड, पोलीस अधिकारी अशोक तरंगे, महिला पोलीस अधिकारी कदम यांच्या पथकाने ईश्वरीचा शोध घेण्यासाठी ३ अधिकारी आणि १२ कर्मचारी कामाला लावत स्वतः शोध घ्यायला सुरुवात केली. संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली. दुपारी एकच्या सुमारास दिघी पोलिसांना ईश्वरीला शोधण्यात यश आले. ईश्वरी साई पार्क परिसरात सापडली. ईश्वरीला पाहताच आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते.
पालकांनी सतर्क राहावे
पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. मुलांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. गेल्या आठ दिवसात मुले शोधण्याची ही तिसरी वेळ आहे. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले, तर अशा घटना टाळता येतील.
स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त
व्हीएस न्युज - गुन्हेगारी विश्वावर आधारीत ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा सुरु असताना पोलिसांनी पुण्याच्या मंगला थिएटरमधून कोल्हापूरातील एका कुख्यात गुंडाला अटक केली. थिएटरच्या स्क्रीन नंबर ३ मध्ये मुळशी पॅटर्न सिनेमाचा खेळ सुरु असताना रात्री ११.३०च्या सुमारास पोलीस थिएटरमध्ये शिरले. चित्रपटाचा खेळ थांबवून लाईट सुरु केल्या व मॅनेजरच्या मदतीने त्या गुंडाला ताब्यात घेतले.
उमेश भाऊसाहेब अरबाळे (२६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो कोल्हापूर इंचलकरंजीचा राहणारा आहे. हत्या, दरोडा, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना तो हवा होता. शनिवारी रात्री कोल्हापूर पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांना संशयित गुन्हेगार शहरामध्ये असल्याची माहिती दिली.
हर्षवर्धन ठाकूरदेसाई यांच्या हत्या प्रकरणात उमेश भाऊसाहेब अरबाळे तिसरा गुन्हेगार आहे. ११ डिसेंबरला सहा जणांनी मिळून ठाकूरदेसाई यांची हत्या केली. उमेशही त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होता. हत्या केल्यानंतर पुण्यामध्ये लपून बसला होता. चित्रपटगृहावर धाड टाकून अशा प्रकारे अटकेच्या केलेल्या कारवाईमुळे चित्रपट पाहणाऱ्या अन्य प्रेक्षकांना त्रास झाला नाही. काही मिनिटांमध्ये आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस बाहेर निघाले असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002