व्हिएस न्युज - १९ फेब्रुवारी रोजी जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उ्साहात साजरी केली जाते, त्याच प्रमाणे यंदाही मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त काळेवाडी येथील एम.एम. शाळे पासून ते एच.ए. कॉलनी येथे स्तिथ शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत टू व्हीलर रॅली कडण्यात आली. अनेक शिवप्रेमींनी या रॅली मध्ये सहभाग घेतला.
छञपती शिवाजी महाराजांच्या पूतळ्यास मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांच्या हस्ते पूष्प हार अर्पण करण्यात आला व जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर,शहर कार्याध्यक्ष गोरख पाटील, अधिकराव भोसले, बाळासाहेब शिरसाठ, संजय गायके, आभिजीत गोफण, बाळासाहेब गायकवाड, भरत इंगळे, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, महेश गूळगोंडा, दिपक भक्त, माऊली जाधव, विशाल बाविस्कर, नरसिंग माने, प्रदिप दळवी, अंकूश कोळेकर, निलेश भोरे, राहूल कदम, सागर तायडे, बबलू कदम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - बुद्ध प्रेरणा बुद्ध विहार सामाजिक ट्रस्ट, पिंपरी अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केट येथे बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष फारुख सत्तार कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली त्यावेळेस पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा राजेंद्र निकाळजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी व त्यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) राजेंद्र निकाळजे यांना संविधानाची प्रत देऊन अध्यक्ष फारुख सत्तार कुरेशी यांच्या हस्ते त्यांचं सत्कार करण्यात आला.
या वेळी ट्रस्ट चे सचिव ॲड. बी.के. कांबळे, भारतीय जन्मत न्यूज पोर्टल चे डायरेक्टर प्रमोद गरड, संदिपान झोंबाडे, संतोष कसबे व सर्व सभासद उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - कर्जरोखे काढण्याचा उद्योग कोणाच्या भल्यासाठी .. स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने .. पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या मिळकतींना अडीच पट करवाढ आणि प्रतिमाणसी प्रतिदिन चाळीस लिटर पेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्या नळजोड धारकांना वाढीव पाणीपट्टी आकारण्याचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावाला शहरातील मिळकतधारकरांचा तीव्र विरोध आहे.ही करवाढ सर्वसाधारण सभेने शंभर टक्के फेटाळावी. अन्यथा मिळकतधारक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला आहे. शहराला पाणी पुरवठा करणारऱ्या पवना धरणात गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक असतानाही आयुक्तांच्या आडमुठपणामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी गळती रोखून बेकायदेशीर नळजोड शोधून त्यावर कारवाई करण्याऐवजी आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागासाठी ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्याचे प्रस्तावित केले आहे. महापालिकेच्या मुदत ठेवींच्या व्याजापोटी २०० कोटीहून जास्त रक्कम मिळत असताना कर्जरोखे काढण्याचा उद्योग नेमका कोणाच्या भल्यासाठी करणार आहे. याचे उत्तर करदात्या नागरिकांना मिळाले पाहिजे.( दि. १७ ) सोमवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की,२००७ सालापूर्वीच्या सर्व रहिवाशी ,व्यापारी, वाणिज्य, औद्योगिक व मोकळ्या जागेतील मिळकतींना अडीच पट करवाढ करण्यात आली आहे. ही करवाढ गुरुवारी (२० फेब्रुवारी )होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने जरी फेटाळली, तरी मी माझ्या अधिकारात ही करवाढ लागू करेल, आयुक्तांच्या या मनमानीपणाचा तीव्र निषेध शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकात केला आहे. शहरातील नागरिकांना माफक दरात रस्ते,वीज,ड्रेनेज सुविधा,स्वच्छता,कचरा व्यवस्थापन, प्राथमिक शिक्षण व प्राथमिक आरोग्य सुविधा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. शहरामध्ये पाच लाखांहून जास्त मिळकती असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. परंतु अद्यापही हजारो मिळकतींची आणि नळ जोडणींची नोंद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मिळकतधारकांवर आयुक्त अन्यायकारक अडीच पट करवाढ लागू करीत आहे केंद्र सरकारने मागील पाच वर्षात नोटाबंदी,जीएसटी सारख्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचा जीडीपी कमी झाला आहे. त्याचा मुख्यत्वे औद्योगिक पट्ट्यावर जास्त परिणाम झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योजक व कामगारांचे शहर आहे. औद्योगिक मंदीचा परिणाम कामगारांच्या उत्पनावर झाला आहे संथगतीने सुरु असलेल्या विकास कामांमुळे मागील तीन चार महिन्यापासून खोदून ठेवलेले शहरातील बहुंतांशी रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. शहरभर धुळीचे साम्राज्य आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली डिजिटल सुविधा देण्यासाठी अनेक योजना आयुक्तांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये दूरसंचार वाहिन्यांचे नेटवर्क,वायफाय,किऑस्क यंत्र,डिजिटल बोर्ड,फेस्टिवल ऑफ फ्युचर,सिटीझन हॅकेथॉन, स्टार्टअप पिचफेस्ट,स्पिकर सिरीज या योजना म्हणजे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय. असे प्रकल्प म्हणजे नागरिकांना 'मुंगेरी लाल के हसीन सपने 'दाखविण्याचा प्रकार आहे.
व्हीएस न्यूज : भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ करण्यासह शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी सुरू झालेल्या ‘इंडो- फ्रेंच नॉलेज समिट’च्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. पुढील वर्षी(२०२१) ४ आणि ५ मार्चला ही परिषद होणार असून, फ्रान्स आणि भारत सरकारचे उच्चस्तरीय अधिकारी, शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा परिषदेत सहभाग असेल.
फ्रान्सच्या मुंबईतील महावाणिज्य दूत सोनिया बार्बरी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या नवसंकल्पना केंद्राच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, फ्रेंच दूतावासातील अधिकारी ऑलिव्हर फुडूम, फिलिप गुलियन आदी या वेळी उपस्थित होते. अवकाश विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवस्थापन अशी नऊ प्रमुख क्षेत्रे आणि संबंधित विषयांवर या परिषदेत चर्चा केली जाईल, विद्यापीठांशी सामंजस्य करार केले जातील, विविध विषयांवरील एकत्रित संशोधन प्रकल्प राबवण्यासंदर्भातील ठराव केले जातील.
बार्बरी म्हणाल्या, ‘भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ आहेत. अवकाश विज्ञान, संरक्षण अशा क्षेत्रांत एकमेकांचे सहकार्य घेत आहेत. दोन्ही देशांसाठी विद्यापीठे आणि संशोधन हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करणे शक्य आहे. पुणे हे शिक्षणाचे केंद्र असल्याने ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचे ठरले. या पूर्वीच्या दोन परिषदांमध्ये सुरू झालेले प्रकल्प पुण्यात होणाऱ्या तिसऱ्या परिषदेत सादर केले जातील. ही परिषद फलदायी ठरेल, अशी अपेक्षा आहे.’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला या परिषदेच्या आयोजनाचा मान मिळणे ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठ अन्य संस्थांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करेल. या परिषदेमुळे विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, नव्या विषयांसंदर्भातील अभ्यासक्रम, काही महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेता येतील. या पूर्वीच्या दोन परिषदांमुळे एव्हिएशन, इलेक्ट्रिक मोबिलिटी संदर्भातील दोन अॅडव्हान्स्ड सेंटर निर्माण झाली. त्यामुळे या परिषदेतूनही शिक्षण, संशोधन, विज्ञानासंदर्भातील महत्त्वपूर्ण घडामोडी होऊ शकतील, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.
पहिल्यांदाच विद्यापीठात परिषद
फ्रान्सच्या अध्यक्षांनी २०१८ मध्ये भारताला भेट दिली होती. त्या वेळी फ्रान्स दूतावासातर्फे ही परिषद आयोजित केली होती. पहिली परिषद २०१८ मध्ये दिल्लीत आणि २०१९ मध्ये फ्रान्समधील लिऑन येथे झाली. आता २०२१ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारी परिषद पहिल्यांदाच एखाद्या विद्यापीठात होणार आहे.
व्हीएस न्यूज - कानशिलात लगावल्याच्या कारणावरून चाकण एमआयडीसी मध्ये वर्कशॉप मालकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हरीशचंद्र किसन देटे (वय-४५) असे खून झालेल्या वर्कशॉप मालकाचे नाव आहे. तर जीवन दत्ता डोंगरे असे आरोपीचे नाव असून त्याच्यासह ऐकून पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रमोद वशिष्ट कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हरीशचंद्र किसन देटे यांचे चाकण एमआयडीसीमध्ये व्ही.एच.डी नावाचे वर्कशॉप आहे. त्याठिकाणी आरोपी जीवन डोंगरेची पत्नी काम करते. सोमवारी सकाळी आरोपी पत्नीला वर्कशॉपमध्ये सोडवण्यासाठी आला होता. तेव्हा, काही कारणामुळे मयत हरिशचंद्र देटे आणि आरोपी जीवन डोंगरे यांच्यात भांडण झाले. हरिशचंद्र यांनी आरोपीच्या दोन कानशिलात लागवल्या. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. परंतु, कानशिलात लगावल्याचा राग मनात असल्याने जीवन डोंगरे हा स्वस्त बसला नाही. त्याने आपल्या पाच ते सहा साथीदारांसह हरीशचंद्र यांचे पुन्हा वर्कशॉप गाठत धिंगाना घातला. वर्कशॉपचे मालक हरीशचंद्र हे बाहेर आले. त्यावेळी थेट लाथा बुक्क्यांनी मारहाण करत मुख्य आरोपी जीवन डोंगरे याने त्यांच्या डोक्यात दगड घातला. जखमी देठे यांना तत्काळ चाकणच्या एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर आरोपींनी पळ काढला.
या घटनेमुळे चाकण एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार करत आहेत. आरोपी हा भाड्याने रिक्षा घेऊन चालवत असे असंही पोलिसांनी सांगितले आहे
व्हीएस न्यूज -तिसऱ्या शिफ्टमध्ये रात्रपाळीने काम करणारे १०० जण बजावले हिंजवडी येथील माणमध्ये हेड लाईट आणि टेल लाईट तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. तिसऱ्या शिफ्टमध्ये रात्रपाळीने काम करणारे शंभर कामगार वेळीच बाहेर पडल्याने बचावले आहेत. ही आग पहाटे चार वाजताच्या सुमारास हिंजवडी माणमधील वेरॉक लाईटिंग सिस्टिम कंपनीला लागली होती. घ
टनेची माहिती मिळताच पुणे आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल घटनास्थळी दाखलं झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीमधील वेरॉक लाईटिंग सिस्टिम कंपनी ला आज पहाटे चार च्या सुमारास भीषण आग लागली होती. यात प्लास्टिक आणि थिनर या रसायनाचा जास्त वापर होत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. जेव्हा आग लागली तेव्हा तिसऱ्या शिफ्टमध्ये काम करणारे शंभर कामगार कंपनीत काम करत होते. ते सर्व वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, प्रत्येक्ष दर्शी कामगाराने ही आग शॉर्टसर्किटमुळे स्टोअरमध्ये लागली त्यानंतर अवघ्या कंपनीत आग पसरली असे अधिकारी म्हणाले. पिंपरी-चिंचवड (राहटणी), हिंजवडी एमआयडीसी, पुणे (पीएमआरडीए) आणि खासगी टँकर च्या साहाय्याने तब्बल चार तास अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले. या घटनेत जीविहितहानी झालेली नाही. घटनास्थळी हिंजवडी पोलीस देखील उपस्थित होते.
व्हीएस न्यूज -इंदुरीकर महाराजांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक स्थरातुन इंदुरीकर महाजरांवर टीका सुरू असताना त्यांच्या समर्थनार्थ काही लोक पुढे येत आहेत. पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे इंदुरीकर महाराजांची बैलगाडीतुन मिरवणूक काढत पाठिंबा दर्शवला आहे. यावेळे वारकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणाव हजर होते.पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंती निमित्त ह.भ.प महाराज इंदुरीकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करत, उपस्थित नागरिक, वारकरी यांनी बैलगाडी मधून इंदुरीकर महाराज यांची मिरवूनक काढत कीर्तनस्थळी नेहले. शेकडो नागरिकांची गर्दी पाहून महाराजही सर्वांना नमस्कार करत होते.प्रत्येक पिंपरी-चिंचवडकर तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन नागरिकांनी इंदुरीकर महाराजांना दिले.
व्हीएस न्यूज -महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रिडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राची देखील जडणघडण होत असते. तसेच अभियंता होण्यासाठी सतत चार वर्ष केलेले कष्ट आणि गुरुजनांचे मार्गदर्शन याचे फळ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मिळणारे पदवी प्रमाणपत्र होय. या कार्यकालात आलेल्या अनुभवानेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो. योग्य दृष्टीकोन ठेवून सर्व सामान्यांना भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी या अनुभवाचा उपयोग करावा, असे मार्गदर्शन माजी कुलगूरु डॉ. आर.एस.माळी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील माजी कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. एन. बी. चोपडे, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट डिन डॉ. शितलकुमार रवंदळे, डॉ. संजय लकडे, डॉ. शितल भंडारी, प्रा. प्रशांत पाटील, समन्वयक प्रा. गफ्फार मोमीन, महाविद्यालयीन परिक्षा अधिकारी प्रा. सुनिल ताडे, प्रा. केतन देसले आणि यशस्वी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
डॉ आर. एस. माळी म्हणाले की, पीसीईटीच्या विश्वस्त मंडळाने केलेल्या मार्गदर्शनामुळे मागील वीस वर्षात पीसीसीओईची ही शैक्षणिक घोडदौड अभिनंदनीय आहे. पीसीसीओईने मागील वर्षात टेडेक्स, केपीआयटी स्पार्कल आणि आयईईई सारखे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होतो त्यामुळे यावर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत वीस पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले हे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातून पदवी घेऊन गेलेले अभियंते देश परदेशातून नामांकित आस्थापनांमध्ये उच्च वेतन श्रेणी व उच्च पदांवर आहेत आणि संस्थेच्या नावलौकिकात भर घालत आहेत हे आणखी कौतुकास्पद आहे.
विश्वस्त भाईजान काझी म्हणाले की, माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांनी पुढील शंभर वर्षांचा विचार करुन ही संस्था स्थापन केली. येथून पदवी घेऊन गेलेले हजारो अभियंते जबाबदार नागरिक म्हणून कार्यरत आहेत. येथे विद्यार्थ्यांना फक्त अभियंता नाही, तर प्रतिभाशाली, गुणवत्तापुर्ण व सुसंस्कृत नागरिक म्हणून घडविले जाते. या वर्षी संस्थेत विविध शाखांतून चार हजारांहून जास्त विद्यार्था शिक्षण घेत आहेत. त्यांना उच्च मार्गदर्शन व सेवा सुविधा देण्यासाठी संस्थेचे विश्वस्त मंडळ नेहमी प्रयत्नशील असते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्वागत प्राचार्य डॉ. नीलकंठ चोपडे , सुत्रसंचालन प्रा. अंजली मिश्रा, प्रा. अश्विनी वझे आणि आभार प्रा. सुनिल ताडे यांनी मानले.
व्हीएस न्यूज -घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्यानं दाम्पत्याला प्राण गमवावे लागले. बुधवारी (13 फेब्रुवारी) पुण्यातील बिबेवाडी परिसरात ही घटना घडली. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्यानं विषारी वायूनं मृत्यू झाला.
पेस्ट कंट्रोलमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. घरातील डास, कीटक घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल केले. पण त्यात दाम्पत्याचाच जिव गेला. पुण्यातील बिबेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी ही घटना घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी मयतांची नावे आहेत. घरात पेस्ट केल्यानंतर त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. घराची दारे आणि खिडक्या बंदच ठेवल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
यापू्र्वीही झाला होता दोन तरुणांचा मृत्यू –
ढेकूण घालवण्यासाठी खोलीत पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. पेस्ट कंट्रोल करण्यात आलेल्या खोलीतच दोघे तरुण झोपले होते. सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. दोन्ही तरुण एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते. कॅन्टीन मालकाने त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. ढेकणांचा त्रास होत असल्याने खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. पेस्ट कंट्रोल केलं असल्याने ते दोघे तीन दिवस मित्राच्या घरी राहिले. नंतर पुन्हा ते आपल्या खोलीवर आले होते.
व्हीएस न्यूज-पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्याचा निर्णय घेतला होता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रविवारी मुंबईत महामोर्चा निघणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मनसेकडून हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महामोर्चा यशस्वी व्हावा यासाठी राज्यभरातील मनसे कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत. पुण्यातही मनसे कार्यकर्त्यांना ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आहे.
पुणे पोलिसांना वाहतुकीवर परिणाम होईल सांगत बाईक रॅलीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. तसंच या रॅलीमुळे नागरिकांना त्रास होईल असंही सांगण्यात आलं आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून या रॅलीला सुरुवात होणार होती. मनसे कार्यकर्त्यांनी मात्र मुस्लिमबहुल भागातून रॅली जात असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांना परवानगी नाकारल्यानंतरही मनसे कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पोलिसांनी कारवाई करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. नारायण पेठ पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही रॅली पार पडणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान रविवारी दुपारी १२ वाजता मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता मोर्चा सुरु होईल. गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न आणि घरकाम महिला सभा यांच्या सहकार्याने ,भक्ती -शक्ती निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ देशातील पहिले महिलांचे रिक्षास्टॅंड चे उदघाटन गुरुवारी (दि. ६) रोजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला रिक्षाचालकांनी फेटे परिधान करून या रिक्षास्टॅंड चे स्वागत केले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे ,नगरसेवक सचिन चिखले ,उत्तम केंदळे ,पंकज भालेराव ,कमल घोलप, शर्मिला बाबर ,पौर्णिमा सोनवणे ,माजी नगरसेवक सुलभा उबाळे ,तानाजी खाडे ,ऊर्मिला काळभोर ,घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे ,संजय बोराडे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात महिला रिक्षा चालवत आहेत आणि त्यांनी स्वतःचे रिक्षास्टॅंड निर्माण केले आहे. हे शहराच्या दुष्टीने अभिमानाची बाब आहे. रिक्षाचालक महिलांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. महिलांच्या रिक्षास्टॅंडवर वाचनालय ,पाणपोई आणि रिक्षाचालक महिलांना बसण्यासाठी सुविधा केल्या जातील ,असे आश्वासन महापौरांनी दिले. बाबा कांबळे म्हणाले कि ,महाराष्ट्र रिक्षा पंचायती आणि घरकाम महिला सभेच्या प्रयत्नांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरपेक्षा अधिक महिलांना रिक्षा लायसन्स बॅच ,परमिट आणि नवीन रिक्षा मिळाल्या .यामुळे महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाने रिक्षा चालक झाले असून ,आता महिलाही रिक्षा चालवणार आहे. महिलांना रिक्षा चालवण्यासाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे त्यांनाही हक्काचे रिक्षास्टॅंड मिळावे यासाठी महिलांचे देशातील पहिले रिक्षास्टॅंड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वसंध्येला या रिक्षास्टँडचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्षा सरस्वती गुजलोर ,यमुना काटकर ,विजयालक्ष्मी हडपद ,जयश्री मोरे,जयश्री साळुंखे,संगीता कांबळे,आयेशा सोळाशे अक्षता गावडे ,सविता ओव्हाळ ,रेखा ठेळके, कविता मैदाड ,रुपाली तिकोने ,दीपाली तिकोने ,मीना रंधवे यांनी परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज -अलीकडेच, चिखलीत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापण्यात आले, त्यानंतर तेथील पैसे घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला.
पिंपरी : पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसात अनेकविध क्लुप्त्या वापरून एटीएम फोडून बँकांचे लाखो रुपये पळवण्याचा सपाटा सराईत चोरटय़ांनी लावला आहे. अशा आरोपींचा छडा लागत नसल्याने अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. तरीही एटीएम फोडण्याचे गुन्हे सुरूच असल्याने पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येते. एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक नसल्याने चोरटय़ांचे चांगलेच फावते, हेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
पिंपरी आयुक्तालयाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम केंद्रातील पैसे ठेवले जाणारे यंत्र फोडून त्यातील पैसे पळवण्याचे प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांत वाढताना दिसत आहेत. अलीकडेच, चिखलीत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापण्यात आले, त्यानंतर तेथील पैसे घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला. याच परिसरात अशाच पद्धतीने एटीएम फोडण्याचा दुसरा अयशस्वी प्रयत्न झाला. वाकडला पोलीस ठाण्याच्या जवळच असलेले एटीएम केंद्र गॅसकटरच्या साहाय्याने फोडण्यात आले,मात्र त्यात चोरटय़ांना यश आले नाही. या प्रयत्नात त्यातील आठ लाख रुपये जळून खाक झाले. चाकणला एटीएम फोडण्याच्या दोन घटना घडल्या. त्यातील एका घटनेत, एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने, यंत्राला दोरखंड बांधून ते खेचून बाहेर नेण्यात आले. नंतर ते मोटारीत टाकून इतरत्र नेऊन त्यातील रक्कम पळवण्यात आली.
अशा घटनांमध्ये आरोपींनी लाखो रुपये लांबवले आहेत. बहुतांश ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे तपासात पुढे आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला असून बँकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
अशाप्रकारच्या गुन्ह्य़ांसाठी पोलिसांनी विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे. असे गुन्हे करणाऱ्या पाच गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातील दोन टोळ्या राज्याबाहेरील आहेत. एटीएमसंदर्भातील गुन्हे याच टोळ्यांनी केल्याचा संशय पोलिसांना आहे. आम्ही त्यांच्या मागावर आहोत. बॅँकेला सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. – रामनाथ पोकळे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी -चिंचवड पोलीस
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002