व्हिएस न्युज -रिक्षात बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादात 14 जणांच्या टोळक्याने बाप-लेकावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर झाले. ही घटना चिखली येथे घडली. याप्रकरणी तीन जणांना निगडी पोलीसांनी अटक केली आहे.
नजीर शेख (वय 64 ) आणि त्यांचा मुलगा सद्दाम नजीर शेख (रा. रूपीनगर, तळवडे) असे जखमी झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे. अनिकेत प्रकाश रणदिवे (वय 18 ) आतीश उर्फ मन्नु बलदेव कोरी (वय20, रा. घरकुल, चिखली) आणि आदर्श उर्पै छोट्या अशोक मगर (वय 18, रा. पवळे शळेसमोर, निगडी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर सिद्धेश उर्फ सोन्या मोरे, जुनेद नाईकवाडी, वाजिद शेख, आक्या बॉण्ड, वसीम हारूण शेख, विशाल खरात आणि इतर चार ते पाच आरोपी पसार आहेत. नजीर यांनी त्यांची रिक्षा स्टार बेकरीजवळ उभी करून ते मुलगा सद्दाम याच्यासमवेत बोलत होते. यावेळी आरोपी अनिकेत आणि मन्नु हे नजीर यांच्या रिक्षात बसु लागले. मात्र, नजीर हे सद्दामसमवेत बोलत होते. यावेळी रिक्षात बसण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे धमकी देत ते निघून गेले. काही वेळानंतर ते इतर साथीदारांना घेऊन आले. या टोळक्याने नजीर आणि सद्दाम यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. आदर्श आणि मन्नु याने कोयत्याने बाप-लेकांवर कोयत्याने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करत आहेत.