व्हीएस न्यूज - सद्य परिस्थितीत देशात शांतता,सहिष्णुता वाढीस लागण्यासाठी रक्त पिपासूंपेक्षा रक्तदात्यांची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी येथे केले.
विश्व विवेक फाऊंडेशन आणि नावंदर कुटुंबियांच्या वतीने प्राधिकरण निगडी येथील संत तुकाराम उद्यानात आज रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खा. साबळे बोलत होते यावेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी महापौर आर. एस. कुमार, संयोजक नगरसेवक बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर, भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सचिन नावंदर, विजय सिनकर, संजय मंगोडेकर,सुभाष नावंदर, सुरेश नावंदर, सचिन नावंदर, आधार ब्लड बँकेचे मकरंद शहापुरकर आदी उपस्थित होते.
साबळे म्हणाले, गेली एकवीस वर्षे कै. अशोक नावंदर यांनी सुरु केलाला रक्तदान शिबीराचा यज्ञकुंड असाच पुढे सुरु रहावा. निस्पृहपणे त्यांनी सुरु केलेले समाजकार्य त्यांची पुढची पिढी करीत आहे. नावंदर परिवाराने सुरु केलेली मोफत स्वर्गरथ रुग्ण वाहिका सेवा समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे. राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी देखील शुभेच्छा दिल्या. स्वागत बाबू नायर, सूत्र संचालन सलीम शिकलगार, राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002