पिंपरी- चिंचवड शहरातील विविध प्रश्नासंबंधी पालकमंत्री घेणार नागपुरात बैठक
पिंपरी-चिंचवड
2017-12-17
व्हिएस न्यूज- पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेणे, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणणे, पवना बंदिस्त जलवहिणी प्रकल्प मार्गी लावणे, शास्तीकर, रिंगरोड आदी शहरातील प्रश्नासंबंधी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट नागपुर येथे पिंपरीतील पदाधिकाऱ्यांसमवेत येत्या दोन दिवसांत बैठक घेणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन पिंपरी महापालिकेत भाजपाने सत्ता काबिज केली. मात्र, दहा महिने झाल्यानंतर एकही महत्वाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे शहरवासियांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्य़ाची शहरवासियांकडून जोरदार मागणी होत आहे. यासह आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणणे, पवना बंदिस्त जलवहिणी प्रकल्प मार्गी लावणे, शास्तीकर, रिंगरोड आदी शहरातील महत्वाच्या प्रश्नासंबंधी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या समवेत य़ेत्या दोन दिवसात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून चर्चा करणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री बापट यांच्या नेतृत्वाखाली महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. हिवाळी अधिवेशनात शहरातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत.