व्हिएस न्यूज - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारल्यामुळे देशभरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राहुल गांधींपुढे जरी अनेक आव्हाने असली तरी ते अहिंसेच्या तत्वाने पुरोगामी विचारांचा वसा पुढे नेत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पाठ बळावर पुढील आव्हानांवर मात करतील असा विश्वास कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला.
शनिवारी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारला. त्यानिमित्त शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, प्रदेश सचिव बिंदू तिवारी, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, शहर सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, राजेंद्रसिंह वालिया, नरेंद्र बनसोडे, विशाल कसबे, मयूर जैयस्वाल, शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, तुकाराम भोंडवे, राजन नायर, संदेश नवले, आबा खराडे, गौरव चौधरी, कुंदन कसबे, चंद्रशेखर जाधव, शोभा कोराटे, मलीना दास, मेहताब इनामदार, दिलीप पांढारकर, पांडूरंग जगताप, किशोर कळसकर, आण्णा कसबे, भास्कर नारखेडे, हिरा जाधव आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रीमंडळाचे सदस्य जन मानसात संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य करुन जाती, धर्मात तेढ निर्माण करीत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे कार्यकर्ते महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वांचा देशभर प्रचार प्रसार करतील. देशात पुन्हा पुरोगामी विचार वाढवून 2019 ला सत्ता बदल करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.