Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
यंदा 9.4% पगारवाढीची शक्यता ! भारताने चीनला टाकले मागे

व्हीएस न्यूज - आर्थिक प्रगतीच्या बाबत भारत आणि चीनमध्ये चढाओढ असतानाच एका बाबतीत मात्र भारताने चीनवर मात केली आहे. नोकरदारांना देण्यात येणाऱ्या पगारवाढीच्या बाबतीत भारताची सरशी झाली असून यावर्षी भारतातील नोकरदारांना घसघशीत पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

अॅव्हॉन इंडिया या कंपनीने आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रातील अनेक देशांमध्ये पगारवाढीच्या शक्यतेबाबत एक सर्वेक्षण केले. या अहवालानुसार, भारतातील पगारदारांना 2018 साली सरासरी 9.4टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे, तर चीनमध्ये हा आकडा सरासरी 6.7 टक्के एवढा आहे.

वेगवेगळ्या 20 उद्योगांतील 1000 कंपन्यांमध्ये ही पाहणी करण्यात आली. भारतात गेल्या वर्षी सरासरी 9.3 टक्के एवढी पगारवाढ झाल्याचे त्यात दिसून आले. मात्र त्यापूर्वीच्या वर्षांमध्ये ही पगारवाढ दोन आकडी म्हणजे 10 टक्क्यांच्या वर होती. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पगारदारांना कमी पगारवाढ मिळणार आहे. यात आणखी एक विशेष म्हणजे आधीच लठ्ठ पगार मिळविणाऱ्या लोकांच्या पगारामध्ये फारशी वाढ झालेली नाही. उलट वरिष्ठ व व्यवस्थापनाच्या पातळीवर काम करणाऱ्या लोकांच्या पगारवाढीची पातळी खाली येत चालली आहे. या पगारवाढीच्या मागे कंपनीचा आकार व्यापार-व्यवसायात असे पद्धत व कामगिरी अशा अनेक घटक आहेत असे अॅव्हॉन इंडियाचे भागीदार आनंदरूप घोष यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
पाकिस्तानात टीम पाठविण्यास बीसीसीआयचा स्पष्ट नकार

व्हीएस न्यूज - पाकिस्तानात एप्रिल मध्ये होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन्स कप साठी भारतीय क्रिकेट संघ पाठविण्यास बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे हे सामने पाकिस्तानात होणार का यावरच सवाल निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अधिकारी या संदर्भात बोलताना म्हणाले की बीसीसीआयने कुठल्याही परिस्थितीत टीम इंडिया पाकिस्तानात सामने खेळणार नाही असे कळविले आहे.

पाक क्रिकेट बोर्डाने या सामन्यांसाठी पूर्ण तयारी केली आहे. मात्र टीम इंडिया सहभागी होणार नसेल तर हे सामने श्रीलंका किंवा बांग्ला देशात खेळवावे लागतील. सर्व देश पाकिस्तानात त्यांच्या टीम पाठवितील अशी अपेक्षा होती. या संदर्भात कोलंबोत एक बैठक घेतली जात असून त्यात हे सामने तसेच आशिया कप सामने संदर्भात अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते.

या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये भारतात आशिया कप खेळला जाणार आहे. त्यात पाकिस्तान सहभागी होणार का नाही याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीवर घेतला जाईल असेही सांगितले जात आहे. मुंबईवर २००८ साली दहशवादी हल्ला झाल्यानंतर पाक विरुद्ध कोणताही द्विपक्षी सिरीज खेनाल्यास भारताने नकार दिला होता.

...Read More

V. S. News
जल्लोषात केलेल्या गोळीबारात नवरदेवाचा मृत्यू

व्हीएस न्यूज - लग्नाच्या जल्लोषातील अतिउत्साह नवरदेवाच्याच जीवावर बेतण्याची घटना नवी दिल्लीत घडली आहे. येथील एका लग्नाच्या वरातीत नवरदेवाच्या मित्राने जल्लोषात केलेल्या गोळीबारामध्ये त्या नवरदेवाचाच मृत्यू झाला आहे.

दीपक कुमार (वय 21 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव असून मंगळवारी रात्री सीमापुरी भागात ही घटना घडली. दीपक हा या वरातीच्या अग्रभागी होता आणि सर्वांच्या जल्लोषात तोही सामील होता. त्यावेळी एक गोळी घेऊन त्याच्या पाठीत लागली, असे पोलिस उपायुक्त प्रसाद यांनी एशियन एज वृत्तपत्राला सांगितले. ही वरात फरीदाबादकडे जात असताना नवरदेवाच्या एका मित्राने बंदुकीतून गोळी झाडली. ती अचानक दीपककुमारच्या पाठीत शिरली आणि तो घोड्यावरुन खाली पडला, असे प्रसाद यांनी सांगितले.

वऱ्हाडी मंडळी दिपकला जीटीबी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटनेतील आरोपी अद्याप फरार आहे. गोळी झाडणारा इसम हा दीपककुमारचा याचा दूरचा नातेवाईक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

...Read More

V. S. News
पुढच्या वर्षी चंद्रावरही मिळेल 4जी नेटवर्क

व्हीएस न्यूज - पृथ्वीवर सर्वत्र 4जी नेटवर्क मिळत नसताना चंद्रावर हे नेटवर्क पुरविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2019 साली चंद्राच्या पृष्ठभागावरही 4जी नेटवर्क मिळेल, असे व्होडाफोन या टेलिकॉम कंपनीने जाहीर केले आहे. त्यासाठी कंपनीने नोकिया कंपनीशी हात मिळवणी केली आहे.

पुढच्या वर्षी चंद्राच्या पृष्ठभागावर मनुष्याने पाऊल ठेवण्याच्या ऐतिहासिक घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त ही कामगिरी करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर व्होडाफोन आणि नोकीया यांनी बर्लिन येथील पीटी सायंटिस्टस् या अंतराळ संशोधन कंपनीसोबत कामावर सुरुवात केली आहे. पीटी सायंटिस्ट्चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोबर्ट बोम यांनी ही माहिती दिली आहे.

केन कार्निव्हल येथील स्पेस एक्स फॅक्टर9 या रॉकेटमधून 2019 या वर्षी ही चांद्रमोहीम सुरू होईल. यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीवर हाय डेफिनेशन स्ट्रीमिंग शक्य होईल. यासाठी सुमारे एक किलो वजनाचा हार्डवेअर लागणार आहे, असे रोबर्ट बोम म्हणाले. तर दुसरीकडे 5जी सेवा पुरविण्याएवढी तयारी झालेली नाही, परंतु 5जी नेटवर्कचीही चाचणी सुरू केल्याचे व्होडाफोनने म्हटले आहे.

...Read More

V. S. News
बिहारमध्ये काँग्रेसला झटका, माजी अध्यक्षांसह चार आमदार जदयूमध्ये

व्हीएस न्यूज - होळीच्या पूर्वसंध्येला बिहारमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षांसहीत चार आमदारांनी संयुक्त जनता दलात(जदयू) प्रवेश केला आहे. पक्षांतर करणारे सर्व आमदार विधान परिषदेचे सदस्य आहेत.

माजी प्रदेशाध्यक्ष डॉ अशोक चौधरी यांच्यासहीत दिलीप चौधरी, रामचंद्र भारती आणि तनवीर अख्तर या आमदारांनी जदयू प्रवेश केला आहे. अशोक चौधरी यांनी काल रात्री उशिरा आपल्या सरकारी निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. यावेळी अशोक चौधरी म्हणाले, “मी अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर बिहारमध्ये काँग्रेसला उभे केले. चार आमदार असलेल्या पक्षाला 27आमदारांपर्यंत आणले. विधान परिषदेत काँग्रेसचे सहा सदस्य झाले. परंतु मला कशी वागणूक दिली, हे सर्वांना माहीत आहे. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले, त्यामुळे पक्ष सोडण्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

मी आणि अन्य तीन आमदार जदयूची सदस्यता घेणार आहोत. या संबंधात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. विधान परिषदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी अर्ज दिला आहे,अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच आणखी अनेक जण काँग्रेस सोडण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे प्रभारी बिहार अध्यक्ष कादरी यांनी चौधरी व अन्य तीन नेत्यांना पक्षातून निलंबित करण्याची घोषणा केली आहे.

...Read More

V. S. News
आता कॅनरा बँकेत घोटाळा ! ममता बॅनर्जीच्या निकटवर्तीयावर खटला दाखल

व्हीएस न्यूज - पंजाब नॅशनल बँक आणि ओरिएंटल बँकेतील घोटाळे समोर आल्यानंतर आता कॅनरा बँकेत 500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. या संबंधात केंद्रीय अन्वेषण विभागाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती व्यक्तीवर खटला दाखल केला आहे.

कोलकत्यातील आरपी इन्फोसिस्टिम कॉम्प्युटर कंपनीच्या संचालकांवर सीबीआयने खटला दाखल केला आहे. शिवाजी पांजा, कौस्तुभ रे, विनय बाफना आणि उपाध्यक्ष देबनाथ पाल अशी या संचालकांची नावे आहेत. यातील पांजा हे बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

कॅनरा बँकेने या प्रकरणी आरपी इन्फोसिस्टिमच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यात या कंपनीने 515.15 कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपींनी कॅनरा बँकेसोबतच अन्य 10 बँकाही गुंतलेल्या आहेत. आरोपींनी पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, युनियन बँक ऑफ इंडिया,अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ पतियाळा आणि आणि फेडरल बँक यांच्याकडूनही कर्ज घेतले होते असा आरोप कॅनरा बँकेने केला आहे.

पांजा हे फेब्रुवारी 2015 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या सोबत बांगलादेश दौर्‍यावर गेले होते. त्यावेळी परत येताना कोलकाता येथे त्यांना अटक करण्यात आली होती. जून 2015 मध्येही पांजा व अन्य संचालकांविरुद्ध खटला खटला दाखल झाला होता. त्यावेळचे प्रकरण आयडीबीआय बँकेशी संबंधित 180 कोटी रुपयांच्या कर्जाचे होते.

...Read More

V. S. News
आता कॅनरा बँकेत घोटाळा ! ममता बॅनर्जीच्या निकटवर्तीयावर खटला दाखल

व्हीएस न्यूज - पंजाब नॅशनल बँक आणि ओरिएंटल बँकेतील घोटाळे समोर आल्यानंतर आता कॅनरा बँकेत 500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. या संबंधात केंद्रीय अन्वेषण विभागाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती व्यक्तीवर खटला दाखल केला आहे.

कोलकत्यातील आरपी इन्फोसिस्टिम कॉम्प्युटर कंपनीच्या संचालकांवर सीबीआयने खटला दाखल केला आहे. शिवाजी पांजा, कौस्तुभ रे, विनय बाफना आणि उपाध्यक्ष देबनाथ पाल अशी या संचालकांची नावे आहेत. यातील पांजा हे बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

कॅनरा बँकेने या प्रकरणी आरपी इन्फोसिस्टिमच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यात या कंपनीने 515.15 कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपींनी कॅनरा बँकेसोबतच अन्य 10 बँकाही गुंतलेल्या आहेत. आरोपींनी पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, युनियन बँक ऑफ इंडिया,अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ पतियाळा आणि आणि फेडरल बँक यांच्याकडूनही कर्ज घेतले होते असा आरोप कॅनरा बँकेने केला आहे.

पांजा हे फेब्रुवारी 2015 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या सोबत बांगलादेश दौर्‍यावर गेले होते. त्यावेळी परत येताना कोलकाता येथे त्यांना अटक करण्यात आली होती. जून 2015 मध्येही पांजा व अन्य संचालकांविरुद्ध खटला खटला दाखल झाला होता. त्यावेळचे प्रकरण आयडीबीआय बँकेशी संबंधित 180 कोटी रुपयांच्या कर्जाचे होते.

...Read More

V. S. News
जीएसटी जमा न करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक

व्हीएस न्यूज जीएसटी कायदा अमलात आल्यानंतर पहिल्यांदाच या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून मुंबईतील २ व्यापाऱ्यांना या कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. इनपुट टॅक्स क्रेडिटच्या घोटाळा प्रकरणातील आरोपाखाली ही कारवाई जीएसटी अधिकाऱ्यांनी केली आहे.

शाह ब्रदर्स इस्पात प्रा.लिमिटेडचे संचालक संजीव मेहता आणि व्ही.एन. इंडस्ट्रीचे संचालक विनयकुमार आर्या या दोघांचा जीएसटी कायद्यान्वये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत मुंबई जीएसटीचे आयुक्त डॉ. के. एन. राघवन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कुठल्याही मालाचा पुरवठा न करता फक्त कागदावरच व्यवहार दाखवून इनपुट टॅक्स क्रेडिट जमा करण्याचा आरोप या दोन्ही आरोपींवर आहे.

५ कोटी २० लाख आरोपी संजीव मेहता यांच्यावर आणि २ कोटी ३ लाख विनयकुमार आर्या यांच्यावर इनपुट टॅक्स क्रेडिट जमा न करण्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी विनय कुमार आर्या याने जीएसटी नियमान्वये रक्कम भरल्यानंतर त्याला जीएसटी कार्यालयातून जामीन मिळाला. तर संजीव मेहता यास न्यायालयात हजर करून त्या ठिकाणी रक्कम भरल्यानंतर जामीन मिळाला आहे.

जीएसटी अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार कागदावरच बनावट व्यवहार दाखवून टॅक्स इनपुट क्रेडिट दोन्ही व्यापाऱ्यांनी वाढवले होते. जेणेकरून त्यांच्याजवळ जमा होणाऱ्या पैशांच्या आधारावर लेटर ऑफ क्रेडिट दाखवून हे दोघे बँकांना फसविण्याच्या प्रयत्नात होते. जीएसटी अधिकाऱ्यांना संशय आहे, की अशाच प्रकारे अनेक व्यापारी अशा प्रकारची फसवणूक करत आहेत.

...Read More

V. S. News
भाजपची राज्यसभेची ऑफर नारायण राणेंना अमान्य?

व्हीएस न्यूज - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी घेतलेल्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले. भाजपतर्फे नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते अशाही चर्चा झाल्या. पण नारायण राणे ही ऑफर यांना अमान्य असल्याचे दिसते आहे. कारण नुकतेच एक ट्विट नारायण राणेंचा मुलगा नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, नारायण राणेंच्या हितचिंतकांना असे वाटते आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळासाठी रहावे आणि नारायण राणेंसारख्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. त्यांना आम्हाला विधानसभेत बघायचे आहे राज्यसभेत नाही. नारायण राणेंनी भाजपची राज्यसभेची ऑफर अमान्य असल्याची चर्चा नितेश राणे यांच्या या ट्विटनंतर रंगली आहे.

नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना मंत्रीपद देण्यासाठी उशीर का होतो आहे याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा असे सांगितले होते. तसेच राज्यसभेची ऑफर भाजपकडून असल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. पण नितेश राणे यांच्या सूचक ट्विटनंतर नारायण राणे यांना ही ऑफर मान्य नसल्याची माहिती समोर आली आहे.

...Read More

V. S. News
नाशिक महापालिकेतील ३ कामचुकार अधिकाऱ्यांना मुंढेंकडून नोटीस

व्हीएस न्यूज - पालिकेच्या ११ अधिकाऱ्यांची नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चौकशी सुरु केली असून ३ अधिकारी या चौकशीत दोषीही आढळले आहे. तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच आपला कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे.

चौकशीत दोषी आढळलेल्या ३ कामचुकार अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढे यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या अधिकाऱ्यांना उत्तर देण्यासाठी वेळही देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करणार असल्याचे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

मुंढेंनी नाशिककरांना नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शी कारभार केला जाईल. नाशिक शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होईल, त्यासाठी काम केले जाईल, असा विश्वास दिला. कोणताही नागरिक,पदाधिकारी किंवा कंत्राटदार यांनी फाईल फिरवू नये, ते काम अधिकारी कर्मचाऱ्याचे आहे, त्यात हलगर्जीपणा झाला तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुंढेंनी पदभार स्वीकारताना दिला होता.

...Read More

V. S. News
भाजपकडून नारायण राणेंची फसवणूक – जयंत पाटील

व्हीएस न्यूज नारायण राणे यांची भाजप पक्षाकडून फसवणूक केली जात असल्याचे मत माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच जे दबावाचे राजकारण भाजपकडून केले जात आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. दरम्यान, शिवसेनेचा विरोध म्हणजे फक्त दिखावा असून सरकारमध्ये शिवसेनेला किंमत नसल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

पाटील म्हणाले, भाजप आणि शिवसेनेचे हे सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करत असून इंदिरा गांधी यांनी देखील काही वर्षांपूर्वी असेच केले होते. सत्ता परिवर्तन झाल्याचे चित्र त्यावेळी पाहायला मिळाले होते. आता राज्य आणि केंद्र सरकारदेखील दबावाचे राजकारण करत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांनी अभिनय केलेल्या एका गाण्याची खिल्ली उडवली जात आहे. जयंत पाटील यांना याबाबत विचारले असता, राज्यातील जनता सुज्ञ असून यावर निर्णय जनताच घेईल,अशी सावध प्रतिक्रिया देत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. येत्या १० तारखेला शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या हल्लाबोलमोर्चाचा समारोप होणार असल्याचीही माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

...Read More

V. S. News
उत्तर प्रदेशात अवघ्या १ रुपयात साडी!

व्हीएस न्यूज एक रुपयांच्या नाण्यांचे काही वेळासाठी का होईना पण वाराणसीत अच्छे दिन आले. फक्त १ रुपयात साडी खरेदी करण्याची स्कीम शहरातील महमूरगंज येथे एका दुकानमालकाने काढली अन् बघता-बघता तरुणींच्या व महिलांच्या लोंढेच्यालोंढे साडी घेण्यासाठी दुकानात अवतरले. साड्या खरेदी करण्यासाठी महिला अक्षरश: तुटून पडल्या.

दुकानात झुंबड उडाल्यामुळे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. शेवटी साडी खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहाण्याची वेळ महिलांवर आली. पाहता-पाहता रांग थेट रस्त्यावर जाऊन पोहोचली अन् वाहतुकीची कोंडी झाली. अखेर पोलिसांना घटनास्थळी दाखल होऊन गर्दी पांगवावी लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दुकानदाराला नाईलाजाने स्कीम बंद करावी लागली. स्कीम बंद केल्यामुळे तासन्-तास रांगेत उभे असलेल्या महिलांचा पारा भडकला. अनेक महिलांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अगोदर पाचशे रुपयांची खरेदी केल्यानंतर मग एका रुपयात एक साडी खरेदी करता येणार, अशी ही स्कीम होती. पण दुकानदाराने जाहिरात करताना अवघ्या एका रुपयात साडीअशी जाहिरात केली अन् प्रंचड गोंधळ उडाला.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!