Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
भारत, अमेरिका आणि इस्रायलने इसिसच्या खात्म्यासाठी एकत्र यायला हवे – स्वामी

व्हीएस न्यूज भारताने अमेरिका आणि इस्त्रायलसोबत आपल्या दहशतीने जगभरात थैमान घातलेल्या इसिसया आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटेशी मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे. याचा चांगला उपयोग होईल, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी व्यक्त केले आहे.

जगाला इसिसने आव्हान दिले असून इसिसचे जगात ज्या ठिकाणी अस्तित्व असेल त्यांचे ते मनसुबे उधळून लावण्यासाठी अमेरिका आणि इस्त्रायलसोबत भारताने एकत्र यायला हवे. संख्याबळ आपल्याकडे आहे, अमेरिका आधुनिक शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण असून इस्त्रायलकडे सक्षम गुप्तचर यंत्रणा आहे. या तीनही गोष्टी एकत्र आल्यास एक ताकदवान दल तयार होईल. इसिसचा त्यामुळे ज्या कुठल्या देशात तळ असेल तेथे आपले सैन्य पाठवण्यात संकोच करता कामा नये, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
सोशल मीडियामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टीत ‘मी’पणा झळकू लागतो – मोहन भागवत

व्हीएस न्यूज - संरसंघचालक मोहन भागवत यांनी सोशल मीडियामुळे माणूस आत्मकेंद्री आणि अहंकारी होतो, असे मत मांडले आहे. सोशल मीडियापासून मी सोशल मीडियाचे दुष्परिणाम समजून घेणे गरजेचे असून दुष्परिणामांमुळेच लांब असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यया साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत नागपूरमध्ये झालेली प्रतिनीधी सभा, सोशल मीडिया, संघाच्या शाखा अशा विविध विषयांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत मांडले. तुम्ही अॅप्स, सोशल मीडियाकडे कसे बघता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. भागवत यावर म्हणाले की, ते एक उपयोगी साधन आहे. त्याचा वापर आपण केला पाहिजे, पण एका मर्यादेपर्यंत. तुम्ही त्याचा वापर संघटनेत एक सुविधा म्हणून करु शकता. पण सोशल मीडियाचा वापर करताना आधी त्याचे दुष्परिणाम समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही सोशल मीडियामुळे आत्मकेंद्रीत आणि अहंकारी बनता. मीपणा तुमच्या प्रत्येक गोष्टीत झळकू लागतो. समाजाचा मी एक भाग असून समाजासाठी थांबण्याची गरज नसल्याची भावना मनात येते. फेसबुक तर अगदी फेसच आहे, असे त्यांनी सांगितले. संघाचे फेसबुक आणि ट्विटरवर अकाऊंट आहे. पण माझे नाही. ना भविष्यातही मी सोशल मीडियावर येईन. राजकारणातील मंडळींना फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट जास्त उपयुक्त ठरते. पण त्याचा वापर करताना त्यांना सावधही राहावे लागते, असे त्यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय ६५ वर्षे

व्हीएस न्यूज - अत्यावश्यक सेवा कायद्यातून अंगणवाडी सेवक आणि सेविकांना मागे घेण्याचा तूर्तास निर्णय झालेला नाही. पण ६० वर्षांवरून अंगणवाडी सेवकांच्या निवृत्तीचे वय पुन्हा ६५ करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. त्यांनी ही घोषणा अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या मागण्यांना उत्तर देताना केली.

हा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ५ वर्षांनी कमी केल्याने सेविकांमध्ये असलेल्या नाराजीची भावना पाहता घेतल्याचे त्यांनी सष्ट केले. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात आवश्यक ती वाढ करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी केली होती. अंगणवाडी सेविकांचे मानधन आधीच वाढवल्याची माहिती यावर त्यांनी सभागृहात दिली. अगोदरच अंगणवाडी सेविकांचे मानधन चारवरून साडेसहा हजार रुपये प्रति महिना एवढे वाढवण्यात आले आहे. तसेच मेस्मा या अत्यावश्यक सेवा कायद्यातून अंगणवाडी सेविकांना वगळण्याबाबत तूर्तास तरी कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवांमध्ये आणण्याबाबत उच्च न्यायालयात आम्ही प्रतिज्ञापत्र दिले आहे. तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये न आणल्यास मुलांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होईल,असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.

...Read More

V. S. News
रेल्वे रुळावर उतरले रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी

व्हीएस न्यूज विद्यार्थ्यांनी दादर - मांटुगादरम्यान रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली असून विद्यार्थी रेल्वे रुळावर रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात उतरले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करत रेल्वे रुळावरुन हटवण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडून रुळावरुन हटण्यास नकार दिला.

शेकडो विद्यार्थी अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. आम्ही रेल्वेकडे गेल्या तीन ते चार वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे एका विद्यार्थ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आम्ही रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. पोलिसांचे पथक रेल रोकोचे वृत्त समजताच घटनास्थळी पोहोचले. आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण विद्यार्थी आक्रमक होत रेल्वे रुळावरुन हटण्यास नकार दिला. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थी आणखी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी सकाळी सात वाजल्यापासून आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी आहेत. आधी रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

...Read More

V. S. News
गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अण्णा हजारे आंदोलनावर ठाम !

व्हीएस न्यूज - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जनलोकपाल आंदोलनावर शिष्टाई अखेर निष्फळ ठरली असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चच्या आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले आहे. महाजन केवळ मंत्री आहेत. दिल्लीतील बॉसच्या हातात सूत्र असल्यामुळे चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय घ्या, असे अण्णा यांनी म्हटले आहे.

अण्णांनी आंदोलनाला रामलीला मैदानावर परवानगी मिळाल्याने चलो दिल्लीचा नारा दिला. अण्णांनी यावेळी लोकशाही देशाचा कारभार चार जण पाहत असल्याचा आरोप केला. तर हुकूमशाहीकडे देश कसा वाटचाल करत आहे, हे आंदोलनात सांगणार असल्याचे अण्णा म्हणाले.

कोणते विधेयक अधिवेशनात मांडणार ते अगोदर सांगा, असेही अण्णांनी बजावले. वेळ कमी पडत असल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवा, असेही अण्णांनी सुचवले. आता केवळ चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. पत्रांना उत्तर देण्यासाठी परदेशी दौर्‍यातून पंतप्रधानांना सवड नसेल किंवा ईगो असेल, असा टोलाही अण्णांनी लगावला. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर रामलीला मैदानावर होणाऱ्या मोदी सरकारविरोधातील आंदोलनावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

...Read More

V. S. News
छोटा राजनच्या भावावर बलात्काराचा आरोप

व्हीएस न्यूज - लग्नाच्या आमिषाने आपल्यावर गँगस्टर छोटा राजनचा भाऊ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळने बलात्कार केल्याचा आरोप एका २२ वर्षीय युवतीने केला आहे. या प्रकरणी निकाळजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निकाळजेने आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत, तसेच शिक्षणाचा खर्च करु, असे सांगून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला, असा आरोप नवी मुंबईतील घणसोली भागात राहणाऱ्या एक युवतीने केला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नवी मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग केले आहे.

पोलिसात युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती २०१४मध्ये कुर्ला येथे आपल्या मामाकडे आली असताना तिच्यावर दीपक निकाळजेची नजर पडली. तिच्या कुटुंबासोबत लगट करुन, तिला पैसे आणि लग्नाचे आमिष निकाळजेने दाखवले. कर्जत येथील एका फार्म हाऊसवर आपल्या ऑडी कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला,असाही आरोप आहे. लग्नाची मागणी या मुलीने केली असता तिला मारहाण सुद्धा करण्यात आली. दीपक निकाळजेची बहीण आणि मेहुण्याने पोलीस तक्रार करु नये म्हणून दबाव आणल्याचा आरोपही तक्रारदार युवतीने केला आहे. टिळकनगर पोलिसात तरुणीने १८ मार्चला तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जिथे हा प्रकार घडला त्या नवी मुंबईतील परिमंडळ २ कडे वर्ग केला आहे, अशी माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे यांनी दिली.

...Read More

V. S. News
मृत्यूला चकमा देणारे चीता देशसेवेत पुन्हा रुजू

व्हीएस न्यूज - काश्मीरच्या बांदीपोरा भागात दहशतवाद्यांशी झुंज घेताना ९ गोळ्या अंगावर झेलून जबर जखमी झालेले सीआरपीएफचे कमांडंट चेतन चीता देशसेवेच्या कामावर पुन्हा रुजू झाले असून त्यांनी कोब्रा बटालियन मध्ये पोस्टिंग मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. ही बटालियन नक्षलीविरोधी कारवाया पार पाडते.

१४ फेब्रुवारी रोजी काश्मीर मध्ये दहशतवाद्यांबरोबर अटीतटीची झुंज घेताना चीता याच्या डोळ्यात, मेंदूत, दोन्ही हात, खांदे, कमरेत ९ गोळ्या लागल्या होत्या. अत्यवस्थ अवस्थेत त्यांच्यावर एम्स मध्ये उपचार सुरु असताना ते कोमात गेले होते. दीड महिना कोमात राहिल्यावर मृत्यूशी यशस्वी लढा देऊन ते बाहेर आले आणि वर्षभरात बरे होऊन कामावर रुजू झाले आहेत. त्याना १५ ऑगस्ट ला शांती काळातले दुसरे मोठे गॅलंट्री अवार्ड कीर्तीचक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. चीता यांना सध्या सीआरपीएफच्या कार्यालयात काम दिले जाणार आहे कारण अजूनही ते पूर्णपणे फिट नाहीत त्यामुळे त्यांची इच्छा असली तरी त्यांना आघाडीवर मोर्चा सांभाळण्यासाठी पाठविले जाणार नाही असे समजते.

...Read More

V. S. News
अॅक्सिस बँकेलाही घातली चार हजार कोटीची टोपी

व्हीएस न्यूज – बँकांना टोप्या घालण्याचे सत्र सुरूच असून आता आणखी एक बँक घोटाळा समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी अॅक्सिस बँकेच्या तक्रारीवरुन एका खासगी कंपन्यांच्या तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे. या खासगी कंपनीचे नाव पारेख अॅल्यूमिनेक्स लिमिटेड असे असून, बँकेला तब्बल चार हजार कोटींचा चुना कंपनीने लावल्याचा आरोप होत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी भंवरलाल भंडारी, प्रेमल गोरागांधी आणि कमलेश कानूनगो यांना अटक केली आहे. ही कारवाई अॅक्सिस बँकेच्या तक्रारीनंतर करण्यात आली.

दरम्यान, बँकेचे अधिकारी देखील या घोटाळ्यात सहभागी असल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. अॅक्सिस बँकेच्या तक्रारीत अमिताभ पारेख, राजेंद्र गोठी, देवांशु देसाई, किरण पारेख आणि विक्रम मोरडानी यांच्याही नावांचा समावेश आहे. यातील अमिताभ पारेख यांचे २०१३ सालीच निधन झाले आहे. दुसरीकडे पारेख अॅल्यूमिनेक्स लिमिटेडविरोधात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसिस बँकेनेही यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन सीबीआय कंपनीचा कसून तपास करत आहे. पारेख अॅल्यूमिनेक्स लिमिटेड ही कंपनी रियल स्टेट डेव्हलपर्सकडे फंड डायव्हर्ट करत असल्याचा बँकेचा आरोप आहे.

...Read More

V. S. News
राजू शेट्टींची काँग्रेससोबत हातमिळवणी

व्हीएस न्यूज - गेली लोकसभा निवडणूक भाजपबरोबर लढविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या साथीने लढविण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. खासदार राजू शेट्टी यांच्या या निर्णयाने पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो.

शेट्टींनी काही महिन्यांपूर्वीच भाजपशी मैत्री सोडली होती. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा यापूर्वीच केली आहे. शेट्टी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे जाहीर केले. भाजपला झटकल्यानंतर शेट्टी यांनी त्यांचे एके काळचे कट्टर शत्रू शरद पवार यांच्याशी चांगलेच जुळवून घेतल्याचे मानले जाते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशीही हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात भाजपविरोधात भरभक्कम आघाडीला आकार देण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे.

शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेने २०१४ मध्ये भाजपशी युती केली होती. परंतु त्यांचा भ्रमनिरास होऊ लागला. त्यातच त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत हे मंत्री झाल्यानंतर तर पक्षामध्ये चांगलीच दुफळी माजली. तेव्हापासून शेट्टी भाजपविरोधात गेले होते.

...Read More

V. S. News
तीनशे सैनिक पत्नींचा विशेष सन्मान

व्हीएस न्यूज - मराठा बटालिन (काली पाचवी) च्या स्थापनेला २५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ३०० सैनिक पत्नींचा विशेष सन्मान पिंपळेगुरव येथील निळुफुले नाट्यगृहात करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार लक्ष्मण जगताप युवामंच आणि शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अश्विनी लक्ष्मण जगताप या होत्या. अश्विनी जगताप यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

अश्विनी जगताप यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित ३०० सैनिक पत्नींना साडी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उषा मुंढे, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, गिरीजा शितल शिंदे उपस्थित होते. यावेळी कर्नल अमनमोहन यांना भक्ती शक्तीचे प्रतिक संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला. आभार नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मानले. तर सुत्रसंचालन पिंपरी चिंचवड भाजप सोशल मिडीया अध्यक्ष रणजित इंगळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश कवटेकर, रणजित इंगळे आणि सागर वाडीया यांनी विशेष परिश्रम घेतले.

...Read More

V. S. News
तंबाखूचं व्यसन करण्यापासून रोखायला हवं होतं – शरद पवार

व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या तंबाखू आणि सुपारीच्या व्यसनाबद्दल खेद व्यक्त केला आहे. ४० वर्षांपूर्वी या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जाण्यापासून आपल्याला कोणीतरी रोखायला हवं होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन डेन्टल असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. इंडियन डेन्टल असोसिएशनने २०२२ पर्यंत तोंडाच्या कर्करोगावर पुर्णपणे नियंत्रण आणण्याचा निर्धार केला आहे.

जीवघेण्या कॅन्सरवर मात करुन पुन्हा जोमाने आयुष्याचा प्रवास सुरु केलेल्या शरद पवारांनी कार्यक्रमात आपले मत मांडले. यावेळी त्यांनी आपल्याला कॅन्सर झाल्यावर झालेला त्रास, उपचार घेताना झालेल्या वेदना सांगितल्या. सर्जरीमुळे आपल्याला प्रचंड त्रास झाला. आपले दात काढण्यात आल्याने तोंड पुर्णपणे उघडण्यास त्रास होत होता. बोलताना आणि अन्न गिळतानाही असह्य वेदना व्हायच्या’,असं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी बोलताना शरद पवारांनी इंडियन डेन्टल असोसिएशनला लागेल ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं.

२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांना कॅन्सर असल्याची माहिती मिळाली होती. उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना भारतातील काही तज्ञ डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी कृषीमंत्रीपद सांभाळणा-या शरद पवारांना ३६ वेळा रेडिएशन ट्रिटमेंट घ्यायची होती. हे प्रचंड वेदनादायी होतं असं एकदा शरद पवारांनी सांगितलं होतं. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत शरद पवार आपल्या मंत्रालयात काम करत असत. नंतर २.३० वाजता अपोलो रुग्णालयात केमिओथेरपी घेत असत. यावेळी एका डॉक्टराने तुमच्याकडे फक्त सहा महिने असून महत्वाची कामे उरकून घ्या असं सांगितलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी मला आजाराची चिंता नाही, तुम्हीही करु नका असं म्हटलं होतं. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात करणारे शरद पवार लोकांना तंबाखूच व्यसन न करण्याचं आवाहन करत असतात.

...Read More

V. S. News
प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला, संभाजी भिडे गुरूजींचा आरोप

व्हीएस न्यूज - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारावेळी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र पेटला, असा आरोप संभाजी भिडे गुरूजींनी केला आहे. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय स्वार्थ आणि मतांसाठी या दंगलीचा वापर करण्यात आला. या दंगलीचे खरे सूत्रधार वेगळेच आहेत. त्यामुळे याची चौकशी केली जावी, अशी मागणी करत येत्या २८ मार्चला महाराष्ट्रात मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मागील चार ते पाच वर्षांत मी वढू गावात फिरकलेलोही नाही. काही संबंध नसताना माझं नाव या प्रकरणात घेतलं आहे. दलितांना खूश करण्यासाठी व त्यांची मते मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवल्याचा आरोप भिडे गुरूजींनी केला. आंबेडकर हे विद्वान आणि मोठ्या कुळात जन्मलेले आहेत. त्यांनी तरी विचारपूर्वक बोलायला हवे होते. त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. यावर काय बोलावं हेच कळत नाही. जे घडलंच नाही, त्यावर हा सगळा आगडोंब उसळला. त्यामुळे या दंगलीची चौकशी झाली पाहिजे. ज्या महिलेने मला दगड मारताना पाहिले त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

दंगलीत झालेल्या नुकसानीचे सरकारने पैसे भरण्याची काहीच कारण नाही, असेही ते म्हणाले. कोरेगाव-भीमा प्रकरणी सरकारचेही धोरण बोटचेपे पणाचे राहिले. या दंगलीचे खरे सूत्रधार वेगळेच आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करायला हवी. एल्गार परिषद घेणाऱ्यांना पहिल्यांदा अटक करायला हवी. प्रकाश आंबेडकरांचीही चौकशी करावी. आता ते विधानसभेला घेराव घालणार आहेत. मला अटक होईपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहेत म्हणे. देव त्यांना बुद्धी देवो, शहाणपणा देवो, इतकंच मी म्हणेन. वास्तविक लोक वेगळेच आहेत. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांनी माझ्यावर आरोप केला. त्यांनी खात्री तरी करावी. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नंतर महाराष्ट्र पेटला होता, असा आरोप त्यांनी केला. येत्या २८ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात याप्रकरणी मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मिलिंद एकबोटेंना अटक केल्यानंतर प्रकाश आंबेडकर व इतर संघटनांनी संभाजी भिडे गुरूजींनाही अटक करण्याची मागणी केली होती. त्यासाठी आंदोलन पुकारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!