व्हीएस न्यूज - भोसरी एमआयडीसीतील झिकोप्लास्ट कंपनीचे व्यवस्थापक जावेद सय्यद यांनी‘रिसायकलिंग ऑफ प्लास्टीक फॉर मॅन्यूफॅक्चर पॉवर क्लॉक अँड ब्रिक्स्’ या नावाने दि.19 जुलै 2017 रोजी. पेटंट नोंदणी कार्यालय मुंबई येथे पर्यावरण पुरक प्लॅस्टिकचा पुर्नवापर करणारे पेटंट नोंदणी केले आहे. ‘रिसायकलिंग ऑफ प्लास्टीक फॉर मॅन्यूफॅक्चर पॉवर क्लॉक अँड ब्रिक्स्’ या त्यांच्या पेटंटमुळे घातक असणा-या प्लॅस्टिकचा पुनर्वापर होऊन पर्यावरण रक्षणास मदत होणार आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर करुन ‘खड्डे मुक्त शहर’ हे ध्येय साध्य करता येईल. यासाठी मोबाईल / पोर्टेबल प्लॅस्टिक रिसाइकलिंग मशीन उभारणी महानगरपालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्थरावर केल्यास शहर खड्डे मुक्त होईल. तसेच शेकडों लोकांना रोजगार मिळेल आणि कोट्यावधी रुपयांची बचत देखील होईल. असा दावा झिकोप्लास्ट कंपनीचे भागीदार संचालक जावेद सय्यद यांनी सोमवारी पिंपरीत पत्रकार परिषदेत केला. यावेळी संचालक आयुब सय्यद ,नाजणींन सय्यद उपस्थित होते,
अशा संशोधक वृत्ती असणा-या अभियंत्यांची सरकारने दखल घ्यावी, व त्यांना सक्षम अर्थ पुरवठा करावा तरच ‘स्टार्ट अप इंडिया’ प्रकल्पाला चालना मिळेल. या पेटंट अंतर्गत प्राप्त झालेल्या स्वामित्व हक्कातून त्यांनी ‘स्टार्ट अप इंडिया’ प्रकल्पाअंतर्गत ऑन लाईन नोंदणी केली. त्यानंतर दोन राष्ट्रीयकृत बँकांचे अधिका-यांनी सय्यद यांच्याशी संपर्क साधला. गेले पाच महिन्यांपासून सय्यद त्या बँकांच्या व्यवस्थापकांकडे कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र बँक व्यवस्थापक सहकार्य करीत नसल्याची तक्रार जावेद सय्यद यांनी केली. बँक व्यवस्थापक नव उद्योजकांची पिळवणूक करतात. हे निषेधार्ह आहे. जावेद सय्यद(M.E.Mechanical) हे मेकॅनिकल शाखेतून व्दिपदवीधर आहेत. आतापर्यत त्यांनी एकूण सात पेटंट नोंदणी केली आहे. यापैकी चार पेटंट ॲटोमोबाईल क्षेत्रांशी तर तीन पर्यावरण क्षेत्रांशी संबंधीत आहेत. हा प्रकल्प पाणी बचत करणारा व ध्वनी, वायुचे प्रदुषण रोखणारा आहे. झिकोप्लास्टने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची सर्वात कौतुकास्पद बाब हीच आहे की या तंत्रज्ञानामध्ये कुठल्याही प्रकारचे वायू आणि पाणी प्रदुषण न होता टाकाऊ प्लॅस्टिकचा पुनर्वापर सहजशक्य आहे.
आपल्या प्रकल्पाविषयी माहिती देताना जावेद सय्यद यांनी सांगितले की, प्लॅस्टिकला निसर्गत: सडायला किंवा कुजायला जवळजवळ 80 ते 100 वर्ष एवढा कालावधी लागतो असे न कुजणारे प्लॅस्टिक जेंव्हा कुजण्या-या सेंद्रीय पदार्थामध्ये सामील होते तेव्हा मात्र त्यांचे मिश्र खतांमध्ये रुपांतर करणे खूप अवघड होऊन जाते म्हणून मग मनपा असे प्लॅस्टिक जमा करत नाही आणि मग ते तसेच इतरत्र पडून राहते आणि प्रदुषणात वाढ होते. यावर दुरगामी व कायमस्वरुपी उपाय भोसरी एमआयडीसी सेक्टर नं. 7 मधील झिकोप्लास्ट कंपनीने नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यात सर्व प्रकारचे प्लॅस्टिकचा वापर करुन पेव्हर ब्लॉक आणि विटांचे उत्पादन करता येईल. याचे झिकोप्लास्ट कंपनीने ‘रिसायकलिंग ऑफ प्लास्टीक फॉर मॅन्यूफॅक्चर पॉवर क्लॉक अँड ब्रिक्स्’ हे तंत्रज्ञान पेटंट नोंदणी केले आहे. त्याच्या हक्कातून एक वर्ष प्रयत्न करुन ‘पिटर’(Peater) मशीनची निर्मिती केली आहे. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणारे व्यापारी सुध्दा जे प्लॅस्टिक वापरत नाही त्या टाकाऊ प्लॅस्टिकचा सुध्दा वापर यात करता येतो. प्लॅस्टिकचा असा पुनर्वापर करणे हा सर्वात नवीन आणि टिकाऊ असा प्रकल्प आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा विभागामध्ये 12 टन एवढे प्रचंड टाकाऊ प्लॅस्टिक दररोज जमा केले जाते. या 12 टनापैकी फक्त 4 ते 5 टन एवढेच टाकाऊ प्लॅस्टिक पुनर्वापर करण्याजोगे असते. झिकोप्लास्टने शोधलेल्या या तंत्रज्ञानामध्ये ह्याच अश्या पडून राहिलेल्या टाकाऊ प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणे सहज शक्य आहे. पातळ द्रवरुपातील प्लॅस्टिक आणि दगडांचा बारीक चुरा एकत्रित करुन पेव्हर ब्लॉक किंवा विटा बनविल्या जातात. यात मानवी हस्तक्षेपाची गरज नाही. टाकाऊ प्लॅस्टिक वितळवताना कोणताही धूर बाहेर पडत नाही. सर्व धूर exhaust gas तंत्रज्ञानाव्दारे शोषला जातो आणि त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन शुध्द हवेत रुपांतर केले जाते. यासाठी पाण्याचा अल्पसा वापर करावा लागतो. या पेव्हर ब्लॉकचा वापर फुटपाथ आणि वाहन पार्किंग, औद्योगिक आस्थापनातील फ्लोरिंगसाठी करता येईल. बाजारात उपलब्ध असलेले पेव्हर ब्लॉक वजनाने जास्त असून त्यांची वजन पेलण्याची क्षमता 8 टन एवढी आहे. एकदा तुटले की परत वापरता येत नाही. झिकोप्लास्टने बनविलेल्या पेव्हर ब्लॉक आणि ब्रिक्स्चा पुनर्वापर करता येतो. ते वजनाला तर हलके आहेत आणि त्यांची वजन पेलण्याची क्षमता 22 टन एवढी प्रचंड आहे. (सोबत प्रयोग शाळा अहवाल जोडला आहे.) तसेच हे पेव्हर ब्लॉक 150 डीग्री एवढे तापमान सहन करु शकतात. हे ब्लॉक तोडणे खूप कठिण आहे. त्यामुळे याचा वापर औद्योगिक क्षेत्रात देखील होऊ शकतो. याची किंमत सध्या उपलब्ध असणा-या पेव्हर ब्लॉकच्या तुलणेत 40 टक्के कमी आहे.
10 सेटअप मशीन पिंपरी चिंचवड परिसरामध्ये उभारले तर अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल व हजारों टन प्लॅस्टिकचा पुनर्वापर होईल. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी याचा वापर करुन ‘खड्डे मुक्त शहर’ हे ध्येय साध्य करता येईल. यासाठी मोबाईल / पोर्टेबल प्लॅस्टिक रिसाइकलिंग मशीन उभारणी करावी लागेल. असेही जावेद सय्यद यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज –पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर चिंचवड येथील निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने येत्या २६ डिसेंबर पासून नागरिकांसाठी प्रवेश बंद ठेवण्यातयेणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरणास मान्यता दिली आहे. त्यानुसार तेथील विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. संभाजीनगर चिंचवड येथील निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय येथील कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सोयीसाठी हे प्राणी संग्रहालय लवकरात लवकर सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि माजी विरोधी पक्ष नेते नेताजी गणपतराव चव्हाण (वय-५७) यांचे दिर्घ आजाराने मध्यरात्री एकच्या सुमारास मोहननगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
नेताजी चव्हाण यांनी १९९२ ते १९९७ दरम्यान नगरसेवक पद भूषवले आहे. तसेच गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे माजी संचालक, मोहनगर येथील शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष होते. तर भगवा रक्षक या साप्ताहीकाचे ते संपादक होते.
चव्हाण यांच्या पार्थीवावर त्यांच्या मुळगावी मु.पोस्ट बोरवडे ता.कागल जि. कोल्हापूर येथे दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मोहननगर शिवसेना शाखा येथे ठेवण्यात आले होते. यावेळी स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे, मीनल यादव, माजी नगरसेवक मधुकर बाबर, मारुती भापकर, नंदकुमार सातुर्डेकर, योगेश बाबर, गणेश लंगोटे, सारंग कामतेकर, अमित बाबर, तसेच अनेक शिसैनिकांनी श्रद्धांजली वाहिली.
व्हीएस न्यूज - मानवता हाच धर्म या महात्मा गांधी यांच्या संकल्पनेवर स्थापन झालेला कॉंग्रेस पक्ष नेहमी सहिष्णुता, समानता व मानवी अधिकार मूल्यांचा आदर करणारा पक्ष आहे. कॉंग्रेसने सर्व धर्मातील नागरिकांना बरोबर घेऊन भारताला विकसनशील राष्ट्र बनविले आहे. स्वर्गीय राष्ट्रपती डॉ. ऐ. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेनुसार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी युवक व महिलांना राजकारणात अधिक संधी देण्याचे धोरण आखले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम मुजावर यांनी केले.
पिंपरीतील बेटीना देवीदास आणि मुख्यधापिका सँड्रा अँथोनी डिसोझा यांना अनुक्रमे कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी व सचिवपदी नियुक्ती पत्र मुजावर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेल प्रदेश सचिव मॅन्युअल डिसोझा, रुपा दास व रुपेश दास, मेरी चक्रनारायण आदी उपस्थित होते.
मुजावर म्हणाले कि, बेटीना दास व सँडरा डिसोझा यांच्या कामाचा पुर्वानुभव आणि जनसंपर्क पाहता त्यांची अल्पसंख्यांक कमिटीवर निवड करण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी काँग्रेसमुक्त भारत ची आरोळी ठोकली होती. त्यांचे स्वप्न देशातील दलित, युवा, महिलावर्ग कधी पुर्ण होऊ देणार नाही. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतून हे सिध्द झाले आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व ईशान्येतील राज्यात विधानसभा निवडणुकात कॉंग्रेस समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन निवडणुकांना सामोरे जाईल व यश संपादन करेल असा विश्वास मुजावर यांनी व्यक्त केला. सुत्रसंचालन रुपा दास व आभार मेरी चकरनारायण यांनी मानले.
व्हीएस न्यूज - २९-३०-२०१७ या रोजी धम्मदिप प्रतिष्ठाणच्या वतिने आठ ते दहा मागण्या करिता बे मुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते त्यातिल एक प्रमुख मागणि अशि होति की पिंपरी चिंचवड महानगरपालिका जवळ असणारे महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळिल परिसरास 'महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक' कायदेशिर असे नाव देण्यात यावे या करिता धम्मदिप प्रतिष्ठाणच्या वतिने धरणे आंदोलन करण्यात आले होते व त्या नंतर प्रभागाच्या कार्यकक्षम नगरसेविका मा.महापौर वैशालिताई घोडेकर यांना धम्मदिप प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांनी निवेदन दिले होते त्याचि दख्खल घेउन मा.महापौर नगरसेविका वैशालिताइ घोडेकर यांनि सदर विषय प्रभाग समिति मध्ये मांडुन महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक असा ठराव 'क' प्रभाग समिति मध्ये मांडुन तो ठराव पास करण्यात आला व रविवारी पालिकेच्या वतिने महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक नामफलकाचे उद्दघाटन मा.महापौर नगरसेविका वैशालिताई घोडेकर यांच्या हस्ते रविवार रोजि 4 वाजता करण्यात आले आहे. या वेळेस धम्मदिप प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे, सुरेंद्र जाधव, निलेश सरतापे, आनंद साळवे, धर्मपाल कांबळे, नसरिन शेख, प्रशांत किर्ते,दीपक साबळे व भिम संग्राम संघटनेचे पदाधिकारी तसेच हेल्पिंग हँण्डचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव आदि जण उपस्थित होते....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002