Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
माझ्या नादाला लागू नका; अजित पवारांचा बापटांना दम

Turn off for: Marathi

व्हीएस न्यूज - माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अप्रत्यक्षपणे बापटांना दम भरला. मी शांत आहे, तोपर्यंत आहे, माझ्या नादाला लागू नका, असा इशारा अजित पवारांनी दिला.

पुण्यात नारळ फोडण्याशिवाय अजित पवारांनी काहीच कामे केली नाहीत, अशी टीका बापटांनी केली होती. अजित पवारांनी या टीकेला उत्तर देताना हा इशारा दिला. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात बोलताना भाजपवर निशाणा साधला.

बापटांना मी सांगत आहे, मी शांत आहे तो पर्यंत शांत आहे, नाद करायचा नाय बापट. माझ्या बरोबर तुम्ही दहा वर्ष काम केलेले आहे. प्रत्येकाचा आदर आम्हीपण करतो, तशी पवार साहेबांची शिकवण आहे, तुम्ही काय-काय वक्तव्य केली ते येथे महिला असल्याने काढू इच्छित नाही आणि ते सर्वांना माहित आहे आपला आवाका काय आपली कुवत काय, आपण करता काय? असे म्हणत अजित पवारांनी बापटांचा खरपूस समाचार घेतला.

...Read More

V. S. News
पिंपरी – चिंचवड शहरातील विकासकामांसाठी २६ कोटींचा निधी मंजूर

व्हीएस न्यूज - पिंपरी – चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २६ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. स्थायी समिती सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. देहू आळंदी रस्त्यावरील विविध सेवा वाहिन्यांसाठी खोदलेला रस्ता व पदपथ यांचे चर पुर्ववत करण्यासाठी सुमारे ७७ लाख २४ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मंजूरी दिली.

मनपा मुख्यालयात उर्वरित सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उभारण्यासाठी येणाऱ्या सुमारे २८ लाख रुपये, प्रभाग क्र. १० तुळजाईवस्ती व विवेकनगर मध्ये पेव्हींग ब्लॉक, गटर्स, रस्ते दुभाजक फुटपाथ व मनपा इमारतीची किरकोळ दुरूस्तीच्या कामासाठी सुमारे ४१ लाख ०७ हजार रुपये, ड क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील कचरा उचलणे व वाहतुक करण्यासाठी ४९ लाख ६६ हजार रुपये, शेवाळेवाडी ग्रामपंचायतीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दहा हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरव्दारे दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ४० लाख रुपयेखर्च, पिंपरी चिंचवड मनपाचे सर्व्हर, फायरवॉल व आवश्यक संगणक यंत्रणा देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ४८ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार उपक्रमांतर्गत प्रबोधनपर्वाचे आयोजनासाठी २४ लाख ९८ हजार रुपये खर्चास मान्यता, विविध कंपन्याच्या / मनपाच्या सेवावाहिन्या टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, मनपा क्षेत्रातील डांबरी रस्त्यावरील खड्डे जेट पॅचर पॉटहोल मशिन व्दारे भरण्यासाठी येणा-या सुमारे ८ कोटी ३२ लाख ४१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या ताब्यातील पेठ क्र.५ व ८ मधील ग.नं.५४४ शेजारील क्षेत्रामध्ये उद्यान, खेळाचे मैदान व शाळा बांधणेकरिता मनपास आवश्यक एवढा भुखंड ताब्यात घेण्यास येणा-या सुमारे २ कोटी ०७ लाख ३६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ब व क प्रभाग कार्यक्षेत्रातील घरोघरचा कचरा गोळा करुन मोशी कचराडेपो येथे वाहतुक करुन टाकण्यासाठी येणा-या सुमारे ३ कोटी ३७ लाख ०५ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. ब व क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ३८ वाहन चालक, २ सुपरवायझर व ७६ कामगार पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ५५ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयातील टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ५३ वाहन चालक, ३ सुपरवायझर व १०६ कामगार पुरविण्यासाठी येणाऱ्या सुमारे ७४ लाख ९४ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. ड क्षेत्रीय कार्यालयातील टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ४७ वाहन चालक, ३ सुपरवायझर व ९४ कामगार पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ६८ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालयातील टाटा एस वाहनामार्फत घरोघरचा कचरा गोळा करणे व संकलन केंद्र येथे वाहून नेणेचे कामासाठी उपलब्ध वाहनांवर ४५ वाहन चालक, ३ सुपरवायझर व ९० कामगार पुरविण्यासाठी येणा-या सुमारे ६३ लाख ५८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

...Read More

V. S. News
आमदार लांडगे अन् जगतापांवर अजितदादांचा हल्लाबोल

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेतील कारभाराची परिस्थिती दादा-भाऊ दोघं मिळून खाऊ अशी चाललीय, हे म्हणतील तिच पूर्व दिशा, यांना विचारणारं कोणी नाही. शहराचा विकास थांबलायं, कोणतेही नवीन प्रकल्प नाहीत. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराचा आरोप होतोय. कचर्याचा प्रश्न गंभीर झालायं, दादागिरी वाढलीय. या आमदारांनी ४ वर्षात काय काम केलंय असा सवाल करत महेश लांडगे आणि लक्ष्मण जगतापांवर नाव न घेता हल्लाबोल केला.

काळेवाडी येथे आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील,शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार बापू पठारे, विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, खोटं बोलून ही मंडळी सत्तेत आली. ४ वर्षात इथल्या आमदारांनी शहरासाठी काय केलं, कोणतचं विकासाच काम केले नाही. केवळ राष्ट्रवादीने केलेल्या भूमिपूजनांच्या कामांची उद्घाटने यांनी केलीत. वर्षभरात त्यांनी केलेल्या प्रत्येक कामावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. करचा उचलण्याचं टेंडर आज भ्रष्टाचाराच्या आरोपामुळंच रद्द झालं. शहरात आज कचर्याची समस्या भयानक झालीयं. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलयं. गुन्हेगारी वाढली आहे. वाहने तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. सर्वत्र दादागिरी पसरत चालली आहे. पाण्याची समस्या लोकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. मुळातच काम करण्याची इच्छा शक्ती पाहिजे. परंतू दादा-भाऊ दोघं मिळून खाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ते म्हणतील तिच पूर्व दिशा आहे. यांना कुणीच विचारत नाही.

...Read More

V. S. News
जीवे मारण्याची धमकी देत अडीच लाख घेवून दोघे फरार

व्हीएस न्यूज - व्यवसायात तुमच्यामुळे आमचे 25 लाखांचे नुकसान झाले आहे. असे म्हणत तिघांनी एकाकडून जबरदस्तीने अडीच लाख रूपये घेतले. तसेच दोघांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी बावधन येथे घडला. याप्रकरणी एकाला अटक केली असून दोघे फरार आहेत.

कृष्णा भुजंगराव वारे (वय-38, रा. आनंदनगर, पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत. याप्रकरणी संदीप उकरणा (वय-43, रा. बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार पगारे यांनी माहिती दिली.

फिर्यादी उकरणा व आरोपी एकमेकाच्या ओळखीचे आहेत. त्यांनी 2017 मध्ये औरंगाबाद येथे डिजीटल मार्केटींगचे नागरिकांना प्रशिक्षण दिले. त्यांना 4 लाख 50 हजार रूपये मिळाले होते. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कामगारांना पैशाच्या देवान-घेवानवरून फिर्यादी व आरोपींचा वाद झाला होता. त्यावेळी फिर्यादीच्या एका मित्राने मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. परंतू, फिर्यादीला तुमच्या मित्रामुळे आमचे 25 लाखांचे नुकसान झाल्याचे म्हणत सोमवारी दोघांना मोटारीत बसवून बावधन येथील घरी नेले. तसेच फिर्यादीकडून अडीच लाख रूपये जबरदस्तीने घेवून त्यांच्या मोटारीची चावी घेतली. याचे सर्व व्हिडीओ रेकॉर्डींग केले. फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
कामगारांना धमकावून 16 हजारांचा ऐवज पळविला

व्हीएस न्यूज - कंपनीतील कामगारांना धमकी देत एका त्रिकुटाने कॉपर वायर, पट्या व एक मोबाईल असा 16 हजारांचा ऐवज जबरदस्तीने नेला. हा प्रकार मंगळवारी पहाटे भोसरीतील साई एंटरप्रायजेस या कंपनीत घडला. राकेश चौधरी (वय-22, रा. भोसरी) याने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीत सेक्टर नं 7/108 येथे साई एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. फिर्यादी चौधरी व त्याचा सहकारी बबलू कंपनीत मंगळवारी पहाटे काम करत होते. एका दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने फिर्यादीला धमकी देऊन कॉपर वायर, पट्या व एक मोबाईल असा 16 हजारांचा ऐवज जबरदस्तीने नेला. फौजदार आहेर अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
लग्नाच्या अमिषाने तरूणीवर बलात्कार; प्रियकर गजाआड

व्हीएस न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर प्रियकराने बलात्कार केला. तरूणी गर्भवती राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार वाकडमध्ये नुकताच उघडकीस आला आहे. सूरज नामदेव नढे (वय-29, रा. वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर 24 वर्षी तरुणीने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडमध्ये राहणारा सूरज नढे आणि पीडित मुलगी चिंचवडमध्ये एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सूरजने तरुणीला लग्नाचे आमिष वारंवार स्वतःच्या घरात, हॉटेलमध्ये घेवून जात तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. मार्च 2018मध्ये पीडित तरुणी सात आठवड्यांची गरोदर असल्याचे पुढे आले. त्यानंतर सूरज याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीने सूरजचे घर गाठले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनीही स्वीकारण्यास नकार देत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. अखेर या पीडित तरुणीने वाकड पोलिसांत तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. आढाव अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
भाजपाचे राष्ट्रवादीच्य ‘हल्लाबोल’ विरोधात सुडाचं राजकारण?

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज आणि उद्या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त पिंपळे सौदागर जगताप डेअरी चौक येथे लावण्यात आलेला अधिकृत फलक प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान ही कारवाई सुरू असल्याचे समजताच राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकृत फलक असताना कारवाई का करता असा सवाल त्यांनी अधिकार्यांना विचारला. त्यावेळी अधिकार्यांनी सारवासारवीची उत्तरे देत तो फलक पुन्हा लावल्याने या वादावर पडदा पडला. त्यानंतर मात्र सत्ताधारी भाजपच्या सुडबुध्दीच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.

नाना काटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत फ्लेक्स उभारू नयेत ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र अधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणे चुकीचे आहे. एकीकडे शहरात सर्रासपणे अनधिकृत फलक लावले जात असताना केवळ सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या फलकावर कारवाई केली जात आहे. राष्ट्रवादीचा शहरात दोन दिवस हल्लाबोल मोर्चा आहे. त्याची धास्ती सत्ताधारी भाजपने घेतली आहे. आज जगताप डेअरी चौकात हल्लाबोलच्या अधिकृत फलकावर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. मात्र मी त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांना त्याचे कारणही योग्य पध्दतीने देता आले नाही. सत्ताधार्यांच्या दबावामुळेच ही कारवाई होणार होती. अखेरीस हतबल होऊन अधिकार्यांनी तो फलक पुन्हा लावला.

...Read More

V. S. News
आगामी विधानसभेसाठी शहर मनसेची मोर्चेबांधणी

व्हीएस न्यूज - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेत सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे.

मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात पक्षाचे नेतृत्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीचे काम जोरात सुरू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी चिखले यांच्यासह पक्षाच्या शहर पदाधिका-यांवर सोपविण्यात आली आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पक्षाचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी शहरातील मनसैनिकांची नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यापुढे शहरात जाणिवपूर्वक लक्ष घालणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे मनसे पदाधिका-यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागला आहे.

पक्षवाढीसाठी मनसेच्या विविध संघटनांची कार्यकारिणी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठीच सेनेच्या कार्यकारिणीतील विविध पदे रविवारी जाहिर करण्यात आले. विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या हस्ते पदाधिका-यांना नियुक्त पत्र देण्यात आले. त्यामध्ये अक्षय नाळे (सचिव), अनिकेत प्रभु (उपशहर अध्यक्ष), अमित तापकीर (उपशहर अध्यक्ष), गौरव लोटलीकर (विद्यार्थी उपशहराध्यक्ष), प्रतिक शिंदे (विभाग अध्यक्ष), सचिन शिंदे (विभाग अध्यक्ष), बंटी कदम (विभाग अध्यक्ष),महेश येवले (विभागाध्यक्ष) आदी पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवडला वालीच उरला नाही – अजित पवार

व्हीएस न्यूज - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इंन्ट्रेस नागपूरात आहे, तर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांचा पुण्यात आहे. पिंपरी चिंचवडकरांच्या प्रश्नांशी यांना काहीच देणंघेणं नाही.निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वानसे हे विसरलेत. निवडून दिलेल्या आमदारांचे शहरवासियांच्या समस्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे शहराला आता वालीच उरला नाही अशी टिका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे,राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार बापू पठारे, विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणूकीत वाटलं होतं की शहराशी अनेक वर्षे जवळकीचे नाते होते. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. महापालिका निकालाच्या वेळी जनता विकासाच्या मागे गेली नाही. जनतेने आमचा पराभव केला. शहरात होत असलेले बदल, कचरा समस्या, अनेकांचा हस्तक्षेप पिंपरी-चिंचवडकरांना मान्य आहे का?आयुक्तालयाचा निर्णय झाला. पण त्याचा उपयोग नाही. इथे दहशद असून सरकार, पालकमंत्री पावले उचलताना दिसत नाहीत. शहराला कोणी वाली राहिलेले नाही. रस्त्यांच्या टेंडरची घाई केली गेली. कालवा समितीच्या बैठकीला फक्त पालिकेचे आयुक्त होते. तुमच्या पिण्याच्या पाण्यासाठी बैठकीला हे हजर राहू शकत नाही. भीमा कोरेगावला कायदा सुव्यवस्था सरकारने राखली नाही. तिथे निष्पाप मुलाचा बळी गेला. घरे, दुकाने जाळली. त्यामागचा मास्टरमाइंड कोण, हे कळाले पाहिजे. बैलगाडा शर्यंतीबाबत खासदार, आमदार फक्त भावनांशी खेळत आहेत, अशी टिका त्यांनी केली.

देशाचे राजकारण पवारसाहेबांच्या अवती-भवती फिरत आहे. त्यांच्यासाठी आपले आमदार, खासदार वाढले पाहीजेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे घड्याळ चालले पाहिजे. शेतक-यांना सरकारने उध्वस्त केले. नीरव मोदी, ललित मोदी हजारो कोटी घेऊन गेले. देशात महागाई वाढली. रेशनींगला मका देतात. जगात महाराष्ट्रात पेट्रोल महाग आहे. आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाय करण्याची गरज आहे. मंत्रालय आता आत्महत्यालय झाले आहे. महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत बिकट अवस्था झाली आहे. उद्योगांना पोषक वातावरण नाही. भोसरीत मैदानाच्या आरक्षणात टप-या टाकून स्थानिक गुंड तेथे हप्ते गोळा करतात. शाळा काढण्याचा परवाना उद्योगपतींना दिला आहे. भारत कुठे स्वच्छ झाला ? हे सरकारने दाखवावे. सरकारमध्ये एकवाक्यता नाही. प्रशासनावर त्यांची पकड नाही. केंद्रात, राज्यात जंगलराज आले आहे.

सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैसातून सत्ता हे समिकरण सुरू आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तीकरापासून दिलासा देण्याची इच्छाशक्ती नाही. फडणवीसांना नागपूर, बापटांना पुण्याचे प्रेम आहे. बापट काहीही बोलतात. भ्रष्टाचाराने बरबटलेले, पण आव वेगळा आणतात. स्मार्ट सिटीचा पैसा किती आला ? पुण्यात कमळाबाई तिन नंबरला गेली. कुठं नेऊन ठेवलाय भारत, महाराष्ट्र, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी ? हा प्रश्न उपस्थित करून शिरुरची जागा आलीच पाहिजे. जेवढी ताकद द्या. फायदा तुमचाच आहे. बेजबाबदार, नाकर्ते सरकार घालवू, असा निश्चय करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

जयंत पाटील म्हणाले, विकासाचं स्वप्न दाखवलं गेलं, लोकांनी भाजपला नव्हे तर मोदींना बघून मतदान केलं. चार वर्षात भाजपने दिलेली खोटी आश्वासने किती खरी झालीत हे जनतेला समजलेयं. जनतेला फसवलं की, जनता आता त्यांना सत्तेत राहून देणार नाहीत. चौकीदार बनवा असं सांगून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते. मात्र विजय माल्या, निरम मोदी सारखे अनेक उद्याेगपती करोडों रूपये घेऊन फरार झालेत. मग कसली चौकीदारी करत होते. पावलो पावली थापा मारणारे सरकार आहे, खोटं बोलून सत्तेत आलेत. निवडणुकीपूर्वी केलेले एकही आरोप सिध्द करता आले नाहीत. १६ मंत्र्यांनी केलेले भ्रष्टाचारांना क्लिन चिट मुख्यमंत्र्यांनी दिली. उंदरात भ्रष्टाचार करणारे आमदार तुम्ही निवडून दिलेत. आता तुम्ही विचार करा, राष्ट्रवादीच्या मागे ताकद उभी करा.

चित्रा वाघ म्हणाल्या, बेरोजगारी वाढलीय, घर कसं चालवायचं महिलांपुढे मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्यामुळे तरूण गुन्हेगारीकडे वळतोय. रेशन दुकानात धान्याचा पत्ता नाही. गँस महागलाय, स्वयंपाक करणं मुश्किल झालेय. महिलांवरील अत्याचार वाढलेत. कायदा आणि सुवव्यवस्था फक्त कायद्यावरच राहिलीय. या शहरावर अजितदादांनी भरभरून प्रेम केले. पिंपरी चिंचवड दादांचा आत्मा आहे. आज शहराचं चित्र बदललयं, घाणीचे साम्राज्य वाढलयं, नगरसेवक पालिकेत कचरा नेऊन टाकत आहेत. येणार्या निवडणूकीत परिस्थिती नक्कीच बदलणार आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले, राज्याच्या कानाकोपर्यातून हल्लाबोल सभेला सुरूवात झाली. विकास काय असतो हे पिंपरी चिंचवडला बघितल्यावर होतं. अजितदादांच्या स्वप्नपूर्तीतून घडले होते. परंतू गेल्या तीन वर्षापासून पिंपरीचा विकास शोधतोय. राज्याच्या सुरक्षिततेचे तीन तेरा वाजलेत. सत्तेच्या मस्तीत आहेत, म्हणून पवार साहेबांवर टिका करू नका. कामगारांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न या सरकारची सुरू आहे. शेतकरी

...Read More

V. S. News
....तर राज्यभरातील55 हजार रेशनिंग दुकानदार व 47 हजार रॉकेल विक्रेतेसामूहिक राजीनामा देणार

व्हीएस न्युज - एक लाख रेशनिंग दुकानदारांच्या मुंबईतीलमोर्चाने राज्य सरकारला धडकी भरली आहे. त्यामुळेराज्य सरकारने आता या मागण्यांवर संघटनेशी चर्चेचीतयार दर्शविली आहे. या नियोजित चर्चेत रेशनिंगदुकानदारांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील55 हजार रेशनिंग दुकानदार व 47 हजार रॉकेल विक्रेतेसामूहिक राजीनामा देणार आहेत.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स असोसिएशनआणि राज्य महासंघ या रेशनिंग दुकानदारांचेप्रतिनिधित्व करणाऱ्या शिंखर संघटनेची राज्यस्तरियबैठक राज्य महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.6)पिंपरीत पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी काकासाहेब देशमुख म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकरिता मुंबईतील आझाद मैदानावर 19 मार्चला काढलेल्या मोर्चात राज्यभरातील एक लाख रेशनिंग दुकानदार सहभागी झाले होते. त्यामुळे राज्य सरकारला धडकीभरली असून, या दुकानदाराच्या संघटनांसोबत चर्चेचीतयारी आता सरकारने दर्शविली आहे. अन्नपुरवठा मंत्रीगिरीष बापट यांनी आमच्याशी थेट संपर्क न साधता,प्रसार माध्यम प्रतिनिधींशी केलेली चर्चा आम्हाला समजली आहे. मात्र, रेशनिंग दुकानदारांच्या हितासाठीआम्ही या चर्चेला तयार आहोत. सर्व गिऱ्हाईकांचे आधारकार्ड लिंक केल्याशिवाय ई-पॉस मशिनच्या माध्यमातून अन्नधान्य वितरण करण्यास आमचा अद्यापही नकारआहे.

रॉकेलचे वितरण बंद केल्याने इंधनासाठी राज्यभरात विविध ठिकाणची वृक्षतोड वाढल्याने अनेक ठिकाणचे भुप्रदेश ओसाड झाले आहेत. मात्र, सरकार रॉकेलचाकोटा वाढविण्या ऐवजी आता कोट्यवधी वृक्षलागवडीवर भर देत आहे, तरी सरकारला जाग येतनाही. हा शासकीय यंत्रणेतील विरोधाभास पहायला मिळत आहे. नाशिकमध्ये तीनशे कोटींचा अन्नधान्य घोटाळा बाहेर आल्यानंतर रेशनिंग दुकानदारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र; कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेने सारख्या विरोधकांनी रेशनिंग दुकानदारांची बाजू प्रभावीपणे सभागृहात मांडल्याने या संपाला पाठबळ मिळाले. याशिवाय मोर्चातून दोन्ही संघटनांनी आपली ताकद दाखविली आहे. त्यामुळेच सरकारला याची दखल घ्यावी लागली आहे, असे देशमुख म्हणाले.

या बैठकीला असोसिएशनचे राज्य खजिनदार विजयगुप्ता, महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष कैलास शर्मा,सांगली जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, मावळतालुकाध्यक्ष बाबुलाल नालबंद, वर्ध्याचे संजय देशमुखतसेच नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी जिल्ह्यांचे प्रतिनिधीउपस्थित होते.

सार्वजनिक वितरण व्यवस्था कोलमडण्याची भीती

राज्य सरकारकडून प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास रेशनिंग दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन्ही शिखर संघटनांचे 55 हजार रेशनिंग दुकानदार व 47हजार रॉकेल विक्रेते असे एकूण एक लाख दोन हजार सदस्यांनी सामुहिक राजीनामे दिल्यास राज्यभरातील सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा फटका राज्यभरातील लाखो शिधापत्रिकाधारकांना बसू शकतो.

पिंपरी : ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स असोसिएशन आणि राज्य महासंघ या रेशनिंग दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिंखर संघटनेच्या राज्यस्तरिय बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्य महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख.

अधिक माहितीसाठी संपर्क -

श्री. विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स असोसिएशन

मो. ९८२२३०००१४

https://www.youtube.com/watch?v=rHvOIl_TkBA&feature=youtu.be

...Read More

V. S. News
...तर खोटी आश्वासने दिल्यास मंत्रिपदही रद्द करा !

व्हीएस न्युज - खोटी बातमी दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द करण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढला होता. मग खोटी, फेक आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिपदे रद्द का होऊ नयेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी सरकार सत्तेवर येण्यापुर्वी अच्छे दिन आने वाले है, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करने वाले है, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारस लागू केल्या जातील. प्रत्येकाच्या हाताला काम देण्यात येईल, दोन कोटीबेरोजगारांना नोकऱ्या देण्यात येतील, अशी अऩेक खोटी आश्वासने देऊन मोदींनी सत्ता काबिज केली. महाराष्ट्रातील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तर दोन वर्षात पाच वेळा 24 हजार शिक्षकांची भरती करण्यासंदर्भात फक्त आणि फक्त खोट्या घोषणा केल्या. त्यामुळे खोट्याबातम्या देणाऱ्या पत्रकाराची मान्यता रद्द करण्याचा कायदा करता तर मग खोटी आश्वासने दिल्यास मंत्रिपदही रद्द करण्याची मागणी बकाल यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
ट्रॅक्टरच्या धडकेत तरूणी ठार

व्हीएस न्यूज - भरधाव वेगातील ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये तरूणीचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तरूण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना कासारसाई येथील मुरकुटे वस्ती येथे 16 मार्च रोजी घडली.
सृष्टी सुभाष पाठक (वय-25, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव आहे. आयुश खंडेलवाल (वय-24, रा. औंधगाव) हा किरकोळ जखमी झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयुष व सुष्टी 16 मार्च रोजी एकाच दुचाकीवरून जात होते. मुरकुटे वस्ती येथून जाताना भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सृष्टीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आयुश हा किरकोळ जखमी झाला. घटनास्थळी न थांबता ट्रॅक्टर चालकाने पोबारा केला. फौजदार ए. व्ही. बोराटे अधिक तपास करत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!