व्हीएस न्यूज - कौटुंबिक वादातून तरूणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी वाकड येथे उघडकीस आली. अविनाश संभाजी पवार (वय-30, रा. बेलठिकानगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला होता. नागरिकांनी त्याला पालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अविनाश यांच्या खिशात पोलिसांना आधार कार्डसह आदी कागदपत्रे सापडली. त्यानुसार त्यांची ओळख पटविण्यात आली. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचेही आढळले. कौटुंबिक कारणातून आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज :- सवेॕ नंबर २२८/२/४ कुंदळे काॕलनी नंबर ३ मधील स्थानिक रहिवाशाने येण्या जाण्याचा रस्ता बंद केला आहे या बंद केलेल्या रस्यामुळे तेथील जेष्टनागरीक ,महीला भगिनी तसेच शालेय विद्यार्थींनना खुप माणसिक ञास सहन करावा लागत आहे.
या विषयी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की "सदरील ठिकाणचा रस्ता येत्या पंधरा दिवसात मोकळा नकेल्यास शिवसेना स्टाईलने तेथील रहीवाशांच्यासमवेत मोठे जन आंदोलन उभारणार आसुन याकामी उद्भवनार्या सवॕ गोष्टींची जबाबदारी आयुक्त साहेब व महापालिकेच्या प्रशासनाची राहील" .
यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश सचिव- गणेश आहेर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड ,सारिकाताई ताम्हचीकर , तेथील रहीवाशी सुनिताताई कामटे,कुसुम पोकळे,आशोख झांजले,रवी साळवी,शिवानी कामटे ,मंगल झांजले आदी उपस्थित होते.
दतोबा शंकर कुदळे यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. कुदळे याने येण्या जाण्याचा ७ फुकटचा रस्ता बंद केला असून या परिसरात २०-२५ वर्षा पासुन राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या विषयी राहुल साळवे,आशोख आमले,पाडुरंग केसकर,रवि साळवी,वंदना मोरे ,मंगल झांजले,ज्योती खापरे ,सुधा सावंत,किशोर गावडे,सुरेश नलावडे,कुसुम पोकळे,भगवान भुजबळ,शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष- युवराज दाखले, पिंपरी विधानसभा महीला अध्यक्षा सारीकाताई ताम्हचीकर यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक (पिंपरी पोलीस ठाणे) यांच्या कडे तक्रार अर्ज केला आहे व येण्या जाण्याचा ७ फुकटचा रस्ता सुरू करून देण्याची दाद मागितली.
सखोल चौकशी करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश
व्हीएस न्यूज - अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहार, जागा खरेदी, वाहन खरेदी, इमारत बांधकाम यांसाख्या बाबींमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे तक्रार बँकेचे सभासद राहुल गव्हाणे यांनी केली होती. त्या आधारे केलेल्या चाचणी लेखापरिक्षणात नियमबाह्य कारभार आढळून आल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याचे सहकार आयुक्त व सहकार निबंधक डॉ. विजय झाडे यांनी दिले असल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अण्णासाहेब मगर सहकारी बँकेबाबत राहुल गव्हाणे यांनी बँकेच्या इमारतीच्या बांधकामासह अनेक बाबीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सहकार आयुक्तांकडे केली होती. तसेच, बँकेचा कारभार एकाधिकारशाहीने व गैरपध्दतीने सुरू असल्याचेही म्हटले होते. त्या आधारे सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१(३क) नुसार बँकेचे चाचणी लेखापरिक्षण करण्याचे आदेश दिले होते. विशेष लेखापरिक्षक डी. एच. डोके यांनी केलेल्या चाचणी लेखापरिक्षणाच्या अहवालात संचालक मंडळ,अधिकारी वर्गाच्या कामकाजातील गंभीर चुका व नियमांचे पालन न केल्याचे समोर आले. परंतु, त्यावर बँकेने कुठलीही सुधारणा केली नाही.
त्यानंतर चाचणी लेखापरिक्षणाच्या अहवालानुसार आढळून आलेली अनियमितता, बँकेचे कामकाज आणि आर्थिक स्थिती यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ प्रमाणे सखोल चौकशी करण्याचे आदेश २५ मे २०१८ रोजी सहकार आयुक्तांनी दिले. त्यासाठी सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चाचणी लेखापरिक्षणात आढळून आलेल्या मुद्यांच्या आधारे ही चौकशी करण्यात येणार आहे.
चौकशी आदेशात प्रामुख्याने बँकेने कार्यालयासाठी केलेली जागा खरेदी, इमारत बांधकाम कामासाठी देय नसताना ठेकेदाराला २.५३ कोटी रुपये ज्यादा अदा करणे, बँकेचे चेअरमन यांच्या नातेवाईकांना व संबधितांना कर्जवाटपात झालेली अनियमिततेची चौकशी करण्याचे नमदू करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त फर्निचरचे कामकाज, फॉर्च्युनर वाहन खरेदी,वाहनाच्या आकर्षक क्रमांकासाठी ७५ हजार रुपये बँकेच्या नावाने भरणे,कर्जदार मे. आशा असोसिएटसचे प्रवर्तक अरविंद सोळंकी यांना नियमबाह्य पध्दतीने अॅडव्हान्स देणे, बँकेचा आकुर्डी, शिंदे, वसुली, संगमनेर, दिघी व मांजरी शाखांचा जानेवारी २०१८ अखेरचा तोटा, कर्जदार एन. एच. गव्हाणे यांना ऑडी कार खरेदीसाठी ४० लाख कर्ज मंजुरी व विनियोगातील अनियमितता या गंभीर बाबींची चौकशी केली जाणार आहे.
त्याबरोबर बँकेचे चेअरमन यांनी त्याचे मालकीचे हॉटेल युवराज या नावाने चालू खात्यामध्ये २०१६ मध्ये १४ अवैधरित्या झालेले व्यवहार तर, बँकेच्या संबधित अधिका-यांनी चेअरमन यांच्या चालू खात्यातून शिल्लक नसताना अनेक चेक पारीत केले आहेत. तसेच, बँकेच्या नोकरभरतीसंदर्भात चेअरमनच्या १७ नातेवाईकांना भरती करून घेणे, तसेच इंफोसिस्टीमव्दारे नोकरभरती करणे, आकृतीबंध नसणे, मान्यता न घेणे, योग्यरित्या जाहिरात न देणे या गोष्टींची चौकशी होणार आहे. तसेच, बँकेचे शाखा व्यवस्थापक नितीन तापकीर यांना पात्राता नसताना दिलेल्या पदोन्नती व तापकीर यांच्या पत्नीच्या खात्यातून अवैधरित्या चेअरमन यांच्या खात्यात ११ लाख वर्ग केल्याची कार्यवाही आणि कॉसमॉस बँक खात्यावरील व्यववहाराच्या प्रलंबित नोंदींची देखील चौकशी होणार आहे.
विरोधी पक्षनेते दत्ता सानेंचा इशारा
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि आरोग्य विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. सर्व विभाग आपली जबाबदारी झटकत आहेत. पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. पालिकेने त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. अन्यथा महापालिका आयुक्तांना दूषित पाणी पाजण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच स्वखर्चाने हे पाणी खासगी प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पिंपरी महापालिका मुख्यालयातील विरोधी पक्षनेत्याच्या दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना साने पुढे म्हणाले, चिखली परिसरात दाट लोकवस्ती आहे. या परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. चिखलीतील यशवंत कॉलनी, मनिषा कॉलनी या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात दोन ते तीन हजार लोकवस्ती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून होणा-या दूषित पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात दूषित पाणीपुरवठ्याचे नमुने आणून दिले आहेत.
दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. पोटाचे विकार होत आहेत. पाणीपुरवठा विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. चिखली परिसरात त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही साने यांनी केली.
पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात देखील दूषित पाणीपुरवठा होत आहे. मुख्यालयातील पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई केली जात नाही. त्यामुळे पदाधिकारी,अधिका-यांना दूषित पाणी प्यावे लागते. पाण्याला दुर्गंधी येत आहे. पाण्याच्या टाकीचे ऑडीट करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्रपरिवारातर्फे व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली भव्य शिवराज्याभिषेकाची गुढी नवी सांगवी येथील साई चौकात उभारण्यात आली.
ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे नवनाथ जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या सहकार्याने आयोजित केलेले हे शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी या ठिकाणी शिवयोद्धा मर्दानी आखाडा,सांगवी यांच्या वतीने लाठीकाठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व शिवभक्तांच्या हस्ते मशालीचे प्रज्वलन करण्यात आले. शिवकीर्तनकार डॉ.गजानन वाव्हळ यांचे शिवकीर्तन झाले. यावेळी शिवकीर्तनातून भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचा नयनरम्य असा जीवंत देखावा सादर करण्यात आला. तसेच रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शिवकीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान, जुनला साई चौक येथे भारतीय सशस्त्र सेनेतील जवानांसाठी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी मिलिटरी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर व ब्लड बॅंकेतर्फे रक्त संकलित केले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटामधील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही प्राधिकरणातील सेक्टर.4 मध्ये मानस व्हिला इमारतीमध्ये मंगळवारी घडली. विजयकुमार अनंतपुर (वय-54, रा. प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतपुर यांचा फ्लॅट मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कुलूप लावून बंद होता. या कालावधीत चोरट्यांनी दिवसाढवळ्या फ्लॅटचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाटामधील 2 लाख 49 हजार 600 रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने दिवंगत महापौर भिकू वाघेरे (पाटील) यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी पिंपरीगांव येथे झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसदस्य योगेश बहल, विठठल ऊर्फ नाना काटे, भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या सुमन पवळे, उषा वाघेरे, निकीता कदम, माई काटे, उषा काळे, स्विकृत सदस्य नरहरी तापकीर, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्य रंगनाथ कुदळे, निलेश पांढारकर, माजी शिक्षणमंडळ सभापती फजल शेख, विजय लोखंडे, हनुमंत नेवाळे, माजी नगरसदस्या शकुंतला भाट, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, माहिती व जनसंपर्कचे प्र.प्रशासन अधिकारी रमेश भोसले, ह.भ.प माऊली महाराज वाळुंजकर, चंद्रकांत गव्हाणे, कामगारनेते शिवाजीराव तापकीर, शिवाजीराव वाघेरे, सदाशिव नाणेकर, प्रा.संपतराव जगताप, उदयोजक महेश जाचक, प्रकाश सोमवंशी, शंकरराव वाघेरे, गुलाबराव सोनवणे, गुलाबराव वाघेरे,बबनराव खराडे, बाळासाहेब वाघेरे, वाल्मिक कुटे, तसेच मोठया संख्येने मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचलन अभिजीत वाघेरे यांनी केले.
व्हीएस न्यूज - भाजपाने निवडणूकीपुर्वी भाववाढ स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. सर्व नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करु. शेती मालाला भाव मिळवून देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करु. देशातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी दरवर्षी चार कोटी युवकांना रोजगार देऊ. गरीब व अल्पउत्पन्न गटातील कुटूंबांना मोफत घरे देऊ. महिला सक्षमीकरणासाठी नविन योजना अमलात आणू. नद्यांचे संर्वधन, सुशोभिकरण करुन जलपर्यटनास चालणा देऊ. अशा शेकडो घोषणा केल्या होत्या. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होऊन चार वर्ष उलटून गेली तरी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. तर उलट गोरगरिब नागरिकांना तासनतास बँकेच्या रांगेत उभे करुन खाते काढून घेतले आणि आता डिजिटललायजेशनच्या नावाखाली अनेक प्रकारचे टॅक्स आकारुन गरीबांच्या पैशांवर सरकारने डल्ला मारला आहे. मागील चार वर्षात महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक कमी झाली. त्यामुळे नविन रोजगार तर नाहीच उलट आहे तेच कामगार बेरोजगार झाल्याचे चित्र राज्यात व विशेषता पिंपरी चिंचवड मध्ये दिसत आहे. युपीए सरकारने दिलेल्या घरकुल योजना गुंडाळण्याचे काम भाजपा करीत आहे. नद्यांचे संर्वधन तर दुरच नदी पात्रातील अतिक्रमण देखील भाजप सरकारला काढता आले नाही. अशा निष्क्रिय भाजपा सरकारला जनता आगामी निवडणूकीत घरी बसवेल. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात जनजागृती करुन तीव्र आंदोलन छेडणार आहे. असे वैशाली काळभोर यांनी सांगितले.
राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पिंपरी चिंचवडमध्ये गॅस दरवाढी विरोधात केंद्र व राज्य सरकारचा आंदोलन करुन निषेध केला. यावेळी महिलांनी ‘ना तेरी है, ना मेरी है। ये सरकार लुटेरी है।।’ अशा घोषणा दिल्या. दोन दिवसापुर्वी घरगुती गॅस, सिलेंडरच्या किंमतीत 48 रुपयांची वाढ केली. या दरवाढीमुळे महिला भगिनींना कुटूंबाचा मासिक खर्च चालविणे अवघड झाले आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरीकडे कुच करीत असताना वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे आणि शेतक-यांच्या संपामुळे भाजीपाल्यासह सर्वच पदार्थाच्या किंमती उच्चांकी पातळीवर आहेत. या गॅस वाढीचा व पेट्रोल, डिझेल वाढीचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी मंगळवारी (दि. 5 जून) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आणि चिंचवड गावातील चापेकर चौकात चुल पेटवून पिठलं,भाकरी करुन निषेध केला.
यावेळी माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेविका संगीता ताम्हाणे, कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, मनीषा गटकळ, संघटिका कवीता खराडे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, लता ओव्हाळ, माजी नगरसेविका शकुंतला भाट, गंगा धेंडे, सुप्रिया पवार, संगीता जाधव, जयश्री पाटील, विद्या दिसले, दिपाली देशमुख, मंगला ढगे, रंजना कसबे, प्रिती मोकाशी, निलीमा कळंब, मंदा पेटकर, मिनल नवले, शिल्पा बिडकर, रुपाली गायकवाड, सविता धुमाळ, रामदास मोरे, नरेंद्र जाधव, दत्ता ओव्हाळ, आंनदा यादव, बाळासाहेब पिल्लेवार आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पावसाळा काही दिवसावरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे या दिवसात चेम्बर्स, ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन तुंबण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. नागरिकांना त्याचा फार त्रास होतो. त्यामुळे पिंपळे सौदागरमधील नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी सतत पाठपुरावा करत पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुर्व तयारी तसेच खबरदारी म्हणून परिसरातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईनची साफ सफाई कामाची सुरुवात करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते.
याची अंमलबजावणी करत आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर प्रभागातील सर्व चेम्बर्स, ड्रेनेज लाईन, स्टोर्म वॉटर साफसफाई करण्याबाबत अभियान सुरु केले आहे. या अभियानामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर गटारी, नाले तुंबणार नाहीत. स्टॉर्म वाटर लाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल जेणेकरून पावसाचे पाणी कुठेही साचणार व तुंबणार नाही. त्यामुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.
यासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी आरोग्य विभागाला दिले. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही सांगितले.
व्हीएस न्यूज - गेल्या दोन वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या एमआयएम पक्षाला सुरूंग लागला आहे. वरिष्ठ नेत्यांचे होत असलेले दुर्लक्ष, कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा यामुळेच नाराज होत शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलीय. शहराध्यक्ष अकील मुजावर यांच्यासह सर्वच पदाधिकार्यांनी थेट पक्षाचेच राजीनामे दिले आहेत.
शहराध्यक्ष अकिल मुजावर, महासचिव शफीमुल्ला काझी, प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी याबाबत एमआयएमचे आमदार इम्तियाझ जलील यांना सर्व पदाधिकार्यांनी राजीनामे सादर केले आहेत. या राजीनाम्यात म्हटले आहे की, ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे कार्य २०१६ पासून प्रामाणिकपणे अविरत कार्य करत होतो. फेब्रुवारी २०१७ च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे १४ उमेदवार स्वबळावर दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी कार्यक्षमपणे लढतही दिली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेते खासदार असददुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा राज्य कोर कमिटीने नियोजित केली होती. या सभेसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करून नियोजन केले होते. मात्र ऐंनवेळी ही सभा रद्द करण्यात आल्याने स्थानिक नागरिक तसेच पक्षातील कार्यकर्त्यांचा रोष आमच्यावर ओढला गेला. ही सभा रद्द झाल्यामुळे निवडणुकीवरही त्याचा परिणाम झाला. मोठ्या पराभवाला सामोरे जाऊन देखील खचून न जाता आम्हा पक्षाच कार्य सुरुच ठेवले. काही दिवसांपूर्वी देहूरोड येथे शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांच्या वडिलांच्या वादग्रस्त दर्ग्याच्या व देहूरोड मुस्लिम जमात दफनभूमी येथे पक्षाचे आमदार वारीस पठाण यांच्या हस्तक्षेपामुळे १७ निष्पाप युवकांवर गुन्हे दाखल झाले. यामुळे शहरातील उलेमा आणि मुस्लिम समाजसेवक व मुस्लिम संघटना नाराज झाले आहेत. आगामी काळात एमआयएम पक्षाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही अशी भूमिका सर्वांनीच जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्य कार्यकारणी शहरात पक्षबळकट करण्यासाठी कार्य करत नाही.जनतेला पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही पक्षात का कार्य करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करून आम्ही सर्व पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - एका सोनसाखळी चोराला त्याच्या साथीदारांसह वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ४५ हजार रुपये किमतीचे आठ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. झटपट पैसे कमविण्यासाठी चोरीसारखे गुन्हे करत असल्याची कबुली दोन्ही चोरांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी हा एका वृत्तवाहिनीचा पत्रकार असल्याची माहीती तपासात समोर आली आहे.
नसीम सादिक उस्मानी (वय ३२, रा. जगतापनगर, लेन नंबर पाच, थेरगाव) आणि मोहम्मद शराफत हुसेन अली (वय २४, मूळ रा.ग्राम-पोस्ट अफजलगढ, ता. धामपूर, जि. बिजानेर,उत्तर प्रदेश, सध्या रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखळीचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वाकड पोलिसांनी तपास पथक तयार केले. या पथकाने २९ मे रोजी साखळी चोरीच्या घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानुसार नसीम आणि मोहम्मद हे दोघे अॅक्टिव्हा मोपेड (एम एच १४ / जी आर ५४६८) वरून वाकड,थेरगाव आणि काळेवाडी परिसरात पायी चालत जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आरोपींवर कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ८२ ग्रॅम वजनाचे २ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील दोन सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेला आरोपी नसीम हा अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, एका संघटनेचा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आणि एका वृत्त वाहिनीचा पत्रकार म्हणून काम करत होता. त्याने आपला साथीदार मोहम्मद अली याला वेळोवेळी दिल्लीवरून बोलावून पिंपरी चिंचवड शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत. मोहम्मद अली याच्यावर दिल्लीमधील पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, तपास पथकातील विक्रम कुदळ, विजय गंभीरे, अशोक दुधवणे, प्रमोद कदम, विक्रांत गायकवाड, शाम बाबा, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, बिभीषण कन्हेरकर, अनिल महाजन, सनी जोंधळे, महंमद नदाफ, धनराज किरनाळे, दादा पवार यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्यूज - कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी झालेल्या दंगलीमधील पीडित आणि तिथे राहणारी पूजा सकट हिच्या हत्या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी,या मागणीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी गिरीश बापट यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.
भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर ५ महिने होऊन गेले पण अद्यापपर्यंत दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई या सरकारने केलेली नाही, ही निषेधार्थ बाब आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे पीडितांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृतत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी, ‘माझ्या मुलीची हत्या होऊन दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला. मात्र त्यातील आरोपीही अद्याप मोकाट आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी’, अशी मागणी पूजा सकटच्या वडिलांनी केली.
दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आज पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर धवळे यांना त्यांच्या गोवंडी येथील घरातून ताब्यात घेतले. तर वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपुरातून आणि माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002