व्हीएस न्युज - सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहेत. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. मात्र त्याआधीच पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
तृप्ती देसाईंनी गुरुवारी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची मागणी केली होती. आपल्याला शबरीमाला मंदिर प्रकरणी मोदींना भेटायचे आहे असे त्यांनी पत्रात म्हटले होते. आपल्या भेटू दिले नाही तर मोदींचा ताफा रोखण्याची धमकी त्यांनी दिली होती.
आम्ही शिर्डीला निघणार होतो. त्याआधीच पोलीस इथे पोहोचले. हे चुकीचे आहे. आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. आम्हाला घरीच थांबवण्यात आले. मोदींकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले केले आहेत. पण त्यानंतरही मंदिरात जाण्यापासून महिलांना रोखण्याचा प्रयत्न होतं आहे. अयप्पाच्या भक्तांकडून काही महिलांना मारहाण करण्यात आली आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाईंना पंतप्रधान मोदींची भेट घ्यायची होती.
मोदी शिर्डीत येऊन सुरक्षितपणे साईबाबांचे दर्शन घेणार. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महिला शबरीमाला मंदिरात का जाऊ शकत नाहीत? असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला. आम्हाला शबरीमाला मंदिरात जायचे आहे पण तुमचे तुकडे करुन महाराष्ट्रात पाठवू अशा धमक्या दिल्या जात आहेत. जे हिंसाचार पसरवणारे आहेत त्यांना भाजपा पाठिंबा देत असताना मोदी गप्प का आहेत ? असा सवाल त्यांनी विचारला.
व्हिएस न्युज - खेड तालुक्यातील डेनेगावमध्ये राहणाऱ्या भाऊ बहिणीचेलग्न ठरत नसल्याने दोघांनी नैराश्यातून आत्महत्या केली. रंजन गणपत भोपळे (40) तर शैला गणपत भोपळे(38) अशी आत्महत्या केलेल्या भाऊ बहिणीची नावं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ बहिणीचे लग्न ठरत नसल्याने दोघांनी नैराश्यातून विषारी औषध पिऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारच्या सायंकाळी सातच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना विषारी औषधाचा वास आल्याने, हा प्रकार समोर आला. भाऊ-बहीण दोघेच इथे राहत होते. दोघांचे वय वाढत चालले होते, मात्र लग्न ठरत नव्हते. त्यामुळे दोघे नैराश्यात होते, बऱ्याचदा यावर नातेवाईकांसोबत त्यांच बोलणं ही होत असे. आज मात्र या नैराश्यातून त्यांनी आयुष्य संपवले. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्युज - पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 21 ऑक्टोबर) ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव एन. एस. पटवर्धन यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत देश, विदेशातील वेगवेगळ्या जातीचे श्वान शहरवासियांना पाहण्याची पर्वणी ठरणार आहे. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा, रॉटविलर, डालमिशन तसेच विशेष आकर्षण म्हणुन अफगाण हाउंड, जायंट श्नाउजर, फॉक्स टेरियर, साइबेरियन हस्की या जातीचे श्वान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 112 व 113 वी चॅम्पियनशीप स्पर्धा होत आहे. यामध्ये मायनर पपी, पपी, ज्युनियर, इंटरमेडिएट, ब्रेड इन इंडिया, ओपन, चॅम्पियन या गटात स्पर्धा होतील. फिलिपाइन्स येथील साइमन सिम, स्विडन येथील नीना कार्ल्सडॉटर आणि भारतातून मुकुल वैद व संजय देसाई हे परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. देशभरातून तीनशेहून जास्त श्वानांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत होणा-या या स्पर्धेत सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश आहे. देश, विदेशातील नामांकित जातीचे श्वान पाहण्याची संधी शहर वासियांना मिळणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक योगेश आकुलवार, सिद्धेश दर्शीले, तुकाराम सुर्वे, विकास बाराथे, संजय मुत्तुर, विक्रांत भोसले, राजेश जाधव यांनी केले आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान ही जनतेचीच मागणी.....सोमाभाई मोदी
व्हिएस न्युज - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीबाबतचे धोरण युपीए सरकारच्या कार्यकाळात ठरविण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किंमतींच्या परिणामामुळे भाववाढ होत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही जनतेचीच मागणी आहे. त्या पदासाठी ते सक्षम आहेत. तसेच मेहनती आणि प्रयत्नवादी आहेत. आगामी निवडणूकीला विरोधकांपुढे काहीच मुद्दा नसल्यामुळे विरोधक भाववाढीचा मुद्दा काढत असल्याची टिका सोमाभाई मोदी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी मंगळवारी (दि. 16 ऑक्टोबर) पुणे, आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी च-होली येथील साई मंदीरात भेट दिली. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास रासकर श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे, सदन कमांडचे संचालक संजीवकुमार, शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त डी. एच. इनामदार, वसंतराव पिंपळे आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सोमाभाई मोदी म्हणाले की, त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाबाबत आपण पुर्ण संतुष्ट आहोत. सर्व काही मोफत मिळाले तर अच्छे दिन येतील असे नाही तर त्यासाठी कष्ट केले पाहिजे. मोदींनी कष्ट करुनच देशात स्वच्छ भारत अभियान यशस्वी केले आहे. देशभर शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय उभारली आहेत. त्यामुळे आरोग्याचा व शिक्षणाचा आलेख उंचावला आहे. महिला, मुलींवरील अत्याचाराबाबत प्रश्न विचारला असता सोमाभाई मोदी म्हणाले की, आई, वडील ज्याप्रमाणे मुलींना बंधनात ठेवतात तसे त्यांनी उशीरा घरी येणा-या मुलांना देखील प्रश्न विचारले पाहिजेत. मुलगा, मुलगी भेदभाव न करता त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत. देशातील शेती पाऊसावर अवलंबून असल्यामुळे पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरला पाहिजे असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त सुभाष नेलगे यांच्या हस्ते सोमाभाई मोदी यांच्या शाल, श्रीफळ व साईंची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.
व्हीएस न्युज - कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तामचीकरला गरबा खेळण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
तिचा पती विवेक तामचीकर यानेही पिंपरी येथे घडलेल्या या प्रकाराबाबत फेसबुक पोस्ट लिहून या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे.
पिंपरी चिंचवडच्या भटनगरमध्ये हा प्रकार घडला. खराडीत राहणारी ऐश्वर्या माहेरी आल्याने भटनगरमधील देवीच्या दर्शनाला गेली होती. तेव्हा ती इतर महिलांसोबत दांडिया खेळू लागली. मात्र मंडळाने हे पाहताच दांडिया खेळ बंद केला आणि डिजे सुरू केला. तिथे असलेले तरूण डिजेवर नाचू लागले. ऐश्वर्या तिथे काही वेळ थांबली होती. मग तिने एका मैत्रिणीला बोलावले, मैत्रिणीला तिथेच थांबवून ती पिंपरी पोलीस चौकीत गेली ऐश्वर्या तिथून गेल्याचं पाहताच दांडिया पुन्हा सुरु झाल्याचे तिच्या मैत्रिणीने तिला कळवलं. कौमार्य चाचणीला विरोध केल्यानेच मला गरबा खेळू दिला नाही असा आरोप ऐश्वर्याने केला आहे.
जानेवारी महिन्यापासून ऐश्वर्या आणि कंजारभाट समाजातील इतर तरूण-तरूणींना कौमार्य चाचणीला विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर Stop The V Ritual या नावाने ग्रुप तयार करून हे तरूण-तरूणी एकवटलेत. ”पिंपरीतील कंजारभाट समाजातील गुंडांनी पुन्हा एकदा पुरुषार्थ दाखवून दिला. निषेध! निषेध! निषेध! माझ्या पत्नीने या जात गुंडांच्या कौमार्यपरिक्षणाच्या अमानुष प्रथेविरोधात हिंमतीने लढा दिला म्हणून तिला दांडिया, गरबा खेळण्यास मनाई करून बहिष्काराचं कृत्य करण्यात आलंय, कौमार्य परिक्षण करणाऱ्यांनी नवरात्रीत देवीची पूजा करणे हे निव्वळ ढोंग आहे.” अशी फेसबुक पोस्ट ऐश्वर्याचा पती विवेक तामचीकर याने लिहिली आहे.
व्हीएस न्युज - विविधतेने आणि परंपरेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत सण, उत्सवाला महत्व आहे. खंडप्राय देशात सर्वच धर्मात विविध सण साजरे केले जातात. या सर्व सण - उत्सवाला शास्त्रीय आधार असल्याचे दिसते. शेतीप्रधान देशात भुप्रदेशानुसार संस्कृती विकसित होत गेली. यामध्ये भगवान महावीर यांनी सांगितलेली अहिंसेची परंपरा जपणारी जैन संस्कृती हि देशातील प्राचिन संस्कृती आहे. मातृ - पितृ आणि गुरु परंपरेला महत्व देणारी, अहिंसेचे पालन करणारी जैन संस्कृतीच पाश्चिमात्यांचे अनुकरण करु पाहणा-या ‘युवा डिजीटल पिढीला’ मार्गदर्शक ठरेल असा विश्वास जैन समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फुलचंद कटारिया यांनी व्यक्त केला.
जैन एकता मंचच्या वतीने आहेर गार्डन चिंचवड येथे नवरात्री निमित्त 15 ऑक्टोबर 2018 रोजी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे चित्रपट कलाकार आलोक नरूला, अंशु मलिक - नरूला, संस्थापक संजय जैन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, नगरसेविका करुणा चिंचवडे, उद्योजक दिलीप सोनिग्रा, राजेंद्र मुथा, अशोक बाफना, राहुल मुनोत, करुणेश जैन, कृपाल गेहानी, पंकज सुराणा आदी उपस्थित होते.
जैन एकता मंचचे पदाधिकारी राहुल मुनोत, राजेश सोनिमिढे, भुपेश संकले, भारत बेदमूथा, किरण संचेती, प्रशांत बंब, जितेंद्र संचेती, पारस भटेवरा, विजय सोनी, दिलीप संचेती, संतोष नहार, संतोष लुणावत, आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला होता. सोनिका जैन यांनी नवकार महामंत्राचे पठण केले. स्वागत संजय जैन, सूत्रसंचालन सपना जैन तर आभार राहुल मुनोत यांनी मानले.
व्हीएस न्युज - भाजपा निगडी चिखली मंडल व प्रभाग क्र 9 च्या वतीने वतीने नेहरु नगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे आज रोजी "स्वच्छता अभियान"राबविण्यात आले. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगर पालिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथजी पवार,नगर सेवक बाबु नायर ,भाजपा सावुथ सेल प्रदेशअध्यक्ष राजेशजी पिल्ले , स्वीक्रुत नगर सदस्या सौ वैशाली खाडे ,सौ अक्षता पाताडे , सौ गायत्री सावंत.गीतांजली मोडक, नंदिनी जोगदंड , सौ मिराताई वाघमारे ,मनाली पाताडे , भुषण चव्हाण , भावेन पाठक , अरुण सदानंद यादव , सचीन देवकुळे , सुभाष पाठक , सचीन शिंदे ,विनोद पटिल ,यशवंत दनाणे, बाळा गुरव , दिपक सावंत , सुरेंद्र घाणेकर , राजकुमार दणाणे प्रशांत जाधव ,यश काजुल्कर , ओमकार सावंत , भाविक पाताडे , ओमकार आयरे व ईत्तर वॉकिंग ग्रुप चे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला .
यावेळी स्थानिक आरोग्य विभागानेही योग्य ते सहकार्य केले.
कार्यक्रमाचे नियोजन मंडलअध्यक्ष अजय पाताडे यांनी केले .यावेळी आण्णा साहेब मगर स्टेडियममधील सर्व परिसराची साफ सफाई करण्यात आली.
व्हीएस न्युज - डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल व संशोधन केंद्रामध्ये सोमवार, दि १ ऑक्टोबर २०१८ रोजी २७ वर्षीय रुग्ण महिला मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. रुग्ण महिलेच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी समुपदेशन करण्यात आले व त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. यकृत, दोन मूत्रपिन्ड, दोन नेत्रपटल हे अवयवदान केले.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र पुणे यांच्या प्रतीक्षा यादी प्रमाणे यकृत, एक मूत्रपिंड आणि दोन नेत्रपटल हे अवयव डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी येथे तर दुसरे मूत्रपिंड नाशिक येथील खाजगी रुग्णालयात येथे देण्यात आले. ५८ वर्षीय रुग्ण यकृत विकाराने ग्रस्त होता या रुग्णावर यकृत प्रत्यारोपण तर २७ वर्षीय रुग्ण ८ महिन्यापासून मूत्रपिंड विकाराने ग्रस्त होता या रुग्णावर मूत्रपिंडप्रत्यारोपण तसेच दोन रुग्णांवर नेत्रपटल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत झाली. जीवनदान देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली. यकृत प्रत्यारोपण व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ. बिपीन विभूते व अवयव प्रत्यारोपण टीमची यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ भाग्यश्रीताई पाटील यांनी ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत अवयवदानच्या या धाडसी निर्णयाबद्दल नातेवाइकांचे आभार मानले.
अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी आनंददायी बाब आहे. परंतु अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे. अवयवदात्याच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी आभार मानले तसेच या संपूर्ण प्रक्रियेसाठी विश्वस्थ डॉ. सोमनाथ पाटील व डॉ. यशराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्यांनी डॉकटर्स टीम, भूलतज्ज्ञ कर्मचारीवर्ग यांचे कौतुक केले.
दि ११ /१० /२०१८रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेत डॉ अमरजित सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ वत्सला स्वामी संचालिका शैक्षणिक विभाग, सौ भाग्यश्रीताई पाटील उपाध्यक्षा डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ सोसायटी, डॉ जे. एस भवाळकर अधिष्ठाता, डॉ पी एस गरच्या कॉर्पोरेट हेड, डॉ वैशाली भारंबे प्राध्यापिका उपस्थित होत्या.
व्हीएस न्युज - तक्रार करायला आलेल्या महिलेचा विनयभंग करणारा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामनाथ पालवे याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली होती. पोलिसानेच तक्रार करायला आलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पीडित विवाहितेचे वय ३६ वर्ष असून आरोपी पोलीस हा सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला १० ऑक्टोबरला आपल्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी साने चौकीत आली होती. त्यावेळी राजेंद्र पालवे या पोलिसाने, ‘मी आहे, तुम्ही घाबरू नका असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला’. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता या पोलिसाने पीडित महिलेच्या मुलाच्या फोनवर फोन केला, आणि आईकडे फोन दे असं त्याला सांगितलं.
मुलाने पीडित महिलेकडे फोन दिल्यावर पोलिसाने त्यांची विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि थेट ‘आय लव्ह यू’ म्हणाला. दुसऱ्यादिवशी त्याच्याविरोधात पीडित महिलेने चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दहा तारखेला चिखली पोलीस स्टेशनची स्थापना झाली. त्यानंतर हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.
व्हिएस न्युज - पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना अशाप्रकारे भाजपा आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे, रविंद्र बराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत कात्रज-कोंढवा रोड या भागात फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालू होते. त्या महिन्याभराच्या कालावधीत आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांनी त्यांना सतत फोन करून काम करू न देण्याची धमकी दिली. त्याला योग्य तो प्रतिसाद न दिल्याने तर ७ सप्टेंबर रोजी त्यांना फोनवरून ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली. तर याप्रकरणी फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
व्हीएस न्युज - पाण्याचा ड्रमला लाथ मारण्याच्या झालेल्या किरकोळ कारणावरून चुलत भावासह दोघांनी मिळून चुलत भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. विनोद उर्फ पप्पू मातफेर गिरी (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आकाश विनोद गिरी (वय २२. महात्मा फुले नगर झोपडपट्टी भोसरी) याने भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद उर्फ पप्पू गिरी (मूळ गाव उत्तर प्रदेश) हे महात्मा फुले नगर झोपडपट्टी भोसरी येथे रहावयास होते. ते रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. गुरुवारी मध्यरात्री शेजारी राहणाऱ्या जय प्रकाश गिरी (वय ३८) बाबुराम गिरी (वय ४०) दयाराम गिरी (वय ३५) या आरोपी पैकी एकाने शेजारी राहणाऱ्या विनोद गिरी यांच्या घरा समोर असलेल्या ड्रम ला लाथ मारली. या कारणावरून विनोद गिरी व आरोपी त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी गिरी यांना मारहाण करून चाकूने वार केले. या घटनेत विनोद गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारा करिता वाय सी एम रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस निरीक्षक गुन्हे सतीश नांदुरकर सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आदींनी घटनास्थळी जाऊन घटनेची चौकशी केली.
व्हीएस न्युज - पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कंपनीचे व्यवस्थापनाने बेकायदा स्थलांतर सुरु केले आहे. आज रोजी (सोमवारी) प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारे रसायन गुजरात येथे पाठविण्यासाठी पोलीस बंदोबस्तात या साहित्याचे ट्रक पाठविण्याचा प्रयत्न केला. परंतु इंटकचे जिल्हाध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखालील सतर्क कामगारांनी हा डाव उधळून लावला. कामगारांची उपासमार थांबवून कंपनी प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा, वेतन करार करून थकबाकी देण्यात यावी, निवृत्त कामगारांनाही त्याचे लाभ मिळावेत, नंतरच कंपनीतून प्रयोगशाळेचे साहित्य पाठविण्यास संमती देऊ, अशी भूमिका कैलास कदम यांनी घेतली. तर आवश्यक रसायनच कंपनीतून पाठवण्यात येत आहे, अशी कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे होते. मात्र, सदर वाहनांमध्ये प्रयोगशाळेतील रसायनाबरोबरच काही मशिनरीदेखील या वाहनांमध्ये असल्याचे कामगारांनी बंदोबस्तावरील पोलीस पथकाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे फक्त रसायनच पाठविणार असाल तरच आम्ही बंदोबस्त देऊ, अन्यथा आम्ही आपणास सहकार्य करू शकणार नाही अशी भूमिका भासेरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी घेतली. अखेर कंपनी व्यवसथापनाने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे पोलीस फौजफाटा तेथून निघून गेला.
पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कंपनी व्यवस्थापनाने बेकायदा स्थलांतर सुरु केले आहे. याला कंपनीतील कामगारांनी तीव्र विरोध केला असून, शनिवार दि. 25 ऑगस्ट पासून कंपनी प्रवेशव्दारासमोर हिंद कामगार संघटनेच्या (इंटक) वतीने ठिय्या आंदोलन इंटकचे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे. डाई-ईची करकरिया ही कंपनी पुणे मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे 54 वर्षापूर्वी सुरु करण्यात आली. या कंपनीत उत्पादनाशी संबंधित शेकडो कामगार काम करीत आहेत. परंतू मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कंपनीतील मशिनरी काढून गुजरातकडे रवाना करण्यात येत आहेत. कामगारांना देशोधडीला लावणारा हा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटना, राज्य सरकार, उद्योग मंत्रालय, श्रम मंत्रालय यांना सर्वांना अंधारात ठेवून घेतला आहे. याच्या विरोधात हिंद कामगार संघटनेने माननीय न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. असे असूनही कंपनी व्यवस्थापनाने सोमवारी प्रयोगशाळेसाठी लागणारे आवश्यक साहित्य गुजरात येथे पाठविण्याची तयारी केली होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. यावेळी उपस्थित कामगार, त्यांचे कुटुंबियांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून कंपनीतील वाहने बाहेर पाठविण्यास विरोध केला.
यावेळी कंपनीचे संचालक डॉ. संजय पुरव यांनी मशिनरी बाहेर पाठविली जात नसून केवळ रसायन पाठविण्यात येणार आहे, कोणत्याही कामगाराला कामावरून कमी केले जाणार नाही, चर्चेने कामगारांचे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन दिले. मात्र, 11 वर्षांपासून आमचा शांततेच्या मार्गाने लढा सुरू आहे. व्यवस्थापनाने कामगारांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेदेखील कासारवाडीस्थीत कंपनीतून मशिनरी अन्यत्र स्थलांतरीत करण्यास मज्जाव केला आहे, याची आठवण कदम यांनी करून दिली. तसेच न्यायालयाची प्रत उपस्थित पोलीस अधिकारी, कंपनी व्यवस्थापनास दिली. यावर आम्ही संघटनेच्या व्यक्तिंशी चर्चा करणार नाही, अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतली. त्यावर कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी, निवृत्त कर्मचारी यांची समिती तयार केली आहे, ते आपल्याकडे मागण्या मांडतील, त्यावर चर्चा करावी, नंतरच कंपनीतून संबंधित वाहने साडावीत अशी मागणी कदम यांनी केली. परंतु कंपनी व्यवस्थापनाकडून निर्णायक प्रतिसाद मिळाला नाही.
कंपनी व्यवस्थापनाने यापूर्वीच कोणतीही लेखी सूचना न देता कामगारांची बस आणि कॅन्टिन सुविधा बंद केली आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी रात्री अपरात्री कामगारांच्या डोळ्यात धूळफेक करून कंपनी व्यवस्थापन मशिनरी हलविण्याचे काम करीत आहे. कामगारांची ही फसवणूक लक्षात आल्यामुळे कामगारांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हिंद कामगार संघटनेची मागणी आहे की, पूर्वी 200 कोटींचा टर्नओव्हर होता, तो आता 1200 कोटींवर गेला आहे. आता केवळ 27 कायम कामगार कार्यरत आहेत. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाची कंपनी व्यवस्थापनाने अंमलबजावणी करावी तसेच सर्व कामागरांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची ग्रॅज्यूईटी व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झालेत त्यांनाही फरकासह ग्रॅज्यूईटी मिळावी. कायद्याप्रमाणे पूर्व प्रथेप्रमाणे फरकासह बोनस मिळावा. कंपनीने पूर्वीप्रमाणेच उत्पादन सुरु करून ज्या कामगारांना खोट्या आरोपांपोटी कामावरून काढून टाकले आहे त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे.
2008 सालापासून प्रलंबित असलेला कामगार वेतन करार कामगार संघटनेशी चर्चा करून केला पाहिजे. तसेच कामगारांच्या सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु करण्यात यावी व निवृत्त झालेल्या कामगारांच्या जागेवर नव्याने कायमस्वरूपी कामगारांची भरती करण्यात यावी. व त्यांना संघटनेचे सभासद होण्यासाठी हक्क मिळावेत. कंपनी स्थलांतरीत करण्याचे हे काम कंपनी व्यवस्थापनाने ताबडतोब बंद करावे. तसेच आतापर्यंत या कपंनीतून बाहेर पाठविण्यात आलेली मशीनरी पुन्हा कंपनीत आणून उत्पादन सुरु करावे. या विषयाबाबतच हिंद कामगार संघटना न्यायालयात लढा लढतच आहे. कंपनी व्यवस्थापनाने सर्व उत्पादन पूर्ववत सुरु करून कामगारांच्या न्याय हक्क मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा कैलास कदम यांनी दिला आहे.
यावेळी आनंदराव फडतरे, मारुती पाटील, शिवाजी मंडलिक, संजय काशिद, कमलाकर इंगळे, शिवाजी घाटे, वीरसेन ननवरे, विनायक पोतदार, गणपत जगदाळे, सुरेखा ससाणे, रामचंद्र पवार, प्रल्हाद भाकरे, बबन घाटे, बिलास बधे, सत्यवान गवस, शांताराम कदम, एल. एम. पिंटो, राजेंद्र नांगरे, सदानंद जोशी, कृष्णानंद साई, डेव्हीड खरात, राजेंद्र नांद्रे, वसंत नागोसे, पद्माकर मोडक, घनश्याम भारंबे, मेहमूद सुतार, नामदेव होले, ज्ञानेश्वर जाधव, केशव जाधव, रमेश रबडे, राजेंद्र पवार, छबू जवळकर, शिवाजी हांडे, अंकुश करके, बाळू थिटे, रिचर्ड, श्यामराव शिंदे, नाथूराम फाळके, प्रकाश पवार, रवी दीक्षित, भोजा मुलीया, जेरॉय लोबो, आनंद भोसले, भीमराव साळवी, दशरथ शेडगे, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002