व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच अतिक्रमण वाढत आहे. कोरोनाने शहरात चक्क शंभरी पार केली आहे. महापालिकेने सोमवारी १७१ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते.
एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांचे अहवाला आज मंगळवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. या अहवालात तब्बल नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या नऊ जणांमध्ये सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पुरुषांची वये अनुक्रमे १६,१८,२२,२७,३४, एका पुरुषाचे वय समजू शकले नाही. तर महिलांचे वय अनुक्रमे १५, १८, १९ अशी आहेत. हे सर्व रुग्ण निगडी-रुपीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. तसेच खडकीतील परंतु, वायसीएममध्ये दाखल असलेल्या ५० वर्षीय महिलेचे रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या १०६ वर गेली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ७३ वर गेली आहे. तर, २९ जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.
व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना काळेवाडी येथील मशिदीजवळ सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. रस्त्याने विनाकारण फिरताना हटकल्याच्या रागातून पोलिसाला मारहाण करण्यात आली.
पोलीस कर्मचारी शंकर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, युनूस गुलाब आत्तार, मतीन युनूस आत्तार, मोईन युनूस आत्तार (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक काळेवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी काळेवाडी येथील मशिदीजवळ आरोपी युनूस आतार हा विनाकारण फिरत होता. पथकातील पोलीस कर्मचारी कळकुटे यांनी त्यास घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. या रागातून युनूस आणि त्यांची दोन मुले मतीन आणि मोईन यांनी आपसात संगनमत करून कळकुटे यांना मारहाण केली. यातील आरोपी मतीन हा रेल्वे पोलीस आहे.
पुढील तपास वाकड पोलिस करीत आहे.
व्हिएस न्युज -
व्हिएस न्युज -पिंपरी चिंचवड शहरातील “करोना’च्या रुग्ण वाढीची गती कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण महापालिका क्षेत्रास कंटेनमेंट झोन घोषित न करता केवळ 16 ठिकाणांचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. 27 एप्रिल 2020 रोजी रात्री 12 . 00 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत या 16 ठिकाणचा परिसर सील करण्यात येत आहे. या परिसराच्या सर्व सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात येत आहेत. या परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व या परिसरातील सर्व नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी केल्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
कंटेंनमेन्ट झोन समाविष्ट क्षेत्र 1 खराळवाडी परिसर – पिंपरी जामा मस्जिद , खराळवाडी या भोवतीचा परिसर, गिरमे हॉस्पिटल – अग्रेसन लायब्ररी , क्रिधा ट्रेडर्स , चैताली पार्क हौसिंग सोसायटी , खराळ आई गार्डन , ओम हॉस्पिटल , ओरियंटल बैंक , सिटी प्राईड हॉटेल , क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल
2 पीएमटी चौक परिसर – भोसरी पाटील हॉस्पिटल, पीएमटी चौक , मारुती मंदिर , पीसीएमसी पाणी टाकी , भोसरी जुने हॉस्पिटल , विश्वविलास बिर्याणी हाऊस .
3 गुरुदत्त कॉलनी परिसर , भोसरी – भोसरी आळंदी रोड, बिकानेर स्वीट्स, एच.पी. पेट्रोल पंप, बालाजी मंदिर, न्यू मिलान बेकरी, हरी ओम स्वीट्स, महा – ई सेवा केंद्र, ममता स्वीट्स, आनंद हॉस्पिटल
4 रामराज्य प्लॅनेट परिसर , कासारवाडी – सीएमई हद्द , 7 ऍप्पल हॉटेल, सिद्धार्थ मोटर्स, मुंबई पुणे हायवे, दत्त मंदिर, पोस्ट ऑफिस ।
5 गणेश नगर परिसर, दापोडी – पाण्याची टाकी, रेल्वे लाईन, सिध्दी टॉवर्स, माता शितळादेवी चौक, श्रेया एंटरप्रायजेस, न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल,
6 शास्त्री चौक परिसर , भोसरी- संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, परफेक्ट इलेक्ट्रिल, व्यंकटेश मेडीकल, महानगर को – ऑप . बॅंक, भोसरी आळंदी रोड
7 संभाजीनगर परिसर , आकुर्डी – हॉटल शिवशंकर , तुळजाभवानी मंदिर , बेंगलोर बेकरी , कस्तुरी मार्केट
8 रोडे हॉस्पिटल परिसर , दिघी- महा-ई सेवा केंद्र दिघी, गुरुकृपा मॉल, अष्टविनायक दूध डेअरी, जान्हवी ट्रेडर्स
9 तनिष्क ऑर्किड परिसर चऱ्होली – तनिष्क ऑर्किड सोसायटी हद्द
10 कृष्णराज कॉलनी परिसर पिंपळे गुरव – पवना नदी किनारा, दत्त मंदिर, बालाजी हॉटेल, भारत गॅस एजन्सी, पवना नदी किनारा
11 नेहरुनगर बस डेपो परिसर, भोसरी – जनता सहकारी बॅंक, नूरानी मस्जिद, पवार पेट्रोल पंप, हैद्राबाद बिर्याणी हाऊस
12 कावेरीनगर पोलीस लाइन परिसर – बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज, अण्णाभाऊ साठे नगर,
13 रुपीनगर परिसर, तळवडे – दीपक ग्लास सेंटर, स्वामी समर्थ मठ, त्रिवेणी चौक, भक्ती-शक्ती बस डेपो
14 फातिमा मस्जिद परिसर मोशी – जय हनुमान ट्रेडर्स, हॉटेल सूर्योदय, मोशी कचरा डेपो, पुणे-नाशिक हायवे
15 विजयनगर परिसर, दिघी – शिवशंकर अपार्टमेंट, समायक गॅस एजन्सी, गणेश सुपर मार्केट, राघव मंगल कार्यालय, संत ज्ञानेश्वर रोड, व्हीआरएल कुरिअर सर्व्हिसेस
16 आदिनाथनगर परिसर भोसरी – पुणे नाशिक हायवे, एचपी गॅस, आदिनाथ नगर मेन रोड, निलकंठेश्वर मंदिर, रुपी को-ऑप बॅंक, आई मॅटर्निटी होम,
कंटेनमेंट परिसरामध्ये सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जाणार आहे. तर शहराच्या उर्वरित भागात जीवनावश्यक वस्तूंची विक्री सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि दूध विक्री सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. शहरातील सर्व इस्पितळे, दवाखाने व औषधांची दुकाने संपूर्ण कालावधीकरता खुली राहतील.
व्हिएस न्युज - राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 26 एप्रिल 2020 या सव्वीस दिवसात राज्यातील 1 कोटी 53 लाख 64 हजार 769 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 65 लाख 55 हजार 480 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.
राज्यात या योजनेमधून सुमारे 20 लाख 28 हजार 616 क्विंटल गहू, 15 लाख 67 हजार 121 क्विंटल तांदूळ, तर 19 हजार 305 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 8 लाख 32 हजार 739 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दिनांक 3 एप्रिलपासून एकूण 1 कोटी 29 लाख 11 हजार 696 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 5 कोटी 86 लाख 33 हजार 060 लोकसंख्येला 29 लाख 31 हजार 650 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे. या योजनेसाठी 35 लाख 820 क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राज्य शासनाने कोविड-19 च्या संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 APL केशरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन 28 हजार 090 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.
व्हिएस न्युज - सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्ती विरोधात आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली. याबाबत माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून नवनीतकुमार देशमुख या व्यक्तीविरोधात मुख्यमंत्र्यांची बदनामी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख हा मूळ जिंतूर, जि. परभणी येथील रहिवासी असून आळंदीत खासगी वारकरी प्रशिक्षण संस्था चालवतो.
व्हिएस न्युज - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील गरजु कष्टकरी कामगारांना त्यांच्या कुटुंबासहीत उपासमारीची वेळ आली आहे. तरी त्यांच्यासाठी किमान जेवणाची सोय व्हावी म्हणून ज्या पद्धतीने शिवभोजन व शरदभोजन थाळी सुरू करण्यात आली, त्याप्रमाणेच सोनिया भोजन थाळी सुरू करण्यात यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड असंघटित कामगार काँग्रेसचे सुंदर कांबळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
याबाबत कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनिया भोजन थाळी सुरू केल्यास त्याचा फायदा आता कोरोनाच्या काळात कामगारांना होईल. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार वर्ग हा सर्वात जास्त काँग्रेसप्रेमी असून इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेसने नेहमी कष्टकरी कामगार वर्गाचा विचार केला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील असंघटित कामगाराच्या अडचणी लक्षात घेता, बाळासाहेब थोरात सोनियाथाळी लवकरच अखंड महाराष्ट्रात सुरू करतील, अशी अपेक्षा कामगार वर्ग करत आहे.
व्हिएस न्युज - महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्च 2020 रोजी टाळेबंदी घोषित केली त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगार वर्गातील गवंडी, बिगारी, रिक्षाचालक, घरकाम करणा-या महिला, वॉचमेन, हातगाडी-पथारी व्यवसायिक यांच्यावर काम बंद झाल्यामुळे व हातावर पोट असल्यामुळे या क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे . या कामगारांना मदतीचा हात म्हणून, असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरातर्फे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांच्यातर्फे टाळेबंदी झाल्यापासून आतापर्यंत विद्यानगर या ठिकाणी सलग 20 दिवस असंघटित कामगारांना जेवण वाटप केले .
त्याचप्रमाणे प्रभाग 19 बौद्धनगर, भाटनगर येथील घरकाम करणा-या 100 महीलांना दररोज सलग 20 दिवस अन्नदान करण्यात आले. त्याचप्रमाणे चिखली जाधववाडी येथील परप्रांतीय कामगारांना येथील रमा ग्रुप या बांधकाम साईटवरील 150 कामगारांना अन्नदान करण्यात आले.
दि. 19/04/2020 रोजी पासून असंघटित कामगार काँग्रेस कार्यालय पिंपरी येथून 11 ते 2 या वेळेत असंघटित कामगारांना गहू, तांदूळ, तेल, साखर, चहापत्ती या प्रकारच्या धान्याची किट वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये रिक्षा चालक, घरेलु महिला कामगार बांधकम करणारे मजूर, विधवा निराधार महिला, ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्ड आदी क्षेत्रातील कामगारांना धान्यचे किट देण्यात आली.
व्हिएस न्युज - भारतातसह जगात कोरोना या साथीच्या आजारांने थैमान घातले आहे .करोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. सोशल डीसटन्सी शिवाय कोणताही पर्याय नसलयामुळे मुळे देशात टाळेबंदी लागु करण्यात आले आहे . स्वच्छता- सुंदरता-जागरुकता ही उद्दिष्टे बाळगणारी थेरगाव सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या सभासदांनी माझा समाज माझी जबाबदार हि संकल्पना राबवली आहे.
कोरोनामुळे थेरगाव व आजुबाजुच्या परिसरात अडकुन पडलेल्या विद्यार्थी आणि कामगार वर्गाला थेरगाव सोशल फाऊंडेशन तर्फे आज २५ दिवस अविरत अन्नदान सुरु आहे . सामाजिक अंतर पाळण्यासाठी पांढरे वर्तुळ आखण्यात आलेले आहेत सर्व सभासद स्वतःहुन काळजी घेतात. अन्नछत्रा वर वाढती गर्दी पाहता कोणाला ही विषाणु ची लागण होऊ नये म्हणुन सॅनिटायझर कक्ष ची उभारणी केलेली आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासत अपंग व वयोवृद्ध नागरिकांपर्यंत घरपोच अन्न पोहचविण्याचे काम संस्था करत आहे. ३ मे पर्यत थेरगाव मध्ये कोणीही उपाशी झोपनार नाही असा निर्धार थेरगाव सोशल फाऊंडेशने केला आहे.
पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी स्वतः अन्नछत्रांची पाहणी केली असता उत्तम नियोजन आहे असे म्हणत कौतुक केले.
व्हिएस न्युज - भारतातसह जगात कोरोना या साथीच्या आजारांने थैमान घातले आहे .करोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. सोशल डीसटन्सी शिवाय कोणताही पर्याय नसलयामुळे मुळे देशात लॉकडाऊन लागु करण्यात आले आहे . या जीवघेण्या आजारापासुन बचावासाठी जगभरातून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स या कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्यावी , अशी मागणी नगरसेविका गीता मंचरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .
जगभरातून भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी करण्यात येत आहे. पिंपरी येथील ‘ एचए ‘ कंपनीत या औषधाची निर्मिती होऊ शकते . येथे सर्व यंत्रणा सज्ज असल्यामुळे त्वरित उत्पादनाला सुरुवात केली जाऊ शकते , असे मंचरकर यांनी या पत्रात म्हटले आहे . जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांच्या सहकार्याने 1954 साली सुरू झालेल्या या कंपनीत सुरवातीला ‘ पेनिसिलीन ‘ ची निर्मिती होत असल्याने ‘ एचसीक्यु ‘ चे उत्पादन सहज शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे .
एच.ए. कंपनीपासून रस्ता व रेल्वे मार्ग जवळ असल्याने वाहतूकीसाठी अडचण निर्माण होणार नाही . कंपनीची औषध उत्पादनाची क्षमता मोठी असल्यामुळे देशातील मागणीचा योग्य पुरवठा केला जाऊ शकतो . पण काही अपरिहार्य कारणांमुळे हा प्लांट उत्पादन थांबवून बंद करण्यात आला . गरिबांना स्वस्तात औषध उपलब्ध व्हावी , या महात्मा गांधी यांच्या विचारातून स्थापन झालेल्या या कंपनीचा या आणिबाणीच्या परिस्थितीत यथायोग्य उपयोग होऊ शकतो . त्यामुळे सरकारने पिंपरी येथील ‘ एच.ए. ‘ कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्यावी , अशी मागणी मंचरकर यांनी केली आहे .
व्हीएस न्युज - भोसरीत राहणाऱ्या व इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या परिसरातील १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. भोसरी येथील राहणारा हा विक्रेता महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहे. तो किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांचा पुरवठा करायचा.
पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे दररोज नवे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, भोसरी परिसरातील एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले असून तो इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करत होता. यामुळे वेगवेगळ्या भागातील ऐकून १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. कनकवले यांनी दिली आहे. यात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांचा समावेश आहे.
परिसरातील नानेकरवाडी, खराबवाडी आणि मेंदनकरवाडी येथील व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, परिसरात सर्वे सुरू केला असून आत्ता पर्यंत कोणी करोना पॉजिटिव्ह आढळला नाही अशी माहिती देखील डॉ. कनकवले यांनी दिली आहे.
व्हिएस न्युज - लॉकडाउन तसेच कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर दारूसेवान करणारे तसेच अन्य व्यसने करणाऱ्यांना दारू आणि अन्य गोष्टी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. एरवी सहजतेने उपलब्ध होणारे दारू, तंबाखू तसेच गुटखा सेवन करणे आता परवडेनासे झाले आहे. चोरटय़ा मार्गाने दारू, तंबाखू तसेच गुटख्याची वाहतूक होत आहे. कात्रज घाटात वाहतूक पोलिसांनी रात्री दुधाच्या टेम्पोतून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी बिअरची बारा खोकी जप्त केली.
सलीम बशिर शेख (वय २४) आणि सिद्धार्थ संजय मिसाळ (वय २५, दोघे रा.भिलारेवाडी,कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरोधात मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॉकडाउन मध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रशासन तसेच पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. रात्री कात्रज घाटात भारती विद्यापीठ वाहतूक शाखेने नाकाबंदी लावली होती. पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस हवालदार नरेंद्र पारखी, तोंडे, भिंगारे, झुंजार या भागातून जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते.
त्या वेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी घाटात दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला थांबण्याची सूचना केली. टेम्पोतील चालक शेख आणि मिसाळ यांची चौकशी सुरू केली तेव्हा ते गडबडले आणि पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली तेव्हा टेम्पोत दूध ठेवण्यासाठी येणाऱ्या प्लास्टिकच्या जाळीमागे (कॅरेट) बिअरची खोकी ठेवल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी टेम्पोतील बिअरची खोकी जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या बिअरच्या बाटल्यांची किंमत २८ हजार ८०० रुपये आहे. वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलीस पथकाचे कौतुक केले.
अत्यावश्यक सेवा स्टिकरचा गैरवापर
या प्रकरणात अटक केलेल्या आरोपी शेख अणि मिसाळ यांनी दूध वाहतुकीच्या टेम्पोला अत्यावश्यक सेवेतील वाहन असे स्टिकर लावले होते. पोलिसांकडून कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी हे स्टिकर लावले होते. आरोपींनी सातारा रस्त्यावरील शिरवळ येथून बिअरची खोकी आणली होती. दोनशे रुपयांची बाटली ते सहाशे रुपयांना विकणार होते, अशी कबुली शेख आणि मिसाळ यांनी पोलिसांना दिली.
व्हीएस न्युज -
दि ९ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची ( कॅबिनेट) बैठक घेण्यात आली, सदर बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर नेमणूक करण्याबाबत शिफारस करणारा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला, मंत्रिमंडळाचा ठराव व सल्ला म्हणून उद्धव ठाकरे यांना आमदार करण्याबाबत महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडे शिफारस करण्यात आली.
सदरची शिफारस हि केवळ बेकायदेशीरच नसून भारतीय लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेला काळिमा फासणारी आहे असे मत दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश भाजप चे अध्यक्ष राजेश पिल्ले यांनी त्यांच्या १२/०४/२०२० रोजीच्या प्रसिद्धी पत्रात व्यक्त केले आहे
उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. संविधानाच्या कलम 164 (4) अंतर्गत उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात राज्याच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनणं अनिवार्य आहे. उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.
राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस हि भारतीय राज्यघटनेला काळिमा फासणारी गोष्ट आहे याची करणे सुद्धा त्यांनी स्पस्ट केली आहेत ती खालील प्रमाणे ,
अ) सदरची मंत्रिमंडळ बैठक ( कॅबिनेट) अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अजित पवार हे उपमुख्यमंत्री जरी असले तरी,“उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नसून मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही “. असा अधिकार आपल्याला आहे असे भासवून घेण्यात आलेली दि. ९ एपिल २०२० ची मंत्रिमंडळ बैठक ही पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यात संमत केलेले ठराव ही बेकायदेशीरच आहेत.
आ) सदर मंत्रिमंडळ बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर विहित नमुन्यातील कागदपत्रांसह उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेचे आमदार करण्याबाबतचा विषय विषय पत्रिकेत नव्हता, महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावली( Rules Of Buisness) कलम १७१ (३) (e) प्रमाणे राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव, सदर महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावली चे कलम १५ पोटकलम (१०) प्रमाणे मुख्यमंत्र्यांकडे लेखी प्रस्ताव सादर करावा लागतो व त्यानंतरच असा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करता येतो, अशी कोणतीही कार्यपद्धती या वेळी वापरण्यात आलेली नाही आणि म्हणूनच, विहित कागदपत्रांव्यतिरिक्त सदरचा प्रस्ताव दि ९ एप्रिल २०२० रोजी मंत्र्यांसमोर आणण्यात आला.
इ) सदरची बैठक मुख्यमंत्रीच गैरहजर असल्याने बेकायदेशीर ठरते व विहित कायद्याच्या बाजूंची पूर्तता न केल्यानेही राज्यपालांना दिलेला सल्ला हा बेकायदेशीर ठरतो.
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६६ (१) एक प्रमाणे मुख्यमंत्री प्रमुख असतील अशा मंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसारच राज्यपालंनी कोणतीही कार्यवाही करणे अपेक्षित असते दिनांक 9 एप्रिल 2020 या बैठकीस उद्धव ठाकरे स्वतः गैरहजर होते त्यामुळे मुख्यमंत्री प्रमुख आहेत अशा परिस्थितीत उर्वरित मंडळाने दिलेला सल्ला राज्यपालांवर बंधनकारक नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजारी असतील किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे करण्यास समर्थ असतील अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावली( Rules of Buisness ) कलम ६(अ ) अन्वय माननीय मुख्यमंत्री एखाद्या मंत्रस त्यांची संपूर्ण अथवा विशिष्ट कामे करण्याबाबतचा अधिकार देऊ शकतात परंतु उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवला नसताना 9 एप्रिल 2020 रोजी मुख्यमंत्र्याच्या अनुपस्थित अजितदादा पवार यांनी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक घेणे व ती कायदेशीर आहे असे भासवून उद्धव ठाकरे यांना आमदार करण्याबाबतचा राज्यपाल यांना घटनात्मक सल्ला देणे ही घटनेची पायमल्ली नसून कायदेशीर गुन्हाच आहे.
सत्तेच्या लोभापायी घटनेने तयार केलेल्या नियमावलीला धाब्यावर बसून करणाच्या विळख्यात जनता अडकलेले असताना जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून उद्धव ठाकरे यांना सहा वर्षांकरिता कोणतीही निवडणूक न लढवतात आमदार करण्याचा घाट सत्तेच्या लोभापायी घातला जात आहे.
सरकारच्या तिजोरीच्या चाव्या घटनाबाह्य कृत्य करून उद्धव ठाकरे व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातात देण्याचा हा डाव आहे सदरचे कृत्य घटनाबाह्य बेकायदेशीर व लांच्छनास्पद आहे.
या संधर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असून आवश्यक वाटल्यास फौजदारी तक्रारही करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रात म्हंटले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002