पुण्यातील गर्दी आणि अनलॉकबद्दल अजित पवारांनी केलं भाष्य? संजय राऊतांच्या विधानावर मांडली भूमिका
व्हीएस न्यूज - करोनाचा उद्रेक झाल्यानंतर पुण्यात तातडीने निर्बंध लागू करण्यात आले होते. जवळपास दीड ते दोन महिन्यांनंतर पुण्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध शिथिल होताच पुण्यातील रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये लोकांची वर्दळ वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचं दिसत आहे. पुण्यातील वाढत्या गर्दीवर चिंता व्यक्त करत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं.
पु्ण्यात अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यामुळे पुण्यात पुन्हा गर्दी होत असल्याचं दिसत आहे. यावर अजित पवारांनी चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “गर्दी झाली तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे, त्याबद्दल लक्ष द्यावे. अन्यथा आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका. लोक कंटाळली आहेत. लोकांची कामे रखडली आहेत, त्यामुळे बाहेर पडत आहेत. पण करोना संकट दूर झालेलं नाही. जर गर्दी वाढत राहिली, तर एका बाजूची आज आणि दुसर्या बाजूची उद्या अशा पद्धतीने दुकाने सुरू करण्याची वेळ आणू नका. त्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. बाहेर पडताना, नियमांचे पालन करावं,” असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
“पेट्रोल-डिझेलचे दर १०० रूपयांच्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे कर कमी करण्याची मागणी होत आहे, परंतु गेल्या वर्षांपासून आपण करोनाशी लढत आहोत. त्यामुळे करामध्ये कपात करता येणार नाही. केंद्राची परिस्थिती आता चांगली आहे,” असं सांगत त्यांनी पेट्रोलवर दर कपातीचा निर्णय केंद्राकडे टोलावला.
संजय राऊतांच्या विधानावर मांडली भूमिका
पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना ८० जागा जिंकेल. किंग किंवा किंग मेकर असू, असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही अजित पवार यांनी भूमिका मांडली. “प्रत्येकजण पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने भूमिका मांडत असतात. त्यातून त्यांनी मांडली असावी. आगामी महापालिकेत प्रभाग २,३ की ४ करिता अनुकूल आहात का, त्यावर ते म्हणाले की, “सध्याच्या स्थितीला मी तरी २ करिता अनुकूल आहे,” अशी माहिती पवार यांनी दिली.
व्हीएस न्यूज - पोलिसांपासून बचावासाठी अवैध धंद्यावाले अनेक शक्कल लढवतात. अशाच प्रकारे एका महिलेने गावठी हातभट्टीची दारू तयार करून कॅनमध्ये भरून घरामागच्या मोकळ्या जागेत पुरायची. त्या दारूची वाहतूक करून आसपासच्या परिसरात विक्री करायची. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने या दारुभट्टीवर छापा मारत हा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवईत तीन लाख ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरे दत्तवाडी रोडलगत असलेल्या शिवांजली नगर, हिंजवडी येथे एक महिला ही गावठी हातभट्टीची दारू तयार करून ती दारू प्लास्टिक कॅनमध्ये भरून ते कॅन तिच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या मैदानात पुरत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (दि. ४) दुपारी सव्वाएकच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. दोन लाख ८० हजारांची टाकी, त्यात साडेतीन हजार गावठी दारू बनविण्याचे रसायन, एक हजारांची लोखंडी टाकी, ५०० रुपयांची मोकळी टाकी, २०० रुपयांचा एक पाईप, ७० हजार रुपये किमतीची ७०० लिटर गावठी हातभट्टीची दारू, असा एकूण तीन लाख ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी जप्त केला. आरोपी महिला ही गावठी हातभट्टीची दारू तयार करून प्लास्टिक कॅनमध्ये भरून साठवत होती. दारूचे ते कॅन तिच्या राहत्या घरामागील मोकळ्या जागेत पुरायची. तसेच तिला शक्य होईल तेव्हा वाहतूक करून आजबाजूच्या परिसरात ती दारू विक्री करायची. पोलिसांनी कारवाई करून दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले. तसेच जमिनीत पुरलेले दारूचे कॅन उकरून काढून जप्त केले. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, प्रणिल चौगले, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, संतोष बर्गे, भगवंता मुठे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला गती येण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठित
व्हिएस न्युज - पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लागणारी संरक्षण विभागाची परवानगी नुकतीच मिळाली असून पुणे महानगरपालिकेने सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्किट हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पुणे मेट्रो मार्गिका 3 हिंजवडी ते शिवाजीनगर कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. मेट्रोचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व ‘पीएमआरडीए’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कामकाज करावे, असे सांगितले. नागरिकांशी संवाद साधून मेट्रोचे काम जलदगतीने होण्यासाठी महापालिका व पीएमआरडीए मधील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये माधव जगताप, नितीन उदास व सुनंदा गायकवाड यांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रकल्प निश्चिती, मान्यता, कामकाजाची सुरुवात, भूसंपादनाची सद्यस्थिती, केंद्र आणि राज्य शासनाची जागा, पर्यायी रस्ते तसेच अंमलबजावणीतील महत्त्वाचे टप्पे व प्रकल्प राबवण्यासाठी सुरु असलेल्या कार्यावाहीबाबतचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांनी याविषयी माहिती देऊन कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले.
व्हिएस न्युज - पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुण्याच्या प्रश्नांची जाण असणारे अधिकारी नवल किशोर राम यांना प्रधानमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे, ही चांगली बाब असून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी श्री. राम प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी देखील नवल किशोर राम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अटी लागू करून फूल बाजार सूरू करण्याचे आदेश काढावेत.
पिंपरी चिंवडमधील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील सूरू असणारा फूल बाजार अनेक दिवसापासून बंद झाल्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः फूले रोज फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे त्यांना अनेक मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
फूल बाजारातील सर्व व्यापारी चिंतेत असून आशीच परिस्थिती राहिले तर मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होवू शकते. शेतकरी हातघाईला आला असून शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा आशी मागणी गणेश आहेर यांनी केले आहे.
महानगरपालिका आयुक्तांनी शेतकर्यांचा विचार करून पिंपरीतील फूल बाजार सकाळी ७ ते १० या वेळेत सूरू करण्याचे आदेश द्यावेत. ज्यांने करून फूल उत्पादक शेतकर्यांना थोडा का होईना पण आधार मिळेल आशी मागणी पिंपरी फुल बाजारातील फूलांचे व्यापारी गणेश आहेर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना केली आहेत.
व्हिएस न्युज - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या काळातही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज अशा तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडली जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी सांगितले व त्या प्रमाणे दारूची दुकाने उघडली सुद्धा ,पण तळीरामांची दारूच्या दुकानाच्या बाहेरील झुंबड बगता आणि कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावा लक्षात घेता दारू विक्रीला परवानगी देणे हा निर्णय धोकेदायक ठरत असल्याचे दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरात तर सोशल डिस्टंस्टिंगचा आणि कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा फज्जा उडाला आहे म्हणून पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक समीर मसुळकर यांनी लॉक डाऊन संपुष्टात आल्यावरच दारू विक्रीला परवानगी द्या अशी मागणी पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महारष्ट्रातील रुग्णांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने आर्थिक कारण पुढे करून राज्यभरात दारू विक्रीला परवानगी देण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला आहे. निदान दारू विक्री मुळेतरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढू नये असे मत नगरसेवक समीर मासुळकर यांनी व्यक्त केले.
व्हिएस न्युज - दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्र याचबरोबर दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देणे सुकर करण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘दिव्यांगसाथी’ (divyangsathizpbeed.com) या विशेष संकेतस्थळाचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी अशा प्रकारचे संकेतस्थळ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असावे या दृष्टिकोनातून विभागाला सूचना करण्यात येतील, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.
या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील सर्व गावातील ग्रामसेवकांमार्फत येत्या एक महिन्याच्या आत दिव्यांग व्यक्तींची माहिती भरण्यात येईल, यामध्ये प्रामुख्याने त्यांचे आधार कार्ड, बँक खाते, दिव्यांग प्रमाणपत्र आदी बाबींचा समावेश असेल; जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके हे यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी दिली.
या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी करून, प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना ३ टक्के खर्च योजना, विमा, पेन्शन, एसटी-रेल्वे पास इत्यादी योजनांचा लाभ मिळवून देणे, पात्र लाभार्थींना स्वावलंबन कार्ड मिळवून देणे, तपासणी व ऑनलाईन नोंदणी, तसेच आरोग्यविषयक सेवा मिळवून देणे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे.
अशा प्रकारचे संकेतस्थळ असावे अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती, त्याला प्रतिसाद देत त्यासाठी सर्वात प्रथम त्यांच्याच बीड जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे संकेतस्थळ आकाराला आणले त्याबद्दल धनंजय मुंडे यांनी श्री.येडके व श्री.मडावी यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण सह शहरी भागातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंद घ्यावी, सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत विभागाची प्रत्येक योजना पोहोचविण्यासाठी मदत व्हावी असे चोख नियोजन करून हा उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना यावेळी श्री.मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके यांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
व्हिएस न्युज -कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नियमित भाजी मंडई बंद करुन मोकळ्या मैदानावरील भाजी मंडई चालू करण्यात आलेल्या आहेत त्या बंद करून पूर्वप्रमाणे भाजी विक्री सुरू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणू संसर्गांमुळे पूर्ण देशात संचार बंदी लागू करण्यात आलेली आहे. नागरीकांना अत्यावश्यक कामे वगळता घराबाहेर पडण्यास मनाई आहे. या अनुषंगाने मनपाने शहरातील नागरीकांच्या सोईसाठी सुमारे ४७ ठिकाणी सकाळी ११ ते २ या वेळेत भाजी –फळे विक्री केंद्रे चालू करण्यात आलेली आहेत. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीक येत नसून आसपासच्या कोरोना बाधित क्षेत्रातील नागरीकही भाजी खरेदी करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला भाग केवळ कोरोना बाधित असलेल्या क्षेत्रातून या ठिकाणी भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरीकांमुळे हा भाग कोरोनाग्रस्त होऊन यलो किंवा रेड झोनमध्ये जाऊ शकतो, व मनपाच्या कोरोना बचावाच्या उद्देशालाही हरताळ फासू शकतो.
याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरीक गर्दी करीत आहेत. त्यामुळे फिजीकल डिस्टंन्स पाळले जात नाही. मास्क लावले जात नाही. त्यामुळे हि मंडईची ठिकाणी कोरोना संसर्ग वाढविण्याची ठिकाणे ठरु लागली आहेत. त्यामुळे मोकळ्या मैदानावरील भाजी विक्रीची केंद्र तातडीने बंद होणे गरजेचे आहे, व पूर्वीप्रमाणेच ठिकठिकाणी भाजी विक्रेते बसून भाजी विक्री करीत होते त्याप्रमाणे भाजी विक्री करण्यास परवानगी दिल्यास त्याठिकाणी गर्दी होणार नाही, फिजिकल डिस्टंन्सचे पालन होईल व संभाव्य कोरोना संसर्ग वाढणार नाही.
मोकळ्या मैदानावरील भाजी विक्री केंद्र तातडीने बंद करण्यात यावीत व पूर्वी ज्याप्रमाणे ठिकठिकाणी भाजी विक्रेते बसून भाजी विक्री करीत होते त्याच प्रमाणे भाजी विक्रेत्यांना मनपाच्या नियमांचे व फिजिकल डिस्टंन्स पाळण्याच्या अटीवर परवानगी देण्यात यावी.
व्हिएस न्युज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना सोबतच गरजूंना रक्ताची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे मानवधर्म व सेवेचे व्रत म्हणून ' एक पाऊल पुढे येऊया ,रक्तदान करूया ' हि संकल्पना राबवत आज महाराष्ट्र दिनानिमित्त विश्रांतवाडी येथे नवजीवन तरुण मंडळ आणि मुकुंद माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आज आयोजन करण्यात आले . राज्याच्या रक्त संक्रमण परिषदेच्या मान्यतेने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत आणि स्वच्छता पाळत रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला. रक्तदान शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले व संकलित केलेले रक्त ससून रुगणालयात देण्यात आले .
महाराष्ट्र राज्य प्रादेशिक रक्तपेढी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत आणि कुंदन लष्करे, संतोष पवार, अमोल मोहिते, मनोज साळुंके, अक्षय माने, चेतन धोत्रे यांच्यासह नवजीवन तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्यने शिबीर यशस्वी पार पडले . राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्यातर्फे सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
राज्यात दररोज साधारण पाच हजार रुगणांना रक्ताची आवश्यकता असते . विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रुगणांना रक्ताची गरज असते . नियमित राबवण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांना कोरोनाचा फटका बसला आहे. करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वजण वेगवेगळ्या पध्दतीने प्रशासनाबरोबरच गरजूंना सहकार्य करत आहेत. एखादा वेगळा उपक्रम घेण्याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी सूचना केली होती. त्यानुसार “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” असून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आल्याचे कुंदन लष्करे यांनी सांगितले.
व्हिएस न्युज -पिंपरी चिंचवड शहर असंघटित कामगार काँग्रेस तर्फे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमीत्त छत्रपती शिवाजी महाराज, कामगारांचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन टाळेबंदी मुळे जेवणाचे हाल होत असलेल्या गरजु असंघटित कामगारांना गहु, तांदुळ, साखर, तेल व चहापत्ती आदी धान्याच्या किट वाटण्यात आले .
पिंपरी चिंचवड व वाकड इत्यादी ठिकाणी कामगारांना अन्नदान करण्यात आले. यावेळी लहु उकरंडे अध्यक्ष प्रभाग क्र १०, नसीमा मोमीन महिला वार्ड अध्यक्ष प्रभाग क्र. १९ आणि निलेश ओव्हळ चिंचवड विधानसभा अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शितलताई कोतवाल महिला अध्यक्षा असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांनी केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन उनवणे यांनी केले.
व्हिएस न्युज -देहूरोड भागात नुकतेच कोरोना रुग्ण आढळून आल्याने याचा धसका घेत देहूरोड येथील विकासनगर मधील समर्थ कॉलनीतील नागरिकांनी ख बरदारी म्हणून स्वतःहून कॉलनीकडे येणारे सर्व रस्ते काही दिवसांसाठी बंद केले आहेत.
कॉलनीतील जागृत मंडळीच्या सदस्यांनी रहिवाश्यानशी समन्वय साधून एक मताने कॉलनीतील सर्व छोटे - मोठे रस्ते, पायवाट बंद केल्या बऱ्याच दिवसांपासून रहिवाशी भागात अनोळखी लोकांचा वावर दिसत होता तसेच लहान मोठ्या गाड्यांची ये-जा ही होती त्यामुळे खबरदारी म्हणून येणाऱ्या वर मज्जाव करीत सर्व रस्ते बंद केले. रहिवाश्याना सुध्दा बाहेर जाऊ नये तर आवश्यक कारण असेल तरच बाहेर पडा व सहकार्य करा अशी विनंती मंडळाकडून केली आहे. आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यानाच कॉलनी बाहेर पडता येणार आहे. कचरा गाडी, दूध वितरण, गॅस, फळ भाजीपाला इ कॉमर्स सुविधा इत्यादीचे आदण-प्रदान कॉलनीच्या हद्दी बाहेरूनच करण्यात येत आहे. प्रवेश बंदचे फलक ही लावण्यात आले असून प्रत्येकाच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या वरही नजर ठेवली जात आहे. शासकीय यंत्रणेला सहकार्या बरोबर सुरक्षा आणि खबरदारी घेत लॉकडाउनचे पालन व्हावे व कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे हाच या पाठीमागील प्रमुख उद्देश आहे.
व्हिएस न्युज - पिंपरी कॅम्पमध्ये कपड्याच्या दुकानाला आग लागली व्ही आग एका दुकानातून इतर दुकानांमध्ये पसरल्यामुळे कपडे, ऑप्टिकल्स आणि मेन्स पार्लर अशी तीन दुकाने जळून खाक झाली आहे . ही घटना मंगळवारी (दि. 28) दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी कॅम्प येथील शगुन चौक ते साई चौक दरम्यान घडली.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बाराच्या सुमारास मुख्य अग्निशमन केंद्राला पिंपरी पोलीस चौकीतून शगुन चौकात आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्राचे तीन, रहाटणी आणि प्राधिकरण उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. उप अग्निशामक अधिकारी ऋषिकांत चिपाडे, अशोक कानडे, लिडिंग फायरमन संजय ठाकूर, प्रतीक कांबळे, फायरमन विजय घुगे, संभाजी दराडे, निखिल गोगवले, सारंग मंगरूळकर, विकास भोंगाळे, अंकुश बडे, भाईदास, सचिन माने, हनुमंत होले, वाहन चालक गोविंद सरोदे, विशाल फडतरे, नीळकंठ दुबे, राजाराम लांडगे, संतोष सरोटे यांच्यासह एकूण 30 जवान घटनास्थळी दाखल झाले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002