व्हीएस न्यूज - पुणे-नगर मार्गावर सणसवाडी परिसरात अज्ञांताकडून गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यात 40 हून अधिक कार, गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर येत आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे तासभर तणावपूर्ण स्थिती होती. मात्र, तेथे सीआरएफच्या तुकड्या पाठवल्या आहेत. सध्या स्थितीवर पूर्ण नियंत्रणात परिस्थिती निवळली आहे. दरम्यान, वढू बुद्रुक येथे नामफलकावरून दोन गटातील वादावरून दगडफेकीची घटना घडल्याचे समोर येत आहे. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गावरील गावे बंद ठेवण्यात आली आहेत. तेथून जवळच असलेल्या भीमा कोरेगाव येथे दलित संघटनांचा शौर्य दिन कार्यक्रम आज साजरा होत आहे. त्यामुळे या दगडफेक घटनेकडे भीमा कोरेगावची तर पार्श्वभूमी नाही ना हे तपासले जात आहे.
आज सकाळी 11 च्या सुमारास काही अज्ञांत टोळक्याने नगर-पुणे मार्गावरील सणसवाडी परिसरात अचानक कार व गाड्यांवर दगडफेक सुरू केली. कोणाला काहीच कळायच्या आत तरूणांनी दगडफेक सुरू केली. मात्र, दगडफेक का आणि कोणी केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. आज सकाळी नेहमीप्रमाणे रस्त्यावर वर्दळ होती. त्यामुळे स्थिती तणावपूर्ण होती. मात्र, पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवले. त्याचवेळी त्यांच्या मदतीला सीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
व्हीएस न्यूज - लोहगडावर आज वणवा पेटल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुर्गप्रेमीकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गडावर सध्या अनेक पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. तसेच गडावर असलेल्या दर्ग्याच्या उरुसासाठी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक जमले आहेत. दोन दिवसांपूर्वी गडाच्या पायथ्याला असाच वणवा पेटला होता. धूम्रपान करणाऱ्या मंडळींमुळे असे प्रकार घडत असल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे....Read More
व्हीएस न्यूज – प्रतिभाताई पाटील यांचा आज सत्कार माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते होऊ शकला नसला तरी हा सत्कार या व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. शरद पवार हे देशाचे भावी राष्ट्रपती असल्याचे मिश्किल उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान काढल्यामुळे अनेकांच्या भुवया शिंदे मनातलेच बोलले की काय या भावनेने उंचावल्या होत्या.
पवारांचा उल्लेख भावी राष्ट्रपती असा करताच व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांनी लगेच नकारार्थी हात दखवला. पण हाच त्यांचा होकार आहे असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी मी त्यांच्याच करंगळीला धरून राजकारणात आलो असल्याची कबूली यावेळी शिंदे यांनी देताच सभागृहात हशा पिकला.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी प्रतिभा पाटील जीवनगौरव ग्रंथ समितीतर्फे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या जीवनावर आधारित ‘भारताची प्रतिभा’ या जीवनगौरव ग्रंथ, संकेतस्थळाचे प्रकाशन करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शरद पवार यावेळी म्हणाले, अनेक महत्वाच्या पदांवर प्रतिभाताई पाटील यांनी देखील कामे केली आणि त्याला न्याय देखील दिला. मात्र, फक्त त्यांचे मुख्यमंत्री या एका पदावर काम करायचे राहून गेले. हे पद त्यांच्यापासून हिरावून घेण्याचे काम मी केले, असे ते मजेत म्हणाले.
व्हीएस न्यूज - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधानाबाबत केलेले विधान हे अत्यंत चुकीचे असून भाजप नेत्यांना बेताल विधाने करून सरकारला अडचणीत आणण्याची सवय असल्यामुळे भाजपने सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या हेगडे यांना समज द्यावी, अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मी संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आहे. आरक्षण संपुष्टात आणणार आणि संविधान मोदी सरकार बदलणार, असा अपप्रचार केला जात आहे. राज्यघटनेच्या पाठीशी पंतप्रधान मोदी ठामपणे उभे आहेत, असेही आठवले यांनी सांगितले.
आठवले म्हणाले, की संसदेत हेगडे यांच्या विधानावर खुलासा करण्यात आला असून संविधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे संविधान सरकार बदलेल ही भावना चुकीची असून हेगडे यांनी कदाचित हे विधान कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले असावे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकविण्यात येईल मात्र घटना बदलू दिली जाणार नाही.
व्हीएस न्यूज – मी नागपुरात येऊन संघ समाप्ती संमेलनाची घोषणा करणार असून संघाची संविधान (राज्यघटना) बदलण्याची इच्छा आहे. तुमच्यात दम असेल तर संविधान बदलूनच दाखवा आणि आम्ही संविधान वाचवून दाखवू,असे आव्हान गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी भाजप व संघ परिवाराला दिले. भाजप विरुद्ध गरिबी अशी लढाई २०१९ च्या निवडणुकीत असेल. फॅसिस्ट संघ परिवाराच्या या लढाईत पराभवासाठी जात, धर्म, पक्ष वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. कुणीही जिंकू दे पण भाजपचा पराभव झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
रविवारी पुण्यात नव्या पेशवाईविरोधातला सांस्कृतिक एल्गार या नावाने एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राधिका रोहित वेमुला यांनी कोरेगाव-भीमा (पुणे) येथील मराठेशाहीच्या कथित पराभवाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित या परिषदेचे उद्घाटन केले. ही परिषद भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिग्नेश मेवाणी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना अजहरी, आदिवासी महिला नेत्या सोनी सोरी, ‘भीम आर्मी’चे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतनसिंग, सर्वहारा आंदोलनाच्या उल्का महाजन, ‘जेएनयू’तील विद्यार्थी उमर खालिद, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील आदी उपस्थित होते.
काही संघटनांनी मी पुण्यात येऊ नये म्हणून इशारा दिला. मी त्यांना सांगू इच्छितो की मी तुमच्या मोदी-शहाला घाबरलो नाही. गुजरातेत मोदींची ५६ इंची छाती फाडून ठेवली. तुम्ही तर अजून ‘बच्चे’ आहात. जात, धर्म, भेद सोडून जनता ‘शेतकरी’ व ‘तरुण’ म्हणून पुढे येईल तेव्हा भाजपला २०१९ मध्ये दोनअंकी संख्यासुद्धा गाठू देणार नाही. मोदी ४ वर्षे विकासाच्या गप्पा मारतात. ‘राम विरुद्ध हज’चा अपप्रचार निवडणूक आल्यावर करतात. या नव्या पेशवाईविरुद्धचा लढा निवडणुकीतून लढता येणार नाही. त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असे मेवाणी म्हणाले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002