व्हीएस न्युज - खराळवाडी पिंपरी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल शेजारील आनंदी बाग सोसायटी च्या आवारात असलेला एक जीर्ण वृक्ष अचानक तुटून रस्त्यावर कोसळला.
रविवार आणि दुपारची वेळ असल्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर वाहनांची व माणसांची वर्दळ कमी असल्या मुळे मोठी जिवीत हानी होता होता टळली .
सदरील कोसळलेल्या वृक्ष्या विषयी स्थानिक नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयात वेळो वेळी तक्रार देऊन सुद्धा संबंधित अधिकारी ,कर्मचारी यांच्या दुर्लक्षपण मुळे हा प्रकार घडला असे नागरिकांकडून वर्तवले जाते.
नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले कि शेजारीच पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे ,त्या मध्ये हजारो लहान मुलं- मुली शिकत आहेत व हा रास्ता रहदारीचा असल्यामुळे नागरिकांची व वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते हा प्रकार इतर दिवशी झाला असता तर, शाळकरी मुले व नागरिकांच्या जीवावर बेतले असते.
या सर्व दुर्घटनेला वृक्ष प्राधिकरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत अशा कडव्या प्रतिक्रिया नागरिकांनी वर्तवल्या.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड उदयोगनगरीतील सह्याद्रीचे मावळे अनिल दत्तात्रय वाघ (वय 33 वर्षे), क्षितीज अनिल भावसार (वय 27 वर्षे) आणि रवि मारुती जांभूळकर (वय 30 वर्षे) हे युवक सोमवार दि. 19 फेब्रुवारीला साजरी होणारी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती प्रथमच दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील सर्वात उंच माऊंट किलीमांजरो (समुद्र सपाटीपासून उंची 5895 मीटर) या पर्वतावर साजरी करणार आहेत. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशिल सुधीर दुधाणे, सुर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहिम होणार आहे. शिखर चढणे व उतरणे अशी एकूण सहा दिवसांची ही मोहिम आहे. यासाठी सोमवारी (दि. 12 फ्रेबुवारी) हे युवक मुंबईतून दक्षिण आफ्रिकेला प्रयान करणार आहेत. दक्षिण आफ्रिका, टांझानिया येथील सर्वात उंच किलीमांजरो या पर्वतावर शंकू, कोंबो, मवेन्झी आणि शिरा हे निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. हा पर्वत सर करण्याचे धाडस खुप कमी गिर्यारोहकांनी दाखवले आहे. सह्याद्रीचे हे मावळे शिवजयंतीच्या दिवशी तेथे छत्रपती शिवरायांच्या दोन फुटी पुतळ्याचा अभिषेक करुन छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत. हा एक जागतिक विक्रम होणार आहे. या ऐतिहासिक क्षणांचे ड्रोन कॅमेराव्दारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मोहिम यशस्वी झाल्यानंतर हे चित्रीकरण सर्वांसाठी यु ट्युबवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. गिर्यारोहणासारख्या साहसी क्रिडा प्रकारात युवकांनी यावे यासाठी देश परदेशात अशा मोहिमांचे आयोजन आम्ही करतो. यासाठी सामाजिक संस्था, उद्योजक, कंपन्या व दानशूर व्यक्तींनी मदत करावी. असे आवाहन सुशिल दुधाणे यांनी केले.
व्हीएस न्यूज - पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी (दि.११) लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन, पीसीसीएफने केले आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी सकाळी साडेदहा वाजता लाक्षणिक उपोषणाला सुरुवात होणार आहे. हे उपोषण सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे. यामध्ये ग्राहक पंचायत पिंपरी चिंचवड, सस्कार प्रतिष्ठान पुणे, आस्था सोशल फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, भावसार व्हिजन, ‘इ’ पिंपरी चिंचवड, प्रदीप वाल्हेकर आणि टीम, स्वातंत्र्य वीर सावरकर मंडळ, पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ आकुर्डी, फेडरेशन ऑफ घरकुल आणि जलदिंडी प्रतिष्ठान या संघटना लाक्षणिक उपोषणात सहभागी होणार आहेत.
पिंपरी चिचंवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असूनही या कामाच्या मंजुरीसाठी अडथळे निर्माण केले जात आहेत.
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासाठी तत्वतः मंजुरी दिली असली तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘पीसीसीएफ’च्या मिस्ड कॉल मोहिमेस शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या लाक्षणिक उपोषणात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन,आयोजकांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - केंद्र सरकारने सेवा व वस्तू कर (जीएसटी) लागु करून एक धाडसी निर्णय घेतला आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत १८ लाख करोड जमा झालेत. करदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जीएसटीच्या कर माध्यमातून जगात आपल्या देशाची प्रतिमा उंचावणार आहे. असा सुर तज्ञ मान्यावरांनी काढला. चऱ्होली येथील डॉ.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “वस्तू व सेवा करातून भारताची प्रतिमा उंचावणे व त्या संबंधातील संधी व आव्हाने” या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन चर्होली येथील डॉ.अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठात इसरोचे माजी समूह संचालक डॉ.ए.के. संगल यांच्या हस्ते झाले. यावेळी आयकर विभागाचे सह आयुक्त हेमंत तांतीया,द.कोरियामधील जनयाँग विद्यापीठातील ब्रेन पुल शास्त्रज्ञ डॉ.डी.पी. अमळनेरकर, आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि संशोधन संस्तेचे अधिष्ठाता डॉ. सुप्तेन सर्बाधिकारी, डॉ. आनंदराय, शार्प इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक टोमियो इसोगायी, महाराजा समूहाचे संचालक डॉ. सतीश शर्मा, डॉ.अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते.
डॉ. संगल म्हणाले कि, सध्या पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आल्यास महागाई नियंत्रणात येईल. ग्रामीण भागातील नागरीकांच्या मनात जीएसटी बाबतीत भीती आहे. याबाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे. तर हि प्रणाली साधी सोपी होण्यासाठी विद्यार्थ्यानी मोबाईल ॲप्सची निर्मिती केली पाहिजे.
सह आयुक्त तांतीया म्हणाले कि, सरकारच्या तिजोरीत तब्बल १८ लाख करोड जीएसटीतून जमा झाले. यातून हजारो विकासकामे होणार आहे. जीएसटीमुळे परकीय गुंतवणुक करण्यासाठी इच्छुक आहेत. पूर्वी ३ करोड करदाते होते. सध्या एक करोड करदाते वाढले.
डॉ. खेडकर म्हणाले कि, स्वातंत्र्य काळानंतर जीएसटीमुळे ऐतिहासिक आर्थिक परिवर्तन झाले. जीएसटीमुळे नोकरीची संधी वाढली. आर्थिक सुधारणा झाली. भविष्यात नक्कीच विकास दर वाढलेला दिसेल. इसोगायी म्हणाले कि, भारत जपान ने हातात हात घालून कार्य करू. जपानी टिमवर्क आणि भारतीय जुगाड टेक्नॉलॉजी यांच्या समन्वयातून वेगळी कलाकृतीची निर्मिती करू. मराठवाडा कॉलेजचे डॉ.श्रीराम नेर्लिकर, एलएम थापर मॅनेजमेंट स्कूलचे डॉ. रूद्रा रामेश्वर, हरियाणाचे डॉ.अमरिक सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयंका शर्मा व सार्थक शुक्ला तर आभार प्रा. इंदू मजुमदार यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर ही औद्योगीक नगरी म्हणून ओळखली जाते, औद्योगीक नगरी बरोबरच हि क्रीडा नगरी म्हणून ओळखली जावी यासाठी महापालिकेच्या वतीने क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या लाल बहाद्दूर शास्त्री क्रिडांगणाचे तसेच अभिनव गगन स्पोर्टस क्लब यांच्या सहकार्याने माजी महापौर रंगनाथ सदाशिव फुगे महापौर चषक राज्यस्तर खो-खो स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलत होते.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी महापौर रंगनाथ फुगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, कला,क्रिडा साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहरसुधारणा समिती सभापती सागर गवळी, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, रोहित काटे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, स्वाती काटे, सारीका बो-हाडे, स्विकृत सदस्य माऊली थोरात, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, पुणे जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव सचिन गोडबोले, अर्जुण पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा प्रशासन अधिकारी राजेश जगताप,महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, भविष्यात या शहरातून चांगल्या खेळाडूंची निर्मिती व्हावी म्हणून महानगरपालिका प्रयत्नशिल आहे. विविध क्रिडा स्पर्धातील राज्यस्तरीय बक्षिसांचे मानकरी पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू ठरतील त्यासाठी खेळाडूंनी प्रयत्न करावेत. यावेळी महापौर नितीन काळजे म्हणाले, कासारवाडी येथील लाल बाहाद्दूर शास्त्री क्रिडांगणाचा शहरातील खेळाडूंना चांगला उपयोग होणार आहे. या क्रिडांगणामध्ये खेळल्या जाणा-या विविध खेळाद्वारे शहरातून चांगले खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे. विविध खेळांमध्ये जिल्हा राज्य, केंद्रासह देश विदेशातही नावलौकिक करणारे खेळाडू घडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. या स्पर्धेमध्ये ८ पुरुष गट व ८ महिला संघांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये २२४ खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी माजी महापौर रंगनाथ फुगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे यांनी केले तर सुत्रसंचालन जयश्री साळवी यांनी केले, आभार संजय शेंडगे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - येथील आर्मी ग्राउंडवर परेड सुरु असताना एका जवानाला अचानक चक्कर आल्याने त्याला आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. जवानाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चक्कर आल्याची घटना शुक्रवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास देहूरोड येथे घडली. चंद्रकांत चोरवाजी दाभाडगे (वय39) असे मृत जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रोजी सकाळी आठच्या दरम्यान देहूरोड येथील 787 ब्रिगेड ग्राउंडवर ए डी ब्रिगेड परेड सुरु होती. परेड अंतिम टप्प्यात असताना चंद्रकांत दाभाडगे या जवानाला अचानक चक्कर आली. मैदानात उभी असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये जवानाला उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात हालविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दाभाडगे यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत. ...Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002