Breaking News

कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी | संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल | पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल! | 'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन |
V. S. News
थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान

व्हीएस न्युज - थेरगाव परिसरात राहणारे राहुल सरवदे ह गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी केसदान हा उपक्रम राबवित आहेत. राहुल सरवदे हे थेरगाव येथील पदमजी पेपर प्रॉडक्ट्स या कंपनीत कार्यरत आहेत. तसेच ते परिवर्तन सोशल फाऊंडेशन आणि थेरगाव सोशल फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रीय असतात. त्यांनी पहिल्यांदा २७ जुलै २०१९ रोजी केसदान केले. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२२ आणि आता पुन्हा एकदा केसदान केले आहे.

मुंबई येथील टाटा हॉस्पिटल संलग्न मदत ट्रस्ट या संस्थेकडून दान मिळालेल्या केसांचे विग बनवले जातात. हे विग कर्करोगामुळे केस गेलेल्या रुग्णांना दिले जातात. कर्करोगाशी उपचार पद्धती असलेल्या केमोथेरपीमध्ये रुग्णाच्या डोक्यावरील सर्व केस गळून जातात. त्यामुळे अनेक रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यांना मानसिक बळ मिळण्यासाठी मदत ट्रस्टने केलेले विग त्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दिले जातात.

केसदान या उपक्रमाबाबत व्यक्त होताना राहुल सरवदे म्हणतात, “केसदान आणि इतर सामाजिक कार्य करत असताना मला माझे कुटुंबीय व सहकारी मित्र परिवार यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. आजवर मी ४५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले असून तीन वेळा केसदान केले आहे.तसेच यापूढे देखील आपल्या समाजसाठी काहीतरी चांगले करण्यासाठी मी नेहमीच अविरतपणे प्रयत्नशिल राहील.”

...Read More

V. S. News
प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

व्हीएस न्युज - वाकड येथील एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेत प्रजासत्ताक दिना निम्मित भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टपणे सदर केले.विद्यार्थ्यांनी भाषणे करून क्रांतिकारकांना आदरांजली व्यक्त केली.

यावेळी ॲड. दीप्ती देशपांडे यांनी ध्वजारोहण करण्याची आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली म्हणून शाळेचे आभार व्यक्त केले. या वेळी विद्यार्थांना संबोधित करीत त्या म्हणाल्या की "दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो.आपला भारत हा एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राष्ट्र आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली." पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना आणि त्यातील नागरिकांचे मूलभूत हक्क या वर मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याबद्दल माहिती दिली आणि शिक्षणामुळेच आपण आवश्यक कौशल्ये, ज्ञान, मुल्ये आणि जीवनविषयक दृष्टीकोन आत्मसात करून सक्षम होतो’, असे प्रतिपादन करत शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

शाळेचे संस्थापक श्री अंकुश बोडके आणि मुख्याध्यापिका आरतारे मॅडम यांनी शिक्षणाच्या नव्या दृष्टीनुसार अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला साह्य करणाऱ्या समग्र अनुभवसंहतीचा समावेश केला आहे. त्यामुळे अभ्यासेतर समजल्या जाणाऱ्या क्रीडा, वक्‍तृत्व, नाट्य आदी कार्यक्रमांचा अभ्यासक्रमात समावेश होत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यात निपुण केले आहे.यामुळे ॲड. दीप्ती देशपांडे यांनी शाळेच्या संस्थापक , मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचे कौतुक केले.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि शाळेतील इतर स्टाफ उपस्थित होता.

...Read More

V. S. News
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

व्हीएस न्युज - भारताच्या ७५ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अजित गव्हाणे म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे आम्ही सर्व नागरीक असल्याचे आम्हां सर्वांना सार्थ अभिमान असून संविधानाच्या आधारावर सर्वसामान्य नागगरीकांचे मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मा.उपमहापौर मोहंम्म्द पानसरे, माजी नगरसेविका वैशालीताई काळभोर, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सेवादल अध्यक्ष महेश झपके, प्रदेश सरचिटणीस ॲड.गोरक्ष लोखंडे, ओबीसी निरिक्षक ॲड.सचिन औटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर, मुख्य सरचिटीणीस विनायक रणसुभे, खजिनदार दिपक साकोरे, सहकार सेल अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, ज्ञानेश्वर कांबळे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंध, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कविता खराडे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, शोभा पगारिया, अर्बन सेल अध्यक्ष मनिषा गटकळ, बचत गट महासंघ अध्यक्षा ज्योती गोफणे, साफसफाई कामगार अध्यक्षा सुर्वणा निकम, महिला संघटीका पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, आशा शिंदे, युवराज पवार, बाळासाहेब पिल्लेवार, तुकाराम बजबळकर, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, सचिन वाल्हेकर, अंकुश दिघे, दिलीपराव तापकिर, संपत पांचुदकर, काळूराम खेडकर, अभिजीत आल्हाट, नवनाथ डफळ, बाबासाहेब चौधरी, माऊली मोरे, प्रविण गव्हाणे, सतीश चोरमले, विजय दळवी, राजन नायर, दत्तात्रय बनसोडे, वर्षा शेडगे, वंदना कांबळे, देवी थोरात, रामप्रभू नखाते, महेश माने, अर्चणा लोहार, मिरा कांबळे, रजनी गोसावी, सचिन मोकाशी, राजू चांदणे, योगेश सागरे, निखिल सिंग, इम्रान शेख, सुनिल अडागळे, धनाजी तांबे इत्यादीसह पदाधिकारींसह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते.

या कार्यक्रमाचे संयोजन सेवादल अध्यक्ष महेश झपके यांनी केले.

...Read More

V. S. News
कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात

व्हीएस न्युज - कात्रज-कोंढवा रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात होत असल्याने आणि निधी अभावी भूसंपादनाची प्रक्रिया तसेच अन्य कामे रखडल्याने महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या निधीतून रस्त्याच्या कामासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या निधीतून निधी देण्याचा वर्गीकरणाचा प्रस्तावाला स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे.

रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाकडून २०० कोटी रुपये देण्याची घोषणा झाली असली तरी हा निधी महापालिकेला अद्याप मिळालेला नाही. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी सध्या भूसंपादनासाठी ७०० कोटींची आवश्यकता आहे. निधी अभावी रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणाला मंजुरी देताना रस्त्याची रुंदी ८४ मीटर एवढी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, रस्त्याची रुंदी ५० मीटर एवढी करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यासाठी भूसंपादनही कमी करावे लागणार असून, त्यासाठी २७७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी दोनशे कोटींचा निधी राज्य शासनाने महापालिकेला द्यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठिवण्यात आला होता.

उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा निधी दिला जाईल, अशी घोषणाही केली होती. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात हा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र तो अद्यापही महापालिकेला प्राप्त झालेला नाही. या रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी ऑक्टोबर अखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते.

महापालिकेला प्रकल्पाच्या व्यवस्थापन सल्लागाराचे शुल्कापोटी ११ लाख ९४ हजार ३०४ रुपये, जागेचा मोबदला १५ कोटी ३७ लाख ४५ हजार ९०० रुपये, केबल स्थलांतरित करणे यासाठी १ कोटी १ लख २० हजार १०८ रुपये असे एकूण १६ कोटी ५० लाख ६० हजार ३१२ रुपयांची महापालिकेला तातडीची आवश्यकता आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या निधीतून ही रक्कम घेण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगासाठी १३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ३० कोटींचा निधी या कामांसाठी घेण्यात येणार आहे.

...Read More

V. S. News
किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

व्हिएस न्युज -वाकड येथील अटलांटा सोसायटी जवळ प्रेयसीने प्रियकरावर धारदार कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.१३) दुपारी तीनच्या सुमारास घडली.हॉटेलमधून प्रियकराला जाण्यास सांगितले असताना देखील तो गेला नाही याचा राग मनात धरून प्रेयसीने प्रियकरवेर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.याप्रकरणी महिलेवर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय नारायण जाधव (वय-४५ रा. श्रीधरनगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेवर भादवी कलम ३०७ आणि आर्म ॲक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय जाधव हा रिक्षा चालक आहे तर महिला हॉटेल चालवते. फिर्यादीचे आरोपी महिलेसोबत प्रेमसंबंध असून दोघेही वाकड येथे राहतात. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्य़ादी हॉटेलमध्ये आले. त्यावेळी महिलेने त्याला हॉटेलमधून राहते घरी जाण्यास सांगितले.मात्र, संजय जाधव हे गेले नाहीत. यावरून दोघांमध्ये वाद झाले.संतापलेल्या महिलेने धारदार कोयत्याने संजय जाधव यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात,हातावर, छातीवर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले.पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

...Read More

V. S. News
भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

व्हीएस न्युज -भोसरी येथील क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून ११ लाख ६८ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली होती.

मोबाईल शॉपीच्या टेरेसवरील स्लॅबच्या बाजूला बसवलेले बार कट करुन दुकानातील १५ लाख १८ हजार ९६२ रुपये किंमतीचे ॲपल व सॅमसंग तसेच इतर कंपनीचे २७ महागडे मोबाईल फोन आरोपींनी चोरुन नेले होते. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात कलीम हुसेन अन्सारी (वय-३३ रा. शास्त्रीनगर, बांद्रा बस डेपो, मुंबई), फिरोज नईम खान (वय-३३ रा. आळंदी रोड, चाकण) यांना अटक करून त्यांचा विरोधात भादवी कलम ४५४, ४५७,३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस शिपाई सुमित देवकर यांना आरोपीची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी कुर्ला मुंबई परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने दोन दिवस कुर्ला, मुंबई, अंबरनाथ व ठाणे या परिसरात आरोपींचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत फिरोज खान याने कालीम अन्सारी याच्या सांगण्यावरून मोबाईल शॉपीमध्ये चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरलेले फोन विक्रीसाठी स्वत:कडे ठेवल्याचे सांगितले. आरोपी कामील अन्सारी याचे कुर्ला मुंबई परिसरात मोबाईल विक्री व रिपेअरींगचे दुकान आहे. आरोपींकडून चोरलेल्या एकूण मोबाईल फोन पैकी ११ लाख ६८ हजार २७० रुपयांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सह पोलीस आयुक्त संजय शिंदे ,अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील ,सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी,पोलीस अंमलदार महेश खांडे, नितीन लोखंडे, सुमित देवकर, गणेश हिंगे, प्रविण कांबळे, आशिष बनकर, गणेश कोकणे,गणेश सावंत, विनोद वीर, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, माळी व हुलगे यांच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक

व्हीएस न्युज -महाराष्ट्र बॅाक्सिंग असोसिएशन आणि ॲमॅच्युअर बॅाक्सिंग असोसिएशन (नागपुर जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या '९ व्या सब ज्युनिअर बॅाईज महाराष्ट्र स्टेट बॅाक्सिंग चॅम्पियनशिप २०२३-२४' मध्ये खराळवाडी स्पोर्ट्स क्लबच्या निश्चय सुभाष जिनवाल ने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. निश्चय हा पिंपरी येथील खराळवाडी परिसरातील रहिवासी आहे.

पिंपरी चिंचवड संघाचे प्रतिनिधित्व करत निश्चय जिनवाल (वय -१४) याने सब ज्युनिअर ६४ ते ६७ वजनी गटात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकाविले आहे.याने जिद्द, चिकाटी,एकाग्रता आणि मेहनतीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले आहे. त्याचे वडील सुभाष जिनवाल हेच त्याचे प्रशिक्षक आहेत. तो खराळवाडी येथील पोतदार इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्हा अ‍ॅमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशन ऑफ नागपूर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन रवी नगरातील विद्यापीठ मैदानाजवळील सुभेदार सभागृहात २२ ते २६ जुलै दरम्यान करण्यात आले होते. नागपूर ,गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, ठाणे, मुंबई, पुणे अशा एकूनच ३३ मुलांचा व ३३ मुलींचा जिल्हा व शहर संघ सहभाग घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून ४५६ खेळाडू सहभागी झाले होते.

त्याने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कडवी झुंज देत अंतिम फेरी गाठून सुवर्ण पदक पटकाविले. निश्चयने पिंपरी चिंचवड शहराचे नाव लौकीक केले आहे.यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

...Read More

V. S. News
माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी

व्हिएस न्युज - माथाडीच्या नावाखाली व्यावसायिक आणि कामगारांमध्ये दहशत माजवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. रमाकांत राजेंद्र जोगदंड (वय 30, रा. वाकड, पुणे), समीर नझीर शेख (33, रा. काळेवाडी, पुणे), मयुर बाळासाहेब सरोदे (23, रा. पुनावळे, पुणे) व करण सदाफळ चव्हाण (24, रा. पुनावळे, पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील माऊली चौकात 5 जुलै रोजी तक्रारदार अनिकेत रवींद्र वाडीया (वय 24, रा. शिवाजीनगर, पुणे) यांच्या रेजीम व्हिस्टा फॅसिलीटीस सर्व्हिसेस प्रा.लि.चे असिस्टंट मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह सुर्यकांत वाघमारे व रोहन कांबळे हे प्रमोशनल ऍक्टीव्हीटी करत होते. त्यावेळी त्याठिकाणी पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून आरोपी जोगदंड व त्याच्यासोबत आणखी दोन ते तीनजण आले. त्यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांना मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या परवानगी शिवाय येथे कामगार कसे ठेवले? काम कसे काय करत आहात? अशी विचारणा करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी आरोपींनी तक्रारदार यांच्या हातातील टायटनचे घडयाळ व सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेली. यावेळी झालेल्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला, पोटाला, कंबरेला आणि पायाला मार लागला. त्यामुळे त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकातील सह.पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि पोलिस उप निरीक्षक सचिन चव्हाण यांना सदर गुन्ह्यातील आरोपी बबलू जोगदंड आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सदर आरोपींचा शोध घेत असताना सह.पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांना त्यांच्या विश्वासू बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बबलू जोगदंड त्याच्या इतर साथीदारांसोबत वाशी, नवी मुंबई येथे लपून बसला आहे. सपोनी.संतोष पाटील यांनी स्टाफच्या मदतीने सापळा रचून वाशी, नवी मुंबई येथून बबलू जोगदंड आणि समीर शेख यांना अटक केली. त्यानुसार जोगदंड याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आणि इतर साथीदारांची माहिती दिली वर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले . रमाकांत जोगदंड (30) हा सराईत गुन्हेगार अजून तो माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे.

...Read More

V. S. News
पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी.

व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विविध विभागात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार काम करीत आहे. संबंधित ठेकेदार त्यांना पगार स्लिप देत नसल्याने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे व इतर कामे करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे पालिकेच्या सर्व कंत्राटी कामगारांना पगार स्लिपा देण्याचे आदेश पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी द्यावेत, अशी मागणी भाजपा कामगार सेलचे सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी केली आहे.

याबाबत लांडगे यांनी आयुक्त सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधून दर महिन्याला 30 ते 35 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे महापालिकेत विविध विभागात ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, संबंधित ठेकेदार त्यांना पगार स्लिप देत नसल्याने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे व इतर कामे करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे सर्व कंत्राटी कामगारांना पगार स्लिपा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सरचिटणीस लांडगे यांनी केली आहे.

"पगार स्लीप न देणे म्हणजे कामगाराला त्याच्या हक्क पासून वंचित ठेवणे . प्रत्येक सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी पगार स्लिप आणि नियुक्ती पत्र महत्वाची असते. पगार स्लिपला महत्वाचे कागदपत्र देखील मानले जाते. जर तुम्ही इन्कमटॅक्स फाइल करीत आहात, किंवा बॅंकेतून कर्ज घेऊ इच्छिता त्यावेळी ही स्लिप महत्वाची असते. तसेच एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्विकारण्याआधीसुद्धा आधीच्या नोकरीची सॅलरी स्लिप महत्वाची ठरते. कंत्राटी कामगारांना पगार स्लीप नसल्याने अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे अशक्य झाल्याने ते सावकारी कर्जाकडे वळत आहेत. पगार स्लीप उपलब्ध झाल्यास अडचणीच्या वेळेस कंत्राटी कामगारांना बँकेतून सहज कर्ज घेता येईल आणि देशाचे नुकसान सुद्धा होणार नाही" असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना लांडगे म्हणाले.

...Read More

V. S. News
चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत

व्हिएस न्युज - राजकारण, समाजकारण, स्त्री-पुरुष संबंध, उद्योग-व्यवसाय अशा विविध विषयांचे वैश्विक परिमाण सिनेमात आवश्यक आहे. तरच, भारतीय सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळेल, असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगवीत बोलताना व्यक्त केले. चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सांगवीतील निळूभाऊ फुले रंगमंदिरात दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ सिनेमा अभ्यासक समर नखाते व लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा मुलाखतकार श्रीकांत चौगुले यांनी विविध विषयावर त्यांना बोलते केले.

यावेळी भाजप नेते शंकर जगताप, लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालींदी निस्ताणे आदी उपस्थित होते.

जवळपास दीड तास चाललेल्या या मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीच्या आजपर्यंतच्या प्रवासातील विविध टप्प्यांवर डॉ. पटेल आणि नखाते यांनी भाष्य केले. डॉ. पटेल म्हणाले की, सिंहासन, सामना अशा चित्रपटातील विषय आणि त्यातील सिद्धांत आजही काही प्रमाणात दिसतात. मात्र जागतिक पातळीवर सिनेमा पोहोचवण्यासाठी आता केवळ भारतीय राजकारणाकडे पाहून चालणार नाही. विश्वातील लोकशाहीचे धागे आणि त्याची मुळे आपल्या लोकशाहीत शोधून वैश्विक परिमाण देणारा सिनेमा आला पाहिजे. राजकारणाबरोबरच स्त्री पुरुष नातेसंबंध, समाजकारण, उद्योग व्यवसाय आदी विविध विषयांबाबतही वैश्विक परिमाण शोधणे आवश्यक आहे, तोपर्यंत भारतीय सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळणार नाही. चित्रपट हा इतिहासाचा साक्षीदार असतो. तो त्या काळातला ऐतिहासिक दस्ताऐवजही ठरतो. त्यामुळे बदलते जग आणि वास्तवाचे भान हे चित्रपटात उतरले पाहिजे. चित्रपटाच्या या चौकटीत संपूर्ण जग असते.

डॉ. पटेल म्हणाले की, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे समर नखाते यांना गुरू मानतात. गुरू वाट दाखवतो, परंतू, पुढची वाटचाल शिष्यालाच पार पाडावी लागते. समर नखाते माझे पहिले गुरू आहेत. सामना चित्रपट करताना मी अगदीच नवखा होतो, सिनेमाचे तंत्र त्यांनी मला सांगितले. निळूभाऊ फुले हे माझे परममित्र होते. त्यांच्यासारखा नम्र माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. त्यांच्या नावाने असलेल्या नाट्यगृहात येऊन आनंद वाटला. आमच्या निळूभाऊंचे नाव या रंगमंदिराला दिल्याबद्दल मी पिंपरी-चिंचवडकरांचे आभार मानतो.

समर नखाते म्हणाले, चित्रपटासाठीचे तंत्रज्ञान आता सर्वत्र आहे. पण केवळ तंत्रज्ञानाने भागत नाही, तर सिनेमाची एक वेगळी भाषा असते. सिनेमा केवळ चित्र दाखवत नाही, तर माणूसपणाची कक्षा विकसित करतो. भारतात प्रादेशिक चित्रपट समृद्ध आहेत, त्यातून भारतीय संवेदना, अविष्कार जगभरात पोहोचायला हवा. तंत्र आणि मांडणीपेक्षाही अभिव्यक्ती पडद्यावर काय येते हे महत्त्वाचे आहे.

भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, मनोरंजनाचे पूर्णपणे पॅकेज असलेला टीडीएम हा मराठी सिनेमा घेऊन येतो आहे. ग्रामीण भाषा, जीवन असे विषय असलेल्या अनेक चित्रपटातून लोकांच्या वेगळ्या संवेदना व त्यांचे जगणे लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यासाठी प्रेक्षकांची साथ हवी आहे. प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यास नवनवे मार्ग सापडत जातात व प्रश्न सुटत जातात. चित्रपट ही एक कलाकृती असून त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. चित्रपटातून काय ताकदीने आशय मांडला जातो, त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन

व्हिएस न्युज - प्रसिद्ध लेखक अजित कुमार झा यांनी लिहिलेल्या 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया: इयर २०१४ ते २०२२' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये नुकतेच करण्यात आले. ईशान्य क्षेत्र विकास आणि संस्कृती, पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, खासदार भुवनेश्वर कलिता, पद्मश्री आलोक मेहता, ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार बिपलव कुमार देब, प्रसिद्ध पत्रकार राजू वाघमारे, सचिन ईटकर, विविध सरकारी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ति उपस्थित होते.

ईशान्य प्रदेशाच्या विकासाचा इतिहास नोंदवण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. केंद्र सरकारने ईशान्य भारताच्या उन्नतीसाठी दृढनिश्चय आणि संकल्प केला आहे. गेल्या सात वर्षांत (२०१४-२०२२) ईशान्य भारतात विकासासाठी ऐतिहासिक कार्य केले आहे. ज्याचे सिंहावलोकन या पुस्तकात केले आहे. अजित कुमार झा हे एक अनुभवी सरकारी अधिकारी आहेत, आणि त्यांचे हिंदीतील पुस्तक, 'सशक्त पूर्वोत्तर, दक्षिण पूर्व एशिया का द्वार' खूप गाजले होते. पुस्तक प्रकाशनानंतर 'ईशान्य क्षेत्राचा आणखी विकास कसा करायचा आणि या क्षेत्राच्या यशाला भारताच्या वेगवान विकास गतीशी कसे जोडता येईल' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड विश्वविद्यालय तर्फे ईशान्य भारतातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

...Read More

V. S. News
चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन

व्हिएस न्युज - आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय चित्रपटांतून मांडले पाहिजे. या माध्यमातून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे. तर आणि तरच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. चित्रपट ग्रामीण आहे की शहरी हा मुद्दा तेव्हा बाजूला राहतो, असे मत प्रसिध्द लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगवीत बोलताना व्यक्त केले.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ सिनेमा अभ्यासक समर नखाते यांच्या हस्ते कऱ्हाडे यांना दिशा कार्यगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास भाजप नेते शंकर जगताप, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालींदी निस्ताणे, गायक वैभव शिरोळे आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना भाऊराव कऱ्हाडे म्हणाले की, ग्रामीण भाषा, जीवन असे विषय असलेल्या अनेक चित्रपटातून लोकांच्या वेगळ्या संवेदना व त्यांचे जगणे लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. कोणताही चित्रपट करताना अडचणी येतातच. मलाही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, मी त्याला सामोरा गेलो. शेतकरी हा सर्वात सहनशील घटक आहे. तो नेहमी आशेवर जगतो. कधीही उमेद सोडत नाही. मीही शेतकरी असल्याने त्याच वाटेने जातो. प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यास अडचणी नक्कीच दूर होतात. नवनवे मार्ग सापडत जातात. प्रश्न सुटत जातात. चांगली माणसं भेटत जातात. प्रामाणिकपणा आणि माणुसकीची कास सोडायची नाही, हे मात्र मनाशी ठाम असायला हवे. चित्रपट ही एक कलाकृती असून त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. आशय आणि विषय पक्का असेल तर भाषेचा अडसर येत नाही. चित्रपटातून काय ताकदीने आशय मांडला जातो, त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते, असे भाऊराव यांनी सांगितले.

आजपर्यंतच्या वाटचालीत रसिक प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिले. दिशा फाऊंडेशनकडून झालेला माझा सन्मान म्हणजे आपल्या माणसांकडून मिळालेले प्रोत्साहन आहे. कौतुक माणसाच्या अंगात दहा हत्तीच बळ देत असते, अशा भावना भाऊराव यांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रास्ताविक जगन्नाथ शिवले यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. राजेश सावंत यांनी आभार मानले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!