व्हीएस न्यूज – महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी पवनाथडी जत्रा भरविण्याली जाते. स्वहस्ते निर्माण केलेल्या घरगुती वस्तू विक्री करण्यासाठी ही हक्काची बाजारपेठ मानली जाते. या जत्रेत सहभागी होण्यासाठी 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, जत्रा आयोजनात दरवर्षीप्रमाणे राजकीय हस्तक्षेप झाल्यास व्यवसायाला चालणा देणाऱ्या पवनाथडीला गालबोट लागण्याची भिती निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण समितीअंतर्गत पवनाथडी आयोजित केली जाते. पवनाथडीच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटांच्या माध्यमातून जिज्ञासू महिलांनी घरात तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ही महत्वाची बाजारपेठ मानली जाते. पवनाथडीत जवळपास 800 स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातात. हे स्टॉल्स मिळवण्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील महिला बचत गटांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान बचत गटांनी स्टॉल्ससाठी अर्ज करायचे आहेत. त्यासाठी महिला बचत गटांच्या स्थापनेपासून बॅंकेतील व्यवहार, ठेवींवरील व्याजाची प्रतिपूर्ती, कर्ज हप्त्यांची परतफेड व सातत्य असलेल्या महिला बचत गटांनाच विचारात घेतले जाणार आहे. नवीन महिला बचत गटांना पवनाथडी जत्रेत सहभागी होण्यासाठी किमान दीड वर्षाचा कालावधी पूर्ण होणे नियमाधीन आहे. दीड वर्षाला एक महिना कालावधी अपुरा असल्यास अशा बचत गटांना जत्रेत सहभागी होता येणार नाही, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. विहित मुदतीत आलेल्या अर्जाचा यासाठी विचार केला जाणार आहे, असेही नागरवस्ती विकास योजना विभागाने सूचीत केले आहे.
प्रशासन म्हणते सांगवीत घ्या…
दरवर्षी पवनाथडीच्या आयोजनावरून पालिकेत राजकीय रणसंग्राम पहायला मिळतो. यावर्षी पवनाथडी आयोजनाचे ठिकाण अध्याप निश्चित झालेले नाही. बहुधा सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर पवनाथडी 4 ते 8 जानेवारी 2018मध्ये आयोजनाचे प्रशासकीय नियोजन आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेपाने बदल होऊ शकतो. यापूर्वी पवनाथडी आयोजनात सांगवीला प्राधान्य दिले आहे. त्यानंतर पिंपरीलाही दोनवेळा मान देण्यात आला. मागच्या वर्षी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या बाजुला मोकळ्या मैदानात जत्रा भरवून भोसरीलाही मान दिला आहे. मात्र, यावर्षी पवनाथडी कुठे आयोजित केली जाते? याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यामध्ये दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ पासून सुरू होणार असून,बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारी २०१८ पासून सुरुवात होणार आहे.
नोव्हेंबर महिना संपत आला तरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेर बुधवारी मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
बारावीची नियमित, द्विलक्ष्यी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत होणार आहे.
त्यापूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. सोशल मीडियावरील वेळापत्रकाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाच्या “डीपीआर’ला (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने बुधवारी (दि. 29) मंजुरी दिली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये एकूण 3 हजार664 घरे बांधण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून शहराच्या वेगवेगळ्या भागात दहा ठिकाणी एकूण 9 हजार 458 घरे बांधण्यात येणार आहेत.
महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातील 10 ठिकाणी एकूण 9 हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार चऱ्होली येथे 1 हजार 442 (खर्च 150 कोटी 32 लाख), रावेतमध्ये 934 (खर्च 91 कोटी 6 लाख), डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये 1 हजार 288 (खर्च 135 कोटी 90 लाख), वडमुखवाडीत 1 हजार 400, चिखलीमध्ये 1 हजार 400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. महापालिकेने या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून आधी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे एकूण 3 हजार 664 घरे बांधण्याच्या डीपीआरला 10 नोव्हेंबर रोजी मंजुरी दिली. त्यानंतर हा डीपीआर केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने अवघ्या 19 दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या तीन प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिली आहे. त्याबाबत केंद्राच्या संबंधित तांत्रिक समितीने बुधवारी (दि. 29) महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे चऱ्होली, रावेत आणि बोऱ्हाडेवाडी येथे सर्वसामान्यांना परवडतील अशी एकूण 3 हजार 664 घरे उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तीनही ठिकाणच्या प्रकल्पांना एकूण 377 कोटी 28 लाखांचा खर्च केला जाणार आहे.
झोपडपट्ट्यांचे स्वतंत्र सर्व्हेक्षण…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला 2022 पर्यंत घर देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत घर नसणाऱ्यांना घर दिले जाणार आहे. भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकल्यानंतर सर्वात आधी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आणि कार्यवाही सुरू केली. या योजनेसाठी नागरिकांकडून अर्जही मागविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून किती जणांना घरे हवी आहेत, हे निश्चित केले जाणार आहे, असे स्पष्टीकरण महापालिकेतील सत्ताधारी भाजपने दिले आहे.
व्हीएस न्यूज – महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर त्याजागी शिक्षण समिती स्थापन होण्याचा निर्णय रेंगाळला असताना, महापालिका अधिनियमानुसार पालिकेत आणखी तीन नवीन समित्यांची नेमणूक प्रस्तावित आहे. माध्यमिक, पूर्व प्राथमिक शाळा आणि तांत्रिक समितीबरोबरच स्थापत्य समिती (सार्वजनिक बांधकाम समिती), वैद्यकीय आणि आरोग्य समिती आणि गलिच्छ वस्ती सुधार, गृहनिर्माण आणि समाजकल्याण समितीची स्थापना करण्याचा निर्णय महासभेसमोर आहे. पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची आवश्यकता विचारात घेऊन समिती स्थापनेचा निर्णय होणार आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम 30 (1) अन्वये महानगरपालिकेला समिती नेमण्याचे अधिकार आहेत. याची अंमलबजावणी करून शिक्षण समिती नेमण्यासाठी पूर्वीचे शिक्षण मंडळ 2 जून रोजी शासनाच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आले. परंतु, याला सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पालिका प्रशासनाने शिक्षण समिती स्थापण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. आता शिक्षण समिती (माध्यमिक, पुर्व प्राथमिक शाळा आणि तांत्रिक समिती)बरोबरच स्थापत्य समिती (सार्वजनिक बांधकाम समिती), वैद्यकीय सहाय्य आणि आरोग्य समिती तसेच गलिच्छ वस्ती सुधार, गृहनिर्माण आणि समाजकल्याण या समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे. इतर समित्या सोडल्या तर शिक्षण समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी दिरंगाई करत आहेत. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या कामकाजावर याचा परिणाम पडू लागला आहे,अशा तक्रारी आहेत.
स्थापत्य समिती (सार्वजनिक बांधकाम समिती) स्थापन केल्यास शहरातील विकास कामांचे निर्णय समितीचे सभापती आणि नियुक्त सदस्यांच्या अधिपत्याखाली बैठकीत होतील. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राहील. विषय मंजुरीचे सर्वाधिकार समितीच्या सभापती यांनाच असणार आहेत. वैद्यकीय सहाय्य आणि आरोग्य समितीअंतर्गत शहरातील रुग्णालये व नागरिकांच्या आरोग्यासंबंधित महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार निर्गमित होतील. त्याचबरोबर औषध, मशिन, रुग्णालयातील वस्तुंच्या खरेदीचे निर्णय समितीच्या बैठकीत प्रशासकीय शिफारशीनंतर घेतले जातील. तसेच, गलिच्छ वस्ती सुधार, गृहनिर्माण आणि समाजकल्याण समितीच्या माध्यमातून नागरिकांच्या घराचे निर्णय होतील. सामाजिक हित जोपासून झोपडपट्टीचा विकास साधण्यासाठी ही समिती महत्वाचे निर्णय घेईल. परंतु, शिक्षण समिती नेमण्याचे कोणतेच संकेत मिळत नसल्यामुळे यासह अन्य पर्यायी समित्या नेमण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे. मंगळवारच्या (दि. 28) महासभेने देखील हा प्रस्ताव तहकुब केला आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ प्रशासकीय अधिकारी नसल्यामुळे बहुतांश फाईली प्रलंबित राहिल्या आहेत. या विभागाचा प्रभारी कार्यभार प्राथमिक विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांच्याकडे आहे. त्यांच्यावर प्राथमिक विभागाच्या कामकाजाचा ताण असल्याने त्यांना माध्यमिक विभागासाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे माध्यमिक विभागाच्या 18 शाळांचे महत्वपूर्ण निर्णय वेळेवर होत नसल्याने विद्यार्थी हितावर गदा आली आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळेच्या एकत्रीकरणाचा निर्णय किती हिताचा आहे, हे सुद्धा संशयास्पद आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसल्यामुळे एकतर्फी निर्णय झाला आहे. तो निर्णय चुकीचा ठरल्यामुळे एकत्रीत केलेल्या चार प्राथमिक शाळा पुन्हा दोन सत्रात सुरू केल्याचे उदाहरण समोर आहे.
व्हीएस न्यूज - राज्यातील सर्व बॅंकेसह वित्त व्यवहार होत असलेल्या ठिकाणी व्यापारी आस्थापना व दुकाने यांचे व्यवहार भाषा व जाहिरात फलक मराठी मधून असावेत यासाठी प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करीत या मागणीचे निवेदन देऊन आळंदी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आळंदीत कामकाज न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देण्यास पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष मनोज खराबी, खेड तालुका उपाध्यक्ष अविनाश लोखंडे, तृणाल गांडेकर, आळंदी शहर माजी शहराध्यक्ष निलेश बापु घुंडरे, उपाध्यक्ष तुषार नेटके, शहर संघटक प्रसाद बोराटे, चाकण विभाग अध्यक्ष किरण पार्टे, सागर सावंत, संदीपान घायाळ, तुकाराम यमगर, ईश्वर सलगर, विनोद लोखंडे, कुष्णा आवटे, शैलेश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व बॅंका व ए.टी.एम.मधील वित्त व्यवहार हा मराठीत व्हावा तसेच दुकानदारांनी आपापल्या दुकानांचे फलक ठळक स्वरूपात मराठीत लिहावेत यासाठी सुचविले आहे. महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करीत आळंदी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी राजभाषा वापर वाढावा यासाठी शहरातील बॅंकांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले आहे.यापुढील काळात यासाठी प्राधान्य न दिल्यास मनसे या मागणीसाठी तीव्र आंदोलन छडेल असा इशारा देण्यात आला आहे.
बॅंका व ए.टी.एम मधील व्यवहार हा इतर भाषांप्रमाणे मराठीत सुरु व्हावा, मराठीत महाराष्ट्रात व्यवहार व्हावा यासाठी शासनाचे तसेच वित्त व्यवस्थापनाचे सूचना देखील आहेत. मात्र नियमांप्रमाणे कामकाज होत नसल्याने या मागणीचे निवेदन देण्यात आल्याचे मनसे प्रमुख निलेश घुंडरे यांनी सांगितले. पुढील दिवसाची मुदत यासाठी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिवसांच्या आत मराठीचा वापर आळंदीतवाढला नाही तर या मागणीसाठी आळंदी शहर मनसे आपल्या स्टाईल ने आंदोलन करील असा इशारा देण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या व विद्यार्थींच्या मासिक पासमध्ये केलेली भाडेवाढ अन्यायकारक असून ती त्वरीत रद्द करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक जन आंदोलन कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
समितीचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिकांचा मासिक पास हा 450 वरून 700 रूपये, विद्यार्थी पास 600 वरून थेट 750 रूपये तर सामान्य पासच्या दरामध्येही मोठी वाढ केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून त्वरीत रद्द करावी. ज्येष्ठ नागरिकांना,विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी रूपनर, विश्वनाथ खंडाळे यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजता नेहरुनगर येथे घडली. रोहन नंदकुमार घोडके (वय 25, रा. कुलदिप अंगण सोसायटी, डी वींग, नेहरुनगर, पिंपरी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी घरी कोणी नसताना रोहनने चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. त्यानंतर त्याला तातडीने डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहनच्या आत्महत्येचे अद्याप कारण कळाले नाही. रोहनची आई डी वाय पाटील रुग्णालयात नर्स होत्य़ा. त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - भावाला भेटण्यासाठी जाणाऱ्या एका दुचाकीस्वार तरूणाचा अज्ञात मोटारीने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मोशी आळंदी रोडवर घडली.
ओमप्रकाश नारायण सिरवी (चौधरी) (वय-22, रा. पिंपळे-गुरव) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचे नातेवाईक मोहनलाल चौधरी (वय-54) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मोशीत राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी दुचाकीवरून जात होता. मोशी आळंदी रस्त्यावर सस्तेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओमप्रकाशच्या दुचाकीला अज्ञात मोटारीने जोरदार धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी न थांबता मोटार चालक पसार झाला.
फौजदार मुळे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - कचरा वेचत असताना क्रेनने धडक दिल्यामुळे एका वृध्द महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना 22 नोव्हेंबर रोजी एमआयडीसीतील एम स्कवेअर कंपनीत सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली.
रूक्मिणी लक्ष्मण साळवे (वय-90, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) असे मृत्यू झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा रामहरी साळवे (वय-66) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
एमआयडीसीतील एम स्कवेअर कंपनीत साळवे या 22 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता कचरा वेचत होत्या. यावेळी क्रेनने साळवे यांना जोरदार धडक दिली. त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
फौजदार गायकवाड अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - चारित्र्यावर संशय घेवून शारिरीक व मानसिक छळाला कंटाळलेल्या विवाहितेने विषारी औषध पिवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी वाकड येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना ऊर्फ निशा सिध्दार्थ गायकवाड (वय-30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सिध्दार्थ सोमनाथ गायकवाड, सासरे सोमनाथ गायकवाड,दिर शाम सोमनाथ गायकवाड यांच्यासह दोन महिला (सर्व रा. रमाबाई आंबेडकर कॉलनी, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेची आई सुशिला भोसले (वय-55, रा. झाफराबाद, जालना) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना व सिध्दार्थ यांचे दोन वर्षापुर्वी लग्न झाले आहे. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासऱ्यांच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात केली. तिचा शारिरीक व मानसिक छळ करून तिला विषारी औषध पिण्यास भाग पाडले.
फौजदार एम.एल. जाधव अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड प्रभाग क्र. 10 येथील इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या इमारतींची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. येथिल नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्या इमारतींचे जिने तुटलेले असून, पावसाळ्यात टेरेस-भिंतींमधून पाणी झिरपत असते, इमारतींमधील शौचालयांचे पाईप्स तुटल्यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे कचरा जमा करण्यासाठी पालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेल्या घंटागाड्यांपैकी एकही घंटागाडी याठिकाणी आत्तापर्यंत आलेली नाही. त्यामुळे सोसायट्यांच्या सभोवती कचऱ्यांचे ढिग लागले आहेत. परिणामी रोगराई पसरत आहे. येथील शौचालयांचे ड्रेनज वारंवार जाम होउन मैला बाहेर येत असतो, त्यामुळे परिसरात दुर्गधी पसरुन लोकांना त्याचा त्रास होत आहे. म्हणून ड्रेनेज लाईन्स नविन टाकण्यात याव्यात, अशी विविध समस्या इंदिरानगर प्रकल्पात असून तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी बच्छाव यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - वर्ग सुरु असताना बाहेरील पॅसेजमधील साफ सफाईचे काम करताना स्लिपरच्या आवाजामुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना त्रास व्हायचा. साबण, ॲसिड, फिनाईल मिश्रीत पाण्यामुळे सफाई कर्मचारी अनेकदा पाय घसरुन पडले. त्यातून छोट्या मोठ्या दुखापती झाल्या. यावर काय तरी उपाय शोधला पाहिजे. या हेतूने प्रा. हरिष तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचारी सुनिता कांबळे आणि सहका-यांनी स्लिपर चप्पलवर अनेक प्रयोग करुन बहुउपयोगी स्लिपरचे डिझाईन तयार केले. यासाठी प्रा. राहुल बावणे यांनी सहकार्य केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) मधील सफाई कर्मचारी बाळू थोपटे, सुनिता कांबळे, मिना सांवत, जय्यमा सुका,जयमाला कांबळे, दामन्ना देसाई, शोभा राऊत, सुनंदा पारधे, सुगलाबाई बिराजदार, शुभंम्मा बैरबोईना आणि रेखा गाडे यांनी स्लिपरला वरील बाजूने प्लॅास्टिकच्या कॅप लावून ‘स्लिपर विथ व्हॅक्युम कप इन हिल्स’चे बहुउपयोगी डिझाईन तयार केले. त्याचे स्वामित्व हक्क मिळविण्यासाठी प्रा. डॉ. हरिष तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील भारतीय पेटंट नोंदणी कार्यालयात सीबीआर क्र. 21285 अर्ज क्र. 201721040069 अर्ज दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना प्रा. बावणे यांनी सांगितले की, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयातून चालू शैक्षणिक वर्षांत आतापर्यंत 70 पेटंटची नोंदणी करण्यात आली आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, कर्मचारी नेहमीच नवीन नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावण्याच्या प्रयत्नात असतात. सफाई कर्मचारी बाळू थोपटे, सुनिता कांबळे यांनी या बहुउपयोगी स्लिपर बाजारात मिळतात का? याचा शोध घेतला. अशा स्लिपर कोणीही बनवत नाहीत. त्यामुळे आपल्या सारख्या इतर सर्व सफाई कर्मचा-यांना अशा स्लिपर मिळाव्यात या हेतूने प्रयत्न केले. या बहुउपयोगी स्लिपर वापरल्यामुळे अनेकवेळ काम करुन देखील पायाच्या टाचा दुखणार नाहीत तर अॅक्युप्रेशरमुळे पायाला आराम मिळेल. अशा स्लिपरचा उपयोग औद्योगिक कारखान्यातील, रुग्णालय, शाळा, मोठे हॉल, सभागृह अशा सर्व ठिकाणी साफ सफाईच्यावेळी करता येईल. यातील कॅपमुळे स्लिपर टाचेला पकडून राहते. त्यामुळे पाय घसरणार नाही. पावसाळ्यात ही स्लिपर वापरुन चालताना चिखल पाणी उडणार नाही. ज्येष्ठ नागरीक, महिला व्यायाम करताना बुट वापरत नाहीत. त्यांना या स्लिपरचा खूप उपयोग होईल. रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, परिचारीका, डॉक्टर यांना देखील याचा उपयोग होऊ शकतो. अशी माहिती प्रा. बावणे यांनी दिली. सफाई कर्मचा-यांच्या या संशोधक व चिकित्सक वृत्तीची दखल घेऊन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002