व्हीएस न्यूज - केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी औरंगाबादमध्ये आयोजित अखिल भारतीय वैदीक संमेलनाच्या उद्घाटन समारंभात डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत संपूर्णपणे चुकीचा असल्याचे वक्तव्य केले आहे.
माकडापासून माणूस निर्माण झाल्याचा उल्लेख वेद, पुराणांमध्ये कुठेही नाही. तसेच हा सिद्धांत विज्ञानाच्या माध्यमातून देखील चूक असल्याचे मत सिंह यांनी मांडले. त्याचबरोबर सत्यपाल सिंह यांनी यावेळी डार्विन थेअरी पुर्णपणे चूक असल्याची माहिती अभ्यासक्रमातून देखील द्यायला हवी अशी मागणी केली.
शुक्रवारी ३ दिवसीय अखिल भारतीय वैदीक संमेलनाचे उद्धाटन झाले. शोभायात्रेने या संमेलनाची सुरुवात करण्यात आली. अनेक संत, महंत तसेच वेद पंडितांनी या संमेलनाला उपस्थिती लावली आहे. जीवनासाठी वेद महत्वाचे आहे. संस्कृती जपायची असेल तर वेद जपणे महत्वाचे असल्याचे मत सत्यपाल सिंह यांनी संमेलनात बोलताना मांडले. वेद जगभरासाठी आणि जगातील सर्व धर्मियांसाठी असल्याचेही सिंह यावेळी म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002