व्हीएस न्यूज - संगमनेरमधील एका गावाने हजारो वर्षापासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा बंद केली असून नदीत अस्थी आणि रक्षा विसर्जन न करता घरासमोर फळ देणारे झाड लावून केले जाणारे आहेत.
संगमनेर तालूक्यातील या गावाचे नाव सावरगावतळ असे असून जेमतेम चार एक हजार ऐवढी गावाची लोकसंख्या असून चार वर्षांपूर्वी विवेकानंद युवा जागृती प्रतीष्ठानची गावातील तरूणांनी एकत्र येत स्थापना केली. अनेक योजना या मार्फत राबविल्या जातात. गावात यावर्षीपासून अस्थिविसर्जन बंद करण्यात आलंलेआहे. तर फळझाडाच्या मुळात मृतव्यक्तीच्या घरासमोर या अस्थिविसर्जित केल्या जात आहेत.
घरासमोर लावलेली झाडं आणि त्यात असलेल्या आपल्या व्यक्तीच्या आठवणी सतत मायेची सावली देणार असल्याची भावना येथील गावकरी व्यक्त करत आहेत. सहा महिन्यांपुर्वी वडीलांच्या निधनानंतर कारभारी गाडे यांनी घरासमोर लावलेल्या आंब्याच्या झाडाला आता बहर आला आहे. दिड वर्षापुर्वी सुरू झालेल्या या नव्या परंपरेनंतर ५१ कुटुंबांनी अशी झाडं लावली आहेत आणि या झाडांची ते काळजीही घेत आहेत. एका छोट्या गावातल्या तरूणांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेल्या या नव्या संकल्पनेचे सगळ्यांकडून कौतूक होत आहे.