Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
महाराष्ट्र सरकारने जारी केली प्लास्टिक बंदीची अधिसूचना

व्हीएस न्यूज - राज्यातील प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे असून यानुसार येत्या एक महिन्यात प्लास्टिक उत्पादक, व्यापारी आणि ग्राहकांना प्लास्टिक नष्ट करावे लागणार आहे.

पण औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक तसेच वन फलोत्पादनासाठी, कृषी आणि घनकचरा हाताळण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशवीला यातून वगळण्यात आळे आहे. तर दुधाची पिशवी दूध डेअरी, वितरक आणि विक्रेत्यांनाच पुन्हा खरेदी कराव्या लागतील. शनिवारपासून राज्यभरात निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आणि पोलिसांना देण्यात आले आहेत.

प्लास्टिक कलेक्शन पॉईंट्स ग्राहकांकडून प्लास्टिक संकलन करण्यासाठी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उत्पादक आणि व्यापाऱ्यांना रिसायकल करण्याची सक्ती करण्यात आली आहे. गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक तसेच थर्माकॉल वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर २३ मार्चच्या रात्रीपासून सरकारने अधिसूचना जारी केली.

...Read More

V. S. News
जो भाजपाला पराभूत करेल त्याला समर्थन, डाव्यांच्या भूमिकेत बदल

व्हीएस न्यूज - काँग्रेसबरोबर आघाडी करण्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सध्या द्विधा मनस्थिती असल्याचे दिसून येते. भाजपाला पराभूत करण्यासाठी पक्षाला जे काही करायचे आहे, ते केले जाईल. मग त्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याची गरज भासली तर ते ही करू, असे पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश करात यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले आहे.

पीपल्स डेमॉक्रसीया पक्षाच्या मुखपत्रात करात यांनी संपादकीय लेखात याविषयी मत मांडले आहे. भाजपाला पराभूत केले जाऊ शकते हे उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकातून स्पष्ट झाले आहे. जर सर्वच मोठे भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले तर छोट्या पक्षांचेही त्यांना समर्थन मिळेल, असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. यापूर्वी पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या प्रस्तावाला करात आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासह पक्षाच्या प्रभावी नेत्यांनी विरोध केला होता. पक्षाने वर्षाच्या सुरूवातीला एक अहवाल तयार केला होता. यामध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची शक्यता फेटाळण्यात आली होती. पक्षातील या गटाने आता नरमाईचे धोरण स्वीकारले असून विरोधी पक्षातील मतविभागणीचा भाजपाला फायदा होत असल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर सर्वच राज्यातील भाजपा विरोधी मतांचे एकत्रीकरण करण्यावर जोर देण्याची आवश्यकता असल्याचे डाव्यांचे मत पुढे आले आहे. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये डाव्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तिकडे पक्ष भाजपा विरोधी पक्षांची साथ घेऊ शकतो, असे या संपादकीयवरून वाटते.

...Read More

V. S. News
बँकांचा पैसा मोठ्या लोकांकडेच गेल्याने रोजगार निर्मिती खुंटली : राहुल गांधी

व्हीएस न्यूज - आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होत असला तरी देशात रोजगार उपलब्ध होऊ शकत नाहीए. त्याचे कारण म्हणजे बँकांचा मोठा पैसा हा देशातील केवळ १५-२० लोकांकडेच गेला असल्याने तुमच्याकडे कौशल्य असले तरी आर्थिक मदतीअभावी रोजगार निर्मितीत अडथळे येत आहेत, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. ते कर्नाटकातील मैसूर येथील एका महिला महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, नीरव मोदीने बँकांचे २२ हजार कोटी रुपये घेतले. जर मी तुम्हाला २२ हजार कोटी रुपये दिले तर तुमच्या सारख्या तरुण महिला अनेक व्यावसायांची निर्मिती करु शकता. मात्र,यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नीरव मोदीसारख्या लोकांना बँकांनी मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवल्याने देशातील रोजगार निर्मितीवर विपरीत परिणाम झाला आहे. मला वाटतं सरकारने नोटाबंदी करुन मोठी चूक केली असून ती व्हायला नको होती. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेचे आणि रोजगार निर्मितीचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या पद्धतीने नोटाबंदी करण्यात आली त्यामुळे मला वैयक्तिक अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, मुख्य आर्थिक सल्लागार, अर्थमंत्री यांनाही सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती नव्हती याचे आर्श्चर्य वाटते, असे यावेळी राहुल गांधी म्हणाले.

...Read More

V. S. News
लालूप्रसाद यादव यांना १४ वर्षांची शिक्षा, ६० लाखांचा दंड

व्हीएस न्यूज - चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ७-७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांना ६० लाख रूपयांचा दंड ही ठोठावण्यात आला आहे. परंतु, त्यांच्या शिक्षेबाबत अजून संभ्रम आहे. कारण ही शिक्षा एकाचवेळी भोगायची की वेगवेगळी हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. निकालाची प्रत मिळाल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल, असे वकिलांनी म्हटले आहे. दमुका कोषागारमधून ३.१३ कोटी रूपये अवैधरित्या काढल्याप्रकरणी लालूंना विशेष न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले होते. सध्या लालूंवर रिम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याच खटल्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना निर्दोष ठरवण्यात आले होते.

लालूंचे वकील प्रभातकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन कलमांनुसार ७-७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एकूण १४ वर्षांची शिक्षा असून निकालपत्र हाती आल्यानंतरच सर्व स्पष्ट होईल. जर ही शिक्षा वेगवेगळी देण्यात आली तर त्यांना १४ वर्षे तुरूंगवास मिळेल. त्याचबरोबर ३०-३० लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न दिल्यास एक वर्षांची शिक्षा वाढेल.

न्यायालयात उपस्थित असलेले वकील विष्णुकुमार शर्मा यांनी माध्यमांना स्पष्टपणे सांगितले की, दोन वेगवेगळ्या कलमांतर्गत लालूप्रसाद यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये ७-७ वर्षे अशा १४ वर्षांची शिक्षा झाली आहे. प्रथम एक शिक्षा व नंतर दुसरी शिक्षा भोगावी लागेल, असे त्यांनी म्हटले.

चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणात (चाईबासा कोषागार) लालूप्रसाद आणि जगन्नाथ मिश्रा यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत पाच-पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने लालूप्रसाद यांना १० लाख तर जगन्नाथ मिश्रा यांना ५ लाखांचा दंड ठोठावला होता. यापूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देवघर कोषागारमधून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी लालूप्रसाद यांच्याकडून झारखंड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना साडेतीन वर्षांची शिक्षा आणि ५ लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. या शिक्षेनंतर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन देण्याचा पर्याय दिला होता. त्या आधारावर लालूंनी झारखंड उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

...Read More

V. S. News
उंदीर घोटाळ्याने फोडले पारदर्शक कारभाराचे ढोल

व्हीएस न्यूज – शिवसेनेने आता आपल्या मित्रपक्ष असलेल्या भाजपला उंदीर घोटाळ्यावरुन फटकारले असून शेतकऱ्यासोबतच घोटाळेबाजांचाही उंदीर हा मित्र असल्याचे उघड झाले आहे. फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नसून पारदर्शक कारभाराचे ढोलही या उंदीर घोटाळ्याने फोडले आहे. राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले असून ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी भाजपची आहे. अन्यथा राज्यातील जनता पिंजरा लावून बसलीच आहे, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उंदीर घोटाळ्यावरुन भाजपवर टीका करण्यात आली आहे. मंत्रालयात उंदीर घोटाळाझाल्याचा स्फोट एकनाथ खडसे यांनी केल्यामुळे देशभरातील घोटाळ्यांमध्ये आणखी एका घोटाळ्याची आणि त्याच्या सुरस कथेची भर पडली. कोणत्या हेतूने या घोटाळयाचा स्फोट खडसे यांनी केला हे त्यांनाच माहीत, पण यानिमित्ताने सरकारी तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते आणि उंदीर हे कार्य करू शकतात, हे उघड झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

मंत्रालयातील उंदरांचा राज्याच्या इतर भागातील उंदरांनाही हेवा वाटत आहे. त्यांची मंत्रालयात आपली निदान डेप्युटेशनवर नेमणूक व्हावी अशी इच्छा असून सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेश काढावा यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही समजते, असे सांगत शिवसेनेने भाजपला चिमटा काढला.

सरकारी कामकाजासंदर्भात कागदी घोडेअसा शब्द वापरला जातो. आता कागदी उंदीरहा शब्द त्याची जागा घेईल, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नसून विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही उंदीर घोटाळ्याने फोडले आहेत. तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत. मंत्रालयाची जमीन भुसभुशीत झाली असून मंत्रालयात धर्मा पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांना थारा दिला जात नसला तरी दलाल आणि उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. उंदरांच्या नावाने सरकारी तिजोरीतील लोणीभलतेच बोकेखात असल्याचे आरोप भाजपचे लोकच करत आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय हे उंदरालय झाले आहे.

...Read More

V. S. News
सीमेवरील जवान होणार हायटेक

व्हीएस न्यूज – लष्कराला गेल्या अनेक वर्षांपासून आधुनिक शस्त्रास्त्रांची आवश्यकता असून अखेर मोठ्या विलंबानंतर केंद्र सरकारने भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी आधुनिक रायफल्स, लाइट मशीन गन आणि क्लोजक्वार्टर बॅटल कार्बाइन्स उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. ही शस्त्रास्त्रे जलदगती प्रक्रियेतंर्गत (एफटीपी) पुरवली जाणार आहेत.

याबाबत संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७२,४०० असॉल्ट रायफल्स, १६,४७९ एलएमजी आणि ९३,८९५ सीक्यूबी कार्बाइन्ससाठी निवडलेल्या विदेशी कंपन्यांना निविदा देण्यात आली आहे. हा व्यवहार सुमारे ५,३६६ कोटी रूपयांचा असल्याचे सांगण्यात येत असून हा करार दहा दिवसांच्या आत निश्चित केला जाणार आहे.

ही शस्त्रास्त्रे येत्या वर्षभरात भारताला सोपवली जातील अशी अपेक्षा केली जात आहे. लष्कराने सन २००५ मध्येच ३८२ बटालियन्ससाठी सीक्यूबी कार्बाइन्सची मागणी केली होती. याच्या प्रत्येकात ८५० सैनिक आहेत. लाइट मशीन गनचे प्रकरण सन २००९ मध्येच सुरू झाले होते. पण काही तांत्रिक मापदंडामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे एफटीपीच्या मार्गानेच पुरवली जाऊ शकतात. सध्या ५.५६ एमएम इन्सासची जागा घेण्यासाठी ८.१६ लाख नवीन ७.६२x५१एमएम कॅलिबर असॉल्ट रायफल्सची आवश्यकता आहे. याच पद्धतीने लष्कराला ४.५८ क्वार्टर बॅटल कार्बाइन्स आणि ४३,५४४ लाइट मशीन गन्सची आवश्यकता आहे. यामध्ये बहुतांश शस्त्रास्त्रे ही लष्करासाठी तर काही नौदल आणि वायूदलालाही दिली जाणार आहेत.

...Read More

V. S. News
भाजपमय झाली राज्यसभा

व्हीएस न्यूज – २३ मार्च हा दिवस भाजपसाठी खास ठरला असून या पक्षाने शुक्रवारी राज्यसभेच्या १२ जागा जिंकल्या आहेत. भाजप आता या विजयामुळे राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यातच हा विजय या सर्वांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठीही खूप महत्वाचा ठरला. त्यांनी पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेतल्याचे बोलले जात आहे.

राज्यसभेच्या ७ राज्यातील २६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. यापैकी १२ जागांवर कमळ फुलले आहे. भाजपचे उत्तर प्रदेशमधील सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे आता राज्यसभेत ७३ खासदार झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील नववी जागा ही अतिरिक्त होती. उत्तर प्रदेशच्या राजकारणात या जागेवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. बसपा, सपा आणि काँग्रेसने एकमेकांवर क्रॉस व्होटिंगचा आरोप केल्याचे दिसते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निवडणुकीच्या यश मिळाल्यानंतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला. बसपाच्या उमेदवाराला सपाची अतिरिक्त मते गेली नाहीत. बसपासाठी हा एक मोठा धडा होऊ शकतो. लोकांनी सपाचा स्वार्थी चेहरा पाहिला आहे. समाजवादी पक्ष घेऊ शकतो, देऊ शकत नाही, असे म्हणत टोला लगावला. भाजपच्या ९ उमेदवारांचा राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशमधून विजय झाला आहे. यामध्ये अमर जेटली, जीव्हीएल नरसिंहा राव, अनिल जैन, डॉ. अशोक वाजपेयी, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, हरनाथसिंह यादव, अनिल अग्रवाल आणि कांता कर्दम यांचा समावेश आहे.

गोरखपूर आणि फुलपूर येथे समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत अनपेक्षितरत्या भाजपचा पराभव केला होता. गोरखपूर हा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा तर फुलपूर हा उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ होता. त्यामुळे भाजपमध्ये थोडे नैराश्याचे वातावरण आले होते. परंतु, राज्यसभेतील विजयामुळे कार्यकर्त्यांमध्येही चैतन्य पसरल्याचे दिसून येत आहे.

...Read More

V. S. News
संभाजी भिडे यांच्यावरील आरोपांच्या निषेधासाठी २८ ला मोर्चा

व्हीएस न्यूज – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी करण्यात आलेल्या तथ्यहीन आरोपांच्या निषेधासाठीच २८ मार्चला मोर्चा काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन महिलांच्या बैठकीत करण्यात आले.

बुधवारी (ता. २८) सांगलीसह राज्यभरात विविध जिल्ह्यांत शिवप्रतिष्ठानतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील महिलांची या मोर्चाच्या आयोजनासाठी बैठक आयोजित केली होती. पुष्पराज चौकातील महामोर्चा कार्यालयात सायंकाळी झालेल्या या बैठकीस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संभाजीराव भिडे यांच्यावर कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी झालेल्या तथ्यहीन आरोपांच्या निषेधार्थ हा मोर्चा निघणार आहे. जिल्हाभरात त्यासाठी मोठी संपर्क मोहीम राबविण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. महिलांनी या वेळी बोलताना भिडे यांच्यावर विनाकारण आरोप करण्यात येत असल्याचे मत व्यक्त केले.

...Read More

V. S. News
सरकारी योजनांचा फायदा फक्त श्रीमंत शेतकऱ्यांना – संघाच्या संस्थेचा दावा

व्हीएस न्यूज - केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी आखलेल्या योजनांचा फायदा फक्त श्रीमंत शेतकऱ्यांनाच होत असून खरे लाभार्थी त्यापासून वंचितच राहत आहेत, असे संघाशी संबंधित असलेल्या भारतीय किसान संघ (बीकेएस) या संस्थेने म्हटले आहे.

बीकेएस संघटनेचे देशभरात सुमारे 20 लाख सदस्य आहेत. संघटनेची बैठक गेल्या आठवड्यात नागपूर येथे झाली. त्यावेळी संघटनेने ही गोष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कानावर घातली. ऑपरेशन ग्रीन या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना एलपीजी सिलिंडरप्रमाणे म्हणजे थेट खात्यात पैसे जमा करून द्यावा, असे किसान संघाने म्हटले आहे. सरकारने कर्जमाफी देण्यापूर्वी पुनर्विचार करावा, कारण खऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्याचा फायदा केवळ श्रीमंत शेतकऱ्यांना होतो आणि ज्यांना या माफीची खरी गरज आहे त्यांना कर्जासाठी पात्र समजण्यात येत नाही, असे किसान संघाच्या अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे कर्जमाफी मिळाल्यानंतर शेतकरी पुढच्या वेळेस कर्ज परत फेडण्यास टाळाटाळ करतात आणि त्यामुळे सरकारी योजनांसाठी ते अपात्र ठरतात, असे किसान संघाने म्हटले आहे.

किसान संघाने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुरू केलेल्या अनेक प्रयत्नांचे कौतुक केले आहे. मात्र या योजनांचा फायदा व्यापाऱ्यांनाच जास्त होईल असेही बजावले आहे.

...Read More

V. S. News
अनिल अंबानींचा पोस्ट विभागाशी करार

व्हीएस न्यूज - प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांनी त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाचे सहकार्य घेतले असून देशातील १२ हजार पोस्ट ऑफिसेस बरोबर सहकार्य करार केला आहे. त्यानुसार डीटीएच सेवा देणारी रिलायंस ब्रॉडकास्ट कंपनी पोस्ट ऑफिस मधून सेट टॉप बॉक्स विक्री करणार आहे. अनिल अंबानी यांच्या आर कॉमवर ४५ हजार कोटींचे कर्ज आहे. त्यासाठी डिसेंबर मध्ये त्यांचे मोठे बंधू मुकेश यांनी जिओसाठी हजारो कोटीचे डील करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती मात्र न्यायालयाच्या आदेशने हे डील होऊ शकलेले नाही.

नव्या करारानुसार महाराष्ट्र आणि गोवा पोस्ट विभागातील १२ हजार पोस्ट कार्यालयातून ५०० रु. भरून रिलायंस बिग टीव्ही सेटटॉप बॉक्स साहती प्रीबुकिंग करता येणार आहे. बिग टीव्हीने देशभरात ५ वर्ष्साठी मुफ्त ५०० फ्री टू एअर चॅनल १ वर्षाचे सब्स्क्रीप्शन भरून देण्याची योजना आखली आहे. त्यनुसार एचडी आणि एचईव्हीसी सेटटॉप बॉक्स ग्राहकांना प्रीबुकिंग मध्ये ४९९ रु.भरून घेता येणार आहेत. त्यानंतर आउटडोअर युनिट मिळाले की बाकी १५०० रु. भरून सर्व पेचॅनल दुसऱ्या वर्षी दर महा ३०० रु. रिचार्ज साठी भरून मिळतील व त्यानंतर दोन वर्षे रिचार्ज म्हणून १९९९ र. लॉयल्टी बेनिफिट दिला जाणार आहे.

...Read More

V. S. News
राज्यसभेत रेखाच्या जागी अक्षयकुमारची वर्णी लागण्याची शक्यता

व्हीएस न्यूज - राज्यसभेवर असलेल्या रेखा, सचिन तेंडूलकर आणि उद्योजक अनु आगा याची मुदत ३ एप्रिल रोजी संपत आहे. विशेष म्हणजे हे तिघेही महाराष्ट्राचे आहेत. त्यांची जागा आता कुणाला मिळणार याची उत्सुकता वाढत चालली असताना राज्यसभेत खराब रेकोर्ड असलेल्या रेखाच्या जागी खिलाडी अक्षयकुमार याची वर्णी लागेल असे खात्रीलायक वृत्त आहे. अक्षय कॅनडाचा नागरिक आहे. त्याच्या निवडीत नागरिकत्वाची अडचण आलीच तर अक्षयच्या सासूबाई डिम्पल याची निवड होईल असे सांगितले जात आहे. डिम्पल गुजराथी आहेत आणि अल्पसंख्यांक समुदायाच्या आहेत.

कला, संस्कृती, साहित्य, समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवरांची राज्यसभेवर राष्ट्रपतींच्या शिफारसीनुसार होणारी निवड लक्षात घेऊन अनेकांनी आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या जगावर अल्पी वर्णी लागावी म्हणून उद्योजकांसह लेखक, कलाकार प्रयत्नशील असून काही जणांनी त्यासाठी मोठी रक्कम मोजायची तयारी दाखविली आहे असेही सांगितले जात आहे. अक्षयकुमार, जुही चावला आणि गजेंद्र सिंग याची नावे रिकाम्या होत असलेल्या तीन जागांसाठी चर्चेत आहेत. अक्षयकुमार महिला शौचालय मोहीम, शहीद जवान फंड, स्वच्छता अभियान यामुळे आघाडीवर आहे तर जुही गुजराथी पती जय मेहतामुळे चर्चेत आहे. गजेंद्र सिंग याना संघाची पसंती आहे. या स्पर्धेत वहिदा रेहमान, आशा पारेख, अनुपम खेर, सुरेश ओबेराय, सलीम, जॅकि श्रॉफ, मधुर भांडारकर याचीही नावे घेतली जात आहेत.

...Read More

V. S. News
आता माहिती अधिकार अर्जासाठी मोजावे लागणार ५० रुपये

व्हीएस न्यूज आता जास्तीत जास्त ५० रुपये शुल्क माहिती अधिकाराखाली अर्ज करायचा असेल तर लागेल. तसेच प्रति पान ५ रुपये कागदपत्रांच्या फोटोकॉपीसाठी आकारले जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालय, विधानसभा, विधानपरिषद, तसेच इतर सरकारी आणि आरटीआय कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश लागू असणार असून हा आदेश न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या खंडपीठाने दिला आहे. विविध उच्च न्यायालये आणि छत्तीसगड विधानसभेसह काही संस्थांच्या आरटीआयसंदर्भातील नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर हा आदेश देण्यात आला आहे. काही संस्था आरटीआय अर्जासाठी आणि फोटोकॉपींसाठी मोठे शुल्क आकारत होत्या. न्यायालयात कॉमन कॉजया एनजीओने एक याचिका दाखल केली होती. यात, अर्जदारांना माहिती कळू नये म्हणून आरटीआय अर्जांसाठी मोठे शुल्क घेऊन त्यांना निराश केले जाते, असे म्हटले होते. केंद्र सरकारच्या नियमानुसार आरटीआय अर्जासाठी केवळ १० रुपये शुल्क आहे. तर तर कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसाठी केवळ २ रुपये एवढेच शुल्क आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!