Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
दापोडीतील स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी विभागाची जमिन अतिक्रमणापासून वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – राज्यमंत्री विजय शिवतारे

व्हीएस न्यूज - दापोडी येथील जलसंपदा विभागात स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी, संकल्पनिय, यांत्रिकी इमारत, गुणनियंत्रण व निरिक्षण या चार विभागाची कार्यालये आहेत. त्यातील स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवणे तसेच या विभागाची ७२ एकर जमीनअतिक्रमाणापासून वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी पुढाकार घेऊन याविषयीच्या बैठकीचे आयोजन मंत्रालयात केले होते. विजय शिवतारे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे गटनेते नगरसेवक राहुल कलाटे, मुख्य अभियंता एस. एन. बोडके, अधिक्षक अभियंता पुंढलिक थोटवे,कार्यकारी अभियंता आनंद काळमेघ, महाराष्ट्र राज्य क्रास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रविण धिवार, नागेश घटकांबळे, कैलास पवार, महेंद्र कांबळे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

आमदार चाबुकस्वार यांनी यावेळी या विभागाची विस्तृत माहिती मंत्र्यासमोर विषद केली. जलसंपदा विभागाचा दापोडी येथे नियोजन व संकल्पचित्र हा उपविभाग कार्यरत आहे. परंतू ‘पुरेसा कार्यभार शिल्लक नाही’ या मतानुसार शासनाने दापोडीतील हा उपविभाग बंद करण्याचानिर्णय घेतला. या ठिकाणी स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी, संकल्पनिय, यांत्रिकी इमारत, गुणनियंत्रण व निरिक्षण या विभागाची चार कार्यालये आहेत. पैकी अब्जावधी रूपये किंमत असलेली ७२ एकर जागेचे संरक्षण व उपाययोजना या बाबी लक्षात घेऊन स्थापत्य बांधकाम वयांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवण्याचा निर्णय राज्यमंत्र्यांनी घेतला. तसेच मोकळ्या जागेची तातडीने मोजणी करणे, संरक्षण भिंत उभारणे, अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा देणे, जलसंपदाच्या खात्याच्या जागेत उभारलेल्या टपऱ्या, भाजी मंडई, यांचे अतिक्रमण काढणेचा निर्णयघेण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेने जलसंपदा खात्याची काही जागा विकासकामांसाठी घेतली होती. मात्र करारनाम्यानुसार पालिकेने कुठलीच पूर्तता केली नसल्याचे यावेळी स्पष्ट झाल्याने पिंपरी महापालिकेला ही नोटीस देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

...Read More

V. S. News
वाचनसंस्कृती वाढवली तरच मराठी भाषा अधिक समृद्ध होईल – डॉ. लक्ष्मीकांत देशमुख

व्हीएस न्यूज - वाचनसंस्कृती वाढवली तरच मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, त्यासाठी गावोगावी समृद्ध ग्रंथालये उभी राहिली पाहिजेत. मराठी भाषेविषयीचे प्रेम वाढत नाही तोपर्यंत सरकारदेखील भाषेकडे गांभीर्याने पाहणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जामिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन बडोदा येथील ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने अॅटो क्लस्टर सभागृहात डाॅ. देशमुख यांची प्रकट मुलाखत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा.पिंगळे यांनी घेतली. शिंदेशाही पगडी, स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्तेसन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार उल्हासदादा पवार, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, समन्वयक नाना शिवले, गिरिजादेवी कुदळे, राजन लाखे, पुरुषोत्तम सदाफुले, राजेंद्र घावटे, सुहास पोफळे,आदी मान्यवर उपस्थितहोते.

डॉ. देशमुख यांनी संमेलनासाठी शासनाची २५ लाखाची मदत खूपच अपुरी असून त्यात वाढ होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. आपण इतर कामांसाठी भरपूर खर्च करतो, मात्र स्वभाषेसाठी करत नाही. इतर राज्यांत भाषेवर प्रेम करणारे राज्यकर्ते आणि नागरिक असल्यानेभाषेसाठी ते भरीव काम करत असतात. मराठी भाषेसाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. शासनाबरोबर आपली सर्वांचीच ती जबाबदारी आहे. केवळ बोलण्यापुरते मराठीवर प्रेम नको तर ते कृतीत उतरले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, माझ्या साहित्यिक प्रवासात माझ्या आईवडिलांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक लेखक आधी चांगला वाचक असतो. वाचता वाचता त्याच्या जाणीवा समृद्ध होत असतात. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालये महत्वाची आहेत. अशी समृद्ध ग्रंथालये प्रत्येक गावात,प्रत्येक शाळेत निर्माण झाली पाहिजेत. महाराष्ट्रात मराठी शाळांना अधिक समृद्ध करण्याची गरज आहे. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. नवनवे तंत्रज्ञान मराठीत यायला हवे. मराठी विद्यापीठ व्हायला हवे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी टाळण्यासाठी सरकारबरोबर कलावंत,साहित्यिकांनी पुढे यायला हवे. मराठी भाषेच्या बाबतीत शासनाबरोबरच आपणही उदासीन आणि करंटे आहोत. ही वृत्ती बदलली पाहिजे, मी कार्यकर्ता लेखक म्हणूनच काम करणार. साहित्य संमेलनाच्या निधी वाढ व्हावी. ई-मराठी धोरण आणले जावे. मराठीतील चांगले साहित्यअन्य भाषांमध्ये अनुवादित व्हावे. अशा अनेक अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, लेखकाची लोकप्रियता ही मानवी जीवनाला पुढे नेणारी मूल्य नावाच्या गोष्टीतून साहित्यामध्ये प्रकट होत असते. समाज कसा असावा. समाजातील मूल्यांची जपणूक कशी व्हावी. आदर कसा राखला जावा. याविषयीची भूमिका लेखक मांडतच असतो. त्यांनीमांडलीच पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ.अविनाश वाळुंज यांनी केले व नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. अविनाश ववले, गणेश लंगोटे, संतोष बाबर, बाजीराव लोखंडे, महेंद्र चिंचवडे, विजय कांबळे, प्रविण कुदळे, राजेंद्र करपे,गुरुदास भोंडवे, रोहित खर्गे, सचिन काटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

...Read More

V. S. News
पिंपरीत प्रजासत्ताक दिनी देशातील सर्वाधिक उंच राष्ट्रध्वजाचे होणार अनावरण

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक ( १०७ मिटर) उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण शुक्रवार दि.२६ जानेवारी २०१८ (प्रजासत्ताक दिनी) रोजी सकाळी १०.०० वा. होणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली भक्ती शक्ती चौक, निगडी येथे होणा-या या कार्यक्रमास पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती तर खासदार शिवाजीराव आढळरावपाटील, श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, कॅन्टोनमेंट बोर्डाचे स्पेशल कमांडंट, प्रेसिडंट, ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णवी, विरचक्र सन्मानित, महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीसभापती सिमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तसेच विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाईफुगे, फ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या शर्मिला बाबर, कमल घोलप, सुमन पवळे, नगरसदस्य राजू मिसाळ, अमित गावडे, उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सह. आयुक्तदिलीप गावडे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत. भारताच्या राष्ट्रध्वजाबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळे आदराचे स्थान आहे ही भावना नविन पिढीच्या मनात रुजत राहण्याच्या दृष्टीने तसेच देशा प्रती प्रेम व्यक्तकरण्याकरीता भक्ती शक्ती उद्यानाच्या आवारात १०७ मिटर उंचीवर दिवस रात्र फडकणा-या राष्ट्रध्वजाच्या (Monumental Flag) कापडाचे मोजमाप १२० फुट X ८० फुट आहे. या पूर्वी १०५ मिटर उंचीचा राष्ट्रध्वज अटारी येथील वाघा सिमेजवळ उभारण्यात आलेला आहे. भक्ती शक्ती चौक, निगडी येथे सकाळी १०.०० वा ध्वजारोहण, सामुहिक संविधान वाचन व राष्ट्रगान होणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे. या कामास केंद्रीय गृह खात्याची परवानगी ११ जुलै २०१७रोजी प्राप्त झाली आहे. तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे यांनी या प्रकल्पाच्या फाऊंडेशनच्या डिझाईनला मंजुरी दिली आहे.

...Read More

V. S. News
डी.एस. कुलकर्णी यांना ५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा

व्हीएस न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने ठेवीदारांची देणी परत करण्यासाठीची २५ टक्के रक्कम म्हणजेच ५० कोटी रुपये न्यायालयात गुरुवारी जमा करण्यात अपयशी ठरलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींना खडे बोल सुनावले. तसेच डीएसकेंना या प्रकरणात उच्चन्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सध्या अडचणीत आले आहेत. गुरुवारी उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. डीएसकेंना ठेवीदारांची देणी परत करण्यासाठी उच्च न्यायालयात ५० कोटी रुपये जमाकरायचे आहेत. डीएसके गुरुवारी देखील ही रक्कम जमा करण्यात अपयशी ठरले. ५० कोटी रुपये बँकेत जमा होणार आहे. हे पैसे परकीय चलनात म्हणजे डॉलर्समध्ये आल्याने सध्या आरबीआय पडताळणी करत आहे. १ फेब्रुवारीपर्यंत हे पैसे जमा करु, अशी माहितीडीएसकेंच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. परदेशातील डीएसकेंच्या मालकीच्या कंपनीच्या माध्यमातून या ५० कोटी रुपयांची तजवीज करण्यात आल्याने ही रक्कम परकीय चलनात आली आहे. उच्च न्यायालयाने डीएसकेंची बाजू ऐकून घेतल्यावर डीएसकेंना ५फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला. तसेच २ फेब्रुवारीपर्यंत लिलावासाठी मालमत्तेची योग्य यादी सादर करावी, असेही उच्च न्यायालयाने सांगितल्याचे समजते. सुप्रीम कोर्टाने डीएसकेंना पैसे जमा करण्यासाठी मुदत देत त्यांना अटकेपासून दिलासा दिला.

...Read More

V. S. News
मौजमजेसाठी चोरी करणारे त्रिकुट गजाआड

व्हीएस न्यूज - मौजमजेसाठी मोबाईल व दागिन्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांनी निगडी पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून तीन लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

आनंद त्र्यंबक इंदुकाने (वय 21 रा. निगडी प्राधिकरण), ऋषिकेश चांदुप्रसाद काटे (वय 20 रा. धारडी, परभणी) अतुल सोमनाथ काटे (वय 20 रा. धारडी, परभणी) अशी या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस गस्त घालत असताना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राधिकरण येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या होंडा डिओ दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ महागड्या किंमतीचे मोबाईल आढळून आले. त्यांच्याकडे विचारणा केल्यांनतर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल, पर्स, दागिने चोरले असल्याचे कबुली दिली. त्यांच्याकडून सात महागडे मोबाईल, 71 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, एक लाख 62 हजार रुपयांचे नेकलेस, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, दोन हजार 300 रुपये रोख असा तीन लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, तात्या तापकीर, प्रकाश कांगळे, कबीर पिंजारी, बाळासाहेब शेलार, मंच्छिद्र घनवट, स्वामीनाथ जाधव, रमेश मावसकर, किरण खेडकर, किशोर पढेर यांनी केली.

...Read More

V. S. News
वाकडमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू

व्हीएस न्यूज - एकाच दुचाकीवरून जाणाऱ्या तीन मित्रांपैकी एकाचा दुचाकी घसरून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास औंध-हिंजवडी रोडवर घडली.

दिपक साऊद असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मनबहादुर चौधऱी (वय-28, रा. मारूंजी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिपक कुमार कडारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, साऊद, चौधरी, कडारा हे मित्र आहेत. शनिवारी तिघे एकाच दुचाकीवरून औंध-हिंजवडी रस्त्यावरून जात होते. आरोपी दिपक कडारा हा दुचाकी भरधाव वेगाने चालवत होता. त्यामुळे दुचाकी घसरून दिपक साऊद गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. फौजदार माने अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
बावधन, पिंपळे-निलखमध्ये महिलांचे मंगळसुत्र हिसकावले

व्हीएस न्यूज - बावधन आणि पिंपळे-निलख येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलांच्या गळयातील दीड लाख रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. या दोन्ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वासात ते नऊच्या दरम्यान घडल्या.

बावधन येथे घडलेल्या घटनेप्रकरणी 34 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला मंगळवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून चालली होती. तिरूमला हाईटस सोसायटीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 45 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले आणि पळ काढला. पिंपळे-निलख विशालनगर येथील घटनेप्रकरणी 43 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला विद्यानिकेतन शाळेजवळून पायी जात असताना दुचाकीवरून दोन जण त्यांच्याजवळ आले. मागे बसलेल्याने त्यांच्या गळयातील एक लाख रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावले आणि पळ काढला.

...Read More

V. S. News
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

व्हीएस न्यूज - घरी जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊऩ मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता चांदणी चौकात घडली.

अमोल उध्दव टाके (वय-30, रा. वडगांव-बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मेव्हना कैलास कदम (वय-27, रा. उत्तमनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. टाके हे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चांदणी चौकातून वडगांव-बुद्रुककडे चाकीवरून जात होते. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. फौजदार ए.एल. गवारी अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
सखोल चौकशीच्या आश्वासनानंतर देवीबाईचा मृतदेह नातेवाईकांनी घेतला ताब्यात

व्हीएस न्यूज - अनधिकृत बांधकाम कारवाई दरम्यान मंगळवारी देवीबाई तुळशीराम पवार या महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. देवीबाईच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत विश्वगोरा बंजारा सेवासंघाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी बुधवारी दुपारी मृतदेह ताब्यात घेतला.

पिंपळे गुरव येथे मंगळवारी सकाळी अनधिकृत बांधकाम कारवाई दरम्यान देवीबाई तुळशीराम पवार (वय-32) या महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली होती. औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला होता. देवीबाईच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी तसेच विश्वगोरा बंजारा सेवासंघाच्या सदस्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. बुधवार सकाळपासूनच औंध जिल्हा रुग्णालयात बंजारा समाजाचे 500 ते 600 लोक जमा झाले होते. त्यामुळे याठिकाणी पोलीसांचा मोठ्या प्रमाणात फोजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, दुपारी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे बंजारा संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन स्थानिक लोकप्रतिनीधींनी दिल्याचे विश्वगोरा बंजारा सेवासंघाचे अध्यक्ष युवराज आडे यांनी सांगितले. देवीबाई हिच्यावर पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

...Read More

V. S. News
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेचा टॅक्स भरण्यासाठी 'अब पेटीएम करो'

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक आता मिळकत कर 'पेटीएम'द्वारे भरु शकणार आहेत. कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी पेटीएमद्वारे मिळकत कर भरून देण्याची सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आज (बुधवार) होणाऱ्या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सव्वाचार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मिळकत भरण्यासाठी पालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी,चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, पालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच सध्य स्थितीत पालिकेच्या वतीने मिळकरत कर रोख, धनादेश, डीडी आणि ऑनलाईन माध्यमातून स्वीकारला जातो.

आता 'पेटीएम'द्वारे मिळतक कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही सुविधा प्रायोगिक तत्वावर एक वर्ष कालावधीसाठी असणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून त्यास आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे. या सेवेसाठी पालिका 'पेटीएम'ला कोणत्याही प्रकारची रक्कम देणार नाही. 'पेटीएम'वर जमा होणारा कर त्याचदिवशी पालिकेच्या बॅंक खात्यात जमा करावा लागणार आहे. त्याचदिवशी जमा न झाल्यास 100 रुपयांसाठी प्रतिदिनी पाच रुपये व्याज आकारले जाणार आहे. कर भरणाऱ्या नागरिकांकडून 'पेटीएम' शुल्क वसूल करणार आहे. नेटबॅंकिंगसाठी पाच रुपये शुल्क, क्रेडिट कार्डसाठी 0.80 टक्के शुल्क, डेबिट कार्डवरील दोन हजार रुपयांसाठी0.50 व 0.75 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. पेटीएम वॉलेटसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

...Read More

V. S. News
शिवसेनेचे खासदार खोटारडे, महापौरांचा हल्लाबोल

व्हीएस न्यूज समाविष्ट गावांतील विकासकामांवर खर्च करण्यासाठी मंजूर केलेल्या ४०६ कोटींच्या निविदा सरासरी ७.१९ टक्के कमी दराच्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांना निविदा दहा टक्के जादा दराने मंजूर केल्याचे सिद्ध करता न आल्यास त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असे आव्हान महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत दिले. येत्या लोकसभा निवडणुकीत शहरातील जनताच शिवसेनेच्या खोटारड्या खासदारांचे तोंड काळे करेल, असा हल्लाबोलही त्यांनी केला. तसेच निविदा किती टक्के दराने मंजूर केल्या आहेत, त्याचे पुरावेच त्यांनी सादर करून महापौर काळजे यांनी दोन्ही खासदारांचा बुरखा फाडला.

महापौर काळजे म्हणाले, “महापालिकेत २० वर्षापूर्वी समावेश झालेल्या समाविष्ट गावांना नेहमीच विकासापासून वंचित ठेवण्यात आले. त्यावेळच्या सत्ताधारी राष्ट्रवादीने केवळ मलई मिळण्याची आशा असणाऱ्या झोन बदलाचेच प्रस्ताव मंजूर केले. समाविष्ट गावांतील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्थेसह अन्य मुलभूत सेवा सुविधांची वानवा आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यातील एक तरी गोष्ट केली असती, तर आज समाविष्ट गावांचा चेहरामोहरा बदलला असता. महापालिकेच्या विकास आराखड्यात समाविष्ट गावांमध्ये सार्वजनिक प्रयोजनासाठी अनेक आरक्षणे आहेत. गेल्या २० वर्षांत एक टक्का आरक्षणे सुद्धा विकसित करता आले नाहीत. साध्या रस्त्यांच्या जागाही ताब्यात घेतले गेले नाहीत. तरीही समाविष्ट गावांतील नागरिक दरवर्षी कोट्यवधींचा कर महापालिकेकडे जमा करत होते. समाविष्ट गावांतील नागरिकांनी दिलेल्या कराचा त्याच भागात वापर झाला असता तर येण्या-जाण्यासाठी किमान रस्ते तरी चांगले तयार झाले असते. मात्र तसे झाले नाही. परंतु, भाजपने सत्तेत येताच समाविष्ट गावांतील सर्व रस्ते आणि आरक्षणे ताब्यात घेऊन त्यांचा विकास करण्याचे धोरण आखले. त्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने रस्ते आणि आरक्षणांच्या विकासासाठी ४०६ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. हे करत असताना रस्ते व आरक्षणांच्या जागा ८० टक्क्यांपेक्षा जास्त ताब्यात घेतल्या आहेत आणि त्यानंतरच खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. महापालिकेच्या अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा ठेकेदारांनी सरासरी ७.१९ टक्के कमी दराने निविदा भरल्यामुळे त्याचा महापालिकेलाच आर्थिक फायदा झाला आहे.

त्यातून महापालिकेची एकूण ३२ कोटी ३४ लाखांची बचत झाली आहे. असे असताना शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, दुसरे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे

काहीच कामाचे न उरलेले पदाधिकारी यांनी समाविष्ट गावांतील रस्ते व आरक्षण विकासासाठी दहा टक्के जादा दराने निविदा मंजूर केल्याचे खोटे आरोप करून स्वतःचे प्रशासकीय अज्ञान प्रकट केले आहे. समाविष्ट गावांमधील विकासकामांना मंजुरी दिलेली एक तरी निविदा दहा टक्के जादा दराची असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांनी सिद्ध करून दाखवावे. अन्यथा त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा. काहीच प्रशासकीय ज्ञान नसणारे खासदार आपल्या शहराचे नेतृत्व करतात, हे जनतेचे दुर्दैव आहे. अशा खादारांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत शहरातील जनताच या खासदारांचे तोंड काळे करेल.

राज्य सरकारने कोणत्याही कामाची निविदा काढताना काय दर असावेत, यासाठी २२ सप्टेंबर २०१७ रोजी राज्य दरसूची (एसएसआर) लागू केले आहे. त्यामुळे शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा ठेकेदारांनी जादा दर सादर केले असते, तर त्यांच्याशी वाटाघाटी करणे योग्य होते. कायद्यानुसार अभिप्रेत नसतानाही सर्व ठेकेदारांसोबत सादर केलेले दर कमी करण्याबाबत प्रशासनाने पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे निर्धारित दरापेक्षा कमी दराच्या निविदा आलेल्या असताना ठेकेदारांसोबत वाटाघाटी का केल्या नाहीत, असे शिवसेनेच्या दोन्ही खासदारांचे म्हणणे म्हणजे अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी कधी तरी आपल्या मतदारसंघातील ताजणेमळा, पठारेमळा, कोतवालवस्ती, बुरूडेवाडी, डुडूळगाव, चोवीसावाडी हा भाग कोठे आहे, याची जाऊन पाहणी केली असती, तर या भागात रस्तेच नाहीत हे त्यांना कळले असते, असा टोलाही त्यांनी हाणला.”

स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, “स्थायी समितीने १३ डिसेंबर २०१७ रोजीच्या सभेत मंजूर केलेली ४२ कामे अपवाद वगळता समाविष्ट गावांतील रस्ते व आरक्षण विकासाची आहेत. महापालिकेने या कामांसाठी ४४९ कोटी ७२ लाखांची अंदाजपत्रकीय रक्कम निश्चित केली होती. ठेकेदारांनी सरासरी ७.१९ टक्के कमी दराच्या निविदा मंजूर केली आहे. त्यानुसार त्याची एकूण रक्कम ४०६ कोटी ४५ लाख रुपये होते. त्यामुळे महापालिकेचे ३२ कोटी ३४ लाखांची बचत झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने दहा टक्के जादा दराच्या निविदा मंजूरीचा केलेला आरोप धादांत खोटा आहे. मोघम आरोपाने जनतेत संभ्रम निर्माण करून आगामी निवडणुका जिंकता येतील, असा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा भ्रम आहे. परंतु, शहरातील जनता सुज्ञ असून, या दोन्ही पक्षांना महापालिका निवडणुकीत जी जागा दाखवून दिली तीच जागा आगामी निवडणुकीतही दाखवून देईल.”

...Read More

V. S. News
दोन दिवसात 17 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

व्हीएस न्यूज -- केशवनगर व चिंचवड गावठाण, थेरगाव, काळेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसामध्ये भटक्या कुत्र्यांनी तब्बल 17 जणांना चावा घेतला आहे. या रूग्णावर पालिकेच्या तालेरा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भटक्या कुत्र्यांना त्वरीत पकडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
यामध्ये सात ते आठ वर्षांची आठ लहान मुले तर महिला व पुरुष नऊ असे 17 जणांना भट्‌क्या कुत्र्याने चावा घेतला आहे. या सर्वांना रस्त्याने जात असताना भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करुन चावा घेतला. यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.
महापालिकेचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले की, कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य त्या सर्व उपाय योजना करत असून, भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांना लवकरच पकडण्यात येईल. तसेच महापालिकेकडे रेबीजची लस देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्णांवरही योग्य ते उपचार केले जातील, असे रॉय यांनी सांगितले. शहरात विविध भागातील कचरा कुंड्यावर भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात असतात. पालिकेचे कुत्र्यांच्या पैदासीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने शहरात कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भटकी कुत्री त्वरीत पकडण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!