व्हीएस न्यूज – गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विश्व श्रीराम सेना या सामाजिक संस्थेच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डी येथील मनपाच्या उर्दू माध्यमिक हायस्कूलमध्ये नोकरी महोत्सव पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या.
पिंपरी चिंचवड उद्योगनगरीतील अनेक मान्यवर कंपन्या, आयलेटल ग्लोबल सर्व्हिस, जेनियम कन्सस्टंट लि., यशस्वी ग्रुप, चिंचवड, ऍबसोर्स बायोलॉजिक, रिलायन्स एच आर सर्व्हिस, युवा शक्ती फाऊंडेशन, युरेका फोर्ब्स, फ्लॉश विंग मायक्रोनिक्स इंडिया, टीम प्लेस सर्व्हिस, ऐक्य ह्युमन कॅपिटल, एएसपी ऑल सर्व्हिस, ऍडिको इंडिया, अर्स मॅनेजमेंट यासारख्या कंपन्यांचे अधिकारी यावेळी उमेदवारांच्या मुलाखतींसाठी उपस्थित होते. पात्रतेच्या निकषांवर बेरोजगार तरूण तरूणींच्या मुलाखती घेण्यात आल्या. बऱ्याच तरुणांना नोकरी मिळल्याने गुढी पाडव्याचा दिवस सोन्याचा दिवस ठरला. विश्व श्रीराम सेनेने सामाजिक बांधिलकी जोपासत तरूणांसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्याबद्यल समाधान व्यक्त केले. यावेळी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींना श्रीरामाची फोटो फ्रेम भेट म्हणून देण्यात आली. यावेळी विश्व श्रीराम सेनेचे प्रवक्ते प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, दिलीप गोसावी, तुकाराम बिराजदार व विश्व श्रीराम सेनचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. सतोष पाचपुते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
व्हीएस न्यूज – पदवी ही शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे फलित असून पदवीधारकांनी व्यापक नीतीमूल्यांच्या भानाने सतत जागरुक राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयाच्या पदवीग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उत्तमराव जाधव, शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमल साळुंखे, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलासकुमार पगारिया, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख प्रा. पांडुरंग भास्कर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.हनुमंत शिंदे, डॉ. ललितकुमार धोका, डॉ.प्रशांत गदिया, कल्पेश पगारिया आदी उपस्थित होते.
राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत, डॉ. अशोककुमार पगारिया यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख डॉ.विजय निकम यांनी ध्वजसंचलन केले. प्रा. प्रवीण म्हस्के यांनी सूत्रसंचलन केले, डॉ. स्वाती वाघ यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी ‘घर चलो अभियान’ राबविणार आहे. या कालावधीत घरोघरी जाऊन केंद्र, राज्य व मनपा यांच्या विकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत.
याकरिता प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांचे गट तयार केले जाणार आहेत. असे गट घरोघरी जाऊनविकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत. अभियना दरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया व फोटो पक्ष कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. तसेच सप्ताहातून एका दिवशी स्वच्छता कार्यक्रम अभिनव पध्द्तीने राबवून जाहिर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. घर चलो अभियनाचे माध्यमातून शहरामधील १३०० बूथचे मजबूतीकरण करण्याचा निर्धार शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. त्याप्रकारची जबाबदारी सर्व पक्ष पदाधिकारी व नगरसेवक यांना दिली आहे.
चलो अभियनाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख समन्वक म्हणून जबाबदारी अमोल थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच मंडलाध्यक्ष अमोल थोरात – प्राधिकरण चिंचवड, संजय मंगोडेकर – चिंचवड स्टे. दापोडी, बाबू नायर – किवळे थेरगाव, माऊली थोरात – सांगवी काळेवाडी, प्रमोद निसळ – निगडी चिखली, सारंग कामतेकर – भोसरी चर्होली, राजेश पिल्ले – युवा मोर्चा, उमा खापरे – महिला मोर्चा, सदाशिव खाडे – अनूसूचित, अल्पसंख्याक, व्यापार व कामगार, सचिन पटवर्धन – उर्वरित आघाड्या अशाप्रकारे विभागांचे समन्वक असणार आहेत. घर चलो घर अभियनामध्ये खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, उमा खापरे, महेश कुलकर्णी, वसंत वाणी, अमर मुलचंदानी,यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकारी व नगरसेवक सामिल होणार आहेत.
भाजपचा येत्या ६ एप्रिलला वर्धापनदिन होणार आहे. तसेच भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन ६ एप्रिल रोजी मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स (बीकेसी) येथे होणार आहे. पिंपरी चिंचवड मधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्याचे शहर पदाधिका-यांना उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती भाजप पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात उद्योगधंदा, नोकरी, शिक्षणानिमित्त मराठवाड्यातील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. तथापि, लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस व बिदर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज र्टमिनस सुपर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा चिंचवड स्टेशनला करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांच्यामार्फत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष युवराज दाखले यांनी निवेदनाव्दारे केली आहे. दाखले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणुन ओळखले जाते. या शहरात उद्योग, नोकरी, शिक्षण, रोजगारासाठी मराठवाड्यातील उदगीर, लातुर, नांदेड, बिदर, अमरावती, धाराशिव येथील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. हे नागरिक लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस व बिदर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज र्टमिनस सुपर एक्सप्रेस या रेल्वेने आल्यानंतर त्यांना पुणे रेल्वे स्टेशन अथवा लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी या दोन्हीही सुपर एक्सप्रेस गाड्यांना चिंचवड स्टेशन येथे थांबा करण्यात यावा अशी मागणी दाखले यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - जमिनीच्या वादातून शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा संघटकाला चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत सिमेंटचा गट्टू फेकून मारला. ही घटना बोपखेल येथे घडली. मंगला सदाशिव घुले (वय 43, रा. मारूती मंदीराजवळ, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषभ ज्ञानेश्वर घुले (वय 20), सविता पांडुरंग घुले (वय 41), पांडुरंग घुले (वय 45), मंदार ज्ञानेश्वर घुले (वय 19, सर्व रा. बोपखेल) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला घुले या शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा संघटक आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून मंगला घुले यांनी 2008 साली न्यायालयात दावा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घुले या घरासमोर थांबल्या होत्या. यावेळी आरोपींनी मंगला घुले यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. ऋषभ याने त्यांना 'तु केस मागे घे, अन्यथा तुला खलास करून टाकू', अशी धमकी दिली. तसेच सिमेंटचा गट्टू मंगला घुले यांना फेकून मारला. फौजदार प्रमोद कठोरे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत पुढे जाण्याचा ध्यास आणि हितचिंतकांसह विरोधकांनाही मदत करण्यात कायम पुढे असणारा नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम होय. त्यांच्या आकस्मित निधनाने राज्यातील राजकारण, सहकार, शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहिली. माजी मंत्री कै.पंतगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गुरुवारी पिंपरीतील कामगार भवन, नारायण मेघाजी लोखंडे सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस शहरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, एमआयएम, मनसे आदी पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापुर, सांगली भागातील नागरिक उपस्थित होते. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, नगरसेवक बाबू नायर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, एमआयएमचे शहराध्यक्ष अकिल मुजावर, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजाभाऊ गोलांडे, अख्तर चौधरी, गिरीजा कुदळे, विद्या नवले, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फझल शेख, शाम आगरवाल, लक्ष्मण रुपनर, प्रदिप गायकवाड, तसेच राजेंद्रसिंह वालिया, बिंदू तिवारी, बाबा कांबळे, संग्राम तावडे, रामदास मोरे, नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, शहाबुद्दीन शेख, विशाल कसबे, सज्जी वर्की, संभाजी मुळीक आदी उपस्थित होते. सचिन साठे म्हणाले की, तरुण पणात पिंपरीत शिक्षकाची नोकरी करताना विद्यापीठाचे स्वप्न पाहुण ते पुर्णत्वाला नेऊण त्यांनी अविरत लोकसेवा केली. भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात लाखों नागरिकांना वैद्यकीय सेवा सुविधा व हजारों युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. मला निवडणुकीत अपयश आल्यानंतर सर्वप्रथम फोन करुन समाजसेवा सुरु ठेवण्यासाठी मानसिक पाठबळ डॉ. कदम यांनी दिली. श्रध्दांजली वाहताना बाबू नायर म्हणाले की, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात शैक्षणिक सुविधा व विस्तार वाढविण्यासाठी डॉ. पतंगराव कदम आणि डॉ. डी.वाय. पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. डॉ. कदम हे राजकारणात सक्रीय असताना देखील मंत्री पदावर असताना समाजकारणाला महत्व देणारे नेते होते. मारुती भापकर म्हणाले की, सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शिष्टमंडळासह डॉ. कदम यांना भेटण्याचा योग आला. त्वेषाने बैठकीला जाणारे शिष्टमंडळ डॉ. कदम यांची ते प्रश्न सोडविण्याबाबतची भुमिका पाहुण हसत खेळत आनंदाने बाहेर पडत असत.
व्हीएस न्यूज - येथील एसटी कॉलनी शेजारील मुख्य बस स्थानकात सुरु करण्यात असलेल्या पाणपोईचे उद्घाटन नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. उन्हाच्या झळा वाढल्या असून बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसरातील संतोष कांबळे, राकेश कांबळे यांच्या प्रयत्नातून पाणपोई उभारण्यात आली. बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे वाहक-चालक, प्रवासी व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यावेळी रामभाऊ देशपांडे, प्रकाश दिवार, आप्पा कांबळे, राकेश कांबळे, देवराम माकर, विलास वाघ, मुरली देवरे, बाळू कांबळे, शिवलिंग सरोदे, मुकुंद शिनगारी, गणेश गायकवाड, असलम शेख आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - दापोडी येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मुर्ती स्थापनेचा 94 वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तीन दिवस विविध कार्यक्रम झाले. यावेळी दिपक कुदळे यांच्या हस्ते महापुजा झाली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. सोपान भाडळे, भंडारी, सुभाष बोधे, सुधाकर कणसे आदी उपस्थित होते. यामध्ये दैनंदिन कार्यक्रम काकड आरती, महिला भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर तसेच ह.भ. प. राजेंद्र जोशी यांच्या हस्ते कलशपुजन, डॉ. धनंजय पाटील, ह. भ. प. सुरेश महाराज किंडरे यांच्या हस्ते विणापुजन आदी कार्यक्रम पार पडले. ह. भ. प. गणेश महाराज कार्ले यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद झाला. या सर्व कार्यक्रमासाठी विजय काटे, ह. भ. प. बाळासाहेब शितोळे यांचे सहकार्य लाभले.
व्हीएस न्यूज - शिक्षणाची गुणवत्ता समाजातील सर्व घटकांवर अवलंबून असते. संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी व पालक हे चार घटक एकत्रितपणे काम करून शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेऊ शकतात, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांनी केले. इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित पदवीग्रहण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माळी बोलत होते. विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्याना डॉ. माळी यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ हे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे, डॉ. विजयकुमार खंदारे, डॉ. सत्यम सानप, डॉ. सदाशिव मेंगाळ, डॉ. संदीप कांबळे, प्रा. सुरेश थरकुडे, स्वप्नाली सोनवणे, प्रा.योगिता शिंदे, श्रीकांत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. माळी म्हणाले, शिक्षणाची इमारत ही चार खांबावर उभी असते, त्यातील विद्यार्थी हा एक प्रमुख घटक आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करताना जिद्द, चिकाटी आणि अविरत परिश्रम घेणे गरजेचे असून, त्याशिवाय पर्याय नाही. आज नोकरी व व्यवसायिक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्यासाठी आवश्यक ती पात्रता धारण करून आपले ध्येय गाठले पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वर्तमानातील ज्ञान ग्रहण केले पाहिजे. स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपण प्राप्त केलेल्या पदवीचा जीवन जगण्यासाठी उपयोग करून घ्यावा, असेही डॉ. माळी यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. बाळसराफ म्हणाले, प्रत्येक विध्यार्थ्यांमध्ये एक राजहंस दडलेला असतो, त्याचा शोध घेऊन आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे. प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आपल्या जबाबदारीची जाणीव होणार आहे. शिक्षण आणि रक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना एकवेळ चांगली गोष्ट करता आली नाही, तरी चालेल; परंतु त्यांनी वाईट गोष्ट करू नये, असे आवाहनही डॉ. बाळसराफ यांनी केले. दरम्यान, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष गोरख काळोखे, मुकुंद खळदे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये उत्तम प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी, तर आभार डॉ. सत्यम सानप यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरीतील थिसेनक्रुप इंडस्ट्रीजमध्ये 4 ते 11 मार्च या काळात सुरक्षा सप्ताह पार पडला. या सप्ताहात मशिनशॉप विभागास अपघात विरहीत काम केल्याबद्दल शून्य अपघात पारितोषिक कंपनीचे जर्मनी येथील व्यवस्थापकीय संचालक डॉ. पीटर फेल्डस यांच्या हस्ते आणि थिसेनक्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलई दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात देण्यात आले. यावेळी कंपनीचे तांत्रिक उत्पादन संचालक सुहास तलाठी, राजेंद्र नागेशकर, रामचंद्र वाईंगडे यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिष गावडे यांनी केले. आभार उदय शिंदे यांनी मानले.
व्हीएस न्यूज -हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त विश्व श्रीराम सेना पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी आकुर्डी येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आकुर्डी फोर्स मोटर्स कंपनीसमोरील मनपा उर्दू हायस्कूलच्या पटांगणावर भरणार असून या रोजगार मेळाव्यात 8वी, 10 वी पास नापास, पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांनी आपला बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी सकाळी 9 वाजता याठिकाणी उपस्थित रहावे. उत्पादन, फार्मसी, फायनान्स, बीपीओ, कॉलसेंटर, आयटी, रिटेल, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, बॅकिंग, ग्रीकल्चर, सिक्युरीटी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत. या बेरोजगार मेळाव्याचा जास्तीतजास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - जे. के. ऑनलाईन सेंटरमध्ये सहाजणांनी कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला. हा प्रकार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला. या प्रकरणातील सर्व आरोपींना हत्यारांसह पकडण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. करण धरमसिंग वाल्मिकी (वय-19, रा. निगडी), प्रशांत नंदकुमार बहुले (वय 19, रा. निगडी), मंगेश सुरेश जाधव (वय 19, रा. निगडी), चंद्रकांत अनंत माने (वय-24, रा. चिंचवडगाव), निखील रामदास साळवे (वय 21, रा. निगडी), प्रतिक आनंद जाधव (वय 23, रा. निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल बालाजी वंगवाड (वय 23, रा. थेरगांव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास थेरगाव येथील जे. के. ऑनलाईन सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करत सेंटरची तोडफोड करून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी सांगवी पोलीस ठाण्याचे तपास पथक सांगवी परिसरात गस्त घालत असताना पिंपळे सौदागर मध्ये पवना नदीच्या शेजारी काशिदपार्क जवळ आर्मीच्या मोकळ्या मैदानात सर्व आरोपी बसल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाने वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करत सापळा रचून लोखंडी कोयत्यासह सहा आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे, तपासी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे, पोलीस हवालदार सुरेश खांडेकर, गिरीश राऊत, रोहिदास बोऱ्हाडे, नितीन दांगडे, अरुण नरळे, शशिकांत देवकांत, हेमंत गुत्तीकोंडा, दीपक पिसे, शिमोन चांदेकर यांनी केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002