व्हीएस न्युज - पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. ८) पिंपरी न्यायालयात व आकुर्डी मनपा न्यायालय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेकडो खटले निकाली काढण्यात आले. आकुर्डी न्यायालयामध्ये न्यायाधिश मे. माधुरी खनवे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार होते. तसेच आकुर्डी न्यायालय लोकन्यायालयाचे उदघाटन ज्येष्ठ विधीतज्ञ सोपान माने यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पिंपरी चिंचवड विभागाच्या अध्यक्षा अॅड. मनीषा महाजन होत्या. यावेळी पिंपरी न्यायालयातील प्रभारी मुख्य न्यायाधीश एस. जी. अग्रवाल, सहन्यायाधीश ए.यु. सुपेकर व सह न्यायाधीश एन. टी. भोसले, पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष अॅड. योगेश थंबा, सचिव अॅड.गोरख कुंभार,महिला सचिव अॅड. स्मिता लांडे पाटील,सहसचिव अॅड. अंकुश एम. गोयल, ऑडीटर अॅड.महेश टेमगिरे, सदस्य अॅड.निलेश ठोकळ,अॅड. सुनील रानवडे, अॅड. पुनम राऊत, अॅड.केशव घोगरे, अॅड.विलास कुटे,अॅड.सुनील कड, अॅड.सुदाम साने , अॅड. सुरज खाडे, अॅड.पद्मावती पाटील, अॅड. निखील बोडके,अॅड. किशोर आरडकर, अॅड. गणेश राऊत, अॅड.संभाजी वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, न्यायालयाबाबतीतील सर्व प्रश्न सोडविण्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वपरीने मदत करेल अशी हमी दिली. पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.सुनील कडुसकर यांनी पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभागी होऊन जास्तीत जास्त खटले निकाली काढावेत असे आवाहन केले.
पॅनल परिक्षक म्हणून अॅड. सागर आडागळे,अॅड. जयश्री कुटे, अॅड. प्रतीक्षा खिल्लारी,अॅड. संगीता कुशालकर, अॅड.मनाली सावंत,अॅड. दिलीप शिंगोटे, अॅड. मोनिका गाढवे,अॅड. शिवाजी महानवर, यांनी काम पाहिले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅड. गोरख कुंभार यांनी केले तर आभार अॅड. महिला सचिव अॅड. स्मिता लांडे यांनी मानले.
व्हीएस न्युज - वडमुखवाडीत एका हॉटेल कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ :३० च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर गवळी (वय २० रा. नानाश्री हाॅटेल, वडमुखवाडी) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी शेखर बाळासाहेब दींडे (वय ३२ नानाश्री हाॅटेल, वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस स्टेशन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजू सखाराम पावडे (वय १९) अनिकेत मानसिंग राजपूत (वय २३) आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर गवळी हा आचारी म्हणून वडमुखवाडीतील नानाश्री हाॅटेलमध्ये कामगार होता. गुरुवारी रात्री ११:३० सुुमारास जेवताना किरकोळ वादातून ज्ञानेश्वर चे आरोपी राजू पावडे अनिकेत राजपूत यांच्या बरोबर भांडण झाले. यामुळे रागाच्या भरात एकाने लोखंडी सळई (राॅड) ज्ञानेश्वर च्या डोक्यात घातली. डोक्यात गंभीर झाल्याने ज्ञानेश्ववर हा जागेवरच मयत झाल्यामुळे आरोपींनी प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने धडापासून शीर वेगळे केले. माञ शरीराचे तुकडे करण्यासाठी वेळ नसल्यामुळे घाबरून त्यांनी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
दिघी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अधिक तपास दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड करीत आहेत.
व्हीएस न्युज - प्रियकराने प्रेयसिला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्या तरुणीसोबत विवाह जमवल्याने प्रेयसिने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
ईश्वरी बाबूराव पोकळे (वय २२, रा. नयन गोविंद गार्डन, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पुष्पा बाबूराव पोकळे (वय ५०, रा. पैठण, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, योगेश गोकूळ सोनावणे (रा. प्रिय अपार्टमेंट, सिडको, रामनगर, औरंगाबाद) या तरुणाविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकर योगेश याने जुलै २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ईश्वरी हिला लग्नाचे आमिष दाखविले. एवढेच नव्हे तर ते दोघेजण पिंपळे गुरव येथे एकाच रुममध्ये राहत होते. मात्र योगेश याने दुसऱ्या मुलीसोबत विवाह ठरवला. याबाबत त्याने ईश्वराला सांगितले. यावर ईश्वरी निराश झाली तिने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.
याप्रकरणी योगेश सोनावणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक अलका सरग अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - भांडणाचा जाब विचारला म्हणून तिघा टोळक्यांनी पती-पत्नीस जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण करुन त्यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. इतकेच नाही तर टोळक्यांनी त्या दाम्पत्याच्या दुचाकीची देखील तोडफोड केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.४) रात्री साडेअकरा ते अडिचच्या दरम्यान पवनानगर गल्ली नंबर ३ आणि २ मजिदसमोर काळेवाडी येथे घडली.
शांताराम एकनाथ काळुळदे (वय ४५) आणि त्यांची पत्नी कल्पना (दोघे.रा. पवनानगर गल्ली नं.२, मजिद समोर) असे जखमी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिपक नाना शेवरे, महेंद्र कोळी आणि राकेश या तिघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक शेवरे, महेंद्र कोळी आणि राकेश यांच्यासोबत फिर्यादी शांताराम काळुळदे यांचा किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणाचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काळुळदे हे आरोपींकडे गेले होते. यावर आरोपी महेंद्र कोळी याने फिर्यादीस, “मी गुन्हेगार आहे तुम्हाला खल्लासच करुन टाकतो” असे बोलून शांताराम यांच्या डोक्यात फायटरने मारुन जखमी केले. यावेळी शांताराम यांच्या पत्नी कल्पना भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता आरोपी राकेश आणि महेंद्र यांनी मिळून कल्पना यांना हाताने जबर मारहाण केली. तसेच रात्री अडीचच्या सुमारास काळुळदे यांच्या घरात घुसून घरातील साहित्य आणि दुचाकीची तोडफोड करुन फरार झाले.
याप्रकरणी शांताराम यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार, तातडीने दिपक नाना शेवरे, महेंद्र कोळी आणि राकेश या तिघा आरोपींना अटक केली. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - पुण्यातील ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या बॅनरचे गूढ उकलले असतानाच आता हडपसरमध्ये ‘जा तू स्वप्नली, मी तुला राहू देणारच नाही’ असे पत्रक ठिकठिकाणी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही भित्तीपत्रके काढली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हडपसर येथे बुधवारी सकाळी भिंतीवर आणि विजेच्या खांबावर पत्रके लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या पत्रकांमध्ये एका तरुणीविषयी आक्षेपार्ह मजकूर असल्याने पोलिसांनी ही पत्रके काढून टाकली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली आहे. पत्रकावरुन आकाश, स्वप्नली आणि शैलेश या तीन नावांचा उल्लेख असून प्रेमभंगातून ही पत्रकबाजी करण्यात आल्याचे दिसते.
काय म्हटलंय पत्रकात ?
‘स्वप्नली आणि मी कॉलेजमध्ये असल्यापासून रिलेशनशिपमध्ये होतो. घरच्यांच्याविरोधात जाऊन आम्ही लग्न देखील केले. पण ती मला काही महिन्यांपूर्वी सोडून गेली. तिचं माझ्या आईशी पटत नव्हते. तिला माझ्या घरच्यांसोबत राहायचे नव्हते. आता ती शैलेश नामक तरुणाशी लग्न करत आहे. ती पैशांसाठी त्याच्याशी लग्न करत असून नवरा- बायकोचं नाते सोडून कोणी जातं का?. जी मला सोडून जातेय ती दुसऱ्याची काय होणार? तू कुठेही जा स्वप्नली मी तुला राहूच देणार नाही’, असे या पत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्युज - चिखली येथील घरकुल प्रकल्पातील सदनिका बांधून तयार असूनही, लाभार्थ्यांना वाटप करण्यास दिरंगाई करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख व रिपब्लिकन युवा मार्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. ४) ताळ्यावर आणले. या आंदोलकांनी सदनिका वाटपाला विलंब का होतोय? याचा जाब विचारला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकाऱ्यांनी ९ इमारतीतील ३७८ सदनिका लाभार्थ्यांना हस्तांतरासाठी त्वरित कार्यवाही सुरू करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले. दहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम पूर्ण करत नसलेल्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी अजिज शेख यांनी केली. परंतु, सहशहर अभियंता राजन पाटील यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्यामार्फत आंदोलकांना घरकुल प्रकल्पाच्या कामाला ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे लेखी उत्तर देऊन पळवाट शोधली.
पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत केंद्र सरकारच्या बीएसयुपी योजनेअंतर्गत चिखली येथे घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना हक्काची घरे देण्याचा उद्देश आहे. २००८ पासून सुरू असलेली ही योजना अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. दहा वर्षांत काही लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आलेले आहे. परंतु, अनेक लाभार्थी अजूनही हक्काचे घर कधी मिळणार याकडे गेल्या दहा वर्षांपासून टक लावून पाहत आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेले लाभार्थींनी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन कार्यालयात तसेच कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी वेगवेगळ्या बँकेत, शासनाचे विविध दाखले मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात, नागरी सुविधा केंद्र, तहसिल कार्यालय यांसह इतर अनेक शासकीय कार्यालयात चकरा मारल्या आहेत. या सर्व कार्यालयांची उंबरे झिजवल्यानंतर शेवटी कुठे तरी जाऊन हे लाभार्थी पात्र ठरले आहेत. तरीही या पात्र लाभार्थींना गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या स्वप्नाचे घर काही मिळत नाही. पात्र लाभार्थ्यांनी बँकेचे घेतलेले कर्ज महापालिकेला जमाही झाले आहे. मात्र घर नसूनही हे लाभार्थी बँकांचे कर्जाचे हप्ते फेडत आहेत.
या प्रकल्पांतर्गत काही सदनिका बांधून तयार असूनही त्याचे लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांनी लाभार्थ्यांना सदनिकांचे त्वरित वाटप सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले होते. त्यानुसार अजिज शेख व रिपब्लिक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर मंगळवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता आंदोलन केले.
सहशहर अभियंता राजन पाटील यांनी आंदोलकांना दुपारी साडेतीन वाजता चर्चेसाठी बोलावले. आयुक्त हर्डीकर यांच्या कक्षात ही चर्चा झाली. यावेळी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी व इतर अधिकारी उपस्थित होते. सदनिका बांधून तयार असताना त्या वाटप का केल्या जात नाहीत?, असा सवाल समाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांनी केला. सदनिका वाटपासाठी स्थापत्य आणि झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे अधिकारी एकमेकाकडे बोट दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सदनिका वाटपाचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांनी प्रकल्पाच्या ९ इमारतीतील ३७८ सदनिका तयार असून त्या लाभार्थ्यांना हस्तांतर करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर अजिज शेख यांनी घरकुल प्रकल्पाचे दहा वर्षांपासून काम पूर्ण होत नसल्याबद्दल सहशहर अभियंता राजन पाटील यांना फैलावर घेतले. आंदोलकांच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावे, हेच त्यांना समजत नव्हते. अजिज शेख यांनी प्रकल्पाचे काम पूर्ण न करणाऱ्या मे. पवार-पाटकर या ठेकेदार कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी केली. परंतु, राजन पाटील यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्यामार्फत आंदोलकांना घलकुल प्रकल्पाच्या कामाला ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे लेखी उत्तर देऊन पळवाट शोधली.
व्हीएस न्युज - मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरण्याच्या संशयावरून एका तरूणाला अटक करून बेदम मारहण करत विजेचा शॉक देऊन त्याच्याकडून ८ लाख रूपये उकळणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या सहकाऱ्यावर आज (शनिवार) पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या दोघांवर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. रमेश नाळे आणि हेड कॉन्स्टेबल राजू केदारी असे निलंबित केलेल्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी आहेत. याना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश नाळे आणि राजू केदारी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी (दि.३०) दिले होते. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
व्हीएस न्युज - पिंपरीत अश्लील फोटोच्या आधारे संगणक अभियंता असणाऱ्या तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार केल्याची आणि फ्लॅटचा अर्धा हिस्सा बळकावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीने सांगवी पोलिसांकडे तक्रार दिली असून बलात्कार करणाऱ्या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कृत्यात नराधमाला त्याच्या पत्नीचीही साथ होती, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
पीडित तरुणी ही गेल्या आठ वर्षांपासून तरुण उर्फ शिबू सिद्दीकी याला ओळखते. शिबूने या ओळखीचा गैरफायदा घेत पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. या आधारे तो तरुणीला ब्लॅकमेल करु लागला. त्याने पीडितेवर बलात्कार केला. तसेच पिंपळे सौदागरमधील तिचे राहते घरही बळकावले. त्याने फ्लॅटचा अर्धा हिस्सा बक्षीस पत्राद्वारे नावावर करून घेतला आहे. या कृत्यात त्याला पत्नी रक्षी शिबु सिद्दीकीचीही साथ होती. या घटनेची बाहेर वाच्यता केल्यास ठार मारु अशी धमकीही त्याने पीडितेला दिली होती. मात्र, हे अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने शेवटी सांगवी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पीडित तरुणी ही गेल्या काही वर्षांपासून हिंजवडीमधील आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत आहे. तर आरोपी दाम्पत्य हे मूळचे उत्तर प्रदेशमधील गोविंदपूरचे रहिवासी आहेत. या प्रकरणी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग या अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - पती आणि सासरच्या व्यक्तींना कंटाळून किंवा सासूच्या छळाला कंटाळून सुनेने आत्महत्या केली अशा अनेक घटना आपण वाचल्या असतील. परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
पत्नी तृप्तीला दारू आणि शॉपिंगचे व्यसन होते. त्यामुळे तिला नेहमी पैसे खर्च करावे लागत. मयत पती जयकडे पैशांसाठी ती नेहमी तगादा लावत असे. पैसे दिले नाही तर तृप्ती जयला मारहाण करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.तृप्तीला चिखली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. जय देविदास तेलवानी (वय -३५) असं आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर तृप्ती जय तेलवानी असं आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या पत्नीचे नाव आहे.
तृप्तीला दारू आणि शॉपिंग चे व्यसन होते त्यामुळे तिला नेहमी पैसे खर्च करावे लागत. आरोपी तृप्तीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जयची आई कांचन देविदास तेलवानी यांनी चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की,नोव्हेंबर महिन्यात मयत जय देविदास तेलवानी याने पत्नीच्या छळाला कंटाळून आपले जीवन संपविले होते. त्यानंतर जयच्या कुटुंबाने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे असा आरोप करत चिखली पोलिसात सुनेविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार चिखली पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात सून तृप्ती जय तेलवानी ही दोषी आढळली आहे.
पती-पत्नी हे गेल्या काही वर्षांपासून आई वडीलांपासून स्वतंत्र राहतात. जय हा प्लंबरचे काम करायचा तर तृप्ती गृहिणी होती. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. संसार सुखाचा सुरू असताना पत्नीला दारूचे व्यसन लागले. तसेच ती मोठ्या प्रमाणावर शॉपिंग करत होती. पती जयला पैशांसाठी तगादा लावायची, यासाठी तिने एकदा कर्जाचे पैसे काढायला भाग पाडले होते. पैशांची पूर्तता न केल्यास तृप्ती जयला शिवीगाळ करत मारहाण करायची. पुढे चालून तिने स्वतःआत्महत्या करण्याची धमकी जयला दिली होती.
जय पूर्णतः मानसिक तणावाखाली आला होता. तृप्तीने जयला कँसर असल्याचा व्हिडीओ बनवला आणि तो सगळ्या मित्रांना दाखवून मानसिक आणि शारिरीक छळ सुरू ठेवला. याच तणावातून जयने नोव्हेंबर महिन्यात आत्महत्या करत जीवन संपविले. दरम्यान, आता त्याच्या पाच वर्षीय मुलाला आजीकडे राहावं लागतं आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
व्हीएस न्युज - वडिलांकडून दिड लाख रुपये उकळण्यासाठी एका तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आणि खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे.
याप्रकरणी विनय राजेंद्र चव्हाण (वय २२, रा. गंधर्वनगरी, तापकीरनगर, मोशी) या तरुणाला ताब्यात घेण्यात आला आहे. त्याचे वडिल राजेंद्र किसन चव्हाण (वय ५३) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२८ नोव्हेंबर) सायंकाळी पावनेसहाच्या सुमारास विनय चव्हाण या तरुणाने घरातून निघून जाऊन स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. त्यानंतर वडिलांच्या मोबाईल नंबरवर हिंदी भाषेत मेसेज करुन अपहरण करता बोलत असल्याचे भासवून दीड लाख रुपयांची खंडणी मागली. तसेच पैसे न दिल्यास आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यास मुलाला मारुण टाकण्याची धमकी दिली. यावर विनय याचे वडिल राजेंद्र यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आणि खंडणी विरोधी पथकाने एकत्रीतरित्या तपास चक्र फिरवत तांत्रिक माहितीच्या आधारे धमकीचा मेसेज आलेला मोबाईल नंबर ट्रेस केला. मोबाईलचे लोकेशन मुंबईतले दाखवत होते. त्याआधारे पोलीसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले त्यांनी सीएसटी रेल्वे स्थानकावर शोध घेत असता त्यांना विनय तेथे आढळून आला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने स्वत:च अपहरणाचा बनाव रचल्याचे कबुल केले. तसेच रेल्वे प्रवासात एकाचा मोबाईल चोरुन त्याव्दारे वडिल राजेंद्र यांना मेसेज करुन धमकावल्याचेही सांगितले. पोलिसांनी विनय याला ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ एखच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पोलीस उपनिरीक्षक चाटे, हवालदार रविंद्र तिटकारे, लिंभोरे, दिपक महाजन, स्वप्नील लांडगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कलाटे, नवनाथ पोटे, करन विश्वासे, विशाल काळे, तसेच खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार महेश खांडे, काटकर, सागर शेंडगे, पुलगम यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या एकूण ३३ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. सुभाष आसाराम तौर (वय २५, रा. माऊली कृपा निवास, वडगाव रोड, आळंदी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची दुचाकी विक्रीसाठी एकजण भोसरीत येणार असल्याची पोलिस हवालदार उत्तम कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा राहून आरोपी सुभाष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून तब्बल ३३ वाहने चोरल्याचे सांगितले.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे, उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस कर्मचारी उत्तम कदम, जी. एन. हिंगे, एस. देवकर एस. एल. रासकर, एस. बी. महाडिक, एस. वाय, भोसले, बी. व्ही. विधाते, व्ही. डी. गाडेकर, फुले, ए. एम. गोपी सी.एस. साळवे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
व्हीएस न्युज - पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने गरीब मुला-मुलींच्या वस्ती शाळेत महात्मा फुले यांची १२४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. वक्ते म्हणून प्रा. संपत गर्जे यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे महाराष्ट्रातील एक कृतीशील थोर समाजसुधारक व क्रांतिकारक विचारवंत होते. समाजजीवनातील पारंपरिक जुन्या चालीरीती, वर्णव्यवस्था व गुलामगिरी यांच्याविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करुन त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची कल्पना समाजाला समजावून सांगितली. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य अनमोल आहे. शेतकरी,शेतमजूर इत्यादींच्या जीर्णोध्दारांच्या कार्यासाठी या उभयतांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला.
याप्रसंगी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक/अध्यक्ष अरुण पवार, नगरसेवक गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते वामन भरगंडे, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, शिवाजी सुतार, नवेश पाटील, बाळासाहेब साळुंके, अभिमन्यु गाडेकर, माधव मनोरे, मारुती बानेवार, विजय देवकर, संपत गर्जे, सखाराम जोशी, दिनेश गाडेकर, कृष्णाजी खडसे, श्री. कुंदे सर, श्रीनिवास पानसरे, सुनील शिंदे, नामदेव गुट्टे, राजेश गाटे, गोटके व्ही.एल, बाळासाहेब चितळकर, नारायण वळसे, शंकर तांबे, चव्हाण पी.एल, पी.जी.तोरवणे आदी उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002