अमित मेश्राम यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड
व्हिएस न्युज - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या राष्ट्रीय कार्यकारिणी व केंद्रीय महासभा प्रतिनिधींची 10 नोव्हेंबर 2019 रोजी भोपाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 26 राज्यातील 200 हून जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वांनुमते दिपकभाऊ निकाळजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि महासचिव पदी डॉ. मोहनलाल पाटील निवड करण्यात आली. अशी माहिती पार्टीचे महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे दिली. शुक्रवारी (दि. 29 नोव्हेंबर) चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय संघटक सुनिल खांबे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम, महाराष्ट्र कार्यालय प्रमुख बप्पा शिंदे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सिना अमित छाजेड आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी सांगितले की, आमचा पक्ष देशातील 28 राज्य आणि 9 केंद्र शासित प्रदेशात कार्यरत आहे. पुढील दोन वर्षात देशातील चार ते पाच राज्यांमध्ये विधानसभा तसेच महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांनंतर 25 हून जास्त महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक निवडणूका आहेत. सर्व राज्यात लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणूकांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी पक्ष संघटना बांधणी करण्यात येत आहे. यामध्ये युवक व महिलांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात होणा-या सर्व निवडणूकांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करण्यात येतील. निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्राचे नेतृत्व युवकांनी करावे अशी मागणी होती. अमित मेश्राम यांचे संघटन कौशल्य पाहून त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय संघटक पदावर सुनिल खांबे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात आघाडी किंवा युती बरोबर जावे की नाही, याबाबत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करुन निर्णय घेऊ असे निकाळजे यांनी सांगितले. पा
महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) या राष्ट्रीय पक्षाची स्थापना 27/07/1990 रोजी भारत निवडणूक आयोगाकडे (क्र.56/6/90/1732/5303/35) करण्यात आली आहे. याबाबतची सर्व माहिती www.republicanpartyofindia.co.in या वेबसाईटवर आहे. पक्षाचे नोंदणीकृत केंद्रीय कार्यालय 1/16, संजय कॉम्प्लेक्स, टी टी नगर, मध्यप्रदेश भोपाळ 03 येथे आहे. 1990 पासून 2009 पर्यंत श्री एस.एस. भारती, श्री राजकुमार भारती, डॉ. मोहनलाल पाटील यांनी अध्यक्षपदावर आणि महासचिव पदावर श्री रामसिंग, श्री जंगेराम तँवर, श्री बी.के.गुप्ता यांनी काम पाहिले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे 2009 ते 2018 या कालावधीत या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तर डॉ. मोहनलाल पाटील महासचिव होते.
रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नावाचा नविन पक्ष स्थापन केला आहे. याबाबतचे नोंदणी पत्र भारत निवडणूक आयोग यांच्या वतीने मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी 19 मार्च 2019 (F. No.56/350/LET/ECI/FUN/PP/PPS-I/2018/11) प्रसिध्द केले आहे.
व्हिएस न्युज - थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले हे मानवी हक्कांसाठी अहोरात्र झगडले, जोतीरावांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता (भाऊपणा व बहीणपणा), शिक्षण, जातीनिर्मुलन, स्त्री-पुरुषसमता, शेती व शेतकरी यांचा सर्वांगीण विकास, महिला, अनुसूचित जाती, आदिवासी, भटके विमुक्त इतर मागासवर्गीय यांचे सामाजिक संघटन, मानवी हक्कांसाठी जागृती आणि संघर्ष यासाठी अभूतपुर्व योगदान दिले, असे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर कविचंद भाट यांनी सांगितले.
थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि. 28 नोव्हेंबर) पिंपरीतील महात्मा फुले यांच्या पुर्णाकुती पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने माजी महापौर कविचंद भाट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, भाऊसाहेब मुगूटमल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, सुनिल राऊत, व्हि.जे. खंडाळे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, गौरव चौधरी, कादीर खान, ॲड. मोहन आडसुळे, हिरामण खवळे, सचिन नेटके आदी उपस्थित होते.
भाट म्हणाले की, महात्मा फुलेंना शिक्षणविषयक कामाला प्रतिगामी विचारांच्या मंडळीनी खूप विरोध केला. तरीही जोतीराव व त्यांचे सहकारी डगमगले नाहीत. वडिलांनी सामाजिक विरोधामुळे जोतीरावांना घराबाहेर काढले. त्यांचे मित्र उस्मान शेख यांच्या घरी राहून जोतीराव व सावित्रीबाईंनी आपले शिक्षणाचे ‘मिशन’ चालू ठेवले. त्यांचा ध्येयवाद आणि त्यांची तळमळ अजोड होती. सावित्रीबाईंना फातिमा शेख, गणू शिवाजी मांग व धूराजी आप्पाजी चांभार या शिक्षकांनी सहकार्य केले. या शैक्षणिक चळवळीत लहूजी वस्ताद साळवे आणि राणबा महार, तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे आणि सहकारी सहभागी होते.
1855 साली त्यांनी पुण्यात गंज पेठेत (महात्मा फुले पेठ) राहत्या घरी देशातील पहिले प्रौढ साक्षरता वर्ग सुरु केले. ही साक्षरता अभियानाची सुरुवात होती. मुलामुलींच्या शैक्षणिक गळतीच्या मुळाशी दारिद्रय, पालकांची निरक्षरता, अंधश्रध्दा, शिक्षणापासून काय लाभ व सुखे असतात याचा परिचय नसणे आदी कारणे असल्याचे सांगून ती दूर करण्यासाठी त्यानी उपाय योजले. ते गरीब मुलामुलींना विद्यावेतन देत असत. शिक्षणातून जीवनातील खरे-खोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे. हा त्यांचा आग्रह होता. ‘दि पूना ऑब्झर्व्हर ॲण्ड डेक्कन वीकली’ या वृत्तपत्राने त्यांचे काम म्हणजे ‘भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय’ असे वर्णन केले होते. त्यावेळी मुलींच्या शाळांच्या परीक्षा बघायला पूना कॉलेजच्या प्रांगणात 3,000 हून अधिक लोक जमले होते आणि त्याहून अधिक गर्दी बाहेर होती असे वर्णन शिक्षणखात्याच्या अहवालात मिळते.
जोतीरावांनी शिक्षणाच्या झिरपत्या सिध्दान्ताला विरोध केला आणि समाजातल्या तळागाळापासून शिक्षणाची सुरुवात केली पाहिजे याचा आग्रह धरला. विधवांना त्या काळात पुनर्विवाहाची बंदी होती. केशवपन करावे लागत होते. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन विधवाविवाह घडवून आणले आणि केशवपन करु नये यासाठी नाभिक बांधवांचे प्रबोधन करुन त्यांचा केशवपनविरोधी संप घडवून आणला. विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी 1863 साली त्यांनी स्वत:च्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह काढले.
स्वत:च्या घरातील पाण्याची विहीर त्यांनी पूर्वास्पृश्य बांधवांसाठी खुली केली. सत्यशोधक विवाह पध्दतीची सुरुवात करुन हुंडा, लग्नातील डामडौल व अमाप खर्च यांना प्रतिबंध केला. कमी खर्चातील सत्यशोधक विवाह घडवून आणले. या लग्नातील मंगलाष्टकांमध्ये स्त्रियांच्या ‘मानवी अधिकारासाठी’ झटण्याची शपथ नवरा मुलगा घेत असल्याचे मनूद केले. 140 वर्षापूर्वी आपला ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील निग्रोंच्या मुक्ती चळवळीला अर्पण केला होता.
जोतीरावांनी ‘शेतक-याच्या आसुड’ या ग्रंथात 1883 साली शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र प्रकाशित केले. शेतीचे शिक्षण, संकरित बियाणे, अवजारे, पीकपध्दती, शेतीला जोडधंदे, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेव्दारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आधुनिक पध्दतीने करण्यावर त्यांनी भर दिला. शेतीमालाला ‘उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव’ मिळाले पाहिजेत याचा त्यांनी आग्रह धरला, अशा नोंदी महात्मा फुले समग्र वाड्.मयात आहेत.
महात्मा फुले यांच्या शिक्षण, शेती, सामाजिक समता, सत्यशोधक समाज या कार्याविषयी आजच्या युवा पिढीने माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले साहित्य अभ्यासावे अशी अपेक्षा कविचंद भाट यांनी यावेळी व्यक्त केली.
व्हिएस न्युज -मराठी पत्रकार परिषद संलग्न व पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील दोन वर्ष कार्यान्वित राहणार आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष तुळशीदास शिंदे, प्रवीण शिर्के, सरचिटणीस मारुती बाणेवार, सहचिटणीस संजय बोरा, खजिनदार विनय लोंढे, समन्वयक विनायक गायकवाड, कार्यकारणी सदस्य सुनील कांबळे, माधुरी कोराड, दिनेश दुधाळे तसेच पत्रकार हल्ला कृती समिती पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून अनिल भालेराव आणि पुणे जिल्हा प्रतिनिधीपदी दादाराव आढाव यांची निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कै. भा. वि. कांबळे पत्रकार कक्षात गुरुवारी (दि. 21) आयोजित केलेल्या बैठकीस पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, गणेश हुंबे, माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अरुण उर्फ नाना कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.
व्हिएस न्युज - पतीपासून ती तब्बल चार वर्ष दूर होती. या कालावधीत तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यु झाला. मात्र, काही दिवसांपुर्वीच पतीने तिला सासरी बोलावले. आता पतीला पोटची मुलगी दाखवायची कशी ? यावर उपाय म्हणून तिने एका महिलेच्या साथीने रविवारी चक्क एका सोसायटीतील पाच वर्षांची मुलगी पळवून नेली. या धक्कादायक प्रकाराबाबत खबर मिळताच विमानतळ पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवून अवघ्या आठ तासातच दोन्ही महिलांना बेड्या ठोकून मुलीची सुखरूप सुटका केली.
रविवारी दुपारी तीन ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास लोहगावच्या निंबाळकर नगरमधील प्राईड आशियाना सोसायटीतील शिवाजी चांदमाने यांची पाच वर्षांची मुलगी घराच्या मागील बाजुस खेळत होती. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने मुलीस कशाचे तरी आमिष दाखवून मुलीला पळवून नेले. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या
प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बळवंत मांडगे यांच्या मागर्दशनाखालील पथकाने तपासाला सुरूवात केली. गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व बाजुंनी आरोपींची माहिती काढली. त्यामध्ये जयश्री शिवाजी कोळी (वय 26), हिराबाई उर्फ बायडाबाई भानुदास खंडाळे (वय 55, रा. माईचा वाडा, कात्रज) यांची नावे उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन सोलापुर गाठले. तेथील हैद्राबाद रोडवरील भवानी पेठेमध्ये खड्डा रघुजी ट्रान्सपोर्ट येथून दोघींना अटक केली.
पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, पोलिस कर्मचारी अविनाश शेवाळे, विशाल गाडे, विश्वनाथ गोणे, संजय आढारी, राहूल मोरे, विनोद महाजन, प्रशांत कापुरे, नाना कर्चे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
..म्हणून केले मुलीचे अपहरण !
जयश्री काळे हिला दोन मुले व एक मुलगी होती. चार वर्षांपासून ती पतीपासून वेगळी राहात होती. जुलै 2019 मध्ये काळे ही नातेवाईकांसमवेत कात्रज येथे राहू लागली.दरम्यान, तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यु झाला. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या पतीने तिला सोलापुरला पुन्हा माघारी बोलाविले. आता पतीला मुलगी कशी दाखविणार ? म्हणून तिने हिराबाई खंडाळे हिच्या मदतीने लोहगाव येथून पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याचे चौकशीत सांगितले
व्हिएस न्युज - वडील व बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे.
शुभम गजानन मोहिते असे अटक झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी शुभम हा पुण्यातील मोटार वाहन परिवहन विभागात कार्यरत आहेत. शुभम याने फिर्यादी महिलेला लग्नाची मागणी घातली. त्यास महिलेने नकार दिला असता त्याने महिलेच्या वडीलांना व बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत महिलेशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर महिलेने आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता आरोपीने त्यास नकार दिला. तसेच याबाबत तक्रार केल्यास महिलेचे वडील व बहिणीची सरकारी नोकरी घालविण्याचीही धमकी दिली. द
याबाबत महिलेने आरोपीची आई व बहिणीस सांगितले असता त्यांनी महिलेस वाईट वागणूक दिली. यासह आरोपीने फिर्यादी महिलेशी जातीवाचक संभाषण केल्याने आरोपीवर अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिएस न्युज - औद्योगिक क्षेत्रात लागू झालेल्या नीम (नॅशनल एम्प्लॉएबिलिटी एन्हेन्समेंट मिशन) या योजनेत कामगारांच्या मुलभूत हक्कांवर गदा येत असून त्यांचे शोषण होत आहे. या योजनेविरोधात देशातील कामगार संघटनांनी विरोध केला असून श्रमिक एकता महासंघाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. संघटनेच्या या लढयास माझा पाठिंबा आहे. कामगारांना त्यांचे मुलभूत हक्क मिळाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी (दि. 12) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केले. औ
क्षेत्रात काम करणा-या कामगारांना भविष्य निर्वाह निधी आणि अन्य सुविधा मिळाव्यात यासाठी खा. साबळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि कामगारांना भविष्य निर्वाह निधी लागू करावा याचे आदेश दिले. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार, कार्याध्यक्ष संतोष कणसे, सचिव मनोज पाटील, मार्गदर्शक मारूती जगदाळे, नगरसेवक केशव घोळवे, माऊली थोरात, अरविंद श्रौती, ॲड. नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते. खा
साबळे म्हणाले, श्रमिक एकता महासंघाने नीम योजनेमुळे कामगारांचे हाल, शोषण याची व्यथा आपल्या पुढे मांडली. तसेच मी स्वतः कामगार मंत्रालयाच्या समितीवर असल्यामुळे देशातील अनेक कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांची प्रत्यक्ष भेट घेतली. नीम योजनेमुळे कामगारांचे शोषण होत आहे. त्यांना सामाजिक सुरक्षा, मुलभूत हक्क मिळत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवाल तसेच संबंधित अधिका-यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यामुळे भविष्य निर्वाहनिधी विभाग आणिा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांना या प्रश्नी कारवाई करणे भाग पडले. तर दि. 12/2/2019 ला भविष्य निर्वाह निधीचे अतिरिक्त आयुक्त जगमोहन यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नीम अंतर्गत नेमणूक केलेल्या प्रशिक्षणार्थींना कर्मचारी म्हणून संबोधण्यात यावे, त्यांना पीफ कायद्यानुसार सर्व फायदे देण्यात यावे असे आदेश दिले. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असे ही बजावण्यात आले, असल्याचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी सांगितले.
अरविंद श्रौती म्हणाले, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वतीने कौशल्य विकास विभागाचे निर्देशक कैलाश बन्सल यांनी सर्व नीम ठेकेदारांना पत्र पाठविण्यात आले असून नीम योजना केवळ प्रशिक्षण देण्यासाठी असल्याचे नमुद केले आहे. तसेच याव्दारे कामगारांचे शोषण होत अल्यास ठेकेदारांची नोंदणी रद्द केली जाईल असे निर्देश दिले आहेत, असे श्रौती यांनी सांगितले. श्रमिक एकता महासंघाने केलेल्या सर्वेक्षणात एकट्या पुणे जिल्हयात नीम योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी कामगारांची संख्या सुमारे 2 लाख आहे. देशाचा विचार केल्यास हीच संख्या कोटींच्या घरात आहे. कामगारांच्या अन्य प्रश्नांवर खा. साबळे यांच्या सहकार्याने योग्य तो तोडगा निघेल, असा विश्वास महासंघाचे सल्लागार नगरसेवक केशव घोळवे यांनी व्यक्त केला.
व्हिएस न्युज - विधवांना संपत्तीमध्ये पुरुषांप्रमाणेच समान हक्क मिळावा यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी काम केले. स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाल्यामुळे ब्रिटीशांनी त्यांना अहमदनगर येथील तुरुंगात ठेवले. तेथे त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात नेहरूंनी सिंधु सभ्यतेपासुन, भारताचे स्वातंत्र्य, भारतीय संस्कृती, धर्म आणि संघर्षाचे वर्णन केले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 14 नोव्हेंबर) आकुर्डी प्राधिकरणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे यांच्या हस्ते पंडीत नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, ज्येष्ठ नेते हरिदास नायर, सुदाम ढोरे, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, ज्येष्ठ नागरीक सेलचे उपाध्यक्ष लक्ष्मण रुपनर, दिलीप पांढरकर, हुरबानो शेख, मिना गायकवाड, संदेश बोर्डे, दिपक जाधव, निर्मल तिवारी, हिरामण खवळे, सचिन नेटके, सुनिल राऊत, गौरव चौधरी, भाऊसाहेब मुगूटमल, भास्कर नारकडे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, भारत देशाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी ‘भारतीय स्वातंत्र्य लीग’ ची स्थापना केली. परदेशात शिक्षण घेत असताना आर्यलंड मध्ये झालेले सिन फेन आंदोलन त्यांनी जवळून पाहिले होते. त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेऊन ब्रिटिश साम्राज्यापासून भारत मुक्त करण्याचे ध्येय घेऊन स्वातंत्र्य संग्रामात स्वत:ला झोकून दिले. 1920 साली शेतक-यांसाठी त्यांनी प्रथम उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात किसान मोर्चाचे आयोजन केले, त्यानंतर असहकार चळवळ आणि मिठाचा सत्याग्रह आंदोलनात त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा प्रतिनिधी म्हणून परदेशात अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. सायमन कमिशनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केले. 29 ऑगस्ट 1928 रोजी त्यांनी सर्वपक्षीय परिषदेत भाग घेतला आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या भारतीय घटनात्मक सुधारणेवरील नेहरू अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक होते. असे साठे यांनी सांगितले.
स्वागत मयूर जयस्वाल, सुत्रसंचालन गौरव चौधरी आणि आभार मकरध्वज यादव यांनी मानले.
व्हिएस न्युज - पुणे-पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघातून नवनिर्वाचित आघाडीचे आमदार संजय जगताप यांची सांगता सभा श्री काळभैरवनाथ मंदीर प्रांगणात झाली.मतदारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी देशाचे लोकनेते शरदचंद्र पवार , माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ,बारामतीच्या लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचे विशेष म्हणजे आभार मानले. तसेच मतदरसंघातील कार्यकर्ते ,सहकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, व उपपस्थितांचे आभार मानले.
या दरम्यान ते म्हणाले की "हवेली- पुरंदर भागातून मला खूप उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. माझेकडे बोलायला शब्द नाहीत. यवेळी बोलताना ते भावुक झाले ते म्हणाले,ज्यावेळेस माझ्या आई मतदान केंद्रात आल्या, तेव्हा काकांची कमतरता मला जाणवली असे सांगताना ते भावूक झाले. आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. परंतु मोठ्या प्रेमाणे आपण सर्वांनीच आदरणीय काकांची जागा,तेथे माझ्या पाठीवर थाप देऊन भरून काढलीत . मी सर्वाना शब्द देऊन सांगतो की , हे क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. मी जरी आमदार झालो तरी तुम्ही आमदार झाले आहात. तन ,मन ,व धनाने मी तुमचे सोबत असेन प्रत्येक घरातील मी कुटुंब सदस्य राहील. अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिलीे."
नुकतेच निधन पावलेले कै.विलासभाऊ कामथे यांनी १००० मतांची आघाडी मिळवून दिली असेही त्यांनी आवर्जून सांगितले. मी आज तुमचेेसाठी केवळ सरच आहे व तुम्ही माझेसाठी सर्व आमदार आहात. पुरंदर हवेली, सासवड,जेजुरी सर्वाना एकी दाखवली. याबद्दल त्यांनी सर्वांचेच आभार मानले व सभेची सांगता झाली. प्रचंड जनसमुदाय , महिला, युवक सगळीकडे आनंद अगदी ओसंडून वाहत होता.
एकाच ठेक्यावर ताल धरून विशेष म्हणजे महिला, अबाल वृध्द, युवक जोश पूर्ण ताल धरत बेभान नाचत असलेचे चित्र दिसत होते. सर्व वातावरण संजयमय झाले होते. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमुळे हे शक्य झाल्याची चर्चा व नवनिर्वाचित आमदार संजय सर यांचे उल्लेखनीय कार्य तसेच शेकाप,जनतादल ,मनसे आदी सर्वांनीच एकदिलाने काम केलेमुळे सरांना यश प्राप्त झाले, असे विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, डॉ . दिगंबर दुर्गाडे , अँँड.कलाताई फडतरे, संजय चव्हाण, नंदकुमार सागर, संजय हरपळे, सुदाम आणा इंगळे, शेकापचे दिलीप गिरमे, सुहास लांडगे, अॅड. सुरेश फडतरे , दत्ताशेठ झुरंगे, आदी मान्यवर उपस्थीत होते.
व्हिएस न्युज - पिंपरी गाव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोमवारी (दि. 21) सव्वाबाराच्या सुमारास विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असताना पिंपरीतील मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून थांबल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेशकुमार मुन्नीलाल चौरसिया (वय 28), जितेंद्र कुमार रामकेस चौरसिया (वय 30), अजित सारदा शर्मा (वय 28), दीनानाथ रामकेस निसाद (वय 19), राहूल जितेंद्र यादव (वय 20), रोहीत रामबच्चन यादव (वय 20), सुमन मोहनराम कुमार (वय 19), विनोद सीताराम पाल (वय 21), वीरेंद्र रामविलास पाल (वय 24), यशवंत गुलजारी पासवान (वय 35), कुलदीप चंद्रभोकनसिंग कुमार (वय 19), अखिलेश कुमार सुरजबाबू (वय 24), अनिल कुमार शंकर यादव (वय 23), पवनकुमार लालबाबू गौतम (वय 23), दिलीप गंगाधर भोर (वय 20), अनिल धन्नू जाधव (वय 25, सर्व रा. कस्पटे वस्ती, वाकड). अरबाज जुबेर सय्यद (वय 20), संतोष राम जाधव (वय 22), वैभव श्रीमंत नरवडे (वय 20), गजानन सुभाष जाधव (वय 20), गणेश अनिल अवसरे (वय 20, रा. काळेवाडी फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक काळात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करून आरोपींनी पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. याठिकाणी मतदान केंद्र होते. पोलिसांनी त्यांना त्याठिकाणावरून जाण्याची विनंती केली होती. तरीही, त्यांनी त्याठिकाणी गर्दी जमवली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहित कलम 188 आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
व्हिएस न्युज - अमेरिकेतील स्वाहिली विद्यापीठाच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई पाटील यांना ‘व्यवसाय व्यवस्थापन’ विषयात मानद डॉक्टरेट ऑफ आर्ट्स ही पदवी देऊन गौरवण्यात आले. विद्यापीठाच्या वतीने गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात पदवीप्रदान समारंभ झाला.
सौ. भाग्यश्रीताई पाटील यांचे शिक्षण, आरोग्य सेवा, बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन आणि फ्लोरीकल्चर तसेच महिला सबलीकरण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. या क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान आणि भावी पिढीला प्रेरणा देण्यात त्यांनी बजावलेली भूमिकेची विशेष दखल स्वाहिली विद्यापीठाने घेतली.
पिंपरी येथे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व संशोधन केंद्र स्थापन करण्यात त्यांचा पती डॉ. पी.डी पाटील यांच्यासह मोठा वाटा आहे. या रुग्णालयास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत खाजगी क्षेत्रातील रूग्णालयामध्ये "कायाकल्प पुरस्कार 2019" देऊन देशातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून घोषित केले. उच्च प्रतीची रुग्णसेवा या जनहितार्थ विनामूल्य व काही सेवा या रुग्णालयात माफक शुल्कात दिल्या जातात.
शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सौ. भाग्यश्रीताई पाटील यांनी 2004 मध्ये ‘राईझ एन शाइन बायोटेक’ कंपनीची स्थापना केली गेली. या कंपनीच्या त्या व्यवस्थापकीय संचालिकाही आहेत.
आयएसओ 9001-2015 मानांकीत ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वनस्पतींची जगभरातील 30 हून अधिक देशांना निर्यात करते. यामध्ये मोठ्या आणि सुसज्ज टिशू कल्चर प्रयोगशाळेतही गुंतवणूक केली गेली आहे जी वर्षाला 40 दशलक्षाहून अधिक रोपे तयार करते. सौ. पाटील यांचा महिला सक्षमीकरणावर विश्वास आहे. थेऊर येथे ग्रामीण भागातील 95 टक्के महिला नोकरी उपलब्ध करून दिली आहे आणि त्यांना उत्पादन प्रक्रियेत तांत्रिक प्रशिक्षण दिले. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी. “बचतगट” सारख्या विशेष योजना सुरू केल्या आहेत.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील पदाधिकारी कर्मचारी वर्ग यांनी सौ भाग्यश्री ताई पाटील यांचे अभिनंदन केले आहे
व्हिएस न्युज - सासवड-पुरंदर-हवेली या विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे लोकप्रिय उमेदवार संजय चंदुकाका जगताप यांना त्यांच्या मतदारसंघातील युवक, महिला भगिनींचा आणि वयोवृद्दांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे.
आघाडी झाल्यापासून पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढलाय,संजय जगताप यांना राष्ट्रवादीचे भक्कम पाठबळ आहे आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला कौटुंबिक वारसा लाभलेले आहे.
संजय जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून लोकसेवा करीत आहेत.त्यांच्या गेल्या १५ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत मतदारसंघातील तरुणपिढी आणि महिला भगिनींनी संजय जगताप यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. सासवड पुरंदर हवेली येथून आमदार महाआगाडीचाच होणार असा विश्वास अनेक महिलांनी व्हिएस न्युज प्रतिनिधी सुजाता गुरव यांच्याकडे व्यक्त केला.
संजय जगताप यांनी सत्ता नसताना देखील अनेक तरुणांना नोकरीसाठी सहाय्य केले आहे. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची त्यांची धडपड पाहून तरुण पिढी त्यांच्या पाठीशी आहे. महिलांसाठी बचत गट, स्वयंरोजगारासाठी कर्जसहाय्य अनेक दिवसांपासून ते करताहेत,योगा, व्यायाम शाळा, भजनी मंडळींसाठी साहित्य वाटप अशी अनेक कामे त्यांनी विकासाच्या दिशेने साकारलेली आहेत. दुष्काळात पाण्याच्या टँकर सोडून तर जनावरांसाठी छावणी उभारून लोकसेवा केली. त्यांना प्रचंड प्रमाणात महिला भगिनींची आणि वयोवृद्धांची साथ लाभली आहे.
संपूर्ण मतदारसंघातील मतदारांना प्रत्यक्ष भेटणे, गावभेट कोपरासभा अनेक रॅली मतदारसंघात काढण्यात आल्या. शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखीतळ सासवड येथील प्रचार सभा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी काही महिलांनी आपले मनोगत व्हिएस न्युज कडे व्यक्त केले.
व्हिएस न्युज - डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे दि. १९ ऑक्टोबर २०१९ रोजी "आयुर्वेदातील संशोधन" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन श्री डॉ. के. एस. धीमान (डायरेक्टर जनरल, सी सी आर ए एस, नवी दिल्ली ) यांच्या हस्ते झाले . डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद व आय एम ए व्ही एफ नेदरलँड यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले . वेगवेगळ्या देशातील आरोग्यतज्ञ् , संशोधक, विद्यार्थी असे एकूण ४०० पेक्षा अधिक सहभागार्थी उपस्थित होते.
"आयुर्वेदातील संशोधनाचा प्रचार व प्रसार व्हावा, आयुर्वेदातील नवनवीन संशोधन करण्यास गती प्राप्त व्हावी तसेच या क्षेत्रात नवपिढीचे योगदान वाढावे आणि गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य घडावे" या प्रमुख उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी मान्यवरांनी आपली मते मांडली श्री डॉ. के. एस. धीमान डायरेक्टर जनरल, सी सी आर ए एस, नवी दिल्ली) यांनी "भारत सरकारच्या आयुष विभागामार्फत आयुर्वेदाच्या संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत मार्गदर्शन केले व आयुर्वेद संशोधनातील संधींवर भाष्य केले"
मा.डॉ . जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील) यांनी "ब्राझील मध्ये आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार कश्या पद्धतीने झाला व ब्राझील मध्ये कोण कोणत्या आयुर्वेदिक वनस्पती उपलब्ध आहेत! याबद्दल मार्गदर्शन केले तसेच भारतातील आयुर्वेद तज्ञांकडून मदतीची अपेक्षा केली"
मा. डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष - इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) याप्रसंगी "इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद मार्फत डॉ डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालयात विदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळतात व आयुर्वेदाचे यथार्थ ज्ञान मिळते"
मा. डॉ एन जे पवार (कुलगुरू,डॉ डी वाय पाटील विद्यापीठ) यांनी "आयुर्वेदातील संशोधनासाठी अन्य वैद्यकीय शाखांनी मदत करणे, त्यासाठीच्या सर्व मूलभत गोष्टी विद्यापीठात उपलब्ध असल्याची माहिती दिली"
मा डॉ गुणवंत येवला (प्राचार्य, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय ) यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमाची रूपरेषा सांगून डॉ. जोस रुगे यांच्या मानपत्राचे वाचन केले.
मा. डॉ पी. डी. पाटील (कुलपती,डॉ डी वाय पाटील विद्यापीठ) व मा. सौ. भाग्यश्रीताई पाटील उपाध्यक्षा डॉ डी वाय पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी) यांच्या मार्गदर्शनाखाली ही आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली.
या परिषदेच्या कार्यक्रमास मा. सौ. डॉ. स्मिता जाधव (विश्वस्त व कार्यकारी संचालक, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ )मा. डॉ एन जे पवार (कुलगुरू,डॉ डी वाय पाटील विद्यापीठ) मा. डॉ ए.एन. सूर्यकार (कुलसचिव, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ) मा.डॉ . जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील) मा. डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष - इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा. डॉ सुनंदा रानडे(उपाध्यक्ष, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा डॉ गुणवंत येवला (प्राचार्य, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय ) मा. डॉ बी.पी पांडे (सल्लागार, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा.डॉ. दिगंबर दिपंकर (आयोजन सचिव, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा. डॉ मंदार बेडेकर यांच्या उपस्थितीत परिषद संपन्न झाला. या
दोन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर देश विदेशातील तज्ञ् डॉक्टर्स परिषदेला संबोधित करतील. या मध्ये डॉ श्रीराम सावरीकर नवीदिल्ली, डॉ एम एस बघेल व डॉ अनुप ठकार , जामनगर, डॉ रमेश भोंडे , पुणे, डॉ. एन. श्रीकांत, नवीदिल्ल्ली, डॉ. सुप्रिया भालेराव, रणजित पुराणिक (धूतपापेश्वर) हे प्रमुख वक्त्यांनी संशोधनावर आधारित मते मांडली .
या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध विषयांवर शिक्षणतज्ञ् व्यावसायिक डॉक्टर्स, पद्युत्तर पदवी चे विद्यार्थी यांनी आयुर्वेदात केलेल्या संशोधनावर एकूण १३५ पेपर सादरीकर व २५ भिंतीपत्रक सादरीकरण केले . परदेशातून आलेल्या सहभागार्थीसाठी भारतीय संस्कृती दर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम व दीपोत्सवाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते . डॉ स्मृतिका तावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ. दिगंबर दिपंकर यांनी केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002