Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
पाकिस्तानी दहशतवाद्यांना फक्त दंडुक्याची भाषा कळते, दुसरी भाषा कळत नाही

व्हीएस न्यूज जी स्थिती जम्मू काश्मीरमध्ये आहे, सिमापरिसरातील पाकिस्तानी दहशतवादी त्यासाठी जबाबदार आहेत. फक्त दंडुक्याची भाषा या दहशतवाद्यांना कळते, दुसरी भाषा कळत नाही आणि आपले सैनिक मेहनतीने आणि कष्टाने त्यांच्यावर शक्तीच्या दंड्याद्वारे अंकुश ठेवत असल्याचे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गेल्या काही दिवसात सिमाभागात भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले.

त्यासोबतच जम्मू काश्मीरमध्ये तोडफोड करणाऱ्यांनी ती आपली संपत्ती आहे, अशी भावना रुजवण्यासाठी सरकारला तसे व्हावे लागेल, असे म्हणत मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या भाजप-पीडीपी सरकारचेही कान टोचले. नागपुरात एका महोत्सवाचे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विविध भागांच्या माहितीसाठी आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात हा महोत्सव जम्मू काश्मीर अध्ययन केंद्राच्या माध्य़मातून १५ ते १८ मार्च दरम्यान आहे. या महोत्सवाचे आज संघप्रमुख मोहन भागवत यांनी उद्घाटन केले. यावेळी ते जम्मू काश्मीरबाबत विविध विषयांवर ते बोलले. जम्मू काश्मीरला समस्या म्हणणे चुकीचे असून, ज्याला आपण समस्या म्हणतो ती संपूर्ण भारताची समस्या आहे असंही ते म्हणाले. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

...Read More

V. S. News
रघुराम राजन यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवली होती घोटाळ्यांची यादी

व्हीएस न्यूज - पीएनबी बँक घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघूराम राजन यांनी आपले मौन तोडले असून आपण गव्हर्नर असताना सर्व बँकांना स्विफ्ट नेटवर्कसंदर्भात तपास करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर बँक घोटाळ्यांची एक यादीही पंतप्रधान कार्यालयाला पाठवली होती. तसेच बँकिंग इन्व्हेस्टिगेटर आणि अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून यांची संयुक्त चौकशीची करण्याची विनंतीही केली असल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्याही काळात रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. नेमके या दोघांपैकी कोण पंतप्रधान असताना बँक घोटाळ्यांची यादी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवली, यासंदर्भात राजन यांनी काहीही सांगितले नाही.

राजन म्हणाले, बांगलादेशातील एका बँकेत स्विफ्ट यंत्रणेत दोष असल्याचे आढळून आले. जेव्हा अशा प्रकारची समस्या दिसून येते, तेव्हा त्याची माहिती बँकांना देण्याची जबाबदारी नियामकांची असते. आम्हीही असेच केले आणि बँकांना हे दोष दूर करण्यास सांगितले. बँकांनी हे आदेश पाळले नसतील, तर त्यांनी तसे का केले, हे समजून घेणे आवश्य आहे. असेही राजन यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

स्विफ्ट ही एक अशी यंत्रणा आहे, जी जगभरातील बँका व वित्तीय संस्थांमध्ये संपर्क स्थापित करते. तसेच हिच्या सहाय्याने जगातील वित्तीय संस्थांमध्ये ट्रांझेक्शनसंदर्भातील माहितीचे सुरक्षित,विश्वासार्हपणे आदान प्रदान होते. पीएनबी घोटाळ्यातील हमीपत्रे का दिली गेली? त्यांची नोंदणी बँक व्यवस्थेत का केली गेली नाही? बँक व्यवस्थापनास याची माहिती होती का? ही माहिती बोर्डासमोर ठेवली होती का ? असे अनेक प्रश्न रघुराम राजन यांनी यावेळी उपस्थित केले.

...Read More

V. S. News
एसबीआयने बंद केली ४१ लाख बँक खाती

व्हीएस न्यूज - एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान किमान मासिक ठेव न ठेवणारी ४१.१६ लाख खाती स्टेट बँक ऑफ इंडियाने बंद केली असल्याचे एका आरटीआय प्रश्नाद्वारे समोर आले आहे.

एसबीआयने किमान मासिक ठेव न ठेवल्यास ग्राहकांकडून दंड वसूल करण्याच्या नियमामुळे चालू आर्थिक वर्षातील १० महिन्यांमध्ये (एप्रिल ते जानेवारी) ४१.१६ लाख खाती बंद केली. याबाबत माहिती देताना मध्य प्रदेशातील नीमच येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी सांगितले, की एसबीआयच्या अधिकाऱ्याने त्यांनी केलेल्या आरटीआय याचिकेला दिलेल्या उत्तरात ही माहिती प्राप्त झाली आहे. किमान ठेव न ठेवणाऱ्यांवर दंड आकारण्याच्या नियमामुळे एसबीआयद्वारे आर्थिक वर्ष २०१७-१८ दरम्यान ३१ जानेवारीपर्यंत ४१.१६ लाख खाती बंद करण्यात आली.

एप्रिल महिन्यापासून देशातील या सर्वात मोठ्या बँकेने किमान बाकी न ठेवणाऱ्यांसाठीची दंडाचे शुल्क ७५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गौड यांनी सांगितले, एसबीआयने जर दंडाचे शुल्क कमी करण्याचा निर्णय वेळेत घेतला असता तर ४१.१६ लाख खाती गमावण्याची वेळ बँकेवर आली नसती. यासोबतच मोठ्या संख्येने गरीब लोकांचा समावेश असणाऱ्या खातेधारकांना त्रास झाला नसता.

दरम्यान मेट्रो व शहरी भागात किमान ठेव न ठेवणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम एसबीआयने ५० रुपयांवरून १५ रूपये केली आहे. यासोबतच छोट्या शहरांमध्ये दंडाची रक्कम ४० रुपयांवरून १२ रूपये केली असून ग्रामीण भागासाठी १० रुपये केली आहे. यामध्ये जीएसटी वेगळा लागेल.

...Read More

V. S. News
‘१ एप्रिल पासून या’वस्तू महागणार

व्हीएस न्यूज - ३१ मार्चनंतर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणा-या काही वस्तू महाग होणार आहेत. काही वस्तू ३१ मार्चनंतर खरेदी करताना खिशाला कात्री लागणार आहे. नवे अर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या देशाच्या वार्षिक बजेटमध्ये अर्थमंत्री अरूण जेठली यांनी काही वस्तूवरचा कर वाढवला आहे.

या कराची वसूली नवीन अर्थिक वर्षामध्ये केली जाणार असल्यामुळे काही कंपन्या स्टॉक क्लिअर करण्याच्या प्रयत्नात आहेत. मोबाईल फोन व त्याचे पार्टसवर या अर्थसंकल्पात विक्री कर वाढवला आहे. सौदर्य प्रसाधने, सुगंधी अत्तर यामध्ये १० टक्यावरून २० टक्के कर वाढवला आहे. टी व्ही, एलईडी वर १५ टक्के कर केला आहे. इंपोर्टेड चप्पलवरील करता १० टक्यावरून २० टक्के केला आहे. सिगारेट, पान मसाले , तंबाखू यांच्यावर १२ टक्के कर लावला गेला आहे. तर दुचाकी, चार चाकी व त्यांचे पार्टस करात १५ ते २५ टक्के कर वाढवण्यात आला आहे.

मोबाईल फोन, सौदर्य प्रसाधने, तंबाखूजन्य पदार्थ, दुचाकी चारचाकी वाहने, इंपोर्टेड चप्पल, टि.व्ही, एलईडी, ट्रक- बस टायर्स, इमेंटीशन ज्वेलरी रेशमी कपडे , रत्न हिरे, आदी उत्पादने येत्या १ एप्रिल पासून खरेदी करताना ग्राहकाच्या खिशाला कात्री लागणार असल्यामुळे ३१ मार्चपुर्वी या वस्तू खरेदी करण्याची नामी संधी आहे.

...Read More

V. S. News
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग काळाच्या पडद्याआड

व्हीएस न्यूज वयाच्या ७६ व्या वर्षी बुधवारी सकाळी भौतिकशास्त्रातील संशोधनामुळे जगभरात सुप्रसिद्ध असणारे स्टिफन हॉकिंग यांचे निधन झाले. केंब्रिज येथे एका प्रसिद्धपत्रकाद्वारे ही माहिती लुसी, रॉबर्ट आणि टीम या त्यांच्या मुलांनी दिली आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत हॉकिंग्स यांनी मांडला होता. यामुळे ते सुप्रसिद्ध झाले होते. त्यांची मुले लूसी, रॉबर्ट आणि टिम यांनी सांगितल्याप्रमाणे, केम्ब्रिज येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी यावेळी भावना व्यक्त करताना म्हटले, की आपल्या शोध आणि ह्युमरने अख्ख्या जगाला प्रेरित करणारे आमचे वडील सदैव आमच्या आठवणीत राहतील.

...Read More

V. S. News
सहा वर्षांमध्ये नीरव मोदीला मिळाली १ हजार २१३ हमीपत्रे – अरूण जेटली

व्हीएस न्यूज - पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेतून १० मार्च २०११ ला नीरव मोदीला पहिले खोटे हमीपत्र मिळाले होते. तर पुढील सहा वर्षात अशा प्रकारची १ हजार २१२ हमीपत्रे मिळाल्याची माहिती अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली.

नीरव मोदीशी संबंधित कंपन्यांना भारतीय बँकांच्या विदेशातील शाखांमधून कर्ज मिळवण्यासाठी पीएनबीच्या कर्मचाऱ्यांकडून लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) देण्यात आले. मोदीला एकाच दिवशी देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या पीएनबीमधून पाच वेळा देखील एलओयू देण्यात आल्याचे उघड झाले असल्याचे राज्यसभेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना जेटली यांनी ही माहिती दिली.

५३ खरी हमीपत्रे या सहा वर्षांत देखील देण्यात आली होती. यापैकी पहिले ५ मार्च २०११ मध्ये व शेवटचे ६ नोव्हेंबर २०१७ मध्ये देण्यात आल्याचे जेटलींनी सांगितले. यावर्षी २३ जानेवारीला पीएनबीच्या मुख्य कार्यालयाला खोट्या कारभाराची माहिती मिळाल्यानंतर लगेच २५ जानेवारील तपास गटाने आपला अहवाल दिला. त्यानंतर २९ जानेवारीला घोटाळा झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आली आणि मुंबई सीबीआयकडे तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती जेटली यांनी दिली.

...Read More

V. S. News
मिलिंद एकबोटेंना अटक

व्हीएस न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटे यांना घरी जाऊन अटक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही वेळापूर्वीच मिलिंद एकबोटे यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी एकबोटेंना अटक केली.

यापूर्वी एकबोटेंचा जामीनअर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळला होता. त्यामुळे एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता होती. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने अहवाल सादर करुन, तपासात एकबोटे सहकार्य करत नसल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने या अहवालावरुन एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला.

दरम्यान कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगाव हिंसाचाराबाबत निवेदन दिले होते. मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला, फरार झाल्यावर कोंबिंग ऑपरेशन केले. शिवाय, जिथे जिथे न्यायालयात जामिनासाठी एकबोटे गेले, सरकारने तिथे तिथे चांगले वकील नेमत विरोध केला. उलट आम्ही कोठडी मागून चौकशीची मागणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती.

...Read More

V. S. News
राष्ट्रपती, पंतप्रधानांना मिळणार स्वतःच्या मालकीचे विमान

व्हीएस न्यूज - लवकरच देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानानंना स्वतःच्या मालकीचे विमान मिळणार असून त्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियाकडून दोन बोईंग विमाने खरेदी करण्याच्या तयारी केली आहे. ते या विमानांमध्ये आवश्यक बदल करून २०२० पर्यंत ती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

एअर इंडियाकडून केंद्र सरकारने बोईंग ७७७-३०० एक्सेंटेड रेंज या प्रकारातील दोन विमाने विकत घेतली असून या विमानांमध्ये सध्या व्हीआयपी कक्ष, पत्रकार परिषदेसाठी खोली आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठीच कक्ष तयार करण्याचे काम सुरू असून या विमानात वायफाय आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणाही असेल,अशी माहिती सरकारी अधिकाऱयांनी दिली आहे.

...Read More

V. S. News
जलयुक्त शिवारला निधी टंचाईचा मोठा फटका

व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवारला निधी टंचाईचा मोठा फटका बसला असून लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत असलेली कामे राज्याच्या घसरत्या आर्थिक परिस्थितीमुळे थांबवण्याचे आदेश देण्यात आली आहेत.

राज्यातील जलयुक्त शिवार कामाच्या प्रगतीचा ३१ जानेवारीला विभागाच्या सचिवांनी आढावा घेतला. त्या बैठकीमध्ये ज्या कामांना कार्यारंभ आदेश दिलेला आहे परंतु काम सुरू झालेली नाहीत अशी सर्व कामे थांबवण्याचे आदेश देण्यात आली आहेत. सध्या विभागाकडे निधी नसल्यामुळे येथून पुढे लघु पाटबंधारे विभागाकडून नवीन कामे घेऊ नयेत असेही आदेश देण्यात आले आहेत. ही अवस्था जर मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या प्रकल्पाची असेल तर राज्यातील आरोग्य, ग्रामीण, रस्ते, वीज उभारणी यांची काय अवस्था असेल असा प्रश्न पडला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजप- शिवसेना सरकार सत्तेत आल्यानंतर, जलयुक्त शिवार हा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी टंचाई सदृश्य जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले. दोनच वर्षात त्याचा सकारात्मक निकाल दिसून आला. अनेक दुष्काळी गावात पाणी वाहू लागले. पण आता निधीअभावी बहुतांशी ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान बंद करावे लागत आहे.

...Read More

V. S. News
भाजपचे सदस्यत्व नारायण राणेंनी स्वीकारले आहे का ?

व्हीएस न्यूज - नुकताच राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी राज्यसभेसाठी भाजप कडून अर्ज भरला आहे. पण सेनेचे आमदार अनिल परब यांनी त्यांच्याबाबत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे. नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी भाजपने सुरू केली असताना शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी आता त्यांच्या भात्यातले बाण बाहेर काढले आहेत. त्यांनी नियमांवर बोट ठेवत नारायण राणेंच्या उमेदवारीवरच सवाल उपस्थित केले आहेत. राणेंनी अर्ज भरण्याआधी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले का ?, जर हो तर कधी स्वीकारले जर ते भाजपचे सदस्य झाले तर मग महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा त्यांनी राजीनामा दिला का, असे प्रश्न सेनेचे मुंबईतील आमदार अनिल परब यांनी उपस्थित केले आहे. याचे कारण असे की, एकच व्यक्ती एकाच वेळेला दोन पक्षांच्या सदस्य असू शकत नाही. आता यावर भाजप किंवा खुद्द राणेंकडून स्पष्टीकरण येते का, हे पहावे लागेल.

...Read More

V. S. News
शमी संबंधित आरोपांची चौकशी करणार भ्रष्टाचारविरोधी पथक

व्हीएस न्यूज - भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने त्याच्यावर केलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर भ्रष्टाचारविरोधी पथकाला याबाबत दखल घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चौकशी करण्याची मागणी केली आहे. भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख नीरज कुमार यांना ई-मेलद्वारे या आरोपांच्या चौकशीची मागणी बुधवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी केली आहे, त्याचबरोबर एका आठवड्यात याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनाही हा मेल पाठविण्यात आला आहे. शमीविरोधातील आरोपांचा, विविध माध्यमातील अहवालांचा यामध्ये उल्लेख आहे. प्रशासक समितीने,शमी व त्याच्या पत्नीमधील संभाषणांचे काही रेकॉर्डिंग ऐकले आहेत व दावा केला आहे. या संभाषणात शमी दुसरी व्यक्ती ‘मोहम्मद भाई’शी संवाद करत आहे, ज्या व्यक्तीने पाकिस्तानी महिला ‘अलिस्बा’ हिच्यामार्फत शमीला पैसे पाठवले. असे राय यांनी मेलमध्ये लिहीले आहे. शमीची पत्नी जहांने असे आरोप केले होते की, शमी मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असू शकतो, कारण तो कोलकातामध्ये पाकिस्तानी महिला अलिस्बाकडून पैसे स्विकारत होता. या संबंधातील चौकशी करताना राय यांनी कुमार यांना काही विशेष गोष्टींची तपासणी करायला सांगितले आहे, बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांच्या अंतर्गत वरील आरोपांचा तपास करा व निष्कर्षांनुसार प्रशासक समितीकडे अहवाल सादर करा, असा आदेश प्रशासक समितीने दिला आहे.

...Read More

V. S. News
काँग्रेस आमदाराने भाजप आमदाराला पट्याने मारले

व्हीएस न्यूज - गुजरात विधानसभेत काँग्रेस आणि भाजप आमदारामध्ये तुफान राडा पाहण्यास मिळाला आहे. यादरम्यान भाजप आमदाराला काँग्रेस आमदाराने चक्क पट्याने मारहाण केली आहे. कुठल्या तरी कारणावरून काँग्रेस आमदार प्रताप दुधात आणि भाजप आमदार जगदीश पंचाल यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की दोघेही हमरीतुमरीवर आले. प्रताप दुधात यांनी या धुमश्चक्रीत रागाच्या भरात कमरेचा बेल्ट काढून पंचाल यांना भरसभागृहात मारहाण केली. इतर आमदारांनी दोन्ही आमदारांचा वाद विकोपाला गेल्याचं पाहुन या वादात उडी घेत दोन्ही आमदारांना आवरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेस आमदार विक्रम माडम यांनी सभागृहातला माईक तोडला. दोन्ही आमदारांना शांत राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही कारवाई करण्यात आली नाही.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!