व्हीएस न्यूज - आजपासून म्हणजे १४ एप्रिल आंबेडकर जयंती दिवसापासून भीम अॅपचा वापर करणाऱ्यांना कॅश बॅकचा लाभ मिळणार असून आजपासून बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित भीम अॅपवर आकर्षक कॅश बॅक योजनेची सुरुवात होणार आहे. ग्राहकांना भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरमध्ये एका महिन्यात ७५० रुपये आणि व्यापाऱ्यांना एका महिन्यात १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकते. BHIM म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी (Bharat Interface For Money) भारत सरकारच्या नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे संचालित केले जाते. केवळ २ एमबीच्या या अॅपला काही सेकंदामध्ये Android किंवा आयफोनमध्ये डाउनलोड केले जाऊ शकते. या अॅपचे असे डिजाईन तयार केले गेले आहे, की पहिल्यांदा वापर करणाराही हे अॅप चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. भीम अॅप वापर करण्यासाठी आवश्यक आहे, तुमचे बँक खाते नंबर तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेले असणे.
व्हीएस न्यूज - भारतीय बॉक्सर मेरी कोमने ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली असून भारताचे बॉक्सिंगमधील आणि मेरीचे राष्ट्रकुल स्पर्धांमधील हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. काल भारतीय बॉक्सर्सनी कांस्यपदकाची कमाई केल्यानंतर सुवर्णपदक मिळवत मेरी कोमने भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक टाकले आहे. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने देखील ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील तेजस्विनीचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. तेजस्विनीने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात विक्रमी गुणांची नोंद करत पदकांच्या शर्यतीत भारताचे तिसरे स्थान कायम राखले आहे. ४५७.९ गुणांची कमाई करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तेजस्विनीने मागे सोडले. तेजस्विनीने काल ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती.
व्हीएस न्यूज – काँग्रेसने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात कोणतीच कसर सोडली नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यांनी हे वक्तव्य नवी दिल्लीतील अलीपूर रोडवर डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनावेळी बोलताना केले आहे. इतिहासातून डॉ बाबासाहेब यांच्या सर्व आठवणी पुसल्या जाव्यात यासाठी काँग्रेसने पुरेपूर प्रयत्न केले. हे कठोर सत्य असून बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जिवंत होते तेव्हा काँग्रेसने त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नसल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्यांच्याकडे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले, त्याचबरोबर मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा द्यायला लावल्याचेही यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात एकाही कॅबिनेट समितीत सहभागी करुन न घेण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. देशाच्या इतिहासात बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख नसावा यासाठी काँग्रेसने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. काँग्रेसला माझे आव्हान आहे की, बाबासाहेबांसाठी त्यांनी केलेले एक काम तरी सांगावे. काँग्रेसने त्यांच्या आदरार्थ एक तरी काम केले आहे का ?, असा प्रश्न मोदींनी यावेळी विचारला. मोदींनी पुढे बोलताना सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लोकसभा निवडणूक लढणार होते तेव्हा काँग्रेसने त्यांचा पराभव करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी जोरात प्रचार केल्याचा आरोपही मोदींनी केला.
व्हीएस न्यूज - आज सकाळी ११ च्या सुमारास मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांच्या कृष्णकूंज या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान मागील काही काळापासून राज ठाकरे भारतीय जनता पक्षावर खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले असल्यामुळे भाजप व राज ठाकरे यांच्यात कटुता निर्माण झाली होती. शेलार यांनी त्यामुळे राज यांची आज कशासाठी घेतली याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे. मुंबई भाजपचे नेते कधीकाळी शिवसेनेला शह देण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला पाठबळ देत होते. खासकरून शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि आशिष शेलार यांचे राज ठाकरेंशी सख्य होते. पण राज यांनी नंतर मोदी-शहांवर हल्लाबोल सुरू केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंपासून अंतर राखले होते. पण आजच्या भेटीचे औचित्य काय आहे हे अद्याप समोर आले नाही. कदाचित याबाबत दोन्ही पक्षाकडून स्पष्टीकरण काही वेळात दिले जाऊ शकते.
व्हीएस न्यूज - भाजप नेते एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून अंजली दमानिया या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सतत गैरहजर राहत असल्याने त्यांच्याविरोधात रावेर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान रावेरचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी एकनाथ खडसे आणि भाजपची नाहक बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांविरोधात याचिका दाखल केली होती.
व्हीएस न्यूज - दिल्ली उच्च न्यायालयाने एअरटेल कंपनीला चपराक लगावली असून एक विशिष्ठ प्लॅन एअरटेलच्या ग्राहकांना घेतल्यामुळे आयपीएलचे सामने मोबाईलवर मोफत पाहता येतील, अशी जाहिरात करणे चुकीचे असल्याहा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. जिओने एअरटेलच्या या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यावर जिओच्या बाजूने निर्णय दिला असून आता एअरटेल त्यांच्या जाहिरातीत बदल करणार आहे. क्रिकेट सीझन पॅकबाबत एअरटेलची दिशाभूल करणारी जाहिरात असून प्लॅन घेतल्यावर आयपीएलचे सामने मोफत पाहता येतील असे या जाहिरातीत सांगण्यात आले आहे. पण पण डेटाचे पैसे भरावेच लागतील, हे जाहिरातीत सांगितले गेले नाही. जिओने ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली.
व्हीएस न्यूज - आता भारतामध्ये ब्रिटनमधील प्रसिद्ध कंपनी स्कोमादी पाऊल ठेवणार असून आपली टू-व्हीलर स्कूटी स्कोमादी भारतात लाँच करणार आहे. ही कंपनी लम्ब्रेटा जीपी स्टाईल मॉडल बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध असून ही कंपनी टीएल २००, टीएल२००i, टीएल५०, टीएल१२५ आणि टीटी१२५ या स्कूटींचे उत्पादन करत आहे. पुण्यातील एजे डिस्टीब्यूटर्ससोबत कंपनीने करार केला असून कंपनी त्यांच्यासोबत स्कूटीची विक्री करणार आहे. सध्या भारतात टीटी१२५ स्कूटीची विक्री केली जाणार आहे. जगातील सर्वात महागडी स्कूटी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. २ लाख रुपये एवढी या स्कूटीची किंमत आहे. वर्षाभरापूर्वी येणाऱ्या लेम्ब्रेटा स्कूटी सारखे स्कूटीचे डिझाईन आहे. मॉडर्न लूकसह एलईडी हेडलाईट आणि टेललाईट स्कूटीला देण्यात आले आहेत. डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यामध्ये १२ इंचाची अॅलॉय व्हीलसोबतच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. १०० किलो वजनाच्या या स्कूटीमध्ये ११ लीटरची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे. अप्रिलियाचे १२५सीसीचे इंजिन टीटी१२५ मध्ये असणार आहे.
व्हीएस न्यूज - पुन्हा एकदा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक आणि संतापलेले पाहायला मिळाले. माझ्यावर केलेले आरोप मी खपवून घेणार नाही, त्याचबरोबर आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचेन असा सज्जड दमच त्यांनी विरोधकांना भरला. त्यांनी यावेळी आरोप केल्याने प्रसिद्धी मिळते अशी टीकाही केली. कोल्हापूरातील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण काढण्याला गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील आडकाठी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ज्यांनी गेल्या २० वर्षात शासकीय जमिनीवर आरक्षणे लाटली आणि हॉटेल्स, शिक्षणसंस्था आणि मंगलकार्यालये थाटली आहेत. मी त्या सर्व प्रकरणाची यादी मागवली आहेच. या सर्व प्रकरणांमुळापर्यंत जाऊन चौकशी करणार आहे. जे कोणी चौकशीत दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आरोप करण्याआधी मी राज्याचा नंबर दोनचा मंत्री आणि पक्षाचा बलाढ्य नेता आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.
व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला जर असाच विरोध होत राहिला तर अखेर नाणारचा प्रकल्प गुजरातला जाईल असा सुचक इशारा दिला आहे. नाणारच्या प्रकल्पाला कोकणातील राजकीय नेते विरोध करत आहेत. सिंधुदुर्गमधील नाणार येथे तेल काढण्याचा मोठा प्रकल्प आणण्याचा सरकारचा मनसुबा आहे. सरकारमधील मित्रपक्ष शिवसेना आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे या प्रकल्पाला विरोध करत आहेत. १ लाख रोजगारांची या प्रकल्पामुळे निर्मिती होणार आहे. पण त्यामुळेच कोकणाच्या निसर्गाचे, मासेमारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा याविरोधाच्या पार्श्वभूमीवरच दिला आहे. भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या हद्दीतच ऑईल रिफायनरीचा प्रकल्प अराम्को कंपनी टाकू इच्छिते. राज्य सरकारने म्हणूनच त्यांना नाणारचा प्रस्तावही दिला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पण या प्रकल्पाला असाच विरोध वाढत कायम राहिला तर ३ लाख कोटींचा हा प्रकल्प कदाचित गुजरातलाही जाऊ शकतो, तसेही गुजरात सरकारने यापूर्वीच संबंधीत कंपनीला आमंत्रित केले आहे. असा थेट संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. देशातील विविध राज्यातील प्रकल्प याआधीही गुजरातने असेच ओढले आहे. कोकणाचा औद्योगिक विकास या प्रकल्पामुळे शक्य असल्याचे सरकारचे मत असल्यामुळे कोकणाच्या निसर्गाची हानी होईल अशी विरोधकांची भूमिका आहे. नाणार प्रकल्पातील बऱ्याच जमिनी नापीक आहेत.
व्हीएस न्यूज - संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रुम येथून करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी नेमण्यात आलेल्या परिक्षकांच्या ज्युरीचं नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केलं होतं.
६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांच्या खात्यातही काही पुरस्कार आले आहेत. ‘मृत्यूभोग’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, सुयश शिंदेच्या ‘मयत’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधव यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींचीही मनं जिंकली असं म्हणायला हरकत नाही. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकर यांचा ‘न्यूटन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाला विशेष कामगिरी पुरस्कार मिळाला आहे. सुयश शिंदे दिग्दर्शित ‘मयत’ या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. नागराज मंजुळेंच्या ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाचा यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
मराठी चित्रपट
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – म्होरक्या (मराठी चित्रपट)
स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे
सर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (लघुपट) – पावसाचा निबंध – नागराज मंजुळे
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फीचर) – मयत – सुयश शिंदे
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा- राजेंद्र जंगले
बॉलिवूडमधील पुरस्कार
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता – अमित मसुरकर)
सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – अब्बास अली मोगल – (बाहुबली 2)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली 2
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (गोरी तू लठ मार – टॉयलेट एक प्रेम कथा)
स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)
व्हीएस न्यूज – भारतीय निवडणूक आयोग येत्या १८ तारखेला काँग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची मागणी करणाऱ्या भाजपचे नेते अश्विन उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
१८ एप्रिलला दुपारी ३ वाजता निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार या याचिकेवर सुनावणी करतील. आपल्या याचिकेत उपाध्याय यांनी दावा केला आहे, की हात हा शरीराचा भाग असल्याने हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. उपाध्याय यांनी आपल्या एका पत्रात म्हटले आहे, की आदर्श आचारसंहितेनुसार मतदानाच्या २ दिवस आधीच निवडणूक प्रचार थांबवणे अपेक्षित असते. मात्र काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हाताचा पंजा असल्याने त्यांना तो मतदान केंद्रासह सर्वत्र घेऊन जाता येतो.
व्हीएस न्यूज – सरकारी नोक-यांमधील आरक्षण हटवणार असल्याचे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी जाहीर केले आहे. हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी सरकारी नोक-यांमध्ये विशेष गटांसाठी असलेल्या आरक्षण योजनेविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. शेख हसीना यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या आंदोलनाचा विजय मानला जात आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या कार्यकाळात झालेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन होते. हजारोंच्या संख्येने लोकांनी ढाका येथील रस्त्यावर जमा होऊन आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती. अनेकजण पोलिसांनी केलेल्या कारवाईत जखमीही झाले होते.
बांगलादेश सरकारच्या आरक्षण योजनेनुसार, स्वातंत्र्यसैनिकांची मुले, महिला, पारंपारिक अल्पसंख्यांक, अपंग आणि मागासलेल्या जिल्ह्यांमधील लोकांसाठी सार्वजनिक विभागातील ५६ टक्के नोक-या राखीव होत्या. आंदोलनकर्ते हे आरक्षण १० टक्क्यांवर आणण्याची मागणी करत होते. यासोबतच नोकरीसाठी अर्ज करणा-याला आरक्षणाची संधी किंवा हक्क फक्त एकदाच देण्यात यावा अशीही त्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांनी ढाका येथे घोषणाबाजी करत महत्वाचे रस्ते अडवून धरले होते. शहरातील वाहतूक व्यवस्था आंदोलनाचा फटका बसल्याने विस्कळीत झाली होती. काहीजणांनी आंदोलनादरम्यान तोडफोड आणि लूट केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002