व्हीएस न्यूज - - रस्ता रुंदीकरणासाठी व आरक्षित जागांवर विकास प्रकल्प उभारणीसाठी नागरीकांनी सहकार्य करावे. त्यामुळे शहरातील विकास कामांना गती मिळेल आणि पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी कामे मार्गी लागतील त्यामुळे या औद्योगिक नगरीच्या नावलौकिकात व सौंदर्यात भर पडेल असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
खराळवाडी पिंपरी येथील सदानंद तरुण मित्र मंडळाच्या नविन गणेश मंदिराचा गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ श्री सिध्द सद्गुरु शंखनाथजी महाराज व चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, माजी विरोधी नेते कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम, माजी नगरसेविका निर्मला कदम, मंडळाचे अध्यक्ष अतुल दाभोळकर,उपाध्यक्ष नितीन निकम, सचिव बंन्सीशेठ बहारे, खजिनदार रविंद्र पालाडे आदींसह खराळवाडी, संभाजीनगर, बजरंगनगर, कामगारनगर, गांधीनगर परिसरातील हजारों भक्त भाविक उपस्थित होते. तत्पुर्वी श्रीच्या मुर्तीची व कलशाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जगताप म्हणाले की, पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून नेहरूनगर चौकाकडे जाणा-या या रस्त्यावर स्व. महादेव कदम यांनी मंदिर स्थापन केले होते. या गणेश मंदिराचा जिर्णोध्दार करण्यासाठी माजी विरोधी नेते कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम आणि या परिसरातील नागरीक व सावित्री अपार्टमेंटमधील सदस्यांनी सहकार्य केले. असे सहकार्य नागरीकांनी करावे, असेही आवाहन जगताप यांनी केले. यावेळी होमहवन, वास्तूशांती,वास्तुनिक्षेप पुजन आदी धार्मिक विधींसह महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थितांचे स्वागत कैलास कदम, सुत्रसंचालन अतुल दाभोळकर आणि आभार नितन निकम यांनी मानले.
व्हीएस न्यूज - - पुणे सत्र न्यायालयाने भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. मिलिंट एकबोटे गुन्हा दाखल झाल्यापासून गायब आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
भीमा-कोरेगाव येथे एक जानेवारीला विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. एका व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला होता. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी या जमावाला चिथावल्याचा आरोप आहे. पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी एकबोटे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.
ही घटना ज्या दिवशी झाली त्यावेळेस आपण तिथे नव्हतो, तसेच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे. २२ जानेवारीला एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
व्हीएस न्यूज - तंत्रज्ञान हे आपल्या जिवनातील अविभाज्य घटक असले तरी तंत्रज्ञानाच्या आहारी जावू नका. असा सल्ला उदगार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संगणक व्यवस्थापन अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य डॉ अमोल गोजे यांनी दिला.
आकुर्डी येथील डॉ डी.वाय.पाटील इंस्टिट्यूट ऑफ मास्टर कंप्युटर प्लिकेशन्सच्या वतीने "इंटरनेट ऑफ थिंग्ज- टेक्नॉलॉजी ऑफ फ्युचर "या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे पर्सिस्टंट सिस्टिम कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. आर वेंकटेश्वरन हे उपस्थित होते व्यासपीठावर कॅंपस संचालक कर्नल (नि) एस के जोशी,डीवाय पाटील एमसीए इंस्टीट्यूटच्या संचालिका डॉ के निर्मला,समन्वयक डॉ कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. डॉ गोजे पुढे म्हणाले कि, दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा खूपच उपयोग होत आहे. मशीनवर अवलंबून राहुन तंत्रज्ञानाच्या आहारी जावू नका. मानवनिर्मित तंत्रज्ञानावर मानवाचे नियंत्रण हवे. यावेळी स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे वेंकटेश्वरन म्हणाले कि, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिन स्निंग, डाटा नॅलिटिक्स यांच्या संयुक्त वापरामुळे मानवी जीवन अधिक सुकर होणार आहे. यावेळी स्वयंचलित असलेल्या टेस्ला कारचे उदाहरण दिले. डॉ के निर्मला यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाचा उपयोग स्मार्ट सीटी उभारणीमध्ये मोठा उपयोग होणार असल्याचे सांगितले.
नंतरच्या सत्रात औद्योगिक प्रशिक्षक मनीष जैन, इंटेलिमेंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पानसरे, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षक अखिलेश चौसरा, काशीबाई नवले इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ परिक्षीत महाल्ले, लार्सन न्ड टूब्रो कंपनीचे सुशील कुमार,सिस्को सिस्टिमचे सल्लागार साजिद इलास्कर यांनी मार्गदर्शन केले.या परिसंवादात मुबंई, नागपूर, धुळे, जळगाव, पुणे म. प्रदेश मधून सुमारे 65 प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक व सुत्र संचालन डॉ कविता सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रा. राहुल चौधरी यांनी मानले.
व्हीएस न्यूज - काळभोरनगर येथील अन्सारी वजन काटा या दुकानाला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे तीन बंब त्वरीत दाखल झाले. काही वेळात आग आटोक्यात आणली. निगडी मधील काळभोर नगर येथे अन्सारी वजन काटा हे दुकान आहे. या दुकानाला सकाळी अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तीन बंब दाखल झाले. जवानांनी आग तात्काळ आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण व झालेले नुकसान समजू शकले नाही.
व्हीएस न्यूज - हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि तिर्थक्षेत्र देहूगाव, विठ्ठलनगर ही नऊ गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत तातडीने समाविष्ट करून घेण्याचा निर्णय आजच्या महासभेत झाला. विरोधी राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी यावेळी ही गावे समाविष्ट करण्यास विरोध दर्शविला. मात्र सत्ताधारी भाजपने हा विषय मंजूर करून घेतला. जानेवारी महिन्याची तहकूब मासिक सभा आज पार झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
महापालिका हद्दीच्या पश्चिमेकडील हिंजवडी, गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही ७ गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव यापूर्वी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली. त्यामुळे ही ७ गावे महापालिकेत समावेश करण्याची आवश्यकता नसल्याचे पत्र राज्याच्या नगरविकास विभागाने पिंपरी महापालिकेला पाठविले.
त्यानंतर महापालिकेने ७ एप्रिल २०१७ रोजी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून महापालिकेच्या हद्दीपासून पश्चिमेकडे असलेल्या हिंजवडी, माण, मारूंजी, गहुंजे, जांभे, नेरे आणि सांगवडे ही सात गावे तसेच उत्तरेकडे असलेले देहूगाव, विठ्ठलनगर या गावांचे देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र आणि आळंदी नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र महापालिका हद्दीत समावेश करण्याचा उचित अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार हिंजवडी, माण, जांभे, मारूंजी, नेरे, गहुंजे आणि सांगवडे तसेच देहूगाव आणि विठ्ठलनगर या नऊ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांनी ही गावे महापालिकेत समावेश करण्यास विरोध दर्शविला. पूर्वीच्या समाविष्ट झालेल्या गावांचा आजवर विकास झाला नसल्याचा सर्व सदस्यांनी सुर आवळला. सध्या शहरातील सर्व भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. स्वच्छता, आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर असताना या समाविष्ट गावांना कसा पाणी पुरवठा करणार, मुलभूत सुविधा कशा पुरवणार असा सवाल उपस्थित करत ही गावे समाविष्ट करण्याची ही योग्य वेळ नसल्याचं सांगत शिवसेना नगरसेविका मिनल यादव यांनी लक्ष वेधले. २० वर्षापूर्वी महापालिकेत समावेश झालेल्या गावांमध्ये ज्या पद्धतीने विकास करता आला नाही, तशी अवस्था या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर होऊ नये, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील उदयमुख होतकरू कुस्ती खेळाडूंसाठी शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आपल्या आमदार निधीमधून ५ लाख रुपयांची अंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट प्रदान केली.
येथील राजा शिवछत्रपती कुस्ती प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा कार्यक्रम झाला. केंद्राचे संस्थापक राजेश उर्फ पप्पू काळभोर यांच्या संयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार गौतम चाबुकस्वार,माझी महापौर आझम पानसरे, नगरसेवक अमित गावडे, विलास यादव, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग, ऑलम्पिकवीर मारुती आडकर, श्रीराम कोकणे, व्ही. एस. काळभोर, शंकरराव पांढरकर, धनंजय काळभोर, सचिन काळभोर, विठ्ठल काळभोर, राजेंद्र बाबर, संतोष माचुत्रे, भारत केसरी विजय गावडे, अमित बाबर, बाबा बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षण केंद्रात दररोज सकाळ व संध्याकाळ या वेळात या मॅटवर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती या केंद्राचे प्रमुख व राष्ट्रीय खेळाडू पप्पू काळभोर यांनी यावेळी दिली. तर या मॅटचा वापर शहरातील अधिकाधिक तरुणांनी घ्यावा व शहराचे नाव क्रीडास्तरावर उंचवावे असे आवाहन आमदार चाबुकस्वार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय मोरे, प्रास्ताविक पै. पप्पू काळभोर तर आभार पै. ज्ञानेश्वर कुटे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - मोतीबिंदू आजाराने पीडित असणाऱ्या ३५ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचा संकल्प राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केला आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त दापोडी येथे शौर्य प्रतिष्ठाण,गैलक्सी डायनस्टिक क्लीनिक, विशाल वाळुंजकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उदघाटन शौर्य प्रतिष्ठानचे खासदार साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार साबळे यांचे औक्षण करून व केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक माऊली थोरात, भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विजय शिनकर, ख्रिस्ती समाज विकास संघ अध्यक्ष दीपक चक्रनारायण, प्रा.मनोज वाखारे, संभाजी फुगे, RMC फाऊंडेशन अध्यक्ष रुपेश चांदेरे, सामाजिक कार्यकर्ते इमामभाई शेख, शौर्य प्रतिष्ठण सचिव नाना ढोकले, महिला अध्यक्षा जयश्री नवगिरे, भाजप युवा मोर्चा सचिव प्रथमेश पाठक,आम्ही समर्थ ग्रुप अध्यक्ष रवी क्षीरसागर, सुरज भोसले,गणेश भोकरे, निलेश निलेश सफेरा, भाजप प्रभाग अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर, सुधीर चव्हाण, नूतन जाधव, रवी शिंदे, निलेश आरडे,विनोद जगताप, अविनाश थोरात यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
आरोग्य शिबीरामध्ये नेत्र चिकित्सा, अल्प दरात चष्मे वाटप, हाडांची ठिसुळता, मणका, सांधेदुकी, सर्व हाडांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात सुमारे ५०० रुग्णांनी तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला. यावेळी शिबिरात डॉ.ऋषिकेश पवार, डॉ.शीतल पवार, हॉस्पिटल व्यवस्थापक सी.के.काळे, अक्षय काटे या डॉक्टरांनी सहकार्य केले. शौर्य प्रतिष्ठाणचे कार्य समाजासाठी कौतुकस्पद आहे. समाजहितासाठी नेहमी कार्य करीत राहवे, गोरगरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत प्रत्येकाने अंमलात आणले पाहिजे, असे आवाहन खासदार साबळे यांनी केले. दरम्यान, तामीळनाडू येथे राष्ट्रीय चेस बॉक्ससिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्या बद्दल बॉक्सर राहुल धोत्रे याचा सत्कार खासदार साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभावती जगताप, शुभम शिवले,साहिल शेख, निलेश मंडलिक,गणेश जावीर, ओंकार जगताप यांनी काम पाहिले. कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा.गोरख ब्राम्हणेसर व आभार शौर्य प्रतिष्ठण कार्यध्यक्ष विशाल सातपुते यांनी केले. या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - प्रत्येकाने आपल्या मनाशी संवाद साधूनच उद्योग, व्यवसायात गुंतवणूक करावी. प्रत्येकांच्या मनस्थितीचा परिणाम शरीरावर होत असतो. जो मनाने संतुष्ठ असतो, तोच समोरच्यांना संतुष्ठ करु शकतो. डॉक्टरांकडून मिळणारा विश्वास आणि सकारात्मकतेमुळे रुग्ण लवकर बरे होतात. फक्त शरीराचे डॉक्टर न होता, रुग्णांच्या मनावर देखील उपचार करणारे डॉक्टर व्हावे असे मार्गदर्शन ब्रम्हाकुमारी शिवानीदिदी यांनी केले.
ब्रम्हाकुमारी मेडीकल विभागाच्या वतीने पुणे व सांगवीतील तनुश्री गर्भसंस्कार आणि सुविधा आयुर्वेद संशोधन संस्थेने जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित केलेल्या डॉक्टरांसाठी ‘मानसिक आजार औषध परिषद’(Mind Body Medicin Conference) बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आली होती. याचे उद्घाटन डॉ. केएच संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप काळे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. व्यासपिठावर निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठानच्या भाग्यश्री पाटील, प्रतिभा मोडक, संयोजिका डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. सुभाष रानडे, डॉ.विजय डोहिफोडे, डॉ. शिरीष शेपाळ, डॉ. अनिल गुगळे, बनारसीभाई, सरितादिदी, डॉ. अरविंद संगमनेरकर आदी उपस्थित होते.
शिवानीदिदी म्हणाल्या की, जीवनात नको तिथे भावनिक गुंतवणूक केल्यास नकारात्मक परतावा मिळेल. मनापासून केलेल्या व्यवहारातून सकारात्मक परतावा मिळेल. जेंव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार, राग, व्देष नष्ट होईल. तेंव्हा आपल्या चहूबाजूला नेहमी सकारात्मक वलय निर्माण झाल्याचे दिसेल. डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयात सकारात्मक विचारांव्दारे मंदीराप्रमाणे प्रसन्न वलय निर्माण करावे. येथे येणारा रुग्ण देवाप्रमाणे डॉक्टरांवर भरवसा ठेवून येईल व विश्वासाने पुर्ण बरा होऊन जाईल. रुग्णालय परिसरातील सकारात्मक ऊर्जा वलय व आदरयुक्त आदरातिथ्याने रुग्णाचे स्वागत झाल्यास 50टक्के रुग्ण आपोआप बरा होईल. आज काल डॉक्टरच खुप ताण तणावाखाली त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणा-यांना नकारात्मकतेचा सामना करावा लागतो. डॉक्टर रुग्णांच्या नात्यात भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व प्राप्त झाल्याचे दिसते. एखादा व्यवसाय, उद्योग, नोकरी निवडताना शालेय गुणवत्तेत किती गुण आहेत यावरती ठरते. परंतू त्याच वेळी तो व्यवसाय, उद्योग, नोकरी करण्याची मानसिक तयारी, त्याबाबतचे संस्कार आपल्यात आहेत का? याचा प्रत्येकांनी विचार करावा. असे मार्गदर्शन शिवानीदिदी यांनी केले. डॉ. केएस संचेती म्हणाले की, ज्या पध्दतीने संस्कृतीचा स्विकार करतो तो धर्म, मनापासून जे करतो ते अध्यात्म. मनाची निगा राखली तर ह्रदयाला देखील औषधांची गरज भासणार नाही. प्रास्ताविक डॉ. सुप्रिया गुगळे, सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ, आभार सवितादिदी व पुजा शेपाळ यांनी मानले.
व्हीएस न्यूज - विरोधी पक्षाची भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे खूप चांगल्या प्रकारे वठवतात. ते जेव्हा जेव्हा विरोधी पक्षात राहिले आहेत, त्यांनी तेव्हा तेव्हा विरोधी पक्षाचे खूप चांगल्या प्रकारे काम केले आहे, असा टोला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी लगावला. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
शरद जोशींनी हमीभावासाठी १९८५-८६ साली मोठे आंदोलन उभारले होते. त्यावरुन देशभर रान पेटले होते. काँग्रेसने त्यानंतरही काही केले नाही. मग स्वामिनाथन आयोगाची स्थापना अटल बिहारी वाजपेयींनी केली. तो अहवाल पवार केंद्रीय मंत्री असताना आला. तो अहवाल त्यावेळीच मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या, असे म्हणत खासदार काकडेंनी पवारांवर निशाणा साधला. काकडे पुढे म्हणाले, स्वामिनाथन आयोगाचा अहवाल आल्यानंतरही ८ वर्षे गेली. पण अखेर अहवालातील काही गोष्टी घेत, मोदी सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केला. मोदींचे अभिनंदन करण्याऐवजी पवार ते लोकांची दिशाभूल करत असल्याचेही काकडे म्हणाले.
व्हीएस न्यूज - अल्प उत्पन्न गटातील महिलांना सॅनिटरी पॅडस वापरण्यास प्रवृत्त करण्यासाठी संत गाडगे बाबा स्वयंरोजगार सेवा सह. संस्थेच्या वतीने 'ना नफा ना तोटा' तत्वावर सॅनिटरी पॅडसची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. तसेच वापरलेले पॅडसची पर्यावरण पुरक अशी शास्त्रीयरीत्या मशीनव्दारे विल्हेवाट लावणे हा उपक्रम संस्थेच्या मार्फत राबविण्यात येत आहे. तसेच संत गाडगे बाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व संत गाडगे बाबा महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने सुका कचरा द्या, पैसे घ्या ही उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी 9822940610, 98500065386 या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन संत गाडगे बाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरूण वायदंडे यांनी केले आहे....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002