व्हीएस न्यूज - नोकरी लावण्याच्या अमिषाने एका तरूणाची 60 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निगडी येथे नुकताच उघडकीस आला आहे. तरूणाचे वडील दिलीप चौधरी (वय-60, रा. वानवडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अण्णासाहेब पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला आरोपीने नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीत आरोपीने वेळोवेळी तरूणाकडून 60 हजार रूपये घेवून नोकरी न लावता फसवणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पान टपरी चालक ज्येष्ठ महिलेच्या डोळ्यात मिरची पुड टाकून मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला वाकड पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी साडेदहा वाजता डांगे चौक रोड, काळेवाडी येथे घडला. याबाबत 70 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मणसिग सुरजसिग बायसठाकुर (वय-40, रा. सुदर्शन कॉलनी, पिंपळे-निलख) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची काळेवाडी येथे कुणाल पान नावाने टपरी आहे. टपरीवर आलेल्या आरोपीने त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेने त्याला प्रतिकार केल्याने मंगळसुत्र तुटून टपरीतच पडले. घाबरलेल्या आरोपींने धूम ठोकली. आरोपीला तात्काळ वाकड पोलीसांनी अटक केली. सहाय्यक फौजदार एम. आर. स्वामी अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - किरकोळ कारणावरून दोन सराईत गुन्हेगारांना मारहाण करत एकावर गोळीबार केला. ही घटना वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जयवंत भगवंत चितळकर (वय-30) आणि निलेश कोळपे (दोघेही रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. चितळकर याच्यावर चार तर कोळपे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. चितळकरला चिंचवड पोलिसांनी डिसेंबर 2017 पर्यंत तडीपार केले होते. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी माहिती दिली. चितळकर आणि कोळपे वाल्हेकरवाडीमधील शिवाजी चौकात बसले होते. त्यांनी दुचाकी रस्त्यात पार्क केली होती. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडथळा येत होता. एका मोटार चालकाने रस्त्यात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितले. यावरून मोटार चालक आणि जखमींमध्ये वाद झाला. काही वेळाने मोटार चालकाने साथीदारांना घेवून येत कोळपे व चितळकर यांना मारहाण केली. चितळकर याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याच्या डाव्या दंडाला गोळी लागली आहे. घटनास्थळावर परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक साळुंखे आदींनी भेट दिली. फौजदार आर. बी. सोडनवार अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - साप्ताहीक सुट्टीच्या दिवशी उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या येथिल परिसरात वर्दळीच्या ठिकाणी दोन ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील 56 हजार रुपये किंमतीच्या सोन्याची चैन दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी हिसका मारुन पळवुन नेल्याची घटना घडली. मागील तिन महिन्यातील सोन साखळी चोरीची खडकी पोलिस ठाणे हद्दीतील ही चौथी घटना आहे. मंगलम रामरत्तीनन (वय-67 रा.कॉंफी सेंटरा सोसायटी भाऊ पाटील रोड बोपोडी) व सुधा के.के.सोमन (वय -62 रा.गोयल शिंदे पार्क भाऊ पाटील रोड बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगलम या मैत्रीणीसह पावने पाच वाजता घरी जात असताना सोसायटी समोरील फुटपाथ शेजारील रस्त्यावरुन दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारुन पळ काढला. रात्री 8.35 वाजाता सुधा या घरी जात असताना सोसायटी समोर हे दोघे चोरटे दुचाकी वरुण आले व त्यांच्या गळ्यातील 16 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारुन पळवुन नेली. दोन्ही घटना या उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या भाऊ पाटील रोड येथिल वर्दळीच्या ठिकाणी घडल्या. खडकी पोलिस ठाणे हद्दीतील सोनसाखळी चोरीची मगील तिन महिन्यातील ही चौथी घटना आहे. दुचाकीवरुन हेल्मेट घालुन सोनसाखळी चोरणाऱ्या या दोन चोरट्यांनी खडकी बोपोडी परिसरात धुमाकुळ घातला आहे. न पोलिसांना या आरोपींचा शोध घेण्याकामी अद्याप यश न आल्याने सर्वसामान्य सहीतवयोव्रुद्ध महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण बोराटे या प्रकरणी म्हणाले की पोलिस आरोपींचा शोध घेतआहेत.
व्हीएस न्यूज - चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाने सादर केलेले चेंजरी रिपोर्ट हे योग्य असून ते धर्मदाय आयुक्तांनी मंजुर केले आहेत. त्यामुळे चिंचवड शिक्षण प्रसारक कार्यकारी मंडळाला धर्मदाय आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. निळकंठ चिंचवडे यांनी निवेदनाव्दारे दिली आहे. चिंचवडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाने सादर केलेले चेंजरी पोर्ट बोगस आहेत. मंडळाने कुठल्याही प्रकारची सुचना पत्र न देता बैठक घेतली. बैठकीला कोणीही हजर नव्हते. हजेरी पत्रक सुचनेची पोच आणि एनओसी या सर्व कागद पत्रांवर खोट्या सह्या करून चेंजरी रिपोर्ट केल्याची तक्रार सुरेश धोंडींबा चिंचवडे, सुर्यकांत नामदेव चिंचवडे, मुरलीधर सिताराम चिंचवडे, नानासाहेब बाबुराव चिंचवडे यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे सन 2010 मध्ये गेली होती. परंतू, सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी या सर्व प्रकरणाची शहानिशा करून चेंजरी रिपोर्ट हे योग्य असून ते मंजुर केले आहेत. त्यामुळे चिंचवड प्रसारक कार्यकारी मंडळाला धर्मदाय आयुक्तांनी एक प्रकारे हिरवा कंदील दिला आहे. मंडळाच्या वतीने ऍड. मनोज वाडेकर, ऍड. संजय भळगट यांनी काम पाहिले,अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. निळकंठ चिंचवडे यांनी निवेदनाव्दारे दिली आहे.
व्हीएस न्यूज - गुढीपाडव्याच्या सणानिमित्त खरेदीसाठी पुण्यातील नगर रस्त्यावरील प्रसिद्ध फिनिक्स मॉलमध्ये गेलेल्या तृतीयपंथी सोनाली यांना रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॉलच्या महिला सुरक्षा रक्षकाने आपल्याला मॉल प्रशासनाच्या नियमावलीत तसा आदेश असल्याचे सोनाली दळवी यांनी सांगितले. तसेच या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
सोनाली म्हणाल्या, फिनिक्स मॉलमध्ये मी मित्रासोबत गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी गेले होते. प्रवेशद्वाराजवळील महिला सुरक्षारक्षकाने मॉलमध्ये जात असताना मला पाहताच माझी तपासणी करण्यास टाळाटाळ केली आणि मला थांबण्यास सांगून तिने दुसऱ्या महिला सुरक्षारक्षकाला बोलावून घेतले. माझी हात न लावता त्या महिला सुरक्षारक्षकाने तपासणी करून मला प्रवेश नाकारला. प्रवेश नाकारण्याचे कारण विचारले असता आमच्या मॉल व्यवस्थापन पॉलिसीमध्ये तृतीयपंथाच्या व्यक्तींना प्रवेश न देण्यास सांगितले आहे, असे मला सांगण्यात आले.
सोनाली या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना म्हणाल्या, मॉलमध्ये प्रवेश देण्यापासून मला रोखण्यात आले. मला याचे दुखः झाले असून या पुढील काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी पाठपुरावा करणार. दरम्यान, याबाबत मॉलचे व्यवस्थापक सी. पी. पोरवाल म्हणाले, यापूर्वी आम्हाला तृतीयपंयाबाबत वाईट अनुभव आले होते. तसेच आम्ही त्यांना सुरक्षेसाठीच्या कारणास्तव थांबवून ठेवले होते. त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या ५ सदस्यांच्या जागेवर भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, अर्चना बारणे यांची तर अपक्ष आघाडीच्या साधना मळेकर यांची निवड करण्यात आली. आजच्या सर्वसाधारण सभेत या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीतील सदस्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ असतो. परंतु, सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे काढून निश्चित केली जातात. चिठ्ठीद्वारे भाजपचे सहा नगरसेवक बाहेर पडले होते. बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती देखील झाली आहे.
चिठ्ठीतून वाचलेले भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच भाजपसोबत असलेले अपक्षांचे गटनेते कैलास बारणे स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून कायम राहिले होते. परंतु, स्थायी समितीत पाच वर्षात ५५ नगरसेवकांना संधी देण्यासाठी ‘ड्रॉ’ काढण्याच्या अगोदरच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या दहा आणि अपक्ष एक अशा ११ नगरसेवकांचे स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे घेतले होते.
स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये. यासाठी भाजपने चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. त्यामुळे पाच वर्षात ५५ नगरसेवकांना संधी देण्यासाठी घेतलेले चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती नगरसेवकांचे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी (दि.९) मंजूर केले होते.
त्यामुळे स्थायी समितीत भाजपच्या चार आणि अपक्षांची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या जागांवर भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, अर्चना बारणे या चार आणि अपक्ष साधना मळेकर यांची सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी भाजपच्या तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी अपक्ष नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिले. त्यानंतर संबंधीतांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर काळजे यांनी केली.
व्हीएस न्यूज - लोणावळ्यावरुण पुण्याकडे जाणाऱ्या लोकलमधुन बोपोडी रेल्वे पुलाखालील मुळा नदी पात्रात रविवारी रात्री पडलेल्या विवाहीत महिलेचा मृतदेह तब्बल 16 तासांच्या शोधमोहीमेनंतर अग्निशामक दलास सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सापडला. शितल सुमित लोहरे (वय-26 रा.पडळ वसाहत आंबेडकर नगर बोपोडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
पुणे औंध अग्निशामक दलाने शितलचा मृतदेह मुळा नदीपात्रातुन होडीच्या सहाय्याने शोधुन काढला. यावेळी हॅंरीश पुलावर तसेच पुला खालील सब वे मार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. रविवारी सायंकाळी शितल या पिंपरी येथे राहत असलेल्या बहिणीकडे तिला भेटण्यास गेली होती. रात्री 8 वाजुन 10 मिनीटांच्या लोकलने त्या पिंपरी रेल्वे स्थानकातुन खडकीकडे निघाल्या होत्या. लोकल बोपोडी रेल्वेपुलावरुण जाताना त्या रेल्वे पुलाखालील मुळा नदी पात्रात पडल्या. लोकल मधील एका महिला रेल्वे प्रवासीने रेल्वे डब्यात सापडलेली बॅंग खडकी रेल्वे पोलिसांना दिली. या बॅंग मधील मोबाईलवर कुटुंबियाचा फोन आला. तेव्हा पोलिसांना सदर बॅंग शितलची असल्याचे समजले.
रेल्वेतील एका प्रवासाने पुणे रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलिसांना बोपोडी रेल्वे पुलावरुण एक महिला मुळा नदी पात्रात पडली असल्याची खबर दिली. त्यानंतर रविवारी रात्री अग्निशामक दलाच्या मदतीने खडकी पोलिसांनी प्रथम शोध घेतला. नंतर सोमवारी सकाळी पोलिस उपनिरिक्षिक मदन कांबळे व पोलिस हवालदार मोमिन यांनी अग्निशामक दलाच्या मदतीने पुन्हा शोध मोहिम राबवली. दुपारी12.30 च्या सुमारास अखेर मृतदेह शोध शोधण्याकामी पोलिसांना व अग्निशामक दलास यश आले. उड्डान पुलाच्या कामानिमित्त नदीपात्रात भर टाकल्याने नदीचे पाणी अडुन राहते. त्यामुळे नदीपात्रातील मृतदेह शोधण्यात अडचण आली नाही.
व्हीएस न्यूज - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक घोटाळ्यामध्ये बॅंकेबरोबरच समांतर क्षेत्र तेवढेच जबाबदार आहेत. बॅंका या वित्तपुरवठ्याचे एक साधन आहेत. मात्र, दिलेल्या कर्जाचा उत्पादन क्षेत्रामध्ये पर्याप्त व योग्य वापर केला जात नाही, म्हणून सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये घोटाळे होत असल्याचे दिसून येत आहे, असे मत लेखक, संशोधक व आर्थिक सल्लागार डॉ. संतोष दास्ताने यांनी व्यक्त केले.
इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शिक्षक प्रबोधिनी व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बॅंकिंग विषयासाठी अल्पमुदत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी डॉ. दास्ताने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे, प्रा. के. व्ही. अडसूळ, डॉ. अर्चना जाधव, डॉ. एस.के. सानप, डॉ. एस.एस. मेंगाळ, प्रा. एम.व्ही. खांदवे, डॉ. बी.के. रसाळ, प्रा. डी.बी. पेठे, प्रा. एम.व्ही. देशमुख, प्रा. सुरेश थरकुडे, प्रा. श्रद्धा गुजराती, प्रा. डी.पी. काकडे आदी उपस्थित होते.
डॉ. दास्ताने म्हणाले, पंजाब नॅशनल बॅंकेत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. इतरही अनेक बॅंकांमध्ये घोटाळे आहेत. बॅंका या कर्ज देण्याचे साधन असून, बॅंकांनी मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्रात कर्ज दिली आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात 1991 नंतरच्या आर्थिक उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण यामुळे तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडून या स्पर्धांना तोंड देण्यासाठी बॅंकांकडून मोठ्या प्रमाणात कर्जाच्या रुपाने भांडवलाचा पुरवठा केला जातो. कर्ज मिळवण्यासाठी कंपन्या आपले ताळेबंद फुगवून दाखवतात. त्यामुळे बॅंका त्यांना मोठ्या रकमेची कर्ज देतात. प्रत्यक्षात मात्र बॅंका अशा कंपन्यांच्या ताळेबंदाचा सखोलपणे अभ्यास करत नाहीत. दुसऱ्या बाजूला सूक्ष्म उद्योग, महिला उद्योग, बचतगट यांच्याकडून मात्र 95 ते 98 टक्के कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केली जाते. मोठे उद्योग स्वइच्छेने डिफॉल्टर असतात. त्यांची कर्जफेड करण्याची करण्याची क्षमता असतानाही ते हेतूपुरस्सर कर्ज फेडत नाहीत.
ते पुढे म्हणाले, कर्ज देत असताना प्रकल्पाच्या 150 टक्के तारण मालमत्ता असली पाहिजे. परंतु अलिकडे कर्ज वाटप करताना तारण नको, कारण पहा, असा विचार दृढ होत आहे. थकलेल्या कर्जदारासंबंधी कोठेतरी सरकारचे पाठबळ आहे. रिझर्व बॅंकेची स्वायत्तता कमी होत आहे. अलिकडे सरकार रिझर्व बॅंकेच्या धोरणात हस्तक्षेप करीत आहे. बॅंक रेट, सीआरआर, एसएलआरच्या प्रमाणात घट करा, असा सरकारचा रिझर्व बॅंकेवर दबाव येत आहे. निरव मोदीच्या कर्जासंबंधी रिझर्व बॅंकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारला पूर्वसूचना दिली होती. परंतु सरकारने त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यामुळे पंजाब नॅशनल बॅंकेत मोठा घोटाळा झाला, असेही डॉ. दास्ताने यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. अर्चना जाधव यांनी, तर प्रा. अडसूळ यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - आईला सोडविण्यासाठी निगडी बस थांब्यावर आलेल्या एका तरूणीशी पावती फाडण्यावरून वाहतूक पोलीस महिलेने वाद घातला. तसेच मधस्थी करणाऱ्या एका पोलीस मित्र महिलेला मारहाण केली. हा प्रकार सोमवारी दुपारी एकच्या सुमारास निगडी पीएमपीएमएल बस थांब्यावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक तरूणी दुचाकीवरून आपल्या आईला सोडविण्यासाठी बस थांब्यावर आली होती. आईला सोडून ती दुचाकीवर बसली होती. त्याचवेळी निगडी वाहतूक शाखेची टोईंग मोटार तेथे आली. वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने तरूणीला पावती फाडावी लागेल, असे सांगितले. तरूणीने मी आईला सोडवून लगेच जाणार होते. मी गाडीवर बसले आहे,तुम्ही पावती फाडू शकत नाही. यावरून पोलीस कर्मचारी महिलेने तरूणीशी वाद घातला. हा वाद पाहून तेथे आलेल्या पोलीस मित्र महिलेने वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेला तुम्ही चुकीची कारवाई करत आहात, असे सांगितले. यावरून चिडलेल्या पोलीस कर्मचारी महिलेने पोलीस मित्र महिलेने मारहाण केली. पोलीस मित्र महिलेनेही टोईंग मोटारीला आडवी थांबत मोटार जाऊ देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे बघ्याची मोठी गर्दी जमली. जमावानेही पोलीस महिलेला चुकीची कारवाई करत असल्याचा जाब विचारला.
निगडी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जाधव घटनास्थळी आल्यानंतर हा वाद निवळला. संबंधित तरूणीला वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने दमबाजी केल्यामुळे तिने फिर्याद दिली नाही. परंतू, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी पावती फाडण्यासाठी दादागिरी करत असल्याचा प्रकार समोर आल्याने पोलीसांच्या कामाबाबत उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
व्हीएस न्यूज - श्री विठ्ठल रूक्मिणी प्रेरणा मंडळाच्या वतीने ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचन सोहळ्याचे दि. 21 ते 28 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
प्राधिकरणातील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात सकाळी आठ वाजता पारायण, सायंकाळी 5.30 वाजता हरिपाठ तर सायंकाळी 6 वाजता प्रवचन होणार आहे. यामध्ये सुरेश आगाशे, ह.भ.प. किसन महाराज चौधरी, जयश्री सांगवीकर, ओजदा पोळ, चंद्रशेखर निलाखे, यशवंत लिमये, मधुवंती देव आदी प्रवचनकारांची प्रवचने होणार आहेत. तर शेवटच्या दिवशी ह. भ. प. नारायण महाराज आरडे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. पारायणास बसू इच्छिणाऱ्यांनी शरद अवचट 8275682164 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मोकाशी यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - पुणे येथून लोणावळ्याला मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्यासाठी आलेल्या विद्यार्थी तरुणाचा वाढदिवसाच्याच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यातील वळवण कॉलेज समोर घडली.
शुभम नानूराम सुखवाल (वय-22, सध्या रा. वडगाव धायरी, पुणे, मूळ राज्यस्थान ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मृताचे नाव आहे. शुभम हा पुण्यातील वडगाव धायरी येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभमचा रविवारी वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी शुभम आणि त्याचे इतर पाच मित्र त्यांच्या मोटारसायकलने पुण्याहून सकाळी पावणेदहाच्या सुमारास लोणावळ्याकडे निघाले होते. शुभम हा त्याच्या पल्सर मोटारसायकलने येत होता. त्याचे लोणावळ्यातील वळवण कॉलेजसमोर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी मार्गालगतच्या सिमेंट पुलाच्या खांबाला जोरात धडकली. यात त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास युवराज बनसोडे करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002