व्हीएस न्यूज – प्रतिभाताई पाटील यांचा आज सत्कार माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते होऊ शकला नसला तरी हा सत्कार या व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. शरद पवार हे देशाचे भावी राष्ट्रपती असल्याचे मिश्किल उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान काढल्यामुळे अनेकांच्या भुवया शिंदे मनातलेच बोलले की काय या भावनेने उंचावल्या होत्या.
पवारांचा उल्लेख भावी राष्ट्रपती असा करताच व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांनी लगेच नकारार्थी हात दखवला. पण हाच त्यांचा होकार आहे असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी मी त्यांच्याच करंगळीला धरून राजकारणात आलो असल्याची कबूली यावेळी शिंदे यांनी देताच सभागृहात हशा पिकला.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी प्रतिभा पाटील जीवनगौरव ग्रंथ समितीतर्फे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या जीवनावर आधारित ‘भारताची प्रतिभा’ या जीवनगौरव ग्रंथ, संकेतस्थळाचे प्रकाशन करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शरद पवार यावेळी म्हणाले, अनेक महत्वाच्या पदांवर प्रतिभाताई पाटील यांनी देखील कामे केली आणि त्याला न्याय देखील दिला. मात्र, फक्त त्यांचे मुख्यमंत्री या एका पदावर काम करायचे राहून गेले. हे पद त्यांच्यापासून हिरावून घेण्याचे काम मी केले, असे ते मजेत म्हणाले.
व्हीएस न्यूज - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधानाबाबत केलेले विधान हे अत्यंत चुकीचे असून भाजप नेत्यांना बेताल विधाने करून सरकारला अडचणीत आणण्याची सवय असल्यामुळे भाजपने सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या हेगडे यांना समज द्यावी, अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मी संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आहे. आरक्षण संपुष्टात आणणार आणि संविधान मोदी सरकार बदलणार, असा अपप्रचार केला जात आहे. राज्यघटनेच्या पाठीशी पंतप्रधान मोदी ठामपणे उभे आहेत, असेही आठवले यांनी सांगितले.
आठवले म्हणाले, की संसदेत हेगडे यांच्या विधानावर खुलासा करण्यात आला असून संविधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे संविधान सरकार बदलेल ही भावना चुकीची असून हेगडे यांनी कदाचित हे विधान कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले असावे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकविण्यात येईल मात्र घटना बदलू दिली जाणार नाही.
व्हीएस न्यूज – मी नागपुरात येऊन संघ समाप्ती संमेलनाची घोषणा करणार असून संघाची संविधान (राज्यघटना) बदलण्याची इच्छा आहे. तुमच्यात दम असेल तर संविधान बदलूनच दाखवा आणि आम्ही संविधान वाचवून दाखवू,असे आव्हान गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी भाजप व संघ परिवाराला दिले. भाजप विरुद्ध गरिबी अशी लढाई २०१९ च्या निवडणुकीत असेल. फॅसिस्ट संघ परिवाराच्या या लढाईत पराभवासाठी जात, धर्म, पक्ष वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. कुणीही जिंकू दे पण भाजपचा पराभव झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
रविवारी पुण्यात नव्या पेशवाईविरोधातला सांस्कृतिक एल्गार या नावाने एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राधिका रोहित वेमुला यांनी कोरेगाव-भीमा (पुणे) येथील मराठेशाहीच्या कथित पराभवाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित या परिषदेचे उद्घाटन केले. ही परिषद भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिग्नेश मेवाणी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना अजहरी, आदिवासी महिला नेत्या सोनी सोरी, ‘भीम आर्मी’चे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतनसिंग, सर्वहारा आंदोलनाच्या उल्का महाजन, ‘जेएनयू’तील विद्यार्थी उमर खालिद, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील आदी उपस्थित होते.
काही संघटनांनी मी पुण्यात येऊ नये म्हणून इशारा दिला. मी त्यांना सांगू इच्छितो की मी तुमच्या मोदी-शहाला घाबरलो नाही. गुजरातेत मोदींची ५६ इंची छाती फाडून ठेवली. तुम्ही तर अजून ‘बच्चे’ आहात. जात, धर्म, भेद सोडून जनता ‘शेतकरी’ व ‘तरुण’ म्हणून पुढे येईल तेव्हा भाजपला २०१९ मध्ये दोनअंकी संख्यासुद्धा गाठू देणार नाही. मोदी ४ वर्षे विकासाच्या गप्पा मारतात. ‘राम विरुद्ध हज’चा अपप्रचार निवडणूक आल्यावर करतात. या नव्या पेशवाईविरुद्धचा लढा निवडणुकीतून लढता येणार नाही. त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असे मेवाणी म्हणाले.
व्हीएस न्यूज - मंगळवार दिनांक २ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजता छञपती शिवजी महाराज अर्धाकृती पुतळा ग प्रभाग समोर थेरगाव या ठिकाणी शिवसेना राहटणी काळेवाडी विभागांच्या वतीने सत्ताधारी व प्रशासनाच्या अनागोंधी कारभाराच्या तसेच २०१५ला प्राईड होम सोसायटी समोरील संबधीत जागामालकांनी तापकिरनगर परिसरातील रोडची जागा हस्तांतरीत करून सुध्दा स्थानिक पुढार्यांच्या दबावा ने रोड चे काम रखडले त्याच्या निषेधार्थ शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शन खाली जाहीर निदर्शने करण्यात येणार आहे तरी आपण उपस्थित राहुन तेथील सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी उपस्थित राहुन सहकार्य करावे अशी विनंती शिवसेना प्रभाग प्रमुख राहटणी काळेवाडी,शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा.युवराज भगवान दाखले.यांनी केली आहे ...Read More
व्हीएस न्यूज - प्रत्येक जण हा आयुष्यभर ग्राहकच असतो. नागरिकांवर होणा-या फसवणुकीबाबत व अन्याया विरोधात न्याय मागण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा समजुन घेणे आवश्यक आहे. असे मत व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले. भोसरी येथील स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये अखिल भारतीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी अमर तेजवानी,प्रमिला वाघमोडे, ग्रंथपाल वर्षा जाधव यांच्यासह बहुसंख्येने अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते. वस्तू किंवा सेवेत कमतरता, त्रुटी असल्यास ती दूर करून घेण्याचा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याने दिला आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत १९८४ साली पुण्यात स्थापन झाली. ग्राहकांची हि पहिलीच भारतीय संघटना आहे. ग्राहकांची रोजच्या व्यवहारात होणारी फसवणूक, लुटमार थांबविण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्नपूर्वक ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ रोजी संसदेत पास करून घेतला. भारतातील प्रत्येक नागरिकाने जागरुक राहणे महत्वाचे असुन दैनंदिन जीवनक्रमामध्ये होणा-या फसवणुकीबाबत “ग्राहक न्यायालयात” दाद मागितली पाहिजे. प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक पंचायतीची उद्दिष्टे, याबाबतची माहिती समजुन घेणे गरजेचे आहे. ग्राहकांची फसवणुक करुण व्यापा-यांनी अवाजवी नफा कमवू नये. कायद्यानुसार ग्राहक न्यायालयामध्ये तक्रारदाराला ९० दिवसात न्याय मिळणे अपेक्षीत आहे. प्रत्येक वस्तु व सेवा विकत घेताना ग्राहकाने कायदेशीर बिल घेणे आवश्यक आहे. बिल असेल तर ग्राहकाला ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. ग्राहकाने वाहन, घर आदी विकत घेताणा त्याबाबतचा करारनामा वाचल्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करावी. प्रत्येक ग्राहकाने जागरुक असने गरजेचे असून माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर करावा. हॉस्पिटल, न्यायालय, वाहन परिवहन, हवाई सेवा, जल प्रवास, विद्युत सेवा, सर्व राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महसुल विभाग आदी विभागाकडून नागरिकांना देण्यात येणा-या सेवा पारदर्शी करण्यासाठी ग्राहक पंचायतींची आवश्यकता असल्याचे मतही व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले.
जिल्हा ग्राहक न्यायालयामध्ये एक अध्यक्ष व दोन सदस्य अशी रचना असते. आपले म्हणणे लिखित स्वरुपात पुराव्यासहित किमान ४ प्रतीमध्ये सादर करावे. आपला खटला आपण लढवू शकतो. तसेच जरुरत पडल्यास वकील हि देता येतो. जिल्हा ग्राहक न्यायालयात २० लाखा पर्यंतच्या तक्रारी दाखल करता येतात त्यापुढे १ कोटी पर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगापुढे दाखल करता येतात. १ कोटीच्या पुढील तक्रारी राष्ट्रीय आयोगाकडे दाखल करता येतात. त्यापुढे सुप्रीम कोर्टात अपील करता येते. मोर्चे, रास्ता रोको, तोडफोड, घेराव असे कायदेभंगाचे मार्ग न अवलंबता सविनय कायदे पालन हे सूत्र ग्राहक पंचायतीने सिद्ध करून दाखविले आहे. सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य तसेच सार्वजनिक क्षेत्रात लोकांच्या अडाणीपणामुळे लोकांचे शोषण होत असुन यामुळे त्यांचा अर्थिक दर्जा उंचावत नसल्याने सामाजिक असमतोल वाढल्याचे दिसुन येते. असे ही ते म्हणाले.
व्हीएस न्यूज - भोसरीतील श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत राज्यस्तरीय माळी समाज वधू वर परिचय मेळाव्यात सहाशे एक (मुले377, मुली 225) इच्छुक वधू - वरांनी सहभाग घेतला होता. मेळाव्याचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, नगरसेवक संतोष लोंढे, राहूल जाधव, लक्ष्मण सस्ते, नम्रता लोंढे, पिंपरी चिंचवड माळी महासंघाचे अध्यक्ष आनंदा कुदळे, डॉ अनु गायकवाड, उद्योजक सुदाम अभंग, चंद्रकांत रासकर, ज्ञानेश्वर विधाटे, भास्कर बुरडे, सिने अभिनेता संतोष माने, मेळावा प्रमुख मच्छिंद्र दरवडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम ताम्हाणे, शाम गायकवाड, हनुमंत लोंढे, पंढरीनाथ राऊत, गणपत विधाटे, उत्तम गायकवाड, नोटरी क्लब पिंपरी अध्यक्ष जसबिंदर सिंग, अध्यक्षा वर्षा पांगारे आदींसह इच्छुक वधू - वर,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002