व्हीएस न्यूज - पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी भीमसैनिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी रास्ता रोको केला. चौकात भीमसैनिकांनी ठिय्या मांडला असून चौकातून सर्व मार्गानी येणारी वाहने अडवून निषेध नोंदविण्यात येत आहे. चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भीमा कोरेगाव मधील घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले असून विश्रांतवाडी परिसरातील मुख्य चौकात निषेध करण्यासाठी जमाव जमला आहे. व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी 1997 मध्ये चार प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 2012 मध्ये कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन प्रभाग कार्यालयांची निर्मिती करून त्यांना क्षेत्रीय कार्यालय संबोधण्यास सुरूवात केली. मात्र फेब्रुवारी 2017 मध्ये चार सदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणूक झाली. त्यानुसार 32 निवडणूक प्रभाग झाले आहेत. ही प्रभाग रचना होत असताना पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये,तसेच नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून आठ कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
ही नवीन आठ क्षेत्रीय कार्यालये क्रांतीदिनापासून म्हणजे 9 ऑगस्ट 2017 पासून अस्तित्वात आली आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांना प्रशासनाने कामकाजाच्या सोईसाठी 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग' आणि 'ह' अशी नावे दिली आहेत. क्षेत्रीय कार्यालयांना नावे नसल्यामुळे नागरिकांचाही गोंधळ उडत आहे. त्यामुळे या कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे दिल्यास ते नागरिकांना सहज लक्षात ठेवता येईल. तसेच क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचाही गौरव होईल. त्यानुसार 'अ' क्षेत्रीय कार्यालयाला पन्हाळगड, 'ब' क्षेत्रीय कार्यालयाला पुरंदर, 'क' क्षेत्रीय कार्यालयाला सिंहगड, 'ड' क्षेत्रीय कार्यालयाला रायगड, 'इ' क्षेत्रीय कार्यालयाला शिवनेरी, 'फ'क्षेत्रीय कार्यालयाला देवगिरी, 'ग' क्षेत्रीय कार्यालयाला सिंधुदुर्ग आणि 'ह' क्षेत्रीय कार्यालयाला प्रतापगड हे नाव देण्यात यावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. दरम्यान, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रभाग कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेची आठ प्रशासकीय कार्यालये लवकरच गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत.
व्हीएस न्यूज - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण करू नये, तसेच मानवी हक्काचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, असे प्रतिपादन अॅड. मंजुषा इधाटे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील स्पर्धा परीक्षा केंद्रात मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देताना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अॅड प्रा. आण्णासाहेब ठोसर, अॅड मंजुषा इधाटे, अलका जोशी, नागरिक व अभ्यासक विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी अॅड मंजुषा इधाटे म्हणाल्या, मानवी हक्काच्या रक्षणासाठी न्यायालयांचा उपयोग होतो. मानव अधिकार म्हणजे सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होय. सन्मानाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये कुटुंब निर्माण करण्याचा कुटुंबात राहण्याचा, जीवन समृद्ध करण्यासाठी व जीवनाचा विकास करण्यासाठी म्हणून शिक्षण घेण्याचा अधिकार यामध्ये येतो. शिक्षण घेतल्यावर आवडीचा व्यवसाय करण्यासाठी व त्यासाठी मुक्त संचार करण्याचा तसेच स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार म्हणजे मानव अधिकार होय, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी अॅड प्रा.आपासाहेब ठोसर म्हणाले, राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी उपलब्ध करून दिले आहेत. परंतु बहुतेक नागरिकांना या विषयाचे ज्ञान नसल्याने ते वंचित राहतात. कायदा म्हणजे सागर आहे. कशासाठी व कोणासाठी जगायचे याचे तत्वज्ञान मानव अधिकारामध्ये आहे. सर्वांचे संरक्षण करण्यासाठी घटना आहे. मानव अधिकारांचे संरक्षण व्हावे असेही ते यावेळी म्हणाले. मानवी हक्क दिनानिमित्त अलका जोशी यांनीही माहिती दिली. मानवी मूल्यांना बाधा न पोहचता प्रत्येक माणसाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य हि घटनेने दिले आहे. आजच्या युवा पिढीने मानवी हक्क व कर्त्यव्याची जाणीव परिसरातील नागरिक व मित्र परिवारांना करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असेही यावेळी अलका जोशी यांनी सांगितले. यावेळी घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचनही करण्यात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी यांनी केले.
व्हीएस न्यूज - नववर्षाच्या स्वागताला मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 1165 जणांवर पुणे शहर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागात 31 डिसेंबरच्या रात्री नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरते.
शहरातील एफसी रोड, एमजी रोड, हडपसर, हिंजवडी या भागात मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन साजरे केले जाते. यावेळी काही अतिउत्साही तरूण दारू पिवून धिंगाणा घालतात. अशा तरुणांना रोखण्यासाठी शहरातील प्रमुख चौकात आणि मोक्याच्या 28 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये अल्कोमीटर आणि ब्रेथअॅनलायझरद्वारे ठिकठिकाणी तपासणी करून 'ड्रंक अँड ड्राईव्ह' करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
व्हीएस न्यूज - पुणे-नगर मार्गावर सणसवाडी परिसरात अज्ञांताकडून गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यात 40 हून अधिक कार, गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर येत आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे तासभर तणावपूर्ण स्थिती होती. मात्र, तेथे सीआरएफच्या तुकड्या पाठवल्या आहेत. सध्या स्थितीवर पूर्ण नियंत्रणात परिस्थिती निवळली आहे. दरम्यान, वढू बुद्रुक येथे नामफलकावरून दोन गटातील वादावरून दगडफेकीची घटना घडल्याचे समोर येत आहे. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गावरील गावे बंद ठेवण्यात आली आहेत. तेथून जवळच असलेल्या भीमा कोरेगाव येथे दलित संघटनांचा शौर्य दिन कार्यक्रम आज साजरा होत आहे. त्यामुळे या दगडफेक घटनेकडे भीमा कोरेगावची तर पार्श्वभूमी नाही ना हे तपासले जात आहे.
आज सकाळी 11 च्या सुमारास काही अज्ञांत टोळक्याने नगर-पुणे मार्गावरील सणसवाडी परिसरात अचानक कार व गाड्यांवर दगडफेक सुरू केली. कोणाला काहीच कळायच्या आत तरूणांनी दगडफेक सुरू केली. मात्र, दगडफेक का आणि कोणी केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. आज सकाळी नेहमीप्रमाणे रस्त्यावर वर्दळ होती. त्यामुळे स्थिती तणावपूर्ण होती. मात्र, पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवले. त्याचवेळी त्यांच्या मदतीला सीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
व्हीएस न्यूज - लोहगडावर आज वणवा पेटल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुर्गप्रेमीकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गडावर सध्या अनेक पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. तसेच गडावर असलेल्या दर्ग्याच्या उरुसासाठी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक जमले आहेत. दोन दिवसांपूर्वी गडाच्या पायथ्याला असाच वणवा पेटला होता. धूम्रपान करणाऱ्या मंडळींमुळे असे प्रकार घडत असल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002