व्हीएस न्यूज - पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर जात असताना फुगेवाडी जवळ बीआरटी मार्गातील दुभाजकावर चढला. यामुळे बीआरटीचे बॅरिकेटस तुटून पडले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बुधवारीही याच ठिकाणी अपघात झाल्याचे समजते. त्यामुळे बीआरटी मार्ग किती सुरक्षित आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तर बीआरटी सुरू मार्ग सुरू होण्यापुर्वी चालकांना दिसेल असा सुचना फलक लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. ...Read More
व्हीएस न्यूज - भोसरीतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट पुणे गुन्हे अन्वेषण शाखेने उधळला आहे. याप्रकरणी सातारा येथील कुख्यात गुंडाला अटक केली आहे. व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी त्यांच्याकडून 35 लाख रूपये उसने घेणाऱ्यानेच दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. चार दिवसापुर्वीच पुण्यातील देवेन शहा या बांधकाम व्यावसायिकाचा खून झाला होता.
अमोल संपत मदने (वय 32 रा. वनवडी, कऱ्हाड) असे या कुख्यात गुंडांचे नाव आहे. उदयसिंह चव्हाण उर्फ नाथजी महाराज व त्याच्या एका नातेवाईकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रामभाऊ लांडगे (वय 33 रा. भोसरी) या बांधकाम व्यावसायिकाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित लांडगे यांचा उदयसिंह चव्हाण उर्फ नाथजी महाराज याच्याशी ओळख झाली. लांडगे हे शहरातील मोठे बांधकाम व्यावसायिक असल्याचे चव्हाण याला माहित झाल्याने त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. चव्हाण याचा सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथील आसवले गाव येथे मोठा आश्रम आहे. नाथजी महाराज म्हणून त्याची पंचक्रोशीत ख्याती देखील आहे. या ओळखीचा फायदा घेत चव्हाण याने आश्रमाची अडचण सांगत अमित यांच्याकडे प्रथम 18 लाख तर दुसऱ्यांदा 17 असे 35 लाख रूपये मागून घेतले. ही रक्कम लांडगे यांनी चव्हाणला वारंवार मागितली. परंतू, चव्हाणला पैसे देणे शक्य झाले नाही. त्यामुळे चिडलेल्या चव्हाणने जानेवारी 2018 मध्ये लांडगे यांना जीवे मारण्यासाठी कुख्यात गुंड अमोल मदने याला 20 लाखांची सुपारी दिली. या प्रकरणाची माहिती सांगवी पोलिसांकडून लांडगे यांना मिळाली. याबाबत खात्री झाल्यानंतर लांडगे यांनी थेट पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधला. ही माहिती आयुक्तालयाने पुणे गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. अन्वेषण शाखेने तपासाची वेगाने चक्रे फिरवली अन् लांडगे यांना मारण्यासाठी मदनेला सुपारी दिल्याचे उघड झाले. मदने याच्यावर सातारा परिसरात खून, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल असून त्याला सातारा येथून अटक केली. चव्हाण व त्याचा नातेवाईक हे दोघे फरार आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अन्सार शेख, कर्मचारी दिनेश गडांकुश, सिराज शेख, अस्लमखान पठाण, अजय खराडे, राजू केदारी, किरण पवार, किशोर वग्गू, अजित फरांदे, प्रसाद जंगिलवाड, चंद्रकांत महाजन, गणेश नरूटे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.
भाजपाचे आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कारटं धोरण
व्हीएस न्यूज - महापालिका प्रवेशव्दारावर आंदोलन केल्याप्रकरणी मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांवर दखल पात्र तर आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी भाजप नगरसेवकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचे ते कारटं या धोरणाबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुषार कामटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुरूवारी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पालिकेच्या सुरक्षा रक्षकाने तक्रार दिली आहे. प्रभागातील बेकायदा फ्लेक्स काढावेत म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक तुषार कामटे यांनी सोमवारी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर फेकले. कामटे हे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे त्यांच्यावर फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून होऊ लागला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेविका पौर्णिमा सोनावणे आणि मनसेचे गटनेते नगरसेवक सचिन चिखले यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेको आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा पालिका प्रशासनाने दाखल केला होता. त्यामुळे प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना अभय देत असल्याची टीका होऊ लागली आहे.
व्हीएस न्यूज - बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी केलेला कायदा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, गेल्या १३ वर्षांपासून खासदार असणा-या शिवाजीराव आढळराव यांनी बैलगाडा शर्यतीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. आता लोकसभेची निवडणूक जवळ आली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रक काढण्यात पटाईत असलेले आढळराव यांनी पत्रकबाजी करण्यास सुरुवात केली आहे. बैलगाडा शर्यतीबाबत ते गंभीर नसून केवळ भावनिक मुद्दा करुन ते आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा, हल्लाबोल भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी करावयाच्या कायद्यातील बदलाला केंद्र सरकारने लेखी नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन नगरसेवक राहुल जाधव यांनी खासदार आढळराव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगरसेवक जाधव यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न प्रलंबित आहे. खासदार शिवाजीराव आढळराव हे गेल्या १३ वर्षांपासून खासदार आहेत. प्रत्येकवेळी निवडणुक आली की आढळराव बैलगाडा शर्यतीचा प्रश्न हाती घेतात. सरकारवर आरोप करतात आणि आपण किती बैलगाडा मालकांच्या बाजुने आहोत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.
शेतक-यांमध्ये जातात मी बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न करत असल्याचे खोटे सांगतात आणि नागरिकांना भुलवतात. २००९ आणि २०१४ ची लोकसभा निवडणुक त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या मुद्यांवरुनच लढवून जिंकली. मात्र, शर्यतीचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. त्यामुळे बैलगाडा मालक-चालक संघटना त्यांच्याविरोधात गेल्या आहेत. केवळ निवडणूक जवळ आली की त्यांना बैलगाडा शर्यतीची आठवण होते, असेही जाधव म्हणाले.
आमदार महेश लांडगे यांनी तीन वर्षात राज्य सरकारच्या पाठीमागे लागून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत कायदा तयार करुन घेतला. विशेष म्हणजे, भाजप सरकारमधील विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी पाठींबा देवून संबंधित विधेयक मंजूर केले. तसेच, न्यायालयीन लढाईसाठी राज्य सरकारने स्वखर्चातून वकीलांची नेमणूक केली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार मोठे प्रयत्न करत आहे.
राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला की शिवसेना सत्तेत आहे. आमचे देखील तो कायदा करण्यात योगदान आहे, असे सांगून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न खासदार शिवाजीराव आढळराव करतात. या कायद्याला न्यायालयाने स्थगिती दिली की हेच खासदार सरड्याला लाजवेल अशा प्रकारे रंग बदलतात आणि सरकारवर टीका करतात. सरकारने कायदा सक्षम केला नसल्याचे सांगतात. कायदा करताना शिवसेनेचे योगदान असे सांगतात. मग,कायदा करताना शिवसेनेचे मंत्री, आमदार काय करत होते? असा सवालही नगरसेवक जाधव यांनी उपस्थित केला आहे.
व्हीएस न्यूज - पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते फुगेवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन होणार होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आजच या इमारतीचे उद्घाटन केले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मुले व मुली प्राथमिक विद्यालय व कै. सौ.मिनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार होते. या शाळेचे नूतनीकरनाचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात झाले होते. या प्रभागातील नगरसेवक रोहित आप्पा काटे,स्वाती उर्फ माई काटे व राजू बनसोडे यांना विश्वासात घेतले नाही. तसेच कुठल्याही प्रकारचे निमंत्रण न देता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळेच या इमारतीचे उद्घाटन आज राष्ट्रवादी तर्फे करण्यात आले.
यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक रोहित आप्पा काटे, माई काटे, निकिता कदम, सुलक्षणा धर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश संघटक विशाल काळभोर व कविता खराडे उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - शास्तीकराबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मूळ मालमत्ता कर भरून घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. २०१५ पर्यंतची बांधकामे नियमित करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. अशा बांधकामांना महापालिकेच्या वतीने थकीत मिळकतकरासोबत शास्तीकर भरण्याच्याही नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. मिळकतीवर अवाच्या सव्वा शास्तीकर लादला जात असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. शास्तीकर आणि विविध नोटीस फी यामुळे कराच्या एकूण रकमेत प्रचंड वाढ झाल्याने नागरिक धास्तावले आहेत.
एवढी रक्कम भरण्यास नागरिकांकडून असमर्थता दर्शविली जात आहे. परंतु महापालिकेकडून नागरिकांकडे सगळ्या रकमेची सक्ती केली जात आहे. ज्या नागरिकांनी शास्तीकर आणि मिळकत कर भरण्याची असमर्थता दर्शविली आहे अशा नागरिकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस देखील पाठविल्या आहेत. शास्तीकराचा ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत महापालिकेने शास्तीकर वगळून इतर कर भरून घ्यावे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल आणि आलेल्या करातून महापालिकेच्या उत्पनात वाढ होईल. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना शास्तीकरामध्ये दिलासा द्यावा. शास्तीकर भरल्याशिवाय इतर कराचा भरणा होणार नाही, असे सॉफ्टवेअर महापालिकेने तयार केले आहे. नागरिकांची शास्तीकर भरण्याची तयारी नसल्यामुळे मूळ मिळकतकर जमा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीचे उत्त्पन्न वाढवायचे असेल, तर शास्तीकर सोडून इतर कर भरून घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
व्हिएस न्यूज - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात बॅंक व एटीएम मधील सुरक्षा रक्षकांनी सहभाग घेतला आहे.
व्हिएस न्यूज - मुंबईहून पिंपरी-चिंचवडला आपल्या भावाकडे आलेल्या बहिणीची मुलगी काळेवाडी फाटा येथेच विसरली. घाबरलेली मुलगी पाहून मार्शल कंपनीत काम करणारे आनंद मोहोळ यांनी तिची विचारपुस केली. मात्र, तिला काही सांगता येत नसल्याचे त्यांनी वाकड पोलीस ठाणे गाठले. चिमुकलीला पोलीसामांर्फत तिच्या आई-वडीलांकडे सुर्पूत केले.
व्हिएस न्यूज -शिवसेना पक्ष गटनेत्या शादान चौधरी यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावून तिघांनी भरस्त्यात पाच लाखांची खंडणी देण्यासाठी धमकी दिली. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. त्यामुळे लोणावळा शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चौधरी यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002