व्हीएस न्यूज - स्टार इंडिया ग्रूप आणि वर्किंग जर्नालिस्ट युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे आयोजित केलेल्या तिन दिवशीय प्रॉपर्टी व बॅंकिंगच्या प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त मिळाला.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक विजय फुगे, फॉर्च्यून ग्रूपचे संचालक मकरंद पांडे, बांधकाम व्यावसायिक नितीन धिमधिमे, राजेश अगरवाल, राजेश मेहता , दिनेश जहांगीरदार, नितीन सोमाणी आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार म्हणाले कि, प्रॉपर्टी प्रदर्शनामुळे ग्राहकांना एकाच छताखाली नामांकित व दर्जेदार गृहप्रकल्प पाहण्यास मिळते. अशी प्रदर्शने शहरात वारंवार भरवली पाहिजेत. फॉर्च्यून ग्रूपकडे ३१ जानेवारी पर्यंत बुकिंग केल्यास एकतोळा सोने मोफत दिले जाणार असल्याची माहिती संचालक मकरंद पांडे व नितीन धिमधिमे यांनी दिली. या प्रदर्शनात ५० नामवंत बिल्डर्स सहभागी झाले आहे.
व्हीएस न्यूज – निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक 107 मिटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झालेअसल्याने देशाप्रती राष्ट्र प्रेमाची भावना प्रत्येक शहर वासियांच्या मनात वृध्दींगत होण्यास मदत होणार असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णव यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण व संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी खासदार गजानन बाबर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रिडा, कला साहित्य व सांस्कृती समिती सभापती लक्ष्मण सस्ते, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकिर, जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, अ” प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे,“ ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, ई ”प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, फ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, नगरसदस्या आनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, कमल घोलप,झामाबाई बारणे, आशा धायगुडे शेंडगे, सुजाता पालांडे, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, माधुरी कुलकर्णी, सिमा चौगुले, माधवी राजापुरे, आरती चौंधे, गीता मंचरकर, सुवर्णा बुरडे,नम्रता लोंढे, नगरसदस्य राजू मिसाळ, उत्तम केंदळे, कुंदन गायकवाड, निलेश बारणे, राहुल जाधव, शैलेश मोरे, अमित गावडे, सचिन भोसले, बाळासाहेब ओव्हाळ, नामदेव ढाके, लक्ष्मण उंडे, राजेंद्र गावडे, विलास मडिगेरी, बाबू नायर, माजी महापौर आर.एस.कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, आयुबखान पठाण, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, योगेश कडूसकर, मनोज लोणकर, विजय खोराटे, आशा राऊत, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे,संदिप खोत, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय संचालक पवन साळवे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, रवींद्र दुधेकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, सदस्य श्री.शेलार, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे माजी नगरसेवक राजेश पिल्ले, मारुती भापकर, विजू लांडे, निलेश पांढारकर, सामाजिक कार्यकरते सचिन ढोबळे, संजीवनी पांडे, सारंग कामतेकर, अमित गोरखे यांच्यासह पदाअधिकारी,नगरसदस्य, नगरसदस्या, अधिकारी, कर्मचारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येणे उपस्थित होते.
यावेळी ब्रिगेडीयर ओ.पी.वैष्णव म्हणाले, भक्ती शक्ती चौक हा भक्ती आणि श्क्तीचे प्रतिक असलेला चौक आहे. या ठिकाणी देशातील सर्वात उंचीचा राष्ट्रध्वज उभारल्यामुळे शहरातील नागरिकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल. शोर्य, विरता, प्रगती, पवित्रता व सत्य यांचा प्रतिक भारतीय राष्ट्रध्वज आहे. भारतीय सैनिक लढाईला जाताना तिरंगा फडकावून येवू अथवा तिरंग्यात शरिर झाकून येवू अशी शपत घेतात. कारगीलच्या युध्दा मध्ये विजय प्राप्त करुन तेथे तिरंगा ध्वज फडकवला गेला. राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट हेल्मेटवर राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यास सुरुवात केली तेव्हा पासून क्रिकेट इतिहासात तिरंगी ध्वजाचे म्हत्व वाढले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व कार्यालयात राष्ट्रध्वज लावल्यास राष्ट्रभक्तीची भावना तेवत राहण्यास मदत होईल.
निवृत कर्नल सदानंद साळुंके म्हणाले, भक्ती शक्ती चौकातील देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाखाली उभे राहून अत्यंत आनंद होत आहे. सर्व देशवासियांनी भारतीय एकात्मता बाळगली पाहिजे. मानवता हाच खरा धर्म असून या भावनेमुळेच आपली खरी ओळख समाजात होते. उभारण्यात आलेल्या ध्वज परिसरात स्वच्छता ठेवा. कुठेही घाण करु नका. कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचाच वापर करा. स्वच्छतेचे महत्व इतरांना ही सांगा. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान करणे गरजेचे असून स्वत: मधील देशभक्ती जागृत ठेवणे ही गजेचे आहे.
महापौर नितीन काळजे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या इतीहासात या एतिहासिक क्षणांची नोंद घेतली जाईल. देशातील सर्वात (107 मीटर) उंचीचा हा राष्ट्रध्वज आपली मान अभिमानाने उंचावण्यास प्रेरणा देत राहिल. स्वच्छ सर्वेक्षन 2018 मध्ये शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभाग घेवून शहर स्वच्छ मोहिमेमध्ये प्रथम क्रमांक येणे कामी सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी त्यांनी केले. स्थायी समिती सभापती सिमा सावळे म्हणाल्या, प्रजासत्ताक दिन हा ख-या अर्थाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याचा दिवस असून त्यांनी आपल्या देशाला दिलेली सर्वात मोठी अनमोल देनगी म्हणजेच संविधान होय. सर्वांना समान हक्क व न्याय देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. देशातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज पिंपरी-चिंचवड शहरात उभारल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्र प्रेम जागृत झाले आहे. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या अनावरणे प्रत्येक नागरिकाच्या मनात देश प्रेमाची भावना जागृत झाली आहे. या ठिकाणी उपस्थित राहणारा प्रत्येक नागरिक हा या एतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला आहे. हे शहर आपले आहे, अशी भावना मनात ठेवून शहराच्या विकास कामात सर्वांनी सहकार्य केल्यास पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील एकमेव स्वच्छ, सुंदर व विकसनशिल शहर म्हणून ओळखले जाईल, असे ते यावेळी म्हणाले.
शहरातील मनपा शाळेतील सुमारे दिड हजार विद्यार्थ्यांनी तिरंगी रंगातील वेशभुषा परिधान करुन तिरंगी रंगातील हजारो फुगे आकाशात सोडले. भक्ती शक्तीचा हा परिसर अवघ्या तिरंग्यात न्हाहून निघाला होता. सुमारे दहा हजार पेक्षा अधिक नागरिकांनी या एतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात भक्ती शक्तीचा परिसर भारत माता कि जय व बंदेमातरम च्या घोषणेने दुमदुमूनगेला होता. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सचिन काटकर यांनी केले. ज्ञान प्रबोधीनी शाळेच्या पथकाने ध्वज गीत सादर केले. तर देहूरोड येथील लष्कर बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. या कार्यक्रमापूर्वी संदिप पंचवाटकर यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.
००००
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ६ हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याचा तसेच पाणीपट्टीत ५ टक्के दरवाढ करण्याचा तुघलकी निर्णय स्थायी समितीने घेतला. या निर्णयामुळे करदात्यांना मोठा आर्थिंक भुर्दंड सोसावा लागणार आहे. १ एप्रिल २०१८ पासून नागरिकांना वाढीव पाणीपट्टीची झळ बसणार आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. त्यावर स्थायी समितीत चर्चा झाली. पाणीपट्टीचे प्रस्तावित दर अधिक असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. परंतु, पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणार्या उत्पन्नात मोठी तफावत असल्यामुळे दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाच टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. परंतु, पाच टक्के दरवाढ करण्याला शिवसेना नगरसेवक अमित गावडे आणि राष्ट्रवादीच्या राजू मिसाळ यांनी विरोध दर्शविला.
सभापती सीमा सावळे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वार्षिक १०९ कोटी रुपयांचा खर्च येतो. पवना नदीवर रावेत येथे बांधलेल्या धरणातून पाणी उचलणे, त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणे, त्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठा करणे, मीटर रीडिंगनुसार पाण्याचे बिल तयार करणे, त्याचे वाटप करणे या सर्व प्रक्रियेवर हा खर्च होतो. एकीकडे १०९ कोटींचा खर्च होत असताना नागरिकांनी वार्षिक ३४ कोटी रुपये पाणीपट्टीपोटी भरावेत, ही प्रशासनाची मागणी असते. परंतु, त्यातील अवघ्या २५ ते २६ कोटी रुपयांचीच वसुली होते. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर महापालिकेला वार्षिक ८० ते ८५ कोटी रुपयांचा बोजा पडतो. अखेरिस, प्रति कुटुंबाला दरमहा सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचप्रमाणे मीटर रिडींगप्रमाणे पाणीपट्टीची आकारणी करण्यासाठी प्रति कुटुंब प्रतिमहिना १०० रुपये, झोपडपट्टीतील प्रति नळजोडासाठी महिना ५० रुपये दर आकारण्यात येणार आहे. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांना प्रति एक हजार लिटरसाठी ५० रुपये, खासगी शैक्षणिक संस्था, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन्स, रुग्णालये आणि वसतीगृहांना प्रति एक हजार लिटरसाठी १५ रुपये, धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, धर्मादाय आयुक्तांची मान्यता आणि ना नफा ना तोटा या तत्त्वावरील मंडळे तसेच महापालिकेच्या इमारतींना प्रति १ हजार लिटरसाठी १० रुपये आणि स्टेडियमला प्रति १ हजार लिटरसाठी २० रुपये दर आकारण्याचे आयुक्तांकडून प्रस्तावित करण्यात आले होते. या दरामध्ये स्थायी समितीने कोणतेही बदल केलेले नाहीत, असे सीमा सावळे यांनी सांगितले.
नवीन दरपत्रक -
सहा हजार ते १५ हजार लिटर पाण्याचा वापर करणार्यांकडून प्रति हजार लिटरमागे आठ रुपये, १५ हजार ते २२ हजार ५०० लिटरपर्यंत पाणी वापर करणार्यांकडून प्रति हजार लिटरमागे साडेबारा रुपये, २२ हजार ५०१ ते ३० हजार लिटरपर्यंत पाणी वापर करणार्यांकडून प्रति एक हजार लिटरमागे २० रुपये आणि ३० हजार १ लिटरच्या पुढे पाण्याचा वापर करणार्यांकडून प्रति हजार लिटरमागे ३५ रुपये पाणीपट्टी आकारली जाणार आहे. याचा मोठा भुर्दंड करदात्यांना सोसावा लागणार आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002