+व्हीएस न्यूज - श्री तुकाराम महाराज बीजेनिमित्त येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच तुका झालासे कळस या अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी उत्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बीजेनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात उद्योजक संतोष खांडगे यांचे हस्ते श्री पांडुरंगाची महापूजा आणि तुकाराम महाराजांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी काकड आरती, भजन आणि अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला. अभंगवाणी कार्यक्रमात संगीत विशारद हभप गणेश महाराज मोहिते यांना तुकाराम महाराजांचे अभंग सादर केले. हभप सुखदेव महाराज ठाकर यांनी निवेदन केले. तबल्याची साथ हभप गोरखनाथ कोकाटे, सचिन इंगळे यांनी प्रदीप कुडेकर, ओंकार मोहिते, सुबोध साठे, भाऊ हुलावळे यांनी संगीत साथ दिली. खांडगे यांचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हभप ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, सेवेकरी आप्पा शिरुरे, विठ्ठल दरेकर यांनी परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज - पिंपळे सौदागर येथे ज्येष्ठ नागरिकाला अंगावर घाण पडली आहे असे सांगून त्याचे लक्ष विचलित करत चोरट्याने 50 हजार रुपये असलेली पिशवी पळवून नेली. ही घटना शनिवारी पिंपळे सौदागर येथे घडली. याबाबत पंढरीनाथ वाघ (वय 65, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघ हे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन रोडवर असलेल्या चहाच्या टपरीजवळून पायी जात होते. अचानक एका अंदाजे 45 वर्षाच्या रंगाने सावळ्या, अंगावर निळी जीन्स व पांढरा टीशर्ट घातलेल्या एका इसमाने त्यांना थांबवले व वाघ यांना त्यांच्या अंगावर वरून घाण पडली असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित झाले. याचा फायदा घेऊन त्या इसमाने वाघ यांच्याकडे असलेली पिशवी हिसका देऊन पळवून नेली. पिशवीमध्ये 50 हजार रुपये रोख व महत्वाची कागदपत्रे होती. फौजदार एम टी शिंदे अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - कंपनीच्या माध्यमातून काम करताना गुणवत्तेमध्ये सुधारणा, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता, उत्पादक वाढीसाठी प्रयत्न करणे आदी गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा पंतप्रधान श्रम पुरस्काराने टाटा मोटर्समधील पाच कामगारांचा नुकताच दिल्ली येथे गौरव करण्यात आला. दिल्लीतील विज्ञान भवन येथे 26 जानेवारी रोजी भारताचे उपराष्ट्रपती वैकंय्या नायडु यांच्या हस्ते टाटा मोटर्समधील कर्मचारी राजेंद्र राजाराम निंबाळकर, राकेश भास्कर देशमुख, डॉ. वसंत गंगाधर भांदुर्गे, कैलास विठ्ठल माळी, मनोजकुमार विठ्ठल आणेकर यांना पंतप्रधान श्रम पुरस्कार व मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय श्रम रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार उपस्थित होते.
व्हीस न्यूज - आपल्या देशात होणारे आर्थिक परिवर्तन पाहता 2030 पर्यंत भारत हा जगात आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास चिरुपल्ली येथील आय.आय. एमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी व्यक्त केला. चऱ्होली येथील डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट व स्कूल ऑफ एमसीए आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त "समकालीन धोरण: जागतिक दृष्टिकोन" या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी केबांग्सन मलेशिया विद्यापीठाचे विशेष अतिथी डॉ. जॉन अंतोनी झेवियर, कॅनडा देशाचे डॉ कृष्ण लाल, श्रीलंकेचे डॉ अशोका जीनादासा व आरोषा जयसुंदरा, बांगलादेशाचे डॉ सैफुल मजीद, जाफना विद्यापीठ श्रीलंकेचे डॉ बी निमालाथासन, अन्नामलाई विद्यापीठ तामिळनाडूचे डॉ एस. पंचानाथम, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते. डॉ. मेत्री पुढे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्पादनचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. देशातील काही उद्योग चुकीच्या धोरणामुळे लोप पावत आहे. अडचणीत सापडलेल्या उद्योजकांनी आत्मपरीक्षण करून विकास साधला पाहिजे. जागतिक औद्योगिक क्रांतीचे चार टप्पे समजावून सांगत असताना डॉ कृष्णलाल, कॅनडा म्हणाले की सध्याची औद्योगिक क्रांती हि चौथी आहे. तसेच त्यांनी उद्योग व्यवसाय हा मानवी जीवनाशी व पारंपारिक अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. तसेच त्यांनी भारत व कॅनडा या देशाच्या अर्थव्यवस्थेची तुलना करताना म्हणाले की, कॅनडा मध्ये आरोग्यावर 10.9 टक्के तर शिक्षणावर 6 टक्के खर्च केला जातो व 12 वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. तसेच भारतामध्ये आरोग्यावर 4 टक्के तर शिक्षणावर 3 टक्के पेक्षाही कमी खर्च केला जातो. कुलगुरू डॉ खेडकर म्हणाले की, औद्योगिक क्रांतीमुळे औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आले आहेत. परिणामी जागतिक स्पर्धा वाढली, नव्याने विकास क्षेत्र निर्माण झाले व कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले. तसेच देशाच्या आर्थिक विकासदरात वाढ झाली. औद्योगिक क्षेत्राचा विकास साधण्यासाठी कार्यक्षमता, लवचिकता, ध्येय, प्रतिभा, मूल्यसंवर्धन व शाश्वत या सहा सूत्रांचा वापर केला पाहिजे. सूत्रसंचालन डॉ. श्रीकला बच्छाव तर आभार डॉ ओ पी हलदार यांनी मानले.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका डॉ. कमरुन्निसा माजिद खान यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. करमरुन्निसा या राष्ट्रवादीकडून खराळवाडी येथून (2002 ते 2007) निवडून आल्या होत्या. तसेच त्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती देखील होत्या. त्यांचा नेहरुनगर येथील कबरस्तानात सोमवारी दफनविधी करण्यात आला.
व्हीएस न्यूज - हिंदू धर्मियांनी 2014 मध्ये मोठ्या आशेने भाजपकडे सत्ता सोपवली. मात्र, मोदी सरकार मुस्लिम धर्मियांचे लांगुलचालन करण्यात दंग आहे. 28 वर्षांपूर्वी आम्ही काश्मिरमधून विस्थापीत झालो. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काश्मिरमध्ये जाता येईल, असे वाटले होते. परंतु, ही आशा फोल ठरली. हुरियत सारख्या फुटीरतावाद्यांशी काश्मिर मधील पीडीपी-भाजप सरकार जवळीक साधत आहे. त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. मोदी सरकार राष्ट्रवादी नसून धृतराष्ट्रवादी आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काश्मिरी विचारवंत सुशिल पंडित यांनी केली. रहाटणी येथील हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू स्वाभिमान दिन आणि शिवजयंती महोत्सवाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंडित यांना 'हिंदू कुलभूषण पुरस्कार- 2018' प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पंडित यांनी काश्मिर प्रश्न आणि देशापुढील इतर अनेक प्रश्न यावर आपले सडेतोड विचार व्यक्त केले. कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयातील वकील ऍड. संजिव पुनाळेकर, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक पंडित धर्मवीर आर्य, कार्यक्रमाचे समन्वयक नगरसेवक कैलास बारणे, माजी नगरसेवक कुमार जाधव, प्रतिष्ठानचे सचिव उत्तम दंडिमे, जगदिश वासवानी, अतुल आचार्य, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभूवन, संस्थेचे विश्वस्त सुहास पोफळे आदी उपस्थित होते. पंडित पुढे म्हणाले की, काश्मिर ही शिवशंकराची भूमी असून हिंदू धर्मियांमध्ये या भूमीस अनन्य साधारण महत्त्व आहे. पतंजलिंनी योग विद्येविषयीचे शिक्षण येथेच लिहिले. काश्मिर हे ज्ञानाचे-आस्थेचे केंद्र आहे. आदी शंकराचार्य तपश्चर्यसाठी केरळमधून काश्मिरमध्ये आले होते. बौध्दांनी सहा महिने चिंतन-मनन केल्यानंतर महायानची स्थापना येथेच केली. असे हे काश्मिर सध्या धुमसते आहे. अनेक पिढ्यांपासून येथे राहणाऱ्या अनेक हिंदू कुटुंबांवर अन्यायऱ्अत्याचार, महिलांवर बलात्कार केले. अशा घटनांमुळे येथील हिंदू कुटुंबांना विस्थापीत व्हावे लागले. केवळ दहा ते पंधरा टक्के हिंदू काश्मिरमध्ये वास्तव्यास आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर आम्हाला परत काश्मिरमध्ये जाता येईल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. हिंदुस्थानमध्ये असे होत असेल तर येथील माणूस सुरक्षित नाही, असेच म्हणाले लागेल, असे पंडित म्हणाले. मानपत्र वाचन ऍड. देविदास शिंदे, स्वागत पंडित धर्मवीर आर्य यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम दंडिमे यांनी तर आभार सुहास पोफळे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - कंपनीतील डिझेल फ्युअल इंजेक्टर चोरणाऱ्या एका कामगाराला अटक करण्यात आली आहे. किरण पांडुरंग शिंदे (वय 19, रा. केळगाव, आळंदी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सोन्नप्पा देशमुख (वय-58, रा. लोहगाव, पुणे) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण शिंदे टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी डिव्हिजन मध्ये काम करतो. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दुसरी शिफ्ट संपवून घरी जात होता. किरण पिशीवून काही घेवून जात असल्याच्या संशयावरून कंपनीतील सुरक्षारक्षक सोनप्पा देशमुख यांनी त्याला हटकले. व त्याची पिशवी तपासली असता त्यामध्ये कंपनीतील सुमारे 24 हजार रुपयांचे 12 डिझेल फ्युअल इंजेक्टर होते. फौजदार श्रीकांत शेंडगे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - बेपत्ता तरुणाचा मृतदेह ओटा स्किम येथे एका इंडिका मोटारीमध्ये आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. राहुल खुळे (रा. ओटा स्कीम, निगडी), असे मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा शनिवारपासून बेपत्ता होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील ओटा स्कीम येथे सोमवारी सकाळी एका इंडिका मोटारीत मृतदेह असल्याची पोलीसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. राहूल शनिवारपासून बेपत्ता होता. राहूलचा खून झाला आहे की आत्महत्या केली आहे याचा शोध घेण्यात येईल, असे पोलीसांनी सांगितले. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांना राष्ट्रशक्तीचा थेट प्रश्न !
व्हीएस न्यूज - सध्या राज्यभर गुंतवणूकदारांच्या आंदोलनामुळे गाजत असलेल्या पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या ४५०० कोटींच्या मालमत्ता जप्त केल्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दिनांक २८/२/२०१८ रोजी विधानपरिषदेत माहिती दिली. याविषयी आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडून प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सेबीने ३००० कोटींच्या तसेच आर्थिक गुन्हे शाखेने १५०० कोटींच्या, अशा मिळून ४५०० कोटींच्या मिळकती जप्त केल्या असून गुंतवणूकदारांना त्यातून त्यांचे पैसे मिळतील, असे निवेदन सभागृहात केले. या उत्तरावर पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या देशभरातील गुंतवणूकदारांसाठी लढणाऱ्या राष्ट्रशक्ती संघटनेच्या इन्व्हेस्टर्स फोरम ने आश्चर्य व्यक्त केले आहे.
“पॅनकार्ड च्या बाधित गुंतवणूकदारांची संख्या राज्यात ३० लाखापेक्षा अधिक असून राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी केवळ सभागृहापुढे कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरलेली आहे,” अशी टीका राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी पिंपरी येथे आयोजित गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात केली.. डिसेंबर २०१७ च्या अधिवेशना दरम्यान शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांना मुख्यमंत्र्यांनी, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून असे आश्वासन दिले होते. मात्र तसा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडून झालेला नाही. बुधवारी आमदार सतेज पाटील यांचे मार्फत राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीने उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही मुख्यमंत्र्यांनी काहीच उत्तर दिलेले नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे कडे राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने ज्या मागण्या केल्या होत्या त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांनी करावा हि अपेक्षा होती.
केंद्र शासनाच्या सेबी या यंत्रणेकडून पॅनकार्ड कंपनीच्या ज्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत, त्यांची यादी सेबीने तात्काळ जाहीर केली आहे व त्याबाबत लिलाव प्रक्रिया सुरु असल्याची माहिती राज्यातील व देशातील गुंतवणूकदारांना त्यांच्या वेबसाईटवर किंवा वृत्तपत्रातील जाहीर प्रकटनाद्वारे मिळत आहे. मात्र पॅनकार्ड क्लब्ज कंपनीची १५०० कोटींची मालमत्ता राज्यशासनाच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्याची मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिलेली माहिती धक्कादायक आहे. याबाबत इतक्या मोठ्या रक्कमेच्या कोणत्या मिळकती, कधी जप्त झाल्या ? हि बाब आर्थिक गुन्हे शाखेने का झाकून ठेवली? असे प्रश्न निर्माण झाले असून, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीची सत्यता तपासावी लागेल असेही दारवटकर यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून गुंतवणूकदारांचे ७०३५ कोटी अडकल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र सेबीने एका लेखी उत्तरात देणे ८३४४ कोटी असल्याचे पत्र दिले आहे. हि तफावत कशामुळे झाली? मे २०१७ रोजी सॅट कोर्टाने संबंधित संचालकांवर फौजदारी कारवाईचे आदेश देऊनही संचालकांवर केवळ गुन्हे दाखल करण्यापलीकडे सरकारने काहीच केले नाही. अनेक फसव्या कंपन्यांचे संचालक गजाआड करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने ९ महिने पॅनकार्डच्या संचालकांना मोकाट का सोडले आहे? त्यांना कुणाचे संरक्षण मिळत आहे? पॅनकार्ड क्लब्ज कंपनीविरुद्ध अनेक तक्रारी दाखल झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले आहे. मात्र कंपनीच्या संचालकांच्या अटकेसाठी “पंचांग पाहून मुहूर्त काढला जाणार आहे का?” असा प्रश्न राष्ट्रशक्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांना विचारला असून या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रशक्ती इन्वेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीने केली आहे.
सेबीकडून सध्या सुरु असलेली लिलाव प्रक्रिया संशयास्पद असून मिळकतींच्या किंमती तिसऱ्या लिलावात ६० - ७० टक्क्यांनी घटवण्यात आल्या आहेत. हि गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब आहे. या मेळाव्याचे आयोजन इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीच्या मावळ विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मुगुटराव मोरे, नंदकुमार गावडे, एस.एल.साळवी, देवानंद मुंज, साहेबराव तांबोळी, विजय पवार, सुहास जितकर, सतीश हंचाटे तसेच पिंपरी, चिंचवड, मावळ , मुळशी, पुणे शहर येथील गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काजुळकर व आभार नामदेव खाटपे यांनी केले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे व किरण मोटे यांनी आज मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर उपस्थितीत होते.
जितेंद्र ननवरे १० वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणुन कार्यरत होते. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नीला भाजपची उमेदवारी संत तुकाराम नगर – कासारवाडी या प्रभागातुन मिळाली होती. तसेच किरण मोटे हे कासारवाडी प्रभागातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणुन २०१२ च्या निवडणुकीत निवडुन आले होते. त्यांनी देखील आज खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
व्हीएस न्यूज - मागील वर्षी झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करु असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंगळवारी विखे पाटील यांना मुंबईत भेटले. या शिष्टमंडळात साठेंबरोबर काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर सरचिटणीस क्षितीज गायकवाड, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड मनपामधील गैर कारभाराविषयी माहिती देणारे निवेदन साठे यांनी विखे पाटील यांना यावेळी दिले. या निवेदनात प्रस्तावित पाणीपट्टीवाढ, कचरा उचलण्याच्या निविदेतील भ्रष्टाचार,टीडीआर मधील भ्रष्टाचार, पंतप्रधान आवास योजना निविदेतील भ्रष्टाचार याबाबत माहिती देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रस्तावित केलेली पाणीपट्टीमधील दरवाढ म्हणजे महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य नागरिकांना खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. निवेदनात म्हटले आहे की, रस्ते विकासासाठी तब्बल 425 कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या कामामध्ये सत्ताधारी भाजपने सुमारे 45 कोटींचा भ्रष्टाचार केल्याची चर्चा आहे. तसेच कचरा वाहतुक निविदेतही सुमारे 252 कोटी रुपयांचा जादा खर्च करून गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेने मागील आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल 41 लाख 27 हजार चौरस फुटांचे टीडीआरचे वाटप केले असून त्याची किंमत 5300 कोटी रुपये आहे. यामध्ये ही आयुक्त आणि भाजप पदाधिका-यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान आवास योजनेतर्गत घरबांधणी प्रकल्पांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधा-यांकडून सुरू असलेला भ्रष्टाचार आणि प्रस्तावित केलेली पाणीपट्टी दरवाढ मागे घेण्याबाबत व इतर प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा करु. असे आश्वासन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाला मंगळवारी मुंबई येथे दिले.
पीसीसीओईआर मध्ये जागतिक मराठी दिन उत्साहात साजरा
व्हीएस न्यूज - मराठी भाषा समृध्द होण्यामध्ये कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासह समकालीन लेखक-कवी-नाटककार यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नवकल्पना, नवे विचार, नवनवीन वाड.मय प्रकार वाचकांसमोर मांडून विचार मंथन घडवून आणले. यातूनच भाषा समृध्द होत गेली. आज सोशल मीडियाचा विचार केला तर यामध्येही मराठीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे, असे आपल्या लक्षात येते. यापुढील काळात सर्वच स्तरांवर मराठी भाषेचा वापर वाढलेला आपल्याला दिसेल, असे मार्गदर्शन प्राचार्य हरिष तिवारी यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) चे रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्रात (पीसीसीओईआर) जागतिक मराठी दिन (कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालात मराठी भाषेच्या निरनिराळ्या रूपांचा, विचारांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी कविता, लेख तसेच रांगोळीच्या माध्यमातून मराठीचे महत्त्व सादर केले. 'लाभले आम्हास बोलतो मराठी' या मराठी अभिमान गीताचे समूह गायन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. सोनाली कणसे, प्रा. शाम मानकर, प्रा. प्रिया ओघे यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन, आभार समृद्धी देवकाते यांनी केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002