व्हीएस न्यूज - बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी केलेला कायदा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, गेल्या १३ वर्षांपासून खासदार असणा-या शिवाजीराव आढळराव यांनी बैलगाडा शर्यतीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. आता लोकसभेची निवडणूक जवळ आली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रक काढण्यात पटाईत असलेले आढळराव यांनी पत्रकबाजी करण्यास सुरुवात केली आहे. बैलगाडा शर्यतीबाबत ते गंभीर नसून केवळ भावनिक मुद्दा करुन ते आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा, हल्लाबोल भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी करावयाच्या कायद्यातील बदलाला केंद्र सरकारने लेखी नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन नगरसेवक राहुल जाधव यांनी खासदार आढळराव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगरसेवक जाधव यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न प्रलंबित आहे. खासदार शिवाजीराव आढळराव हे गेल्या १३ वर्षांपासून खासदार आहेत. प्रत्येकवेळी निवडणुक आली की आढळराव बैलगाडा शर्यतीचा प्रश्न हाती घेतात. सरकारवर आरोप करतात आणि आपण किती बैलगाडा मालकांच्या बाजुने आहोत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.
शेतक-यांमध्ये जातात मी बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न करत असल्याचे खोटे सांगतात आणि नागरिकांना भुलवतात. २००९ आणि २०१४ ची लोकसभा निवडणुक त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या मुद्यांवरुनच लढवून जिंकली. मात्र, शर्यतीचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. त्यामुळे बैलगाडा मालक-चालक संघटना त्यांच्याविरोधात गेल्या आहेत. केवळ निवडणूक जवळ आली की त्यांना बैलगाडा शर्यतीची आठवण होते, असेही जाधव म्हणाले.
आमदार महेश लांडगे यांनी तीन वर्षात राज्य सरकारच्या पाठीमागे लागून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत कायदा तयार करुन घेतला. विशेष म्हणजे, भाजप सरकारमधील विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी पाठींबा देवून संबंधित विधेयक मंजूर केले. तसेच, न्यायालयीन लढाईसाठी राज्य सरकारने स्वखर्चातून वकीलांची नेमणूक केली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार मोठे प्रयत्न करत आहे.
राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला की शिवसेना सत्तेत आहे. आमचे देखील तो कायदा करण्यात योगदान आहे, असे सांगून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न खासदार शिवाजीराव आढळराव करतात. या कायद्याला न्यायालयाने स्थगिती दिली की हेच खासदार सरड्याला लाजवेल अशा प्रकारे रंग बदलतात आणि सरकारवर टीका करतात. सरकारने कायदा सक्षम केला नसल्याचे सांगतात. कायदा करताना शिवसेनेचे योगदान असे सांगतात. मग,कायदा करताना शिवसेनेचे मंत्री, आमदार काय करत होते? असा सवालही नगरसेवक जाधव यांनी उपस्थित केला आहे.
व्हीएस न्यूज - पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते फुगेवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन होणार होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आजच या इमारतीचे उद्घाटन केले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मुले व मुली प्राथमिक विद्यालय व कै. सौ.मिनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार होते. या शाळेचे नूतनीकरनाचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात झाले होते. या प्रभागातील नगरसेवक रोहित आप्पा काटे,स्वाती उर्फ माई काटे व राजू बनसोडे यांना विश्वासात घेतले नाही. तसेच कुठल्याही प्रकारचे निमंत्रण न देता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळेच या इमारतीचे उद्घाटन आज राष्ट्रवादी तर्फे करण्यात आले.
यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक रोहित आप्पा काटे, माई काटे, निकिता कदम, सुलक्षणा धर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश संघटक विशाल काळभोर व कविता खराडे उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - शास्तीकराबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मूळ मालमत्ता कर भरून घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. २०१५ पर्यंतची बांधकामे नियमित करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. अशा बांधकामांना महापालिकेच्या वतीने थकीत मिळकतकरासोबत शास्तीकर भरण्याच्याही नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. मिळकतीवर अवाच्या सव्वा शास्तीकर लादला जात असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. शास्तीकर आणि विविध नोटीस फी यामुळे कराच्या एकूण रकमेत प्रचंड वाढ झाल्याने नागरिक धास्तावले आहेत.
एवढी रक्कम भरण्यास नागरिकांकडून असमर्थता दर्शविली जात आहे. परंतु महापालिकेकडून नागरिकांकडे सगळ्या रकमेची सक्ती केली जात आहे. ज्या नागरिकांनी शास्तीकर आणि मिळकत कर भरण्याची असमर्थता दर्शविली आहे अशा नागरिकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस देखील पाठविल्या आहेत. शास्तीकराचा ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत महापालिकेने शास्तीकर वगळून इतर कर भरून घ्यावे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल आणि आलेल्या करातून महापालिकेच्या उत्पनात वाढ होईल. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना शास्तीकरामध्ये दिलासा द्यावा. शास्तीकर भरल्याशिवाय इतर कराचा भरणा होणार नाही, असे सॉफ्टवेअर महापालिकेने तयार केले आहे. नागरिकांची शास्तीकर भरण्याची तयारी नसल्यामुळे मूळ मिळकतकर जमा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीचे उत्त्पन्न वाढवायचे असेल, तर शास्तीकर सोडून इतर कर भरून घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
व्हिएस न्यूज - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात बॅंक व एटीएम मधील सुरक्षा रक्षकांनी सहभाग घेतला आहे.
व्हिएस न्यूज - मुंबईहून पिंपरी-चिंचवडला आपल्या भावाकडे आलेल्या बहिणीची मुलगी काळेवाडी फाटा येथेच विसरली. घाबरलेली मुलगी पाहून मार्शल कंपनीत काम करणारे आनंद मोहोळ यांनी तिची विचारपुस केली. मात्र, तिला काही सांगता येत नसल्याचे त्यांनी वाकड पोलीस ठाणे गाठले. चिमुकलीला पोलीसामांर्फत तिच्या आई-वडीलांकडे सुर्पूत केले.
व्हिएस न्यूज -शिवसेना पक्ष गटनेत्या शादान चौधरी यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावून तिघांनी भरस्त्यात पाच लाखांची खंडणी देण्यासाठी धमकी दिली. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. त्यामुळे लोणावळा शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चौधरी यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिएस न्यूज - केंद्राच्या सक्त वसुली विभागाने (ई.डी.) 2013 मध्ये जप्त केलेल्या जमिनीची सरकारी बाबूंनी दोनवेळा नोंदणी करून बेकायदेशीररित्या विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्या जागेवर बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट बांधून विकल्याचेही समोर आले आहे. हा व्यवहार करणाऱ्या मुळशी व पौड येथील दोन दुय्यम निबंधक, बांधकाम व्यावसायिकांसह आठ जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
व्हीएस न्यूज - जे.के.यु रोड खोदाई करणाऱ्या रिलांयन्स जिओ कन्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख युवराज दाखले यांनी केली आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रिलांयन्स जिओ कन्ट्रक्शनकंपनीकडून गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेञात अंडरग्राऊड केबल टाकन्याचे खोदाईचे काम करीत आहे. जे.के.यु रोडचीखोदाई करण्यात येत असून खोदाईचे काम करीत आसताना कुठल्याही प्रकारची सुरक्षातेची काळजी घेतली नाही. त्यामुळे, सदरील रोडवर मोठ- मोठे खड्डेपडले आहेत.
परिणामी त्या ठिकाणी रोज छोटे मोठे अपघात घडतअसून शालेय लहान मुलांचे पाय मुरगळण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचप्रमाणे, पिंपरीमधील आदर्शनगर मोनिका अपार्टमेंट समोरील बाजू गेल्या चार ते पाच दिवसांपासून चारचाकी गाड्या फसण्याचेअडकण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सदरीलठिकाणी काम करणाऱ्या कंपनी सुपरवायजरला तक्रार केली असता आमदाराच्या नातेवाईकाचे कॉन्ट्रक्टअसल्याचे सांगितले जाते. यामुळे लोक घाबरून दाद देखील मागत नाही, तरी याबाबत गंभीर दखल घेवून कारवाई करण्यात यावी, असेही दाखल यांनी निवेदनात नमूद केले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002