व्हीएस न्यूज - शिव जयंती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी लढाईस 353 वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्य साधत वसंत चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक पत्रे, युध्द नौकांच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनास राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
हे प्रदर्शन पुण्यातील बालगंर्धव रंगमंदिर येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना गुराब, गलबत, युध्दनौका, व पाल या लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती, ढाल, तलवार, कट्यार, कुकरी, भाले, मुल्हेरी मूठ, दांडपट्टा, संगीन, अंकुश कुऱ्हाड, गुप्ती पेशकबज, खंजराली, जंबिया यासारखी शस्त्रे पाहता आली. एकदिवशीय प्रदर्शन भेटीचे आयोजन प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. श्रेया दाणी, प्रा. सविता वीर, डॉ. सीमा काळभोर यांनी केले होते.
व्हीएस न्यूज - राष्ट्रीय कराटे स्पर्धेतील शहरातील विजेत्या खेळाडूंचा सत्कार नगरसेवक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. पिंपरी-चिंचवड कराटे असोसिएशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कराटे स्पर्धेतील खेळाडूंची नावे ः सुवर्ण पदक विजेते ः आकाश वाकडे, राज भराटे, प्रणाद कटकंबलेकर, अंजली रणधीर, रोहन विचारे, दिपन दत्ता.
रजत पदक विजेते खेळाडू ः श्रुती चुडमुंगे, पियुष करडे, आदित्य चौधऱी. कास्य पदक विजेते खेळाडू ः श्रावणी भोईर, समृध्दी कड, राज चौधरी, तेजस विशे, अनुष्का भोंग, धनश्री भांगिदरे, जय चौधरी. ब्राऊन बेल्ट ः अनुज उब्रंजकर, मेहूल घोडके, साहिल बोबाटे, दिव्या आब्दागिरे, श्रीयान ठाकुर, सानवी खांडेकर. ग्रीन बेल्ट ः जान्हवी बनहैत, श्रावणी काळे, माही तेडुलकर, ज्ञानेश्वर गावडे, इशान गाडे, विश्वजीत केणी. प्रास्ताविक कराटे प्रशिक्षक अशोक कदम यांनी केले. अशोक फरगडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर कदम, प्रशांत फरगडे, सागर पुजारी आदींनी परीश्रम घेतले.
व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील एक महान योध्दा व चारित्र्यसंपन्न राजा होते, असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक प्रमोद लाड यांनी केले. भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाव्दारे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारीया, प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. डॉ. एच. पी. शिंदे, विद्यापीठ प्रतिनिधी पुजा ठाकर, प्रा. पांडूरंग भास्कर, प्रा. रेणू आग्रवाल, प्रा. डॉ. स्वाती वाघ, प्रा. प्रविण म्हस्के, प्रा. एस. पी. बैसाणे, प्रा. विभा ब्राम्हणकर, प्रा. महालक्ष्मी ठुबे आदी उपस्थित होते. प्रा. पगारीया म्हणाले की, देशातील निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही या दक्षिणेतील राजसत्तांबरोबरच उत्तरेतील मोगल साम्राज्याशी एकाच वेळी शिवरायांनी टक्कर दिली. त्यामुळेच छत्रपतींच्या कार्यकाळात इंग्रजांची डाळ शिजू शकली नाही. दाढी वाढवून व कपाळावर अर्धचंद्र कोरून शिवाजी होता येणार नाही. त्यासाठी छत्रपतींच्या विचारांचे आचरण करणे आवश्यक असल्याचे प्राचार्य सदाशिव कांबळे म्हणाले. प्रा. डॉ. हनुमंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुधा चौधरी हिने सुत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. स्वाती वाघ यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 हे अभियान यशस्वीपणे राबविले आहे. आगामी काळातही हे अभियान अतिशय सक्षमपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले. नगरपरिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आवारे यांनी नगरपरिषदेमध्ये घेतली. या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण 2018 या अभियानाचा आढावा घेण्यात आला. गेल्याच आठवड्यात या अभियानाची शासकीय पातळीवरील समितीने मुल्यांकन पाहणी केली. या पाहणीनंतर सर्वांनी समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या असल्याचे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले. सहा दिवस चाललेल्या या पाहणीत समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नगरपरिषद राबवीत असलेल्या अभियानाची कागदपत्रे नगरपरिषद कार्यालयात तपासली व शहरातील स्वच्छता अभियानासाठी निवडलेल्या जागांवर जाऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे शहरातील वेगवेगळया भागातील नागरिकांच्या या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अभियाना बाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या अधिकारी समितीने शहरातील वेगवेगळ्या भागातील 177 जागांची पाहणी केली. नागरिकांच्या 220 मुलाखती घेतल्या. केंद्र शासन व राज्य शासनाने देश पातळीवर हे अभियान सुरु केलेले आहे. या अभियानातील स्वच्छता पाहणीचा निकाल 15 ते 30 मार्चच्या दरम्यान लागणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या सार्वजनिक संस्थाना 15 कोटी रुपये, व्दितीय क्रमांक येणाऱ्याला 10 कोटी रुपये आणि तृतीय क्रमांक येणाऱ्यास 5 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. हे अभियान असेच सक्षमपणे आगामी काळातही चालु ठेवणार आहे. याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना नेमून दिलेली कामे अशीच पुढे चालू ठेवावीत अश्या सूचना मुख्याधिकारी आवारे यांनी दिल्या आहेत.
व्हीएस न्यूज - 12 वी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण शुभेच्छांच्या रूपाने कमी व्हावा, परीक्षेचा उत्साह वाढावा या दृष्टीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व उपस्थित प्राध्यापकांनी पुरंदर परिसरातील केंद्र क्र्रमांक 171 मध्ये आलेल्या 12 वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेतली. यावेळी महाविद्यालयाचे उपकेंद्र संचालक प्रा. जांभळे, प्रा. भगवान, प्रा. जिरापुरे आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक षिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. माया गायकवाड व प्रा. दिपक जांभळे यांनी एचएससी बोर्डाकडून आलेल्या सर्व सूचना व माहिती दिली. इ. 12 वी तील पुर्वाराणी जगताप हिने बोर्डाने दिलेली कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रतिज्ञेचे वाचन केले. यामध्ये आपण एक परीक्षार्थी असून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी आई वडीलांनी जे संस्कार केले त्याचे स्मरण करून ही परीक्षा देईन, वर्षभरात केलेल्या अध्ययनावर आधारीत परीक्षा देईन. परीक्षा मोकळया वातावरणात देईन तसेच या परीक्षेत माझ्याकडून कॉपी किंवा अन्य गैरमार्गाचा वापर होणार नाही अशा आशयाची शपथ यावेळी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी देखील यावेळी शपथ घेतली. या कल्पनेचे पालकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
व्हीएस न्यूज - बहिणीच्या शोधात आईसोबत चाललेल्या तरुणीचा बाप-लेकाने विनयभंग केल्याची घटना काळेवाडी येथे घडली. याबाबत 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी आपल्या आईसोबत बहिणीच्या शोधात काळेवाडी येथे जात असताना दोन इसमांनी घरगुती भांडणाच्या कारणावरून तिचा विनयभंग केला. आरोपीने पीडितेच्या शरीराचा चावा घेतला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातून उग्र वास आल्याने मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. तरूणाने तीन-चार दिवसांपुर्वी आत्महत्या केल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. रमाकर फुलचंद राजभर (रा.कुदळवाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाकर यांचे घर गेल्या तीन-चार दिवसापासून बंद होते. मंगळवारी त्यांच्या घरातून उग्र वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी दरवाजा तोडला. रमाकर यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला. रमाकर हा मित्रासोबत राहत होता. मागील काही दिवसांपूर्वी मित्र गावी गेला होता. तीन दिवसांपूर्वी रमाकर यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - बॅकेतून पैसे घेवून बाहेर आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर दोघांनी खाज येणारी पावडर टाकली. पावडर धुण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या ज्येष्ठाकडील सव्वा लाख रूपयांची रोकड, पासबुक असलेली बॅग पळवून नेली. ही घटना भोसरीतील चांदणी चौकातील मेघदुत हॉटेलमध्ये मंगळवारी भरदिवसा दुपारी एकच्या सुमारास घडली. तुकाराम साळवी (वय-64, रा. प्राधिकरण, आकुर्डी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी माहिती दिली. साळवी हे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास चांदणी चौकातील देना बॅंकेतून एक लाख 23 हजार रूपये काढून बाहेर आले होते. बॅकेच्या बाहेर काही अंतरावर आल्यानंतर दोघांनी त्यांच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकली. साळवी पावडर साफ करण्यासाठी मेघदुत हॉटेलमध्ये गेले. साळवी यांनी पैशांची बॅग पाण्याच्या कुलर जवळ ठेवून अंगावरील पावडर साफ करत होते. पाठीमागून आलेल्या एका आरोपीने सव्वा लाख रूपयांची रोकड व पासबुक असलेली बॅग घेवून पोबारा केला. साळवी यांनी आरडा-ओरड केली तोपर्यंत आरोपी पसार झाला. फौजदार चामले अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या एका पादचाऱ्याला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देवून 2200 रूपये लुटले. हा प्रकार दि. 12 फेब्रुवारी रोजी भोसरीतील गुळवे वस्ती येथे घडला. अनिल सरदार (वय-33, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरदार 12 फेब्रुवारी रोजी गुळवे वस्ती येथून पायी जात होते. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील दोन हजार दोनशे रूपये जबरदस्तीने काढून घेत पसार झाले. फौजदार कठोरे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - जिन्याच्या खाली असलेल्या पाण्याच्या टाकीचा कॉक सुरू करण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडल्याने मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. चंद्रप्रभा अंबादास आबडेकर (वय-65, रा. पोटे वसाहत, सखुबाई गार्डनजवळ, भोसरी) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रप्रभा आंबेडकर दररोज सकाळी व संध्याकाळी पाण्याचा कॉक चालू-बंद करत होत्या. बुधवारी सकाळी त्या कॉक सुरू करण्यासाठी गेल्या. आणि तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडल्या. बराच वेळ झाला तरी चंद्रप्रभा परत आल्या नाहीत म्हणून घरच्यांनी बघितले असता, त्यांची एक चप्पल टाकीबाहेर पडलेली आढळली. टाकीत बघितले असता, त्यांचा मृतदेह आढळून आला. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - जगाच्या इतिहासात भुतो न भविष्यती राजा शिवाजी महाराजांसारखा सर्वगुणसंपन्न, पराक्रमी राजा पुन्हा होणे अशक्यच आहे. सर्व बाबींचा विचार करून त्यानुसार स्वराज्याची कार्यप्रणाली चालविणारे राजे शेतक-यांचे कैवारी होते. आजची प्रशासन व्यवस्था पाहून शिवबांची आठवण झाल्या शिवाय रहात नाही. शिवशाही” काळात एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही, किंबहूना तशी परिस्थिती उद्भवू न देणारे जगातील सर्वाेच्च आदर्शांचा मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत. असे प्रतिपादन अमित बच्छाव यांनी केले.
निगडी,भक्ती-शक्ती समुह शिल्प येथे शिवजयंती विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव बोलत होते. जगदगुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बच्छाव म्हणाले,”आज शिवरायांच्या नावावर मत मिळविली जातात, निवडणूकांपुरता त्यांच्या नावाचा उदो-उदो केला जातो. परंतू राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज,त्यांची विचारप्रणाली समजून घेतली आहे का? हा ही एक मोठा प्रश्न आहे. आज मंत्रालयात आत्महत्या केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी न्यायाच्या अपेक्षेने शेतकरी येतो, तेथे त्यांची महात्वाकांक्षाच का संपतेय? का असे घडतेय. आज शेकडो वर्षांनी पुन्हा एकदा शिवबांची शासनप्रणाली समजून घेणे गरजेचे आहे.
आज महाराष्ट्र शेतक-यांच्या आत्महत्येत देशात आघाडीवर आहे. शेतकरी आत्महत्यांना दुष्काळाचे कारण देणा-या राज्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवावे की शिवबांच्या काळातही दुष्काळ पडत होता. परंतू त्या परिस्थितीत शिवबांनी शेतक-यांना एक नवचैतन्याची ताकद देऊन शेतक-यांच्या पाठीशी ते खंबीरपणे थांबले होते. त्या काळात एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही. आज त्यावर सरकारने विचार करून शेतक-यांच्या हाल-अपेष्ठा जाणून घेऊन उपाययोजनांची आखणी केल्यास राजांना ख-या अर्थाने अभिवादन ठरेल. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात आज मनसेच्यावतीने पाणी दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. आज होणार्या महासभेत पाणी दरवाढ करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळेच ही दरवाढ करू नये या मागणीसाठी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात आंगोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना सचिन चिखले म्हणाले की, शहरवासियांचे पाणी चौपट महाग करण्याचा घाट घातला जात आहे. या दरवाढीला मनसेचा पूर्णपणे विरोध आहे. महासभेत सत्तेच्या जोरावर भाजपने दरवाढ केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002