पिंपरी – माथाडी कामगार दिवसभर घाम गाळून कष्टाचे काम करतात. परंतु, त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या बाजूने घेतलेल्या कायद्याची माथाडी मंडळाकडून अंमलबजावणी केली जात नाही, हे मोठे दुदैव आहे. माथाडी मंडळाने सुधारीत अध्यादेशाची त्वरित प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे. कायद्याची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
तसेच, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना साकडे घातले असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरीत बुधवार दि.१० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेते ते बोलत होते. यावेळी, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, ज्ञानोबा मुजुमले, राजू तापकीर, भिवाजी वाटेकर, समर्थ नाईकवडे, ओमकार माने, नागेश व्हनवटे, पांडूरंग काळोखे, संदीप मधुरे, गोरक्षनाथ दुबले, संतोष जाधव, मारुती कौदरे आदी उपस्थित होते.
इरफान सय्यद म्हणाले, राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यात कार्यरत असणाऱ्या माथाडी, हमाल, कष्टकरी, असंघटीत हमाल या सारख्या श्रमजिवी कामगारांच्या नोकरीचे नियमन करणे, त्यांच्या कामाच्या बाबतीत अटी, शर्ती तसेच श्रमाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत अधिक चांगल्या तरतुदी करण्यासाठी माथाडी कामगार कायद्यात योग्य त्या सुधारणा केल्या आहेत. त्या संबंधीचा सुधारित अध्यादेव देखील काढला आहे. या सुधारित कायद्यात माथाडी मंडळाच्या योजनांच्या माध्यमातून असुरक्षित कष्टकरी माथाडी कामगारांच्या तसेच त्यांच्या मालकांच्या नोंदण्या करण्याबरोबर या असुरक्षित घटकांसाठी स्वतंत्र्य भविष्यनिर्वाह निधी, उपदान, बोनस, भरपगारी रजा, आरोग्य सुविधा, कामाच्या निश्चित वेळा, कामगारांना नोकरीविषयक संरक्षण अशा विविध कामगारांना सुविधा दिल्या आहेत. तसेच, मुंबई, ठाणे परिसरातील कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून आरोग्यसुविधा दिल्या जातात. परंतु, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड सारख्या औद्योगिक परिसरातील माथाडी कामगारांसाठी अशा सुविधा दिल्या जात नाहीत. जीवन विमा निगम या संस्थेच्या सुविधा मिळत नाहीत. सरकारचा हा कायदा व त्यातील योजना अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत.
प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. या सुधारित अद्यादेशाची माथाडी मंडळाकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे माथाडी कामगार विविध सोयी-सुविधांपासून वंचित राहत आहे. हाल अपेष्टात माथाडी कामगार विविध सोयी-सुविधांपासून वंचित रहात आहे. हाल अपेष्टात जीवन जगतात. त्यामुळे माथाडी कामगार मंडळाने सुधारित अद्यादेशाची त्वरित अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर माथाडी मंडळात करोडे रुपयांचा भरणा होत असतानादेखील मंडळातील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी हजारो कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. याकडेही सय्यद यांनी लक्ष वेधले आहे. हे प्रश्न लवकरात- लवकर मार्गी लागावेत, अन्यथा आगामी काळात महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने हजारो कामागारांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपण स्वतः कामगार मंत्री संभाजीराज निलंगेकर पाटील यांना निवदेन दिले आहे. मंत्री पाटील यांनी कष्टकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा देखील सय्यद यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चित्रपट सृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री येणे काही नवीन नाही. आपल्या कार्यक्रमानुसार ते येतात आणि जातात देखील. मात्र, सिनेसृष्टीमधील आघाडीचा अभिनेता सलमान खान पिंपरी-चिंचवड शहरात आला, अन् नागरिकांचे हाल करून गेला. असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. निमीत्त होते ते पिंपरी- चिंचवड शहरात नव्याने सुरु होणाऱ्या पी.एन.गाडगीळ या सोने विक्रीच्या नव्या दालनाचे.
पिंपरी – चिंचवड परिसरात पी.एन.जी च्या नव्या दालनाच्या शुभारंभासाठी सलमान खान येणार म्हणून संपूर्ण दिवसभर शहरात जोरदार चर्चा सुरु होती. तशी बातमी देखील शहरभर फिरत होती. मात्र, सायंकाळी ५ वाजण्याचा कार्यक्रम असताना देखील दुपारी १ वाजल्यापासून मोरवाडी चौकातील काही रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यांवरून दैनंदिन ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुरवरील पल्ल्यांच्या मार्गांनी तसेच गल्ली बोळातून मार्ग काढावे लागले. याचा परिणाम म्हणजे ज्या रस्त्यांवर रोजची शांतता पाहावयास मिळायची, त्याठिकाणी वाहतुक कोंडी निर्माण झाली.
इतके नव्हे तर, सलमान खान येणार म्हणून नागरिकांनी वेळेच्या आधी येवून कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. यामुळे त्याठिकाणाहून जाणाऱ्या वाहन धारकांमध्ये वाद निर्माण झाला होता. सलमान खान येणार म्हणून परिसरातील रस्ते बंद केले. त्यामुळे लांबून वळसा घालून नागरिकांना जावे लागले. सलमान खानला बघण्यासाठी नागरिकांची झालेली झुंबड, त्यात काही नागरिक बाजूला असलेल्या पुलावरून खाली पडले व जखमी झाले, पुलाचे कठडे हि तुटले ,काही नागरिक झाडावरून खाली पडले त्या वेळी झालेल्या गर्दीत नागरिक जखमी झाले याला जबाबदार पि.एन.जी राहणार का ?
तसेच, या परिसरातील निदान केंद्र आणि हॉस्पिटलकडे जाणारे रस्ते बंद केल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. सर्व रस्ते बंद केले असल्याने रुग्ण दवाखान्यात पोहचू शकले नाहीत, याला जबाबदार कोण ? असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यावेळी निदान केंद्र आणि हॉस्पिटल जवळ स्पीकर लावण्यात आले. मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाले, रुग्णांना झालेल्या या त्रासाला जबाबदार कोण ? हे सर्व प्रकार घडत असताना पोलिसांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर शैलजा मोरे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते औदुंबर बागडे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, रमेश भोसले, आकाश चव्हाण, भरत गायकवाड, जोपा पवार, सुखदेव जाधव, रामदास कटके आदी उपस्थित होते.
दरम्यान, पुनावळे येथील श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नगरसेविका रेखा दर्शले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
व्हीएस न्यूज - काळेवाडी सिग्नल जवळ मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एक महिला ही तरुणाला दोरी बांधून ओढत नेत असून त्याला भीक मागायला लावत असल्याचे स्माईल प्लस संस्थेचे योगेश मालखरे यांनी पाहिले. त्यांनी संशय येताच तरुणाकडे धाव घेतली असता संबंधित महिला पळून गेली. पिडीत तरुणाने त्याच्यावरील अन्यायाला वाचा फोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, अनुप सिंग (वय अंदाजे 30, रा. जॉनपूर,उत्तरप्रदेश) या पीडित तरुणाला दुणुकाबाई युवराज काळे (वय 70, रा. अहमदनगर) हिने केवळ हजार रुपयांना विकत घेतले होते. त्याला दिवसाला दीड हजार रुपयांचे टार्गेट देखील या बाईंनी दिले होते. ते पूर्ण झाले नाही तर त्याला रात्री उपाशी ठेवणे, सिगारेटचे चटके देणे असे अत्याचार केले जात. दुणुकाबाई ही अनुपला दोरी बांधून ओढत नेत असून त्याला भीक मागायला लावत होती. यावेळी मालखरे यांनी अनुपला विचारणा केली असता दुणुकाबाई हिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच अनुपही मला वाचवा असे ओरडू लागला. तिला पकडून विचारणा केली असता तिने अनुपला चक्क एक हजार रुपये देऊन भाड्याने आणल्याचे सांगितले. त्यानंतर मालखरे यांनी दोघांना वाकड पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी अनुपचा जबाब नोंदवून महिलेवर मुंबई भिक्षा प्रतिबंधक नियम कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची म्हणजे दुणुकाबाई हिचा पेहराव व अवतार भिक्षुक महिलेचा होता. मात्र तिची झडती घेतली असता हजारो रुपये आणि चक्क व्होल्वो बसच्या स्लीपर कोचचे तिकीट मिळाले. इतकेच नाही तर तिने पोलिसांना एका वकिलाचे व्हिजिटिंग कार्ड देत हा आमचा वैयक्तिक वकील असून याला फोन करा असे सांगितले. या प्रकारामुळे भीक मागणाऱ्यांचे एक मोठे रॅकेट शहरात कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
व्हीएस न्यूज - जुन्या भांडणातून मोकळ्या मैदानात उभा केलेला ट्रक जाळण्यात आला. ही घटना गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हिंजवडीतील पॉवर हाऊस येथे घडली. याप्रकरणी रामनारायण ज्ञानोबा पारखी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंजीर (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी माहिती दिली. पारखी आणि कुंजीर यांची यापूर्वी भांडणे झाली आहेत. त्यातून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले आहे. पारखी यांचा ट्रक हिंजवडी येथील पॉवर हाऊस शेजारील वीटभट्टी जवळील मोकळ्या जागेत गेल्या सहा महिन्यापासून उभा आहे. कुंजीर यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन गुरूवारी सकाळी पहाटे पाच वाजता पारखी याचा ट्रक पेटवून दिला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - शहरातील, टपरी पथारी हातगाडी धारकाच्या प्रश्नांसाठी आणि त्याच्या समस्या सोडवण्यासाठी, फेरीवाल्यांची संख्या, हॉकर्स झोन दिलेले लायसन्स आणि किती फेरीवाल्यांचा सर्वे झाला, किती राहिले याबाबत माहिती करून घेण्यासाठी टपरी पथारी हातगाडी पंचायत वतीने जनजागृती अभियान राबविले जात आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या येथे फळभाजी विक्री करणाऱ्या कष्टकरी महिला शारदा जगताप, सुनंदा बेडें यांचे फॉर्म भरून अभियानास सुरवात करण्यात आली. याप्रसंगी पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, शहर अध्यक्ष रमेश शिंदे उपाध्यक्ष गणेश अहेर, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, राजेश मायरमनी, रवी शेलार, राम प्लहारे, संतोष परदेशी युवराज माळी आदी उपस्थित होते. टपरी पथारी हातगाडी 2007 साली कायदा झाला. 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 10 वर्षानंतर देखील आज शहरात एकही अधिकृत हॉकर्स झोन झाले नाही. टपरी हातगाडी पथारी धारक फळभाजी विक्रते अशा गोरगरीब जनतेला या योजनेचा लाभ झाला नाही. गोरगरिबांच्या योजनेत मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून श्रीमंत व्यक्ती ने लाभ घेतला आहे. या योजनेत अनेक व्यक्ती ना लायसन्स मिळाले मात्र त्याचे पक्या गळ्यामध्ये पुनवर्सन झाले पाहिजे. प्रत्येक विभागात हॉकर्स झोन झाले पाहिजे. या साठी हे अभियान राबवले असल्याने बाबा कांबळे यांनी सांगितले. या अभियान अंतर्गत शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकाचा मोफ़त सर्वे करून 15 फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना हा सर्वे सादर करणार असल्याने प्रल्हाद कांबळे यांनी सांगितले. शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांनी अभियानात सहभागी होऊन मोफत असलेले फोर्म भरून दयावेत असे आव्हान शहराध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले.
व्हीएस न्यूज - मोशी येथील यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छता फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छता ऍप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकते,मुख्याध्यापिका शोभा देवकते आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - डॉ. अरविंद तेलंग महाविद्यालयात 16 जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वस्तू व सेवा कर प्रणाली, आजची युवक संस्कृती, सरकारची वाटचाल या तिन विषयावर स्पर्धा होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी दिली.
व्हीएस न्यूज - राहत्या घरासमोर पार्क केलेली मारूती कंपनीची ईरटिगा मोटार 12 डिसेंबर रोजी चोरीला गेली आहे. या मोटारीचा चिंचवड पोलीसांना अद्याप छडा लावण्यात यश आले नाही. याप्रकरणी उदयसिंह तात्यासाहेब गायकवाड (वय-55, रा. गिरीराज हौसिंग कॉम्प्लेक्स, बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची एमएच-14. एफ. जी.2659 या क्रमाकाची ईरटीगा मोटार त्यांच्या इमारतीच्या समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने 12 डिसेंबर रोजी मध्यरात्री मोटारीचे लॉक तोडून चोरून नेला. या घटनेला एक महिना झाला असून मोटारी चोरीचा चिंचवड पोलीसांना छडा लावण्यात यश आले नाही. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - कामगारांच्या पगाराच्या तीन लाख रूपये रखमेचा अपहार करणाऱ्या बाप-लेकाला पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला आहे. दरम्यान,आरोपींना मोरवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 15जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्जुन अंकुश गवारी (वय-43) व अंकित अर्जुन गवारी (वय-22,दोघेही रा. मेंगडेवाडी, आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या बाप लेकाची नावे आहेत. याप्रकरणी हबीब शेख (वय-53, रा. त्रिवेणीनगर, तऴवडे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांची ग्लोबल एंटरप्रायजेस नावाने मनुष्यबळ पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. शेख यांच्याकडे सुपरवायझर म्हणून अर्जुन गवारी नीइल ऑटो प्रा. लि.मी कंपनीत काम करतात. या कंपनीतील कामगारांना पगार, उचल व रूम डिपॉझिट देण्याची जबाबदारी गवारी यांच्याकडे होती. नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 या कालावधीत आरोपी अर्जुन गवारी यांनी कामगारांचा पगार, उचल, रूम डिपॉझिट असे तीन लाख रूपये न भरता मुलगा अंकीत गवारी यांच्या मदतीने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. फौजदार हरिदास बोचरे अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002