Breaking News

कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा | भोसरीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यासाठी रवी लांडगेंचे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन | मुस्लीम समाज केवळ निवडणुकांपुरता का?; खासदार जलील यांचा राष्ट्रवादी, काँग्रेसला सवाल! | पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत एकूण ७९३ कोटी ८६ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता | वैद्यकीय शिक्षण विभागात आमुलाग्र बदलासाठी काम करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख | ओबीसी समाजचे आरक्षण रद्द होण्यास भाजप जबाबदार – संजोग वाघेरे‌ पाटील | अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक न्यायाची आघाडी | आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई | महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनचळवळ उभारू – महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर | आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या - वसंत लोंढे | महिलांना सन्मान देण्यासाठी सोनिया गांधी यांची प्रमुख भुमिका - सचिन साठे | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मिळकत धारकास सामान्य मिळकत करात शंभर टक्के सूट | झेंडे समुहाकडून २२.४६ कोटींचा बँकेला गंडा’: सेवा विकास बँक घोटाळा | पुण्यातून सतरा वर्षांच्या तीन तरुणी बेपत्ता, अज्ञात इसमांनी पळवून नेल्याचा संशय | पिंपरीच्या डॉ डी. वाय पाटील रुग्णालयात कर्करोगावरील दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी | सभापती नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला! | अण्णासाहेब मगर स्टेडियम खासगीकरण केल्यास कामगार लढा उभारु…..डॉ. कैलास कदम | लाचे प्रकरणी ॲड. नितीन लांडगे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी | भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पालिकेवर प्रशासक नेमावा – माजी आमदार विलास लांडे |
V. S. News
भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे

व्हीएस न्यूज - तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुंबईतील इंदू मिल येथे होणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आणि त्या जागेबाबत इतिहासीक निर्णय घेतला. देशातील सर्व आंबेडकरी अनुयायांना कॉंग्रेस नेहमीच न्याय देण्याची भुमिका घेत असते. भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभासाठी देखील महाविकास आघाडी सरकारने भरघोस निधी जाहिर केला आहे. हा दिवस आंबेडकरी जनतेसाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा आहे. म्हणून शहर कॉंग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करीत आहोत. यासाठी भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाले यांनी पाठपुरावा केला त्यांचाही उचित गौरव शहर कॉंग्रेसच्या वतीने करताना मला अभिमान वाटत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधीमंडळातील कॉंग्रेसचे गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचेही अभिनंदन करीत आहोत. या निर्णयामुळे राज्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे प्रतिपादन असे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ आणि परिसर विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातील तीस कोटी रुपयांचा निधी पायाभूत सेवासूविधांसाठी उपलब्ध करुन दिला. यासाठी आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी पाठपूरावा केला. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने डंबाळे यांचा शुक्रवारी पिंपरीत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते शाल, पुष्पगूच्छ देऊन आणि पेढे वाटून सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी डंबाळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देऊन सन्मानित केले.

राष्ट्रवादी प्रवक्ते फझल शेख, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे तसेच बाबा कांबळे, सुवर्णा डंबाळे, नितीन धोत्रे, गोपाळ मोरे, गंगाताई धेंडे, कविता खराडे, मनिषा गटकळ, सारीका पवार, आशा शिंदे, विमल गायकवाड आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन केले.

यावेळी भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाले सांगितले की, पुणे- भिमाकोरेगांव शौर्य दिन कार्यक्रम 1 जानेवारी 2022 रोजी मोठया संख्येने साजरा होणार असून याठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्या भिम अनुयायांना सर्व प्रकारच्या पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू झालेली आहे. यंदाच्या वर्षी भिमाकोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करणेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना समन्वय समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उर्जामंत्री नितिन राऊत, माजी मंत्री प्रा. जोगेंद्र कवाडे तसेच आनंदराज आंबेडकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. उत्सवाच्या तयारीसाठी भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती व जिल्हा प्रशासनाच्यावतीने बैठका घेण्यात आल्या होत्या.

गुरुवारी या संदर्भामध्ये जिल्हा परिषद पुणे येथे तहसिलदार व सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे समवेत इतर सर्व विभागाच्या अधिका-यांशी व आंबेडकर समाजातील पक्ष संघटनांशी संयुक्त बैठक झाली. यात जिल्हा प्रशासनाने सदर ठिकाणी संरक्षण, पिण्याचे पाणी, वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इत्यादी प्रकारच्या पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. दरम्यान यंदाच्यावर्षी सर्व राजकीय पक्षाच्या अभिवादन सभा आंबेडकरी साहित्य विक्रीचे स्टॉल याचा देखील कार्यक्रमात समावेश राहणार आहे. दरम्यान भिमाकोरेगांव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक व्हावे याबाबतची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली असुन त्यासाठी तब्बल १०० कोटींचा बृहत आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरु असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या बद्दल आम्ही राज्य सरकार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष आभार मानत आहोत. या उत्सवात नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण

व्हीएस न्यूज - विविध मागण्यांसाठी 8 नोव्हेंबर पासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांचा संप सुरु आहे. या कर्मचा-यांच्या मागण्या शासनाने त्वरीत मान्य कराव्यात अशी मागणी गुणवंत कामगार कल्याण मंडळ आणि मानिनी फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केली आहे. एस. टी. महामंडळाचे संचालक, भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार आणि दलाल यांचा महामंडळाच्या राज्यभर असणा-या लाखो कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता आणि पाच हजार एकरांहून जास्त असणा-या जमिनींवर डोळा आहे. एस. टी. महामंडळ कायम तोट्यात असल्याचे व्यवस्थापन सांगते.

महामंडळातील भ्रष्ट अधिकारी, व्यवस्थापन हे एस. टी. चे खासगीकरण करुन कामगारांना देशोधडीला लावण्यासाठी अनुकूल आहे. परंतू एस. टी. च्या पुरवठादारांवर कारवाईचे धाडस दाखवत नाहीत. अधिकारी व पुढारी संगनमताने फायद्यात चालणारे मार्ग शिवशाही, शिवनेरीच्या पुरवठादारांना आंदण म्हणून देत आहे. एस. टी. ने सरासरी रोज 65 लाख प्रवाशी प्रवास करतात. तर मागील सात वर्षांपासून प्रत्येक प्रवाशी तिकीटामागे एक रुपया अधिभार लावण्यात आला आहे.

1992 सालापासून प्रत्येक कर्मचा-यांच्या वेतनातून दरमहा 45 रुपये मृत्यू फंड म्हणून कपात केली जाते. एस. टी. ला लागणा-या डिझेलवर राज्य सरकार प्रतिलिटर 35 रुपये कर आकारते. व्यवस्थापन आणि पुढारी संगणमताने करत असलेल्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रातील एस. टी. चा तिकीट दर गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील दरांपेक्षा 25 टक्क्यांहून जास्त आहे. तसेच प्रत्येक प्रवाशांच्या तिकीटावर 17.5 टक्के प्रवाशी कर आकारला जातो. या व्यतीरीक्त प्रत्येक वाहनांमागे दरवर्षी व्यावयायिक वाहनकर आकारला जातो. या विविध करातून जमा होणा-या लाखो कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा अशीही मागणी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी यावेळी केली.

गुणवंत कामगार कल्याण मंडळ, एस. टी. कामगार कृती समिती पिंपरी चिंचवड आणि मानिनी फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (दि. 15 डिसेंबर) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. चव्हाण बोलत होत्या. यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सचिव राजेश हजारे, उपाध्यक्ष राज अहिरराव, एस. टी. कामगार प्रतिनिधी सुदर्शन पजई, ओमप्रकाश गिरी, भरत नाईक, राजाभाऊ गिते, अश्विनी गायकवाड, अनुराधा नाईकवडे, मानिनी फाऊंडेशनच्या शोभा देशपांडे, सुहासिनी भोसले, अर्चना जिलेवार, सविता मोरे तसेच भरत शिंदे, संजय गोळे, आण्णा जोगदंड, गोरक्ष वाघमारे, कल्पना भाईंगडे, महादेव धर्मे, बशीर मुलाणी, प्रकाश शिंदे, प्रविण मोहिते, योगेश शिंदे, अविनाश शेंडगे, बापू जाधव, विजय साबळे आदी उपस्थित होते. व्यवस्थापन राज्यातील प्रवासांना सेवा देण्याऐवजी ठेकेदार आणि पुढा-यांच्या बगलबच्यांना पोसण्याची सेवा करीत आहे.

कोणाचीही मागणी नसताना एस. टी. मध्ये 150 कोटी रुपये खर्च करुन वायफाय सुविधा बसवली त्याची आता काय अवस्था आहे ? निकृष्ठ दर्जाचे गणवेश कर्मचा-यांना देण्यासाठी 100 कोटी रुपयांहुन जास्त दरवर्षी खर्च केला जातो. 24 हजार रुपयांना मिळणारी ट्रायमॅक्स मशिन टेंडर बेसिसवर भाड्याने घेतली आहे यासाठी प्रत्येक तिकीटामागे पुर्वी 20 पैसे प्रती तिकीट आकारले जायचे ते आता 1 रुपया 21 पैसे आकारले जातात. हे मशिन घेण्यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या मशिनची मोडतोड झाल्यास वाहकाकडून 24 हजार रुपये वसूल केले जातात.

खासगी शिवशाही बसला 59 रुपये प्रतीलिटर दराने डिझेल दिले जाते. डिझेलचा बाजारभावाचा दर वजा 59 रुपये यातील तुट एस. टी. महामंडळाला सहन करावी लागते. म्हणजेच खासगी शिवशाही चालविणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार आहे. अहोरात्र रस्त्यावर धावणा-या एस. टी. चे लोकेशन कळण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करुन व्हि.टी.एस. यंत्रणा खरेदी केली आहे. आज काल प्रत्येक चालक वाहकांकडे मोबाईल असताना हा 100 कोटी रुपयांचा खर्च कोणासाठी केला ? खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर मुक्कामी जाणा-या चालक, वाहकांना तेथे कोणतीही सुविधा मिळत नाही. तेथिल शाळा किंवा मंदीराच्या ओसरीवर मच्छर मारत रात्र जागून काढावी लागते. एस. टी. च्या अंतर्गत स्वच्छतेबाबत आणि एस. टी. स्टॅंड, डेपो, कार्यशाळा येथील स्वच्छतेसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतू प्रत्यक्षात या स्वच्छतेबाबत काय अवस्था आहे ? या प्रश्नांची उत्तरे आणि जमा खर्चाचा खरा हिशोब नागरीकांना आता मिळाला पाहिजे. एस. टी. महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे हि आता कर्मचा-यांबरोबरच, प्रवाशांची आणि सर्व सामान्य नागरीकांचीही मागणी आहे असेही डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले की, 8 नोंव्हेबर पासून सुरु असणा-या या संपामध्ये एस. टी. च्या 93 हजारांहून जास्त कर्मचा-यांनी सहभाग घेतला आहे. मागील दोन वर्षात 53 हुन जास्त कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या कर्मचा-यांप्रती सांत्वन करण्याऐवजी परिवहन मंत्री अनिल परब हे ‘मेस्मा’ लागू करण्याची धमकी देत आहेत. या धमकीला घाबरुन आजपर्यंत पाच टक्केही कामावर रुजू झाले नाहीत. 10 हजारांहून जास्त कामगारांवर व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली आहे. औरंगाबादसह अनेक विभाग अधिका-यांनी या कामगारांना चौकशीच्या नोटीसा बजावून हजर राहण्यास सांगितले आहे. या कामगारांवर मानसिक दडपण वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. आता सरकारने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि राज्यातील जनतेला देखिल वेठीस धरु नये अशीही मागणी डॉ. भारती चव्हाण यांनी केली.

1960 साली पुणे - अहमदनगर पहिली एस. टी.ची सेवा सुरु झाली. तेंव्हापासून चांद्यापासून बांद्यापर्यंत एस. टी. कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. या महामंडळाचे राज्य सरकारी कर्मचा-यांमध्ये विलिनीकरण करावे आणि इतर मागण्या सकृतदर्शनी योग्य असल्याचे आमचे मत आहे. एस. टी. कर्मचा-यांच्या व्यथा सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. 35 ते 40 वर्ष सेवा करुनही या कर्मचा-यांना अवघे दोन ते तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते. चालक - वाहक यांची स्टेअरींग ड्युटी विचारात घेतली जाते. परंतू रस्त्यातील अपघात, वाहतूक खोळंबा, गाडी बंद पडणे हे विचारात न घेता वेळेचे बंधन दाखवून वेतन कपात केली जाते. या महामंडळात रुजू होणारा प्रत्येक कर्मचारी निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत ‘तात्पुरत्या समय वेतन श्रेणी’ वर असतो. काही कर्मचा-यांना तर निवृत्तीच्या शेवटच्या आठवड्यात ‘ कायम समय वेतन श्रेणी’ चे पत्र दिले जाते. हे माणूसकीला काळीमा फासणारे आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार...

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमातील १ ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व शाळा उद्या गुरुवार दिनांक १६ डिसेंबर २०२१ पासून सुरु होणार आहेत. याबाबतचा आदेश महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे, दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना घ्यावी लागणार आहे.

राज्य सरकारने १ डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याची मान्यता दिली होती. परंतु, कोरोनाचा ‘ओमायक्रॉन’ हा नवीन व्हेरिएंट आला. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली. त्यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती. कोरोना नियमांबाबत उपाययोजना शाळेत स्वच्छता, निर्जंतुकीकरण विषय सुविधा सुनिश्चित कराव्यात. जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धतता करावी लागणार आहे.

ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत. अशांना ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा दप्तरी ठेवावे. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. वर्ग खोली, स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी.

...Read More

V. S. News
महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम

व्हिएस न्यूज - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या विविध पदांसाठी इच्छुकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे या गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) पिंपरी चिंचवड दौ-यावर येणार आहेत.

यावेळी सव्वालाखे या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. तरी शहर महिला अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणा-यांनी गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) सावित्रीबाई फुले स्मारक (हॉल), महात्मा फुले पुतळ्या मागे, गांधीनगर जवळ, पिंपरी येथे सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती

व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तसेच कायदा सेल विभागाचे अध्यक्ष ॲड. अनिरुध्द कांबळे आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पांढारकर यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी शनिवारी (दि. 11 डिसेंबर) ॲड. कांबळे व पांढारकर यांना नियुक्तीचे पत्र दिले.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी ॲड. कांबळे व पांढारकर यांचे सोमवारी (दि. 13 डिसेंबर) पिंपळे निलख येथील कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंके, परशुराम गुंजाळ, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेते संदेश नवले, राजाभाऊ काळभोर, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवा दलाचे माजी शहराध्यक्ष मकरध्वज यादव, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सोशल मिडीया समन्वयक चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, प्रतिक्षा कांबळे, कुंदन कसबे, वसिम शेख, पांडूरंग जगताप, गुंगा क्षिरसागर, आण्णा कसबे, हर्षवर्धन पांढारकर आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या बरोबरच या दोन नवनियुक्त शहर कार्याध्यक्षांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ॲड. कांबळे व पांढारकर हे शहर कॉग्रेसच्या सर्व कार्यक्रमात विविध आंदोलनात नेहमीच सक्रिय असतात. यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ॲड. कांबळे व पांढारकर यांची नियुक्ती केली आहे.

...Read More

V. S. News
विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल.

व्हिएस न्यूज - न्याय मिळण्यास विलंब होणे म्हणजे न्याय न मिळाल्या प्रमाणेच असतो. परंतू, त्याला छेद देणारा निकाल पिंपरी-चिंचवड न्यायालयाने मंगळवारी (ता.१४) दिला. विशेष म्हणजे जलद न्यायाची अपेक्षा असलेल्या महिलाविषयक खटल्यात हा निवाडा करण्यात आला, फक्त ४८ तासांत म्हणजे दोन दिवसांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दस्तगीर पठाण यांनी विनयभंगाच्या खटल्यातील आरोपीला दोषी धरून सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.

न्यायालयाच्या चपळाईबरोबर पोलिसांचाही जलद तपास या वेगवान न्यायाला कारणीभूत ठरला आहे. हा गुन्हा घडल्यानंतर चिंचवड पोलिस सह.पोलीस निरीक्षक आणि या गुन्ह्याचे तपासाधिकारी विकास मडके यांनी फक्त २४ तासांत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्याला तशीच वेगवान साथ व सहकार्य त्यांना सरकारी वकील अॅड. साधना बोरकर यांचे मिळाले. त्यांनी हा खटला जलद चालवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने मान्यच केली नाही, तर त्यावर जलदगतीने अंमलबजावणीही केली. त्याच्यामुळे १० तारखेला घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपीला लगेच दोन दिवसांत शिक्षा झाली.

सुरेशकुमार मोहनलाल (वय २२, रा. वेताळनगर चिंचवड मूळचा जम्मू-काश्मीर) असे त्याचे नाव आहे. या घटनेतील फिर्यादी २३ वर्षीय नवविवाहिता आहे. तिच्यावर अत्याचार करून आरोपीचा जम्मू-काश्मीरला पळून जाण्याचा बेत होता, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी व फिर्यादी एकाच इमारतीत राहतात. फिर्यादी पहिल्या, तर आरोपी दुसऱ्या मजल्यावर रहावयास आहे. घटनेच्या दिवशी आरोपी हा फिर्यादींच्या उघड्या दरवाजातून घरात घुसला. त्याने दरवाजा आतून बंद करीत फिर्यादींचा विनयभंग केला.त्यावर त्यांनी आरडाओरडा केला. एवढेच नाही, तर आरोपीच्या तावडीतून त्यांनी सुटकाही करून दिली.

दरम्यान, त्यांच्या आरडाओरड्याने आरोपी घाबरला. दरवाजा उघडून त्याने पळ काढला. फिर्यादीही त्यांच्या मागे धावल्या. हे पाळून तळमजल्यावरील पार्किंगमधील रहिवाशांनी पळणाऱ्या आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.

त्यानंतर मडकेंसह पोलीस हवालदार केदारी, पोलीस नाईक सोनपेटे, पोलीस शिपाई बाविस्कर यांनी जलद तपास करून दुसऱ्याच दिवशी ११ तारखेला चार्जशीट दाखल केले. १२ तारखेला रविवारी कोर्टाला सुट्टी असते. अन्यथा २४ तास अगोदरच म्हणजे कालच सोमवारी हा निकाल लागला असता.

दरम्यान, या जलदगती निकालाने समाजात एक चांगला संदेश जाणार आहे. आरोपीला लवकर शिक्षा झाल्याने असे गुन्हे करण्यास आरोपी सहसा धजावणार नाहीत. परिणामी त्यांना व या गुन्ह्यांनाही आळा बसेल, अशी प्रतिक्रिया या खटल्यात सरकार तथा पोलिसांची बाजू मांडलेल्या सरकारी वकील अॅड. साधना बोरकर यांनी दिली. अशा निकालाने धास्ती निर्माण होऊन महिलांविषयक गुन्हे कमी होतील, असेही त्या म्हणाल्या.

...Read More

V. S. News
पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर

व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून बनावट बिस्किटे देऊन फसवणूक करणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील 'सोन्याचे बिस्किट गँग'च्या प्रमुखासह सात जणांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतरची ही पहिली मोक्का कारवाई , या लोकांकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास आयुक्त कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.

तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये सोन्याच्या बिस्किट गँगवर विविध सात गुन्हे दाखल आहेत. गँगप्रमुख प्रकाश साळवे व त्याच्या गँगमधील इतर सहा जण तळेगाव दाभाडे व परिसरात सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या उद्देशाने बनावट बिस्किटे देण्याचा प्रकार करीत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे झाले होते.

आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर गंभीर स्वरूपाचे आणि एकाच प्रकारे वारंवार गुन्हे दाखल करण्याऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले होते. या आदेशानंतर माहिती संकलित होताच या गँगवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त गणपत माडगूळकर यांनी आयुक्तांकडे दिला होता. त्यानंतर आयुक्त पद्मनाभन यांनी कारवाई करण्यास परवानगी दिली होती.

परंतु सत्रन्यायालयाने ( दि.३) यातील आठ महिन्यांपासून कारागृहात बंद असलेला आरोपी तेजस प्रकाश साळवे याचा जमीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणी न्यायालयात अॅड.राजेश रणपिसे यांनी आरोपी तेजस साळवे ची बाजू मांडली. ॲड.राजेश रणपिसे यांनी आरोपी साळवे च्या बाजूने केलेला युक्तिवाद न्यायाधीश ए.एन.सिरसिकर यांनी ग्राह्य धरून जमीन मंजूर केला.

...Read More

V. S. News
पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम

शहर कॉंग्रेसची समन्वय बैठक मोशी प्राधिकरण येथे संपन्न

व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांना सामोरे जात असताना कॉंग्रेसचे सर्व आजी - माजी नगरसेवक, आजी - माजी पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच शहर कॉंग्रेसच्या पदाधिका-यांची निवड नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकाविण्याचे ध्येय ठेवून पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

रविवारी (दि. 12 डिसेंबर) शहर कॉंग्रेसची समन्वय बैठक डॉ. कैलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मोशी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॅा. पी. बी. कुंभार, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, शामला सोनवणे, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे माजी प्रदेश अध्यक्ष मनोज कांबळे, उपाध्यक्ष उमेश खंदारे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, अख्तर चौधरी, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंह वालिया, एनएसयूआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, महिला नेत्या छायाताई देसले, नंदाताई तुळसे, शोभा पगारे, कमला श्रोत्री, ज्येष्ठ नागरिक सेलचे माजी अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सुनिल राऊत, अबूबक्र लांडगे, मल्याळी समाज नेते के. एम. रॉय, के. हरी नारायणन, विश्वनाथ जगताप, आनंदराव फडतरे, आदम पटेल, शब्बीर इनामदार, इरफान शेख, याकूब इनामदार, बाबा बनसोडे, हिराचंद जाधव, निखिल भोईर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, आबा खराडे, सतिश भोसले, किरण नढे, इस्माईल संगम, नयन पालांडे, रवी नांगरे, प्रकाश पठारे, किरण खाजेकर, प्रा. संजय पवार, वामन ऐनिले, अमर नाणेकर, अक्षय शहरकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, मागील पाच वर्षांतील महानगरपालिकेतील भाजपाच्या भ्रष्ट कारभारावर सर्व सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा उद्रेक मतदार मतपेटीतून व्यक्त करतील. यासाठी आपण सर्वांनी कॉंग्रेसची ध्येय धोरणे मतदारांपुढे घेऊन जाऊ.

शेतक-यांनी एकजुटीने ज्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीला पायबंद घालण्यासाठी वर्षभर आंदोलन करुन पंतप्रधानांना माघार घेण्यास भाग पाडले. त्याच प्रमाणे आपण सर्वजण एकजूटीने महानगरपालिकेतील भाजपाची सत्ता उलथून टाकू. या निवडणूकीत कोणाबरोबर आघाडी करायचे ते वरिष्ठ ठरवतील. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम करावे. कॉंग्रेस पक्ष नेहमीच उपेक्षित, वंचित समाज आणि सर्व जाती धर्मातील नागरीकांना न्याय देणारा पक्ष आहे. भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे समाजातील सर्व घटक त्रस्त आहेत. आता कॉंग्रेसला पक्ष वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.

आगामी निवडणूकीसाठी इच्छुक असणा-या कार्यकर्त्यांनी आपली नावे द्यावीत, कार्य अहवाल द्यावा तसेच निवडणूक विभागाने तयार केलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर योग्य वेळी आक्षेप, हरकती घ्याव्यात असेही या बैठकीत ठरले. प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गौतम आरकडे म्हणाले की, डॉ.

कैलास कदम यांच्या माध्यमातून शहराला सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नियुक्तीपासून पक्ष संघटनेत नवचैतन्य आले आहे. शहर कार्यकारिणी करताना सर्व जाती धर्मातील, ज्येष्ठ, महिला, युवक, युवतींना, कामगारांना संधी देण्यात येईल. नरेंद्र बनसोडे, विश्वास गजरमल, मनोज कांबळे, वसिम इनामदार, शामला सोनवणे, निगार बारसकर, कविचंद भाट आदींसह या बैठकीत सर्व उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अभिमन्यू दहितुले आणि आभार उमेश बनसोडे यांनी मानले.

...Read More

V. S. News
पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे

  • भाजपविरोधात आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
  • भ्रष्ट कारभारामुळे पाणीपुरवठा प्रकल्प फसल्याचा आरोप

व्हिएस न्यूज - पिंपरी चिचंवड (प्रतिनिधी) पाणीपुरवठा विभागाच्या टेंडर, टक्केवारीमध्ये स्वारस्य दाखविणा-या भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी चिंचवडकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेतील सत्ताधा-यांनी शहरवासीयांचे पाणी रोखून त्यांना वेठीस धरू नये. अन्यथा सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.

पिंपरी चिंचवडमधील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या संदर्भात पाणी समस्या वाढविण्यास सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचे सांगताना संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिक, विरोधी पक्षाचे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी होते. तरीही सत्ताधारी आणि प्रशासनाला दररोज पाणीपुरवठा करता आलेला नाही.

एकीकडे शहरात दररोज पाणीपुरवठा होत नसताना दुसरीकडे दिवसाआड पाणी देखील नागरिकांना सुरळित दिले जात नाही. शहराच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून विस्कळित पाणीपुरवठा होत आहे. वेळी अवेळी नागरिकांना पाणी सोडले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात २४ पाणीपुरवठा देण्याचे नियोजन सुरू केले होते. परंतु, भाजप सत्तेत आल्यानंतर या नियोजनात पाणी फेरले गेले. सत्ताधारी भाजपच्या कारभा-यांना पाच वर्षात विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढता आलेला नाही. भरमसाठ कामे काढून सल्लागार, ठेकेदारांवर खर्च करण्याला त्यांच्यामार्फत प्राधान्य दिले गेले. त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण शहरात दिवसाआड पाणीपुरवठा कायम आहे. शहरातील नव्याने झालेल्या शेकडो बांधकामांना पाणी देण्यास महापालिका असमर्थ आहे.

आंद्रा, भामा आसखेड धरणाचे पाणी आरक्षित करून ते शहरात आणण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुरु झाले. भाजपला त्या प्रकल्पाचे देखील नियोजन करता आलेले नाही. भाजपच्या पदाधिकारी आणि कारभारी आमदारांकडून केवळ कामांची पाहणी करून महिना दोन महिन्यात शहराला पाणी मिळेल, अशा वल्गना सतत केल्या जात आहेत.

परंतु, या कामाला गती देण्यासाठी काही करताना ते दिसत नाहीत. केवळ भुलथापा मारून, जनतेची दिशाभूल करून पाणीपुरवठ्यासाठी सत्ताधा-यांनी जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. ते थांबवावे आणि शहराला दररोज सुरळित पाणीपुरवठा करावा, अन्यथा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस बोंबाबोंब आंदोलन करणार आहे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे. –

दिवसाआड पाणी, हेच भाजपचं शहर परिवर्तन

पिंपरी चिंचवड शहरात सुरळित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नियोजन करण्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात प्रश्न अपयशी ठरले आहे. भाजपने स्मार्ट सिटी आणि शहर परिवर्तन कार्यालयाच्या माध्यमातून मूलभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याचा दावा केला होता. स्मार्ट सिटीच्या कामांवर कोट्यवधींचा खर्च होत आहे. तर, शहर परिवर्तन कार्यालयाच्या नावाखाली सुमारे १३ कोटींचा खर्च केवळ सल्लागारावर केल्याची माहिती आहे. पाच वर्षापूर्वी दररोज असणारा पाणीपुरवठा भाजपने दिवसाआड केला, हेच परिवर्तन भाजपनं करून दाखवलं, अशी बोचरी टीका वाघेरे पाटील यांनी केली.

...Read More

V. S. News
भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल

व्हीएस न्यूज - सावित्रीबाल फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्यामुळे पुण्यातील या विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क पार्कमध्ये महिला उद्योजकांनी त्यांचे कार्य दाखवणे अत्यंत समर्पक आहे ,असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. पीयूष गोयल यांनी आज पुणे विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कला भेट दिली.

महाराष्ट्रात स्टार्ट-अप संस्कृतीचे नेतृत्व महिलांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत "आपण उद्योजकीय चौकट जिवंत ठेवली पाहिजे," असे ते म्हणाले. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये स्टार्ट-अपमध्ये कार्यक्षेत्राचा भाग म्हणून नोंदणीकृत 46 टक्के एककांमध्ये महिला भागीदार आहेत त्याचप्रमाणे श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांचा स्टार्टअप्समध्ये 45 टक्के वाटा आहे, ही बाब उत्साहवर्धक आहे .” असे त्यांनी सांगितले.

इनक्यूबेटरची तुलना पालकांशी करताना मंत्री म्हणाले की, हे दोघेही मार्गदर्शक आणि समर्थक असून त्यांची स्टार्ट-अप्सना गरज आहे.“आज आपल्याकडे संपूर्ण भारतभर स्टार्टअप कार्यक्षेत्र आहे. भारतात 50000 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स नोंदणीकृत असून हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्ट अप कार्यक्षेत्र आहे'', असे ते म्हणाले.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये केलेल्या नोंदणीनुसार पुण्यात 3200 तर मुंबईत 3274 स्टार्ट-अप्स आहेत, अशी माहिती देत मंत्र्यांनी पुणे-मुंबईमधील ही निकोप स्पर्धा सुरू ठेवावी, अशी सूचना केली. पुण्यात असलेले उद्योग, माहिती आणि तंत्रज्ञान तसेच उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमुळे स्टार्ट-अपला पाठबळ देण्यात पुण्याच्या अनोख्या योगदानाचे वर्णन करत गोयल म्हणाले की, स्टार्ट-अप कार्यक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याची वेळ आली आहे. स्टार्ट-अप्सच्या भरभराटीसाठी, अकादमी, उद्योग आणि संशोधन यांच्या सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

भारतातील 79 युनिकॉर्नपैकी 4 पुण्यातील आहेत ही आनंददायी बाब आहे, असे ते म्हणाले. पुणे विद्यापीठातील विज्ञान तंत्रज्ञान पार्कमध्ये 153 स्टार्ट अप्स आहेत. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कमध्ये दिव्यांग लोकांसाठी दाखवण्यात आलेले काही नवनवीन शोध उत्कंठावर्धक होते हे लक्षात घेऊन,शेतकरी, दिव्यांग आणि गरीबांसाठी आणखी नवनवीन संशोधन केले जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सरकारच्या हस्तक्षेपामुळे उद्योगांची प्रगती नेहमीच खुंटते यावर भर देत मंत्र्यांनी साठ आणि सत्तरच्या दशकात सरकारी हस्तक्षेपामुळे औद्योगिक प्रगती खुंटल्याचे उदाहरण दिले. आज कोणताही युनिकॉर्न केवळ सरकारी पाठिंब्याच्या आधारे या स्थितीपर्यंत पोहोचला नसता, असे ते म्हणाले.

स्टार्ट-अपची रचना उद्योजकांनी तयार केली असेल आणि सरकार केवळ सहाय्यासाठी सुविधा देण्याच्या स्वरूपात असेल तरच पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल, असे त्यांनी सांगितले.

कोवॅक्सिनसारखे काही उपक्रम हे सरकार आणि उद्योग सहकार्याचे उत्तम उदाहरण आहेत असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा समारोप करताना गोयल म्हणाले की, भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात परंतु या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीनें शेतकरी, दिव्यांग आणि गरीब यांच्यासाठी अत्यंत किफायतशीर उपायांसह अब्जावधी उद्योजकही आहेत.

पार्श्वभूमी

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजक पार्क, पुणे,स्थापन केले आहे. इतर विविध मंत्रालयांव्यतिरिक्त या पार्कला अलीकडेच स्टार्टअप इंडियाच्या बीजनिधी (सीड फंड) कार्यक्रमांतर्गत निधी देण्यात आला आहे.

स्टार्टअप इंडियाचा बीजनिधी (सीड फंड) कार्यक्रम हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत एक प्रमुख कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण भारतातील स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अॅग्रिकल्चर, पुणे चे प्रशांत प्रशांत गिरबाने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

...Read More

V. S. News
स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

व्हीएस न्यूज - विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल आणि नव्या पिढीला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलपती डॉ.एस.बी. मुजुमदार, मुख्य संचालिका आणि प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ.रजनी गुप्ते, कुलसचिव डॉ.एम.एस.शेजुळ, परीक्षा नियंत्रक श्रद्धा चितळे आदी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले, शिक्षण क्षेत्रात संशोधनासोबत सृजनशीलतेलाही महत्व आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला महत्व असलेल्या युगात मूल्याची जाण ठेवणेही महत्वाचे आहे. विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा आणि मूल्यांच्या विकासावरही भर द्यावा. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेत देताना सोबत इंग्रजीचे शिक्षण दिल्यास त्यांचा विकास चांगल्याप्रकारे होईल. स्नातकांनी त्यासाठी प्रादेशिक भाषेत पुस्तके लिहिण्याचे काम केल्यास ती समाजाची मोठी सेवा ठरेल.

सिम्बॉयसिस विद्यापीठ विश्वबंधुत्वाचे प्रतीक आहे. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी आपण जागतिक पातळीवर एकत्र येणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर प्रगतीची झेप घेताना विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गावाच्या प्रगतिकडेही लक्ष द्यावे. जगाच्या कल्याणाचा विचार करताना देशाच्या उत्कर्षाचा विद्यार्थ्यांनी प्राधान्याने विचार करावा. शैक्षणिक प्रगतीला विनयाची जोड दिल्यास आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारल्यास जीवनात अधीक चांगले यश संपादन करता येईल, असे ते म्हणाले.

यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा संदेश दाखविण्यात आला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी करावा. विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी या आव्हानांवर मात करीत यश संपादन करावे असे त्यांनी सांगितले. त्यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. डॉ.मुजुमदार म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राला भारतीय चेहरा मिळाला आहे. भारतीय ज्ञानप्रवाहाचा शिक्षणात समावेश करताना ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावनाही त्यात समाविष्ट आहे.

सिम्बॉयसिस विद्यापीठाने या धोरणानुसार वाटचाल सुरू ठेवली आहे. साहचर्य आणि स्वावलंबन हा विद्यापीठाचा आत्मा आहे. सर्व भेद बाजूला सारून वैश्विक भावनेचा संदेश देताना पर्यावरण संवर्धनासारख्या महत्वाच्या विषयावरही विद्यापीठाने लक्ष दिले असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती येरवडेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. डॉ. गुप्ते यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.

राज्यपाल महोदयांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

...Read More

V. S. News
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन

व्हीएस न्यूज – एनेमिया मुक्त भारत यासाठी शासना अंतर्गत व मातृसेवा सेवाभावी संस्थे अंतर्गत व लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीर राबवण्यात आले.या शिबीराचे दीप प्रज्वलन करून विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले व तालेरा रुग्णालया अंतर्गत व मातृसेवा सेवाभावी संस्थे अंतर्गत सर्व ज्येष्ठ नागरिकांचे रक्त तपासणी करण्यात आली.

माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विट्ठल उर्फ नाना काटे यांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक व संस्थापक व संस्थापिका सुहास गोडसे व संस्कृती गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला.तालेरा हॉस्पिटल च्या डॉ. विदया मुंडे व संस्थापक_ सुहास गोडसे व संस्कृती गोडसे यांचा सन्मान विट्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मातृसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक मानसी सुहास गोडसे , संस्थापिका संस्कृती गोडसे , तालेरा रुग्णालयाचे डॉ. विदया मुंडे व सर्व टीम उपस्थित होते. मातृसेवा सेवाभावी संस्था गेली अकरा वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध व असाह्य , निराधार लोकांसाठी कार्य करीत आहेत संपूर्ण गोडसे कुटुंबीयांनी हा सेवेचा वसा घेतला आहे.

आज संस्थेत आजी आजोबांनी संस्थेचे अतिशय कौतुक केले व समाधानी व आनंदी चेहरे पाहून समाधान मिळाले असे मत मा. विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी व्यक्त केले.

संस्थेच्या संस्थापिका संस्कृती गोडसे या पुण्यातील नामवंत रुग्णालय सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्य करीत आहेत. परंतु त्यांनी स्वतः आपली संस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.या संस्थेमध्ये सध्या 18 अनाथ वयोवृद्ध नागरिक असून औंध येथेही 16अनाथ वयोवृद्ध अंध नागरिकांचा सांभाळ सध्या या संस्थे मार्फत केला जात आहे. त्यांना फिजिओथेरपी , मसाज देणे , चालवणे , मोटिवेट करणे , कौन्सिलिंग करणे , हरिपाठ , भगवदगीता , गाणी म्हणणे व सर्व वर्षभरातील सणवार त्यांच्यासोबत करीत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!