व्हीएस न्यूज – सीओएआय (सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया) या टेलिकॉम, इंटरनेट, तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेने सप्टेंबर 2017 पर्यंतचा मोबाइलधारकांचा आकडा जाहीर केला आहे. भारताच्या खासगी टेलिकॉम सेवा पुरवठादारांचे एकूण ग्राहक 946.66 दशलक्ष इतके आहेत. या माहितीत रिलायन्स जिओ आणि एमटीएनएलची जुलै 2017 पर्यंतची आकडेवारीही समाविष्ट करण्यात आली आहे.
भारती एअरटेल लिमिटेड 29.80 टक्के बाजारपेठेतील भागांसह सर्वोत्तम स्थानावर कायम आहे. यात सप्टेंबरपर्यंत 1 दशलक्ष ग्राहकांचा आधार वाढला आहे, या कंपनीची आता एकूण ग्राहक संख्या 282.04 दशलक्ष इतकी झाली आहे. व्होडाफोन इंडिया एअरटेलच्या मागोमाग प्रवास करत आहे, ही संख्या आता 207.44 दशलक्ष इतकी आहे.
उत्तर प्रदेश (पूर्व) सर्कलमध्ये एकूण 83.46 दशलक्ष ग्राहक शिल्लक असल्याचे दिसते. महाराष्ट्रात एकूण मोबाइल ग्राहक 79.20 दशलक्ष इतके आहेत. बिहारमध्ये एकूण ग्राहकांची संख्या तिसऱ्या क्रमांकावर म्हणजेच 76.15 दशलक्ष इतकी आहे. केरळ आणि कर्नाटकात संख्येचा विस्तार झाला असून, ही आकडेवारी अनुक्रमे 0.69 टक्के आणि 0.37 टक्के इतकी झाली आहे. तर गुजरातेतील ही आकडेवारी 0.14 टक्के झाली आहे. ही आकडेवारी सप्टेंबर 2017 पर्यंतची आहे. मुंबई आणि दिल्ली येथे अनुक्रमे 273,250 आणि 136,216 इतक्या ग्राहकाची वाढ झाली आहे, ही वाढ अनुक्रमे 30.17 दशलक्ष आणि 47.57 दशलक्ष इतकी आहे.
सीओएआयचे महासंचालक म्हणाले की, केरळ, हरयाणा आणि गुजरातेतील वाढती ग्राहकांची संख्या पाहता, अद्याप मूलभूत सेवांचा विकास होण्यासाठी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारण्यासाठी संधी असल्याचे दर्शवते. या प्रदेशातील पायाभूत सुविधांमधील स्थिर गुंतवणूक या सकारात्मक निकालांवरून दिसते. हे उद्योगक्षेत्र 4.6 लाख कोटी रुपयांच्या संकलित कर्जात आहे. या उद्योगक्षेत्राला अतिरिक्त 2.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज आहे.
मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि डेटा सेवात भारत देशाला खऱ्या अर्थाने सुसज्ज बनवण्यामध्ये मोबाईल क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे. टेलिकॉम उद्योगक्षेत्रामध्ये तातडीच्या आणि जलद हस्तक्षेपाची गरज आहे, यामुळे पॉलिसी आणि नियामक स्थिरता, शिवाय विकास, नावीन्यपूर्णतः आणि या क्षेत्रातील विकास सुलभतेने होण्यास प्रोत्साहन मिळेल.
पूर्णपणे कनेक्टेड राहणे आणि भारत देशाला डिजिटली सबळ करणे आणि डिजिटल इंडियाचा दृष्टीकोन पुढे नेणे यासाठी हे उद्योगक्षेत्र वचनबद्ध आहे. त्यासाठी अनेक पातळ्यावर प्रयत्न करण्यात येत आहेत असे त्यानी सांगीतले. सीओएआय ही इंटरनेट आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी1995 साली स्थापना झालेली बिगर सरकारी संस्था आहे. नावीन्यपूर्ण मोबाइल कम्युनिकेशन्सच्या पायाभूत सुविधा, उत्पादने आणि सेवा यामध्ये भारत जागतिक स्तरावर अग्रेसर राहावा आणि राष्ट्रीय टेलिविभागात ब्रॉडबॅंडसह 100% यश मिळवावे असा सीओएआयचा दृष्टीकोन आहे. याद्वारे भारतातील लोकांना नावीन्यपूर्ण आणि परवडणीाऱ्या मोबाइल कम्युनिकेशन सेवा देण्याला वाहिलेली आहे असे त्यांनी सांगीतले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002