व्हीएस न्यूज - भारताने पहिला टी-20 सामना सहज जिंकत आपले वर्चस्व कायम राखले. आता उभय संघांमध्ये आज होणाऱ्या दुसरा टी-20 सामना जिंकून झटपट क्रिकेटच्या मालिकेतही विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाने विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा 4-1 असा धुव्वा उडविला होता. त्यानंत पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 9 गडी राखून विजयाची नोंद केली होती. हीच विजयमालिका कायम राखण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या 14 टी-20 सामन्यांतील 10 सामने जिंकून येथेही आपले वर्चस्व राखले आहे. इतकेच नव्हे तर 28 सप्टेंबर 2012 नंतर टी-20 क्रिकेटमध्ये भारताने कांगारूंविरुद्ध पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. त्यामुळेच उद्याच्या सामन्यात भारताव विजय मिळविण्यासाठी कांगारूंना सर्वोत्तम कामगिरीचीच नोंद करावी लागेल. नियमित कर्णधार स्टीव्हन स्मिथ दुखापतीमुळे उपलब्ध नसताना त त्यांचत्यासाठी ही कामगिरी अधिकच आव्हानात्मक आहे.
भाताला पराभूत करण्करिता ऑस्ट्रेलियाला किमान तीन बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. पहिली म्हणजे त्यांना कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चाहल या रिस्ट स्पिनर्सच्या वैविध्यपूर्ण आणि गूढ गोलंदाजीचे कोडे साडवावे लागेल. या दोघांनी मिळून चार वन डे आणि पहिली टी-20लढत मिळून 16 बळी घेतले आहेत. अनेक ऑसी फलंदाज आयपीएलमध्ये खेळत असल्याने त्यांच्यासाठी भातीय हवामान आणि खेळपट्ट्या हे आव्हान राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचे अपयश अधिक आश्चर्यकारक आणि ऑसी संघव्यवस्थापनासाठी चिंताजनक ठरले आहे.
त्याचप्रमाणे स्मिथच्या गैरहजेरीत पहिल्या टी-20 सामन्यात झालेली ऑस्ट्रेलियाची घसगुंडी त्यांच्यावरील दडपण वाढविणारी आहे. या सामन्यात जेमतेम 118 धावांची मजल मारता आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला उद्याच्या लढतीत किमान आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल. वॉर्न व मॅक्सवेल अपयशी ठरत असताना केवळ फिंचवर ऑस्ट्रेलियन फलंदाजीची मदार आहे. परंतु सातत्याने फिरकीविरुद्ध अपयशी ठलेल्या मॅक्सवेलला फिंचने पाठिंबा दिला आहे.
भारतीय खेळाडूंना आपली चांगली कामगिरी कायम राखण्याचीच जबाबदारी पार पाडावी लागेल. अश्विन व जडेजाला बाहेर ठेवून कुलदीप व चाहल यांना दिलेल्या संधीचे त्यांनी चीज केले आहे. चाहलने तर चार वेळा मॅक्सवेलला बाद करून भारतासमोरचा मोठाच अडथळा बाजूला केला आहे. टी-20 मालिकेसाठी परतलेला शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्य कामगिरीतील सातत्य कायम राखल्यास भाताला उद्याही विजय मिळविणे अवघड जाऊ नये.
प्रतिस्पर्धी संघ-
भारत– विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चाहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा व महंमद शमी.
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जेसन बेहरेन्डॉर्फ, डॅनियल ख्रिस्टियन, नॅथन कूल्टर-नाईल, ऍरॉन फिंच, ट्रेव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टिम पेने, केन रिचर्डसन, ऍडम झाम्पा, माकर्स स्टॉइनिस व अँड्रयू टाय.
सामन्याचे ठिकाण- गुवाहाटी. सामन्याची वेळ- सायं. 7-00 पासून.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002