Breaking News

कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा | भोसरीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यासाठी रवी लांडगेंचे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन | मुस्लीम समाज केवळ निवडणुकांपुरता का?; खासदार जलील यांचा राष्ट्रवादी, काँग्रेसला सवाल! | पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत एकूण ७९३ कोटी ८६ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता | वैद्यकीय शिक्षण विभागात आमुलाग्र बदलासाठी काम करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख | ओबीसी समाजचे आरक्षण रद्द होण्यास भाजप जबाबदार – संजोग वाघेरे‌ पाटील | अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक न्यायाची आघाडी | आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई | महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनचळवळ उभारू – महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर | आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या - वसंत लोंढे | महिलांना सन्मान देण्यासाठी सोनिया गांधी यांची प्रमुख भुमिका - सचिन साठे | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मिळकत धारकास सामान्य मिळकत करात शंभर टक्के सूट | झेंडे समुहाकडून २२.४६ कोटींचा बँकेला गंडा’: सेवा विकास बँक घोटाळा | पुण्यातून सतरा वर्षांच्या तीन तरुणी बेपत्ता, अज्ञात इसमांनी पळवून नेल्याचा संशय | पिंपरीच्या डॉ डी. वाय पाटील रुग्णालयात कर्करोगावरील दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी | सभापती नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला! | अण्णासाहेब मगर स्टेडियम खासगीकरण केल्यास कामगार लढा उभारु…..डॉ. कैलास कदम | लाचे प्रकरणी ॲड. नितीन लांडगे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी | भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पालिकेवर प्रशासक नेमावा – माजी आमदार विलास लांडे |
V. S. News
राष्ट्रकुल स्पर्धेत सुशील कुमार, साक्षी मलिकला सुवर्ण

व्हीएस न्यूज - जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमार याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे कुस्तीपटू साक्षी मलिक हिनेही आपला सुवर्णपदक पटकावत महिला कुस्तीपटूंचे उत्तम प्रतिनिधित्व केले आहे. साक्षीबरोबरच अन्य महिला कुस्तीपटूंनीही धमाकेदार कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. साक्षीने ६२ किलो वजनी गटात फ्रीस्टाईलमध्ये न्यूझिलंडच्या तायला तुआहिने फोर्ड हिचा १३-२ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.

याशिवाय, भारतीय महिला कुस्तीपटूंनी स्पर्धेमध्ये नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत. यामध्ये साक्षी मलिकसह इतर कुस्तीपटूंचा समावेश आहे. महिला कुस्तीपटूंनी एकूण १० वजनी गटात पदके पटकावली आहेत. तर सुशीलकुमारने ७४ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाइलमध्ये न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरला चीतपट करत सुवर्ण पदक पटकावले आहे. याच गटात भारताच्या प्रवीण राणाने कांस्य पदक पटकावले.

माझ्यासाठी हा गौरवाचा आणि भावूक करणारा क्षण आहे. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर ३ वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. मी हा विजय माझे माता-पिता, गुरू सतपाल, अध्यात्मिक योगगुरू स्वामी रामदेव आणि देशाच्या प्रत्येक नागरिकांना अर्पण करतो.’ असे ट्विटही सुशीलने आपल्या विजयानंतर केले. याबरोबरच महिला कुस्तीपटूंनी केलेली कामगिरी खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असल्याचे त्याने म्हटले.

...Read More

V. S. News
फेडरेशन कप योगा स्पर्धेत सुशांत तरवडेला तीन सुवर्ण, महाराष्ट्राला 14 पदके

व्हिएस न्यूज - कर्नाटक स्टेट अमॅच्युर योगा असोसिशन यांच्या वतीने व योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय फेडरेशन कप व आंतरराष्ट्रीय योगा मोहत्सवात महाराष्ट्राला 14 पदके मिळाली. तर महाराष्ट्राच्या सुशांत तरवडेने तीन सुवर्ण पदके पटकाविली.
कर्नाटक येथील शांतीवन धर्मस्थळ येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन योगा फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अशोककुमार अगरवाल, वीरेंद्र हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत देशातील 28 राज्यातील व इराण, व्हतनाम या देशातील आंतरराष्ट्रीय योगपटू मिळून एकूण 450 स्पर्धकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रा संघाबरोबर संघव्यवस्थापक म्हणून अनिता पाटील, प्रशिक्षक म्हणून जतीन सोळंकी, महाराष्ट्र योगा असोसिशनचे चंद्रकांत पांगारे उपस्थित होते.
महाराष्ट्र संघातील यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे : देवदत्त भारदे याने 17 ते 25 वयोगटात योगासन प्रकारात चौथा, सुशांत तरवडे यांनी 17 ते 35 वयोगटात आर्टिस्टिक सिंगल प्रकारात प्रथम, चंद्रकांत पांगारे यांनी 17 ते 60 वयोगटात योगासन प्रकारात द्वितीय, सुशांत व देवदत्त यांनी 17 ते 35 वयोगटात आर्टिस्टिक पेअरमध्ये प्रथम, देवदत्त व सुशांत यांनी 17 ते 35 वयोगटात रिदमिक पेअरमध्ये द्वितीय, श्रेया कंधारे हिने 7 ते 17 वयोगटात आर्टिस्टिक सिंगलमध्ये चौथा यांनी यश संपादन केले.
आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवात देवदत्त्त भारदे याने 17 ते 25 वयोगटात योगासन प्रकारात चौथा, सुशांत तरवडे यांनी 17 ते 35 वयोगटात आर्टिषस्टिक सिंगलमध्ये प्रथम, देवदत्त व सुशांत यांनी 17 ते 35 वयोगटात रिदमिक पेअर प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला.
या यशस्वी स्पर्धकांचे महाराष्ट्र योगा असोसिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज, कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, अनिता पाटील यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
...Read More

V. S. News
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बात्रा यांची निवड

व्हीएस न्यूज - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदावर चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे, तर राजीव मेहता यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड झाली आहे.

आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवडय़ात अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे ६० वर्षीय बात्रा यांचा मार्ग मोकळा झाला होता. आयओएच्या निवडणुकीतून मी माघार घेत असून,अध्यक्षपदासाठी बात्रा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आहे, अशा आशयाचे पत्र खन्ना यांनी आयओए निवडणूक आयोगाला लिहिले होते. मात्र हे पत्र खन्ना यांनी ३ डिसेंबरची माघार घेण्याची मुदत उलटल्यानंतर पाठवले होते. त्यामुळे औपचारिकता म्हणून झालेल्या निवडणुकीत बात्रा यांना १४२ मते पडली, तर खन्ना यांना १३ मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी मेहता हे एकमेव उमेदवार असल्यामुळे सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ते पद सांभाळणार आहेत.

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष बिरेंद्र बैश्य हेसुद्धा सुरुवातीला अध्यक्षपदासाठी उत्सुक होते. मात्र त्यांनी अचानक माघार घेतली. दिल्ली उच्च न्यायालयामुळे निवडणुकीपुढे अनिश्चिततेचे वातावरण पसरले होते. क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करून निवडणुकीला अंतरिम स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न क्रीडा प्रशासक अ‍ॅड. राहुल मेहरा यांनी केला. मात्र निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.

कोषाध्यक्ष पदासाठी आनंदेश्वर पांडे यांची निवड झाली आहे, तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत आर. के. आनंद यांनी जनार्दनसिंग गेहलोत यांचा ९६-३५ असा पराभव केला. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०३२च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, २०३०च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०२६च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाच्या भारताच्या यजमानपदाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. या स्पर्धाच्या आयोजनासाठी सरकारचे आर्थिक बळ महत्त्वाचे असते.

- नरिंदर बात्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष.

...Read More

V. S. News
दहा षटकांचे क्रिकेट सामने ऑलिम्पिकसाठी योग्य - सेहवाग

व्हीएस न्यूज - क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग व्हावा, अशी साऱ्यांचीच इच्छा आहे. जर सामने १० षटकांचे खेळवण्यात आले तर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग करता येऊ शकतो, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे.

‘‘क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग करता यावा, असे आपण सारेच म्हणत आहोत. माझ्या मते दहा षटकांचे सामने खेळवले तर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग करता येऊ शकतो. दहा षटकांचे सामने हे फुटबॉलच्या लढतींसारखे ९० मिनिटांमध्ये संपतील. त्यामुळे दहा षटकांच्या सामन्यांचा आराखडा मला ऑलिम्पिकसाठी योग्य वाटतो,’’ असे सेहवाग म्हणाला.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये टी-१० क्रिकेट लीग खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये सेहवाग हा ‘मराठा अरेबियन्स’ या संघाचा कर्णधार आहे. ही लीग १४-१७ डिसेंबर या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. सेहवागच्या संघात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर व कामरान अकमल यांचा सहभाग आहे.

...Read More

V. S. News
जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मिराबाई चानूला सुवर्ण

व्हीएस न्यूज - भारताची महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजनी गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलत हा पराक्रम केला. वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदकाची कमाई करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. २२ वर्षांपूर्वी कर्णम मलेश्वरीनं विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.

अमेरिकेतील अनाहिममध्ये आयोजित स्पर्धेत चानूने ४८ किलो वजनी गटात तिने सुरुवातीला स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचलले. त्यानंतर जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलत तिने भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले. यापूर्वी कर्णम मलेश्वरीनं १९९४ आणि १९९५ मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. यानंतर तब्बल २२ वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. देशासाठी सुवर्ण कामगिरी केल्यानंतर चानूला अश्रू अनावर झाले. या स्पर्धेत थायलंडची सुकचारोनला रौप्य तर सेगुरा अना हिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत चानूला अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर तिने पुन्हा एकदा आपल्यातील कसब दाखवून दिले.

...Read More

V. S. News
भारत-श्रीलंका-बांगलादेश तिरंगी मालिकेचं वेळापत्रक जाहीर

व्हीएस न्यूज - २०१७ वर्षापाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचं २०१८ या आगामी वर्षातलं वेळापत्रकही व्यस्त असणार असे संकेत मिळत आहेत. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ३ कसोटी, ५ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. वर्षभर घरच्या मैदानावर खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा भारतासाठी एखाद्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पहिला परदेश दौरा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर ८ ते २० मार्चदरम्यान भारतीय संघ श्रीलंकेत तिरंगी वन-डे मालिका खेळणार आहे. भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या ३ संघांमध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत प्रत्येक संघ दोन सामने खेळणार असून अंतिम सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडीयमवर खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंकेच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने या तिरंगी मालिकेचं आयोजन केलेलं आहे. १९९८ साली श्रीलंकेच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त निधास चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिरंगी मालिकेत सहभागी होण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला विनंती केली होती. यानंतर बीसीसीआयने श्रीलंका आणि भारत यांच्यात घरच्या मैदानावर छोटीशी मालिका खेळण्याची अट घातली होती. यानूसार भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाल्यानंतर बीसीसीआयने तिरंगी मालिकेत आपण सहभागी होत असल्याचं कळवलं आहे.

“श्रीलंकेच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्ताने आयोजित मालिकेत भारतीय संघाला सहभागी होता आलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. श्रीलंका हा आमचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे या महत्वाच्या प्रसंगी त्यांनी दिलेल्या तिरंगी मालिकेचं आमंत्रण आम्ही स्विकारलं आहे.” बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने, ६ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.

...Read More

V. S. News
रॉजर फेडरर सर्वात श्रीमंत खेळाडू

फोर्ब्स मासिकाने दिला अहवाल

व्हीएस न्यूज - टेनिसपटू रॉजर फेडररच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गोल्फपटू टायगर वुड्सला मागे टाकत रॉजर फेडरर वैयक्तिक क्री़डा प्रकारात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला. फोर्ब्स मासिकाने दिलेल्या अहवालानुसार, रॉजर फेडररने आतापर्यंत बक्षिसांच्या माध्यमातून ११ कोटी २ लाख ३५ हजार ६८२ अमेरिकी डॉलर्सची कमाई केली. फेडररने टायगर वुड्सच्या ११ कोटी ६१ हजार अमेरिकी डॉलर्स या कमाईला मागे टाकत, सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू हा मान मिळवला.

गेल्या वर्षात दुखापतींमुळे ग्रासलेल्या फेडररला मैदानात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. मात्र यंदाच्या वर्षात रॉजर फेडररने दणक्यात पुनरागमन करत आपल्याला टेनिसचा अनभिषिक्त सम्राट का म्हणतात हे दाखवून दिलं. यंदा फेडररच्या खात्यात ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन या दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांची विजेतेपदं जमा आहेत. याव्यतिरिक्त अन्य स्पर्धांच्या अंतिम फेरीतही फेडररने बाजी मारली आहे. या कामगिरीमुळे रॉजर फेडरर जागतिक क्रमवारीत दुसरं स्थान मिळवलं.

२०१७ हे वर्ष रॉजर फेडररच्या कारकिर्दीसाठी अत्यंत सकारात्मक गेलं आहे. २००९ सालापासून फेडररने सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. तर २००७ साली फेडररने सर्वाधिक स्पर्धांची विजेतेपदं पटकावण्याची किमया साधली. वर्षाच्या सुरुवातीस जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या रॉजर फेडररने आपल्या खेळात सुधारणा करुन आता क्रमवारीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

...Read More

V. S. News
‘तेंडुलकर ‘क्रिकेटचा खरा हिरो’ – वसीम अक्रम

व्हीएस न्यूज - पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज वासीम अक्रमने सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा खरा हिरो म्हटले आहे. एका पुस्तक प्रदर्शनाच्या सोहळ्यादरम्यान झालेल्या चर्चेमध्ये अक्रमने सचिनवर स्तुती-सुमने उधळली.‘गल्फ न्युज’वरून या कार्यक्रमातील चर्चेचे प्रेक्षेपण करण्यात आले.

सचिन एक उत्तम खेळाडू तर आहेस शिवाय तो एक महान व्यक्तीही आहे. इतक्या दिर्घ कारकिर्दीमध्ये सचिनचे नाव कोणत्याच वादात आले नसल्याचे कौतूक वाटते असे अक्रम म्हणाला. खेळाच्या मैदानावर आणि बाहेर म्हणजेच‘ऑन अॅण्ड ऑफ द फिल्ड’ सचिन नेहमी क्रिकेटच जगत आला. सचिनच्या रुपात जगाने सर्वात महान खेळाडूचा खेळ पाहिल्याचे समाधान अक्रमने व्यक्त केले.

सचिनबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दलच्या आठवणींनाही अक्रमने यावेळी बोलताना उजाळा दिला. जेव्हा मी सचिनला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच या मुलात काहीतरी खास असल्याचे मला जाणवले. पाकिस्तान विरुद्धच त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याचे खेळण्याचे तंत्र आणि पद्धत पाहून मला आश्चर्य वाटले. त्याच्या आवडत्या लेंथला चेंडू टाकल्यावर तो ज्याप्रकारे चेंडूवर तुटून पडायचा ते पाहून आश्चर्यच वाटायचे असे अक्रमने सांगितले. सचिनच्या पदार्पणात मला वाटलेली शक्यता त्याने खरी करुन दाखवली आणि विशेष म्हणजे मी त्याची प्रत्येक झेप पाहिली आहे. त्याचे आवडते फटके खेळताना मी त्याला मैदानात पाहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शकत साजरे करुन तो क्रिकेटमधील महान फलंदाजांच्या पंक्तीमध्ये सामिल झाल्याचे अक्रम म्हणाला.

अक्रमने भारताचे आघाडीचे माजी फलंदाज सुनिल गावस्कर यांचीही भरभरून स्तृती केली. मी अनेक महान फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. मात्र भारताच्या सर्वोत्तम आघाडीच्या फलंदाजांपैकी एक असणाऱ्या सुनिल गावस्कर यांची विकेट माझ्यासाठी नेहमीच खास राहील. आजच्या खेळाडूंना फलंदाजी कशी करावी हे शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी गावस्करांची फलंदाजी नक्की पहावी. हेल्मेट न घालता फलंदाजी करणारा हा फलंदाज कायमच अव्वल राहिल्याचे विशेष कौतूक वाटते असेही अक्रम म्हणाला.

कोहली सध्याचा सर्वोत्तम खेळाडू

तीनही प्रकराच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची धुरा संभाळणाऱ्या विराट कोहलीला अक्रमने सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे. कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये अत्तापर्यंत ३२ शतके केली आहे. त्यातील अनेक शतके ही प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना म्हणजे दुसऱ्या डावात झळकवली आहेत यावरूनच कोहलीचा दर्जा कळून येतो असे अक्रम म्हणाला.

...Read More

V. S. News
भारतीय महिला हॉकी संघाचा सर्वोत्तम १० जणांच्या यादीत समावेश

व्हीएस न्यूज - जपानमध्ये महिलांच्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत चीनवर मात करुन विजेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. आधीच्या क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असलेला भारतीय महिलांचा संघ आता १० व्या क्रमांकावर आलेला आहे. भारताच्या पुढे कोरिया आणि स्पेन हे दोन मातब्बर संघ आहेत.

या यादीत नेदरलँडचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे इंग्लंड आणि अर्जेंटीनाचा संघ आहे. या क्रमवारीत अमेरिकेच्या स्थानात घसरण झाली असून, हा संघ सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी या क्रमवारीत चौथं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंड आणि जर्मनीचा महिला संघ हा अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिलेला आहे.

चिलीने या क्रमवारीत आपल्या कामगिरीत सुधारणा करत २० व्या स्थानावरुन थेट १५ वं स्थान मिळवलं आहे. पॅन अमेरिकन चषकात रौप्यपदक मिळवल्याचा चिलीच्या संघाला फायदा झाल्याचं दिसून येतंय. चिली व्यतिरीक्त चेक रिपब्लीक (१९ वं स्थान) आणि सिंगापूर (३५ वं स्थान) यांच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली पहायला मिळते आहे. भारतीय पुरुषांचा हॉकीसंघ क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर कायम आहे.

...Read More

V. S. News
निर्णायक लढतीत धोनीवर लक्ष

व्हीएस न्यूज - पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट लढतीत भारताने, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने वर्चस्व राखले. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटविश्व आतुर असेल. दुसऱ्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघ व्यवस्थापनाने सहाव्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते; पण तरीही धोनीने आक्रमक फटकेबाजी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे भारताला जर हा निर्णायक सामना जिंकायचा असेल तर भारताला धोनीच्या फलंदाजी स्थानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे; पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात असून या सामन्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका सध्याच्या घडीला १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जो जिंकेल त्यांना मालिका खिशात टाकता येईल. गेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रो आणि ट्रेंट बोल्ट यांनी चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भारताकडूनही चांगला प्रतिकार झाला असला तरी त्यांना न्यूझीलंडचे आव्हान गाठता आले नव्हते.

दुसऱ्या सामन्यात कोहलीने अर्धशतकी खेळी साकारली होती, तर धोनीनेही त्याला आक्रमक खेळी साकारत चांगली साथ दिली होती; पण या आजी-माजी कर्णधारांना संघाला विजय मिळवून देता आला नव्हता. रोहित शर्मा, शिखर धवन आणि हार्दिक पंडय़ा हे बिनीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला हा सामना जिंकायचा असेल तर संघाला फलंदाजीवर अधिक भर द्यावा लागेल. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या बोल्टचा सामना कसा करायचा,याची रणनीतीही त्यांना आखावी लागेल. भारताच्या गोलंदाजांनी सातत्यपूर्ण चांगला मारा केला आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा संघाला असेल.

बोल्ट हा न्यूझीलंडच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे. भारताच्या आतापर्यंतच्या दौऱ्यात बोल्टने सातत्यपणे भेदक मारा केला आहे. बोल्ट चांगला मारा करत असला तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळताना दिसलेली नाही. जर दुसऱ्या टोकाकडून त्याला चांगली साथ मिळाली तर हा सामना न्यूझीलंडला जिंकता येऊ शकतो. गेल्या सामन्यात मुन्रोने दमदार शतक झळकावले होते, त्यामुळे या सामन्यात तो कशी फलंदाजी करतो, यावर साऱ्यांचे लक्ष असेल. मुन्रोबरोबरच मार्टिन गप्तिलही चांगल्या फॉर्मात आला आहे. आतापर्यंत गप्तिलला मोठी खेळी साकारता आली नाही. कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.

संघ -

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, लोकेश राहुल.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉड अ‍ॅस्टल, ट्रेंट बोल्ट, टॉम ब्रूस, कॉलिन डी ग्रँडहोमी, मार्टिन गप्तिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, अ‍ॅडम मिल्ने, कॉलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साऊदी.

सामन्याची वेळ : सायं. ७ वा.पासून.

प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.

...Read More

V. S. News
भारताकडून न्यूझीलंडचा ५३ धावांनी धुव्वा

व्हीएस न्यूज - विक्रम, पदार्पण, अलविदा अशा वैविध्यपूर्ण छटा लाभलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवीत तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेकीचा कौल किवी कर्णधार केन विल्यम्सन याच्या बाजूने लागला. त्यानंतर मात्र प्रत्येक फासे भारताच्या बाजूने पडले. रोहित-धवन यांनी विक्रमी सलामी दिली. त्यामुळे भारताने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 202 धावसंख्या उभारली. किवींसाठी हे आव्हान आवाक्‍याबाहेरचे ठरले. त्यांना आठ बाद 149 इतकीच मजल मारता आली. धवन-रोहितने158 धावांची सलामी दिली. ही कोणत्याही विकेटसाठी भारतातर्फे विक्रमी भागीदारी ठरली. यापूर्वी 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट-रोहित यांनी 138 धावांची भागीदारी रचली होती. अंतिम टप्यात विराट आणि धोनी यांनी टोलेबाजी करीत भारताला द्विशतकी टप्पा पार करून दिला. रोहितला 16 धावांवर जीवदान मिळाले. त्याने मिचेल सॅंटनरला षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. धवनलाही जीवदान मिळाले.

नेहराला बहुमान

दिल्ली-जिल्हा क्रिकेट संघटनेने (डीडीसीए) नेहराला अनोखी मानवंदना दिली. फिरोजशाह कोटला मैदानाच्या एका बाजूला आशिष नेहरा एन्ड असे नाव देण्यात आले. हा एन्ड पूर्वी डॉ. आंबेडकर स्टेडियम या नावाने ओळखला जात होता. मंगळवारी गेट क्रमांक दोनला वीरेंद्र सेहवागचे नाव देण्यात आले होते.

संक्षिप्त धावफलक

भारत - 20 षटकांत 3 बाद 202 (रोहित शर्मा 80-55 चेंडू, 6 चौकार, 4 षटकार, शिखर धवन 80- 52 चेंडू, 10 चौकार, 2 षटकार, विराट कोहली नाबाद 26-11 चेंडू, 3 षटकार, धोनी नाबाद 7-2 चेंडू, 1 षटकार, ट्रेंट बोल्ट 4-0-49-1, टीम साऊदी 4-0-44-0, ईश सोधी 4-0-25-2)वि.वि. न्यूझीलंड ः 20 षटकांत 8 बाद 149 (मार्टिन गुप्तिल 4, केन विल्यम्सन 28-24 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, टॉम लॅथम 39-36 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, मिचेल सॅंटनर 27-14 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार, आशिष नेहरा 4-0-29-0, युजवेंद्र चहल 4-0-26-2, अक्षर पटेल 4-0-20-2)

अय्यरचे पदार्पण, नेहराचा अलविदा….

या सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यरने पदार्पण केले, पण त्याला फलंदाजीची संधी मिळू शकली नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. त्याला चार षटकांत एकही विकेट मिळू शकली नाही.

...Read More

V. S. News
भारताची विजयाची हॅटट्रिक, मलेशियावर २-० ने मात

व्हीएस न्यूज - महिलांच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने सलग तिसरा विजय नोंदवत गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात भारतीय महिलांनी मलेशियाच्या संघावर २-० ने मात केली. याआधी भारतीय संघानी सिंगापूर आणि चीनला पराभवाचा धक्का दिला आहे. ९ गुणांसह भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

सिंगापूर आणि चीनविरुद्ध सामन्याच्या तुलनेत मलेशियाच्या संघाने आज भारतीय महिलांना चांगलच झुंजवलं. अखेर वंदना कटारिया (५४ वे मिनीट) आणि गुरजित कौर (५५ वे मिनीट) यांनी लागोपाठ गोल करत भारताचा विजय सुनिश्चीत केला. पहिल्या सत्रात मलेशिया आणि भारताने बचावात्मक खेळ केल्यामुळे गोलपोस्ट रिकामीच राहिली. दुसऱ्या सत्रात मलेशियाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची सुरेख संधी चालून आली होती. मात्र भारतीय बचावपटूंनी मलेशियाचे प्रयत्न हाणून पाडले. यानंतरत मध्यांतरानंतरच्या सत्रातही दोनही संघाकडून गोल करण्याचे जोरदार प्रयत्न झाले, मात्र कोणत्याही संघाला यात यश आलं नाही.

हा सामना बरोबरीत सुटणार असं वाटत असतानाच, वंदना कटारियाने मैदानी गोल करत भारताचं खातं उघडलं. यापाठोपाठ गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नवर गोल करत पाठोपाठ भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर सामना संपण्याच्या वेळेस मलेशियाच्या खेळाडूंनी गोल करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय खेळाडूंचा बचाव भेदणं त्यांना जमलं नाही.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!