Breaking News

कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा | भोसरीला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यासाठी रवी लांडगेंचे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन | मुस्लीम समाज केवळ निवडणुकांपुरता का?; खासदार जलील यांचा राष्ट्रवादी, काँग्रेसला सवाल! | पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत एकूण ७९३ कोटी ८६ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता | वैद्यकीय शिक्षण विभागात आमुलाग्र बदलासाठी काम करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख | ओबीसी समाजचे आरक्षण रद्द होण्यास भाजप जबाबदार – संजोग वाघेरे‌ पाटील | अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक न्यायाची आघाडी | आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई | महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनचळवळ उभारू – महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर | आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या - वसंत लोंढे | महिलांना सन्मान देण्यासाठी सोनिया गांधी यांची प्रमुख भुमिका - सचिन साठे | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मिळकत धारकास सामान्य मिळकत करात शंभर टक्के सूट | झेंडे समुहाकडून २२.४६ कोटींचा बँकेला गंडा’: सेवा विकास बँक घोटाळा | पुण्यातून सतरा वर्षांच्या तीन तरुणी बेपत्ता, अज्ञात इसमांनी पळवून नेल्याचा संशय | पिंपरीच्या डॉ डी. वाय पाटील रुग्णालयात कर्करोगावरील दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी | सभापती नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला! | अण्णासाहेब मगर स्टेडियम खासगीकरण केल्यास कामगार लढा उभारु…..डॉ. कैलास कदम | लाचे प्रकरणी ॲड. नितीन लांडगे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी | भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पालिकेवर प्रशासक नेमावा – माजी आमदार विलास लांडे |
V. S. News
बुमराह, भुवनेश्वर सर्वोत्तम गोलंदाज – रोहित शर्मा

व्हीएस न्यूज - जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे निर्णायक षटकांत अचूक मारा करणारे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत, असे मत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले. ‘बुमराह आणि भुवनेश्वरच्या रूपाने आमच्याकडे दोन सवरेत्कृष्ट गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली भेदक गोलंदाजी पाहता दोघांचेही कौतुक करायला हवे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी मजबूत आहे, त्यांच्याकडे बरेच आक्रमक फलंदाज आहेत. मात्र बुमराह आणि भुवनेश्वरने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्यामुळे भारताला मोठय़ा फरकाने मालिका जिंकण्यात यश आले. न्यूझीलंडविरुद्धही भारताच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. ग्रीन पार्क खेळपट्टीवर रविवारी ४ षटकांत ३५ धावा करणे, शक्य होते. मात्र बुमराह आणि भुवनेश्वरने अचूक मारा करताना किवींना विजयापासून रोखले. केवळ न्यूझीलंडविरुद्ध नाही तर मागील काही सामन्यांत दडपण असूनही गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना विजयात मोलाचे योगदान दिले आहे,’’ असे रोहितने सांगितले.

कानपूरमधील तिसरी एकदिवसीय लढत जिंकून भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली.‘मुंबईतील पहिल्या वनडेत आम्हाला २०-२५ धावा कमी पडल्या. मात्र मागील दोन्ही वनडेत खेळ उंचावला. पिछाडी भरून काढताना क्रिकेटपटूंनी दाखवलेली जिगर उल्लेखनीय आहे,’ असे रोहितने सांगितले.

...Read More

V. S. News
न्यूझीलंडला पराभूत करत भारताने मालिका जिंकली

व्हीएस न्यूज - सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकानंतर अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला ६ धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिका २-० अशी खिशात घातली. भारताने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीवीर कॉलिन मुन्रो (७५) आणि कर्णधार केन विल्यमसन (६४) धावांच्या दमदार खेळीनंतर लॅथमने न्यूझीलंडच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, सामना रंगतदार स्थितीत असताना बुमराहाच्या गोलंदाजीवर तोधावबाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडला निर्धारित ५० षटकात ७ बाद ३३१ धावांपर्यंत मजल मारता आली. मालिकेतील विजयाने भारताने सलग सात द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या शतकाच्या जोरावर भारताने पाहुण्या न्यूझीलंडसमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्ण घेतला. त्यानंतर सातव्या षटकात शिखर धवनला बाद करत त्यांनी चांगली सुरुवात केली. मात्र, रोहित शर्मा (१४७) आणि विराट कोहली (११३) यांना रोखण्यात न्यूझीलंड गोलंदाज अपयशी ठरले. परिणामी निर्धारित ५० षटकात भारताने ६ बाद ३३७ धावांपर्यंत मजल मारली. डावाच्या ४२ व्या षटकात १४७ धावावर खेळत असलेल्या रोहित शर्माला मिचेल सँटनरने बाद केले. त्यानंतर सँटनरच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात पांड्या अवघ्या ८ धावांवर बाद झाला. साऊदीने विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवत चौथा धक्का दिला. न्यूझीलंड गोलंदाज अखेरच्या षटकात भारताला लागोपाठ धक्के देत असताना महेंद्रसिंह धोनीने केदार जाधवच्या साथीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर धोनीही बाद झाला. त्याने १७ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. केदार जाधवने १० चेंडूत १८ तर दिनेश कार्तिकने ३ चेंडूत नाबाद ४ धावा केल्या.

...Read More

V. S. News
न्यूझिलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात १७ विक्रम भारतीय संघाच्या नावावर

व्हीएस न्यूज - कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर खेळवल्या गेलेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ धावांनी मात करुन, २-१ या फरकाने मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारताने न्यूझीलंडलाही घरच्या मैदानावर पुन्हा एकदा पराभवाचं पाणी पाजलं. कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मांनी शतकी खेळी करुन भारताला ३३७ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

भारताने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना कॉलिन मुनरो आणि कर्णधार केन विलियमसनने न्यूझीलंडला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडचा संघ संकटात सापडला. यावेळी पहिल्या सामन्यातील शतकवीर टॉम लॅथमने रॉस टेलर आणि हेन्री निकोलस या खेळाडूंसोबत छोट्या भागीदाऱ्या रचून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या कामगिरीमुळे न्यूझीलंडला ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान या सामन्यात भारतीय खेळाडूंनी तब्बल १७ विक्रमांची नोंद केली.

१ – या वर्षात २ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे.

२- कर्णधार म्हणून विराट कोहलीने सर्वात जलद ५ हजार धावांचा टप्पाही ओलांडला. ९३ डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली आहे.

३- वन-डे सामन्यांमध्ये सर्वात कमी डावात ९ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू ठरलाय. विराटने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सचा विक्रम मोडला. डिव्हीलियर्सने २०५ डावांमध्ये ९ हजार धावा काढल्या होत्या, तर विराट कोहलीने हा टप्पा केवळ १९४ धावांमध्ये पूर्ण केला आहे.

४ – एका वर्षात २ हजार पेक्षा जास्त धावा करण्याची विराट कोहलीची ही दुसरी वेळ ठरली.

५ – विराट कोहलीपाठोपाठ २०१७ या वर्षात १ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू ठरला.

६ – वन-डे क्रिकेट सामन्यात सर्वात जलद १५० षटकार ठोकणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू ठरलाय. १६५ डावांमध्ये रोहितने ही किमया साधली आहे.

७ – मार्टीन गप्टीलला बाद करत जसप्रीत बुमराहने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ५० वा बळी टिपला. केवळ २८ सामन्यांमध्ये बुमराहने ही कामगिरी केली आहे. अजित आगरकरनंतर सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. अजित आगरकरने आपल्या २३ व्या सामन्यात ५० वा बळी टिपला होता.

७ – विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये ४ द्विशतकी भागीदाऱ्या जमा आहेत.

८ – वन-डे क्रिकेटमध्ये १५० षटकार ठोकणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय खेळाडू ठरला.

९ – एका कॅलेंडर वर्षात कर्णधार या नात्याने ६ शतकं झळकावणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरला आहे.

१० – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सातवी द्विपक्षीय वन-डे मालिका जिंकली. सर्वात जास्त मालिका कर्णधार म्हणून जिंकण्याचा विक्रम आता कोहलीच्या नावावर जमा झालाय.

११ – भारताची सलामीची जोडी कालच्या सामन्यात ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करण्यासाठी १० वेळा अपयशी ठरली.

१२- विराट कोहलीने आतापर्यंत २०० वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. आपल्या संघाचं सर्वाधीकवेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहलीचा समावेश.

१३ – विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत वन-डे क्रिकेटमध्ये १२ शतकी भागीदाऱ्या जमा आहेत.

१४ – कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं कालच्या सामन्यात १३ वं अर्धशतक. सर्वाधीक अर्धशतकं झळकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराटला दुसरं स्थान.

१५ – घरच्या मैदानावरचं विराट कोहलीचं हे १४ वं शतक ठरलं. या यादीत सचिन तेंडुलकर विराट कोहलीच्या पुढे आहे, सचिनच्या नावावर घरच्या मैदानात २० शतकांची नोंद आहे.

१४६० – २०१७ या वर्षात विराट कोहलीने आतापर्यंत १४६० धावा काढल्या आहेत. एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधीक धावा काढणाचा, ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटींगचा विक्रम विराटने मोडला. रिकी पाँटींगने २

...Read More

V. S. News
मुंबईकर श्रेयसची मास्टर ब्लास्टरच्या विक्रमाशी बरोबरी

व्हीएस न्यूज - न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या श्रेयस अय्यरने रणजी सामन्यात सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. रणजी सामन्यात मुंबईकडून खेळणाऱ्या श्रेयसने तामिळनाडूविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने २१ वर्षापूर्वी केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यातील अपयशानंतर रणजी सामन्यात त्याने पुन्हा एकदा धमाका केला. वांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानात मुंबईच्या दुसऱ्या डावात श्रेयसने १२४ चेंडूत १३८ धावांची दमदार खेळी केली. चांगल्या लयीत खेळत असताना तो धावबाद झाला. धावबाद झाल्यामुळे मोठा विक्रम करण्याची अय्यरची संधी हुकली असली तरी रणजीच्या इतिहासात मुंबईकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या सचिनच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने १९९६ मध्ये रणजी सामन्यात एका डावात ९ षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता.

रणजी सामन्यात मुंबईकडून सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा माजी क्रिकेटर आणि भारताचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावे आहे. त्यांनी १९८५ मध्ये बडोद्याविरुद्धच्या सामन्यात १२३ चेंडूत नाबाद २०० धावांची खेळी केली होती. यात त्यांनी १३ षटकार मारले होते. याच सामन्यात शास्त्रींनी एका षटकात सहा षटकार खेचले होते. भारत- न्यूझीलंड यांच्यात १ नोव्हेंबरला दिल्लीत, ४ नोव्हेंबरला राजकोटमध्ये आणि ७ नोव्हेंबरला थिरुवनंतपूरला टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. रणजीतील वादळी खेळी श्रेयसला या सामन्यात टीम इलेव्हनमध्ये स्थान देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

...Read More

V. S. News
आयपीएल हंगामाआधी चेन्नई, राजस्थान संघांचे पुनरागमन

व्हीएस न्यूज – स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दोन वर्षांच्या बंदीचा काळ सरल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आयपीएलच्या ११ व्या हंगामात पुनरागमनासाठी सज्ज झालेले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आपल्या नावावर लागलेला डाग पुसून टाकण्यासाठी राजस्थानच्या संघाने कंबर कसलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या नावातील राजस्थान हा शब्द वगळला असून यापुढे हा संघ केवळ रॉयल्स या नावाने ओळखला जाणार आहे. याचसोबत राजस्थानच्या संघव्यवस्थापनाने आपला तळ राजस्थानवरुन पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने या बदलांना मान्यता दिल्याचंही समजतंय.

याशिवाय चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक आणि इंडियन सिमेंट कंपनीचे सर्वेसर्वा एन.श्रीनीवासन यांनी आपल्या मालकीचे समभाग कंपनीतल्या इतर भागधारकांच्या नावावर केले आहेत. २०१५ साली गाजलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा आणि एन. श्रीनीवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन हे दोषी आढळले होते. यानंतर बीसीसीआयने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती मुकुल मुदगल समितीने दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घातली होती. दरम्यानच्या काळात बीसीसीआयमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टीस लोढा समितीने गुरुनाथ मय्यप्पन आणि राज कुंद्रा यांना भारतीय क्रिकेटमधून बेदखल करण्याची शिक्षा सुनावली होती.

पुणे सुपरजाएंट संघाचे मालक संजीव गोएंका यांच्याशी झालेल्या करारानुसार राजस्थान संघ व्यवस्थापनाने आपल्या नावातील राजस्थान हा शब्द वगळून केवळ रॉयल्स हा शब्द ठेवल्याचं समजतंय. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत पुण्याच्या संघात चेन्नईच्या अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली होती. त्यामुळे नवीन हंगामासाठी केलेला हा बदल चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांसाठी किती फायदेशीर ठरतो हे पहावं लागणार आहे.

...Read More

V. S. News
कोहलीच्या जागी रोहित शर्माची कर्णधारपदी वर्णी!

व्हीएस न्यूज - कोलकात्यात १६ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहलीच्या जागी कर्णधारपदी रोहित शर्माची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. करीयरच्या महत्वाच्या टप्प्यावर असलेला विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. परंतू विराट काही दिवसांसाठी कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ३१ वे शतक झळकवून विराटने सर्वाधिक शतके झळकावणा-या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र विराटला काही दिवसांसाठी क्रिकेटमधून ब्रेक हवा आहे. तसे त्याने बीसीसीआयला कळवले आहे. विराटने खासगी कारणांसाठी विश्रांती मागितली असल्याने पुन्हा एकदा त्याच्या आणि अनुष्काच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान विराट सुट्टीवर गेल्यानंतर त्याच्या जागी रोहित शर्माची कर्णधारपदी वर्णी लागू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी कर्णधारपदी रोहितची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने मुंबईकर अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या कसोटीसाठी रहाणेला कर्णधारपद मिळू शकते. बीसीसीआयने दोन कसोटींसाठी संघ निवडला आहे. विराट तिस-या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे.

विराटच्या जागी रोहितची निवड करण्यामागे फॉर्म किंवा लीडरशीप क्वालिटी याचा काहीही संबंध नाही. फक्त भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता तात्पुरत्या स्वरुपाचा हा बदल केला जाऊ शकतो.

विराटच्या सुट्टी अर्जाबाबत नेमके कारण समोर अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. मात्र, डिसेंबर महिन्यात विराटला अनुष्कासोबत लग्न करायचे असल्याने त्याने बोर्डाकडे सुट्टीची मागणी केली आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. तर दुसरीकडे जानेवारी २०१८ला टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका दौ-यापूर्वीच विराट-अनुष्काला लग्नगाठ बांधायची असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

कोहलीची विश्रांती लांबवली-

संघ निवडीआधी कॅप्टन विराट कोहलीला विश्रांती मिळणार असल्याची मोठी चर्चा रंगली होती. मात्र, कोहलीने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका आणि लंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यादरम्यान ब्रेक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. लंकेविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने अनुक्रमे कोलकाता व नागपूर येथे खेळविण्यात येतील. त्याचवेळी, कर्णधारासाठीही रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल, असे राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यासह मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये कोहलीला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, यानंतर होणा-या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खडतर दौ-यासाठी कोहली तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे.

...Read More

V. S. News
मगच… पाकिस्तान भारतात वनडे लीग खेळणार

व्हीएस न्यूज - कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये काही अमुलाग्र बदल करत आयसीसीने काही दिवसांपूर्वी कसोटी अजिंक्यपद आणि वन-डे लीग स्पर्धेची घोषणा केली. या स्पर्धेत आयसीसीशी संलग्न असलेल्या प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावर आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर सामने खेळायचे आहेत. २०१९ च्या विश्वचषकानंतर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेत सहभागी होण्याआधी आयसीसीवर दबावतंत्र टाकायला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने द्विपक्षीय कराराचं पालन केलं तरच आम्ही आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद आणि वन-डे लीग स्पर्धेत भाग घेऊ असा पवित्रा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

” जोपर्यंत बीसीसीआय आमच्यात झालेल्या कराराचं पालन करत नाही, तोपर्यंत आम्ही वन-डे लीग आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या करणार नाही. या कराराचं पालन झालं तरच पाकिस्तानचा संघ आयसीसीच्या या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवेल”,असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

जर भारत-पाक सामन्यांशिवाय आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद आणि वन-डे लीग स्पर्धेला महत्व प्राप्त होणार नाही. प्रत्येक क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयसीसीच्या करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. मात्र २०१४ साली बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या कराराचं बीसीसीआय पालन करत नाही. तोपर्यंत पाकिस्तान आयसीसीच्या करारावर स्वाक्षऱ्या करणार नाही असा पवित्रा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलाय.

२०१४ साली भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या करारानूसार दोन्ही संघाना २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा मालिका खेळणं अनिवार्य होतं. मात्र पाकिस्तानकडून सतत होणारे अतिरेकी हल्ले पाहता, भारताने पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारे क्रीडासंबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भारत-पाक क्रिकेट सामन्यांचं घोंगड हे भिजत पडलंय. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या भूमिकेवर आयसीसी काय निर्णय घेतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

...Read More

V. S. News
कुलदीप-चहलचा सामना करणे आव्हान, केन विल्यमसन

व्हीएस न्यूज - भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांचा सामना करणे आम्हाला आव्हानात्मक ठरेल, अशी कबुली न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने रविवारी दिली.

‘‘कुलदीप आणि चहल हे दोघेही गुणी गोलंदाज आहेत. आयपीएलमध्ये त्यांनी स्वत:ला सिद्ध केल्यानंतर आता भारताचे प्रतिनिधित्व करताना चांगले यश मिळवले आहे. त्यामुळेच त्यांच्या गोलंदाजीचा सामना करणे आम्हाला आव्हानात्मक ठरेल,’’ असे विल्यमसनने सांगितले.

‘‘मुळात ‘चायनामन’ गोलंदाज हे क्रिकेटमध्ये कमी घडतात. परंतु या गोलंदाजांनी उत्तम यश मिळवले आहे. कुलदीप आणि चहल हे दोघेही कौशल्यापूर्ण गोलंदाजी करतात. मात्र वातावरण आणि खेळपट्टीचा अचूक अंदाज घेऊन त्यानुसार गोलंदाजी करणे महत्त्वाचे असते,’’ असे विल्यमसन म्हणाला.

आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघातून अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे कुलदीप,चहल आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांच्यावर भारताच्या फिरकीची धुरा आहे. याबाबत विचारले असताना विल्यमसन म्हणाला, ‘‘भारताकडे अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. त्यामुळे अश्विन-जडेजा यांना कदाचित विश्रांती दिली असावी. क्रिकेटच्या हंगामात बरेचसे सामने खेळायचे असतात. त्यामुळे आम्हीसुद्धा खेळाडूंचे अशा प्रकारे व्यवस्थापन करतो. प्रत्येक खेळाडूला क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळणे आता शक्य नाही. कारण आता वर्षभर क्रिकेटची रेलचेल असते.’’

न्यूझीलंडच्या बऱ्याचशा फलंदाजांनी आयपीएलमध्ये कुलदीपच्या गोलंदाजीचा सामना केला आहे. यापैकी काही जण त्याच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाकडूनच खेळतात. त्यामुळे त्यांना कुलदीपच्या गोलंदाजीची चांगली माहिती आहे. माइक हेसन, न्यूझीलंडचे प्रशिक्षक

...Read More

V. S. News
WWE मध्ये खेळणार भारतातील पहिली महिला खेळाडू

व्हीएस न्यूज - WWE (वर्ल्ड रेसलिंग इन्टरटेंनमेंट) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेचच द ग्रेट खली या भारतीय पैलवानाचं नाव येते. खलीनंतर जिंदर महलनेही WWEमध्ये नाव कमावलं. आता यांच्याबरोबरीने पॉवरलिफ्टर चॅम्पियन कविता देवी ही WWEच्या रिंगणात उतरणार आहे. तिने नुकतेच यासंबंधी WWE बरोबर करार केला आहे. कविता देवी WWEमधील पहिली भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे. जिंदर महलनेच यासंबंधीची माहिती आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान दिली.

मुळची हरयाणाची असलेल्या कविताने रेसलिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण द ग्रेट खली (दलीपसिंग राणा) याच्या पंजाबमधील अॅकडमीमध्ये पूर्ण केले आहे. महिला कुस्तीपटू बी बी बुल बुल विरूद्ध लढतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कविता देवी कमालीची लोकप्रिय झाली होती. विशेष म्हणजे कविता देवीने २०१६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्टींगमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.

कविता देवीने यापूर्वी महिलांच्या मई यंग क्लासिक टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला होता. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यापासून WWEच्या ओरलँडो येथील परफॉर्मन्स सेंटरमध्ये तिच्या प्रशिक्षणास सुरूवात होईल. WWEमध्ये सहभागी होणारी भारताची पहिली महिला खेळाडू होणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे कविता देवीने म्हटले आहे. मई यंग या जागतिक स्पर्धेत सहभाग नोंदवल्याचा मोठा फायदा झाला. जागतिक दर्जाच्या महिला रेसलरचा यात समावेश होता. माझ“यासाठी ही स्पर्धा अनुभव देणारी ठरली. आता WWE च्या महिला चॅम्पियनशीपचं जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्याची मला संधी आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली.

जिंदर महलने कविताला शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला की, कविता WWEमध्ये येणे हे गौरवास्पद आहे. भारताची पहिला महिला WWE स्टार होण्याची तिला संधी आहे. भारतीय युवकांची ती प्रेरणास्थान ठरेल. तिच्या कारकिर्दीस शुभेच्छा. त्याचबरोबर WWE ने आणखी एका महिला खेळाडूंचा आपल्या चॅम्पियनशीपमध्ये समावेश केला आहे. जॉर्डनची शादिया बेसिसोबरोबरही त्यांनी करार केला आहे. WWE च्या रिंगणात उतरणारी ती पहिला अरब महिला ठरेल.

...Read More

V. S. News
आकाश चिकटेला सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार

व्हीएस न्यूज - भारतीय हॉकी संघात पी. आर. श्रीजेशनंतर गोलकिपरची महत्वाची भूमिका बजावणारा आकाश चिकटे आणि नाशिकचा बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर विदीत गुजराथी यांना मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या सर्वोत्तम क्रीडापटूंचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या २३ ऑक्टोबर रोजी बॉम्बे जिमखान्यात सर्व क्रीडापटूंना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

यवतमाळसारख्या छोट्या शहरातून आलेला आकाश चिकटे सध्या पुण्यात वास्तव्याला आहे. २०१६ साली मलेशियात पार पडलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आकाशने चमकदार कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. यानंतर आपल्या कामगिरीत सुधारणा करत आकाश सध्या भारतीय हॉकी संघाचा अविभाज्य भाग बनला आहे. २२ वर्षीय विदीत गुजराथीने २७०० एलो रेटींग पॉईंट्सचा टप्पा पार करत विक्रम रचला होता. विश्वनाथन आनंद, पेंटला हरिकृष्णन, कृष्णन शशिकरण यांच्यातर ही किमया साधणारा विदीत चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

याशिवाय, मुंबईच्या आदिती धुमातकर हिला सर्वोत्तम महिला क्रीडापटू तर पुण्याचा ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक सर्वोत्तम ज्युनिअर क्रीडापटू पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. तर कॅरमपटू प्रशांत मोरे, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यांनाही क्रीडा संघटनेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.

मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या वार्षिक पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी

१. सर्वोत्तम क्रीडापटू विदीत गुजराथी (बुद्धिबळ, नाशिक), आकाश चिकटे (हॉकी, पुणे)

२. सर्वोत्तम महिला क्रीडापटू आदिती धुमातकर (जलतरण, मुंबई)

३. सर्वोत्तम ज्युनिअर क्रीडापटू अभिमन्यू पुराणिक (बुद्धिबळ, पुणे)

४. सर्वोत्तम ज्युनिअर महिला क्रीडापटू रायना सलधाना (जलतरण, मुंबई), दिव्या चितळे (टेबल टेनिस, मुंबई)

५. सर्वोत्तम क्रीडापटू, भारतीय खेळ प्रशांत मोरे (कॅरम, मुंबई)

६. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू केदार जाधव

७. सर्वोत्कृष्ट रणजीपटू अभिषेक नायर (मुंबई)

८. सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना (सांगली)

९. सर्वोत्कृष्ट ज्युनिअर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (मुंबई)

१०. सर्वोत्कृष्ट संघ मुंबई इंडियन्स

११. सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरी मुंबई सीटी एफसी

१२. सर्वोत्कृष्ट महाविद्यालय रिझवी कॉलेज, मुंबई

१३. सर्वोत्कृष्ट शाळा डॉन बॉस्को हायस्कुल, माटुंगा

...Read More

V. S. News
आशिष नेहराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

व्हीएस न्यूज - गेली १८ वर्ष भारतीय गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे बाळगणारा आशिष नेहरा आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. येत्या १ नोव्हेंबरला आशिष नेहरा न्यूझीलंडविरुद्ध आपला अखेरचा सामना खेळणार आहे. नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.

होय, आशिष नेहराने आपल्या निवृत्तीचा निर्णय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना कळवला आहे. सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपर्यंत आशिष नेहरा खेळणार होता, मात्र यानंतर आपल्या निवृत्तीसाठी हीच वेळ योग्य असल्याचं बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणलं आहे. आशिष नेहरानंतर भारतीय गोलंदाजीची धुरा ही भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या त्रिकुटावर असणार आहे. याचसोबत आशिषने आगामी आयपीएल हंगामातही न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. २०१७ साली झालेल्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे आशिष नेहरा आयपीएलचे सामने खेळू शकला नव्हता.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानूसार न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर आशिष नेहरा आपल्या निवृत्तीची घोषणा करु शकतो. नेहराने आतापर्यंत १७ कसोटी, १२० वन-डे आणि २६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र अनेक वेळा दुखापतीमुळे नेहराला संघाबाहेर बसावं लागलं होतं. आपल्या १८ वर्षांच्या कालावधीत आशिष नेहराने भारतीय गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली आहे. विशेषकरुन टी-२० सामन्यांमध्ये नवीन चेंडु हाताळण्याची आशिष नेहराची हातोटी वाखणण्याजोगी आहे. याच कारणासाठी निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आशिष नेहराला संघात जागा दिली आहे. पहिल्या दोन टी-२० सामन्यात नेहराला संघात जागा मिळाली नव्हती.

...Read More

V. S. News
मालिका जिंकण्यासाठी “टीम इंडिया’ उत्सुक;ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज दुसरा टी-20 सामना

व्हीएस न्यूज - भारताने पहिला टी-20 सामना सहज जिंकत आपले वर्चस्व कायम राखले. आता उभय संघांमध्ये आज होणाऱ्या दुसरा टी-20 सामना जिंकून झटपट क्रिकेटच्या मालिकेतही विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाने विश्‍वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा 4-1 असा धुव्वा उडविला होता. त्यानंत पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 9 गडी राखून विजयाची नोंद केली होती. हीच विजयमालिका कायम राखण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या 14 टी-20 सामन्यांतील 10 सामने जिंकून येथेही आपले वर्चस्व राखले आहे. इतकेच नव्हे तर 28 सप्टेंबर 2012 नंतर टी-20 क्रिकेटमध्ये भारताने कांगारूंविरुद्ध पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. त्यामुळेच उद्याच्या सामन्यात भारताव विजय मिळविण्यासाठी कांगारूंना सर्वोत्तम कामगिरीचीच नोंद करावी लागेल. नियमित कर्णधार स्टीव्हन स्मिथ दुखापतीमुळे उपलब्ध नसताना त त्यांचत्यासाठी ही कामगिरी अधिकच आव्हानात्मक आहे.

भाताला पराभूत करण्करिता ऑस्ट्रेलियाला किमान तीन बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. पहिली म्हणजे त्यांना कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चाहल या रिस्ट स्पिनर्सच्या वैविध्यपूर्ण आणि गूढ गोलंदाजीचे कोडे साडवावे लागेल. या दोघांनी मिळून चार वन डे आणि पहिली टी-20लढत मिळून 16 बळी घेतले आहेत. अनेक ऑसी फलंदाज आयपीएलमध्ये खेळत असल्याने त्यांच्यासाठी भातीय हवामान आणि खेळपट्ट्या हे आव्हान राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचे अपयश अधिक आश्‍चर्यकारक आणि ऑसी संघव्यवस्थापनासाठी चिंताजनक ठरले आहे.

त्याचप्रमाणे स्मिथच्या गैरहजेरीत पहिल्या टी-20 सामन्यात झालेली ऑस्ट्रेलियाची घसगुंडी त्यांच्यावरील दडपण वाढविणारी आहे. या सामन्यात जेमतेम 118 धावांची मजल मारता आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला उद्याच्या लढतीत किमान आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल. वॉर्न व मॅक्‍सवेल अपयशी ठरत असताना केवळ फिंचवर ऑस्ट्रेलियन फलंदाजीची मदार आहे. परंतु सातत्याने फिरकीविरुद्ध अपयशी ठलेल्या मॅक्‍सवेलला फिंचने पाठिंबा दिला आहे.

भारतीय खेळाडूंना आपली चांगली कामगिरी कायम राखण्याचीच जबाबदारी पार पाडावी लागेल. अश्‍विन व जडेजाला बाहेर ठेवून कुलदीप व चाहल यांना दिलेल्या संधीचे त्यांनी चीज केले आहे. चाहलने तर चार वेळा मॅक्‍सवेलला बाद करून भारतासमोरचा मोठाच अडथळा बाजूला केला आहे. टी-20 मालिकेसाठी परतलेला शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्य कामगिरीतील सातत्य कायम राखल्यास भाताला उद्याही विजय मिळविणे अवघड जाऊ नये.

प्रतिस्पर्धी संघ-

भारत विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), अजिंक्‍य रहाणे, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चाहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, आशिष नेहरा व महंमद शमी.

ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जेसन बेहरेन्डॉर्फ, डॅनियल ख्रिस्टियन, नॅथन कूल्टर-नाईल, ऍरॉन फिंच, ट्रेव्हिस हेड, मोझेस हेन्‍रिक्‍स, ग्लेन मॅक्‍सवेल, टिम पेने, केन रिचर्डसन, ऍडम झाम्पा, माकर्स स्टॉइनिस व अँड्रयू टाय.

सामन्याचे ठिकाण- गुवाहाटी. सामन्याची वेळ- सायं. 7-00 पासून.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!